शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

शहर स्वच्छतेचे नियोजन कोलमडले

By admin | Updated: June 11, 2014 00:09 IST

पावसाळा आता अगदी तोंडावर आला आहे. मात्र अजूनही शहरातील अनेक भागात नाल्यांची साफसफाई झालेली नाही. ठिकठिकाणी पडलेले सांडपाणी वाहून जाणाऱ्या नाल्यांवर बड्या असामींनी अतिक्रमण करुन ठेवले आहे

गोंदिया : पावसाळा आता अगदी तोंडावर आला आहे. मात्र अजूनही शहरातील अनेक भागात नाल्यांची साफसफाई झालेली नाही. ठिकठिकाणी पडलेले सांडपाणी वाहून जाणाऱ्या नाल्यांवर बड्या असामींनी अतिक्रमण करुन ठेवले आहे. शहरातील पाणी बाहेर नेणारे नालेदेखील कचऱ्यामुळे तुंबले आहेत. अनेक ठिकाणी कचरा साचलेला आहे. पण पालिका प्रशासनाने मान्सूनपूर्व तयारीसंदर्भात अद्याप गांभिर्याने पुढाकार घेतला नसल्याचे दिसून येते.गोंदिया नगर परिषद आपल्या कार्यपद्धतीने नेहमीच प्रकाशझोतात असते. शहरातील नाल्यांवर झालेले अतिक्रमण असो, आरक्षित जमिनी विक्रीचा प्रश्न, नियोजन न करताच करण्यात आलेली लाखोंची कामे किंवा रस्त्यांची झालेली दैनावस्था. प्रत्येकच बाबतीत येथील पालिका जनतेच्या हिताची नसल्याची बाब कित्येकदा पालिकेतीलच काही नगरसेवक आणि नागरिकांनी बोलून दाखविली आहे. पावसाळा सुरू होण्याकरिता काही दिवसांचा कालावधी शिल्लक असताना नगर परिषदेच्या वतीने अद्यापही शहरातील गटारे व नाल्यांची पूर्णपणे साफसफाई केलेली नाही. त्यामुळे पावसाळ्याच्या दिवसात शहरातील नागरिकांना पुन्हा विविध समस्यांना तोंड द्यावे लागणार आहे.पालिका प्रशासन नागरिकांचे प्रश्न सोडविण्याची बाब तर दूरच, साधे खंडन करण्याचे सौजन्यदेखील दाखवीत नाही. पावसाळा सुरू होण्यास काहीच दिवस शिल्लक राहिले आहेत. त्या संबंधाने जिल्हाधिकारी कार्यालयात देखील आपत्तीजनक स्थितीत प्रशासन काय करेल? यासंदर्भात आढावा घेण्यात आला. मात्र यानंतरदेखील नगर परिषदेने मान्सूनपूर्व कामाचे नियोजन केवळ कागदावरच केले असल्याचे चित्र दिसून येत आहे. पावसाळ्याच्या दिवसात शहराच्या काही भागात नाल्या व गटारातील पाणी रस्त्यांवरुन वाहत असल्याने नागरिकांची चांगलीच गैरसोय होते. शहरातील सांडपाणी वाहून जाण्याकरिता नाल्या तयार करण्यात आल्या आहेत. मात्र त्या नाल्यांवर बड्या असामींनी बांधकाम केले आहे. त्यामुळे त्या नाल्यांची स्वच्छता होत नाही. नाल्यांमध्ये कचरा साचला असल्यामुळे सांडपाणी मुख्य नालीपर्यंत पोहोचत नाही. नाल्या कचऱ्याने तुंबल्यामुळे पावसाळ्याच्या दिवसात पावसाचे पाणी रस्त्यांवर साचून राहते. त्यामुळे रहदारीला अडथळा निर्माण होते. रिंगरोडच्या पलीकडे नव्याने तयार झालेल्या कॉलनीतील घरांच्या बांधकामाकडे ‘टाऊन प्लॅनिंग’ विभागाने दुर्लक्ष केल्यामुळे येथील नागरिकांना दरवर्षी पुराच्या पाण्याचा फटका बसतो. त्याचबरोबर शहरातील पावसाचे आणि सांडपाणी बाहेर जाणाऱ्या मोठ्या नाल्यांवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण करण्यात आले आहे. त्यासह उरलेले नाले कचऱ्याने तुंबले असल्यामुळे त्यातील पाणी वाहून जाऊ शकत नाही. परिणामी शहरातील घरांमध्ये पावसाचे पाणी शिरण्याचा प्रकार दरवर्षी अनुभवास येतो. पालिका प्रशासनाला नागरिक ठरलेल्या कराची रक्कम दरवर्षी भरत असतानादेखील नागरिकांच्याच आरोग्य आणि सोयी-सुविधांकडे पालिका प्रशासन अक्षम्य दुर्लक्ष करत असल्यामुळे नागरिकांत नाराजीचा सूर पसरला आहे. नगर परिषदेच्या वतीने दरवर्षीच ऐन पावसाळ्यात नाल्यांच्या सफाईच्या कामाला सुरूवात केली जाते. त्यामुळे रस्त्यांवर सर्वत्र चिखलाचे साम्राज्य निर्माण होते. ही समस्या आता शहराकरिता दरवर्षीची झाली आहे. (जिल्हा प्रतिनिधी)