शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
2
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
3
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
4
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
5
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
6
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
7
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
8
बेडरूममध्ये कॅमेरा बसवून खासगी व्हिडीओ काढले अन् परदेशात...; पत्नीने समोर आलं पतीचे किळसवाणं कृत्य
9
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
10
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!
11
सणासुदीच्या तोंडावर सोन्या-चांदीचे दर घसरले! तुमच्या शहरात आज एका तोळ्याची किंमत किती?
12
POKमध्ये पाकचे अत्याचार, भारताची पहिली प्रतिक्रिया; असीम मुनीर यांचा घेतला खरपूस समाचार
13
'आता संयम ठेवणार नाही; पाकिस्तानला जगाच्या नकाशावरुन मिटवू...', लष्करप्रमुखांचा पाकला थेट इशारा
14
भारीच! महागडे प्रोडक्ट सोडा... गळणाऱ्या केसांवर रामबाण उपाय; एकदा करून बघाच
15
“मुंबईच्या गरब्यात सेलिब्रिटींवर लाखोंची उधळण, तेच पैसे शेतऱ्यांना दिले असते”: रोहित पाटील
16
Video: अमानवीय! आधी टक्कर मारली, मग गाडीखाली चिरडले; बैलाची अतिशय क्रुर हत्या...
17
इंट्राडे उच्चांकावरून थेट ११% घसरला हा शेअर, गुंतवणूकदारांना मोठा फटका; रेखा झुनझुनवालांचीही गुंतवणूक
18
Bhiwandi Crime: तोंडात कुरकुरे अन् निपचित पडलेला मृतदेह; कोर्टातून फरार झालेल्या आरोपीचा चिमुकलीवर अत्याचार
19
सचिन तेंडुलकरची गुंतवणूक असलेला शेअर रॉकेट बनला, झटक्यात 10% वधारला! दिला जातोय खरेदीचा सल्ला
20
Navi Mumbai Crime: इन्स्टाग्रावर ओळख, वाशीमध्ये भेटायला बोलावले; 16 वर्षाच्या मुलीवर कारमध्येच...

शहर स्वच्छतेचे नियोजन कोलमडले

By admin | Updated: June 11, 2014 00:09 IST

पावसाळा आता अगदी तोंडावर आला आहे. मात्र अजूनही शहरातील अनेक भागात नाल्यांची साफसफाई झालेली नाही. ठिकठिकाणी पडलेले सांडपाणी वाहून जाणाऱ्या नाल्यांवर बड्या असामींनी अतिक्रमण करुन ठेवले आहे

गोंदिया : पावसाळा आता अगदी तोंडावर आला आहे. मात्र अजूनही शहरातील अनेक भागात नाल्यांची साफसफाई झालेली नाही. ठिकठिकाणी पडलेले सांडपाणी वाहून जाणाऱ्या नाल्यांवर बड्या असामींनी अतिक्रमण करुन ठेवले आहे. शहरातील पाणी बाहेर नेणारे नालेदेखील कचऱ्यामुळे तुंबले आहेत. अनेक ठिकाणी कचरा साचलेला आहे. पण पालिका प्रशासनाने मान्सूनपूर्व तयारीसंदर्भात अद्याप गांभिर्याने पुढाकार घेतला नसल्याचे दिसून येते.गोंदिया नगर परिषद आपल्या कार्यपद्धतीने नेहमीच प्रकाशझोतात असते. शहरातील नाल्यांवर झालेले अतिक्रमण असो, आरक्षित जमिनी विक्रीचा प्रश्न, नियोजन न करताच करण्यात आलेली लाखोंची कामे किंवा रस्त्यांची झालेली दैनावस्था. प्रत्येकच बाबतीत येथील पालिका जनतेच्या हिताची नसल्याची बाब कित्येकदा पालिकेतीलच काही नगरसेवक आणि नागरिकांनी बोलून दाखविली आहे. पावसाळा सुरू होण्याकरिता काही दिवसांचा कालावधी शिल्लक असताना नगर परिषदेच्या वतीने अद्यापही शहरातील गटारे व नाल्यांची पूर्णपणे साफसफाई केलेली नाही. त्यामुळे पावसाळ्याच्या दिवसात शहरातील नागरिकांना पुन्हा विविध समस्यांना तोंड द्यावे लागणार आहे.पालिका प्रशासन नागरिकांचे प्रश्न सोडविण्याची बाब तर दूरच, साधे खंडन करण्याचे सौजन्यदेखील दाखवीत नाही. पावसाळा सुरू होण्यास काहीच दिवस शिल्लक राहिले आहेत. त्या संबंधाने जिल्हाधिकारी कार्यालयात देखील आपत्तीजनक स्थितीत प्रशासन काय करेल? यासंदर्भात आढावा घेण्यात आला. मात्र यानंतरदेखील नगर परिषदेने मान्सूनपूर्व कामाचे नियोजन केवळ कागदावरच केले असल्याचे चित्र दिसून येत आहे. पावसाळ्याच्या दिवसात शहराच्या काही भागात नाल्या व गटारातील पाणी रस्त्यांवरुन वाहत असल्याने नागरिकांची चांगलीच गैरसोय होते. शहरातील सांडपाणी वाहून जाण्याकरिता नाल्या तयार करण्यात आल्या आहेत. मात्र त्या नाल्यांवर बड्या असामींनी बांधकाम केले आहे. त्यामुळे त्या नाल्यांची स्वच्छता होत नाही. नाल्यांमध्ये कचरा साचला असल्यामुळे सांडपाणी मुख्य नालीपर्यंत पोहोचत नाही. नाल्या कचऱ्याने तुंबल्यामुळे पावसाळ्याच्या दिवसात पावसाचे पाणी रस्त्यांवर साचून राहते. त्यामुळे रहदारीला अडथळा निर्माण होते. रिंगरोडच्या पलीकडे नव्याने तयार झालेल्या कॉलनीतील घरांच्या बांधकामाकडे ‘टाऊन प्लॅनिंग’ विभागाने दुर्लक्ष केल्यामुळे येथील नागरिकांना दरवर्षी पुराच्या पाण्याचा फटका बसतो. त्याचबरोबर शहरातील पावसाचे आणि सांडपाणी बाहेर जाणाऱ्या मोठ्या नाल्यांवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण करण्यात आले आहे. त्यासह उरलेले नाले कचऱ्याने तुंबले असल्यामुळे त्यातील पाणी वाहून जाऊ शकत नाही. परिणामी शहरातील घरांमध्ये पावसाचे पाणी शिरण्याचा प्रकार दरवर्षी अनुभवास येतो. पालिका प्रशासनाला नागरिक ठरलेल्या कराची रक्कम दरवर्षी भरत असतानादेखील नागरिकांच्याच आरोग्य आणि सोयी-सुविधांकडे पालिका प्रशासन अक्षम्य दुर्लक्ष करत असल्यामुळे नागरिकांत नाराजीचा सूर पसरला आहे. नगर परिषदेच्या वतीने दरवर्षीच ऐन पावसाळ्यात नाल्यांच्या सफाईच्या कामाला सुरूवात केली जाते. त्यामुळे रस्त्यांवर सर्वत्र चिखलाचे साम्राज्य निर्माण होते. ही समस्या आता शहराकरिता दरवर्षीची झाली आहे. (जिल्हा प्रतिनिधी)