शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: भगूर नगरपरिषदेत शिवसेनेची २५ वर्षांची सत्ता अजितदादांच्या राष्ट्रवादीने उलथवली; पहा लेटेस्ट अपडेट
2
अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी
3
Akkalkot Nagar Parishad Election Result 2025: फटाक्यांची आतषबाजी, विजयाची घोषणा; मतमोजणीआधीच भाजपा कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरू
4
Maharashtra Local Body Election Results 2025: 'या' तीन नगर परिषदा भाजपने जिंकल्या! निकालाआधीच उधळला गुलाल
5
घर खरेदीचे स्वप्न होणार साकार! 'ही' बँक देतेय स्वस्त होम लोन; ५० लाखांच्या कर्जासाठी किती हवी सॅलरी?
6
नात्याला काळीमा! विम्याच्या पैशांसाठी पोटच्या पोरांनीच रचला बापाच्या हत्येचा कट; 'असा' झाला पर्दाफाश
7
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
8
Nora Fatehi : "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती?
9
घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली...
10
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
11
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
12
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
13
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
14
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
15
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
16
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
17
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
18
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
19
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
20
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
Daily Top 2Weekly Top 5

पुलाच्या मागणीसाठी पिपरटोला, मरारटोला, धानोली गावातील नागरिक बसले उपोषणाला

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2024 15:15 IST

३० ते ४० वर्षे जुना असलेला पूल : पुलावर पाणी असल्याने अनेक विद्यार्थ्यांच्या शिक्षणात पडतो खंड

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : आमगाव तालुक्यात असलेल्या पिपरटोला, मरारटोला, धानोली या गावांना जोडणाऱ्या कुआढास मार्गावरील पूल ४० वर्षांपूर्वी तयार केलेला आहे. या पुलाची उंची कमी असल्याने पावसाळ्याच्या दिवसांत या परिसरातील नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतो.

आठ आठ दिवस या नाल्यावर पाणी असल्यामुळे विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित राहावे लागत आहे. कामानिमित्त जाणारे मजूर व भाजीपाला विक्रीकरिता जाणाऱ्या मजुरांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. येथे नवीन पूल बांधण्याची मागणी अनेकदा करण्यात आली. पण त्याची अद्यापही दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे परिसरातील गावकऱ्यांनी सोमवारपासून (दि.१२) या पुलावरच उपोषणाला सुरुवात केली.

आमगाव तालुक्यात असलेल्या पिपरटोला, मरारटोला, धानोली या गावांना जोडणारा हा पूल कमी उंचीचा आहे. त्यामुळे थोडाही जोराचा पाऊस झाला की या पुलावरून पाणी वाहत असते. त्यामुळे परिसरातील गावकऱ्यांचा तालुका मुख्यालयाशी संपर्क तुटतो. तर गावकऱ्यांना २५ किमीचा फेरा मारून तालुक्याच्या ठिकाणी जावे लागते. त्यामुळे या कुआढास नाल्यावर पूल बांधण्याची मागणी करीत सोमवारपासून (दि.१२) उपोषणाला सुरुवात केली आहे.

आमगाव तालुका आणि सालेकसा तालुक्यालगतच असलेल्या धानोली, पिपरटोला, मरारटोला या गावांना जाण्याकरिता कुआढास नाला वाघ नदीच्या जवळ असल्याने ह्या नाल्यावर पावसाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी साचते. त्यामुळे गेल्या ३० वर्षांपासून येथील नागरिकांना हा त्रास सहन करावा लागत आहे.

अनेक विद्यार्थ्यांना माध्यमिक, उच्च माध्यमिक आणि उच्च शिक्षणासाठी तालुक्याच्या ठिकाणी जाण्याकरिता ह्या नाल्यावर पाणी असल्याने अनेक दिवस शाळेत जाण्यापासून वंचित राहावे लागते. ये- जा करणाऱ्या नागरिकांना आणि मजुरांना तसेच लहान व्यावसायिकांना सुद्धा या नाल्यावर पाणी असल्यामुळे २५ किलोमीटरचा लांब फेरा करून तालुक्याच्या ठिकाणी ये-जा करावी लागते. त्यामुळे या मार्गावर पूल तयार करण्याची मागणी केली आहे.

प्रशासनाचे होतेय दुर्लक्षकुआढास मार्गावरील पूल तयार करण्याच्या मागणीसाठी यापूर्वी अनेकदा आंदोलन केले. पण त्याची शासन आणि प्रशासनाने दखल घेतली नाही. यालाच कंटाळून येथील शालेय विद्यार्थ्यांसह परिसरातील नागरिकांनी सोमवारपासून (दि.१२) आमरण उपोषण सुरू केले. जोपर्यंत शासन पुलाची मागणी पूर्ण करीत नाही तोपर्यंत उपोषण सुरूच ठेवण्याचा इशारा प्रहार संघटना व येथील नागरिकांनी दिला आहे. 

टॅग्स :gondiya-acगोंदिया