शहरं
Join us  
Trending Stories
1
चंद्रपूर: 'फादर्स डे'च्या दिवशी पाच मुले झाली पोरकी! दोन रानटी हत्तीनी सोंडेने आपटून एकाला केले ठार
2
Kedarnath Helicopter Crash : चारधाम यात्रेची हेलिकॉप्टर सेवा स्थगित; गौरीकुंडमधील दुर्घटनेनंतर नवा आदेश
3
मोठी बातमी: पुणे पोलिसांनी केलेल्या गोळीबारात कुख्यात गुन्हेगार ठार; सोलापूर जिल्ह्यातील घटना
4
मोठा दिलासा! आधार मोफत अपडेट करण्याची शेवटची संधी? UIDAI ने तारीख बदलली!
5
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
6
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
7
सुनेची काळजी घेण्यासाठी निघालेल्या यास्मिन; तीन दिवस प्रवास पुढे ढकलला, विमान अपघातात मृत्यू
8
Navi Mumbai: नवी मुंबई विमानतळावर लँडिंग करण्याआधी वैमानिकांसमोर २२५ अडथळे!
9
वाशिमच्या मेडशी बायपासवर भीषण अपघात; दोन ठार, एक जखमी, दोघे थोडक्यात बचावले
10
लव जिहादच्या आरोपावर आमिर खानने दिलं उत्तर, म्हणाला, "माझ्या दोन्ही बहिणी अन् मुलीने..."
11
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
12
Thane: मुंब्रा-शीळ भागात आणखी ८ इमारती जमीनदोस्त!
13
हायकू हायकू हायकू... म्हणजेच...; पुस्तकाच्या जन्माची गोष्ट!
14
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
15
"मी एकावेळी ४-४ सिनेमे केले नाही...", दीपिकाच्या ८ तास शिफ्ट मागणीवर काजोलची प्रतिक्रिया
16
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
17
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
18
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
19
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
20
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक

पुलाच्या मागणीसाठी पिपरटोला, मरारटोला, धानोली गावातील नागरिक बसले उपोषणाला

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2024 15:15 IST

३० ते ४० वर्षे जुना असलेला पूल : पुलावर पाणी असल्याने अनेक विद्यार्थ्यांच्या शिक्षणात पडतो खंड

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : आमगाव तालुक्यात असलेल्या पिपरटोला, मरारटोला, धानोली या गावांना जोडणाऱ्या कुआढास मार्गावरील पूल ४० वर्षांपूर्वी तयार केलेला आहे. या पुलाची उंची कमी असल्याने पावसाळ्याच्या दिवसांत या परिसरातील नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतो.

आठ आठ दिवस या नाल्यावर पाणी असल्यामुळे विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित राहावे लागत आहे. कामानिमित्त जाणारे मजूर व भाजीपाला विक्रीकरिता जाणाऱ्या मजुरांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. येथे नवीन पूल बांधण्याची मागणी अनेकदा करण्यात आली. पण त्याची अद्यापही दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे परिसरातील गावकऱ्यांनी सोमवारपासून (दि.१२) या पुलावरच उपोषणाला सुरुवात केली.

आमगाव तालुक्यात असलेल्या पिपरटोला, मरारटोला, धानोली या गावांना जोडणारा हा पूल कमी उंचीचा आहे. त्यामुळे थोडाही जोराचा पाऊस झाला की या पुलावरून पाणी वाहत असते. त्यामुळे परिसरातील गावकऱ्यांचा तालुका मुख्यालयाशी संपर्क तुटतो. तर गावकऱ्यांना २५ किमीचा फेरा मारून तालुक्याच्या ठिकाणी जावे लागते. त्यामुळे या कुआढास नाल्यावर पूल बांधण्याची मागणी करीत सोमवारपासून (दि.१२) उपोषणाला सुरुवात केली आहे.

आमगाव तालुका आणि सालेकसा तालुक्यालगतच असलेल्या धानोली, पिपरटोला, मरारटोला या गावांना जाण्याकरिता कुआढास नाला वाघ नदीच्या जवळ असल्याने ह्या नाल्यावर पावसाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी साचते. त्यामुळे गेल्या ३० वर्षांपासून येथील नागरिकांना हा त्रास सहन करावा लागत आहे.

अनेक विद्यार्थ्यांना माध्यमिक, उच्च माध्यमिक आणि उच्च शिक्षणासाठी तालुक्याच्या ठिकाणी जाण्याकरिता ह्या नाल्यावर पाणी असल्याने अनेक दिवस शाळेत जाण्यापासून वंचित राहावे लागते. ये- जा करणाऱ्या नागरिकांना आणि मजुरांना तसेच लहान व्यावसायिकांना सुद्धा या नाल्यावर पाणी असल्यामुळे २५ किलोमीटरचा लांब फेरा करून तालुक्याच्या ठिकाणी ये-जा करावी लागते. त्यामुळे या मार्गावर पूल तयार करण्याची मागणी केली आहे.

प्रशासनाचे होतेय दुर्लक्षकुआढास मार्गावरील पूल तयार करण्याच्या मागणीसाठी यापूर्वी अनेकदा आंदोलन केले. पण त्याची शासन आणि प्रशासनाने दखल घेतली नाही. यालाच कंटाळून येथील शालेय विद्यार्थ्यांसह परिसरातील नागरिकांनी सोमवारपासून (दि.१२) आमरण उपोषण सुरू केले. जोपर्यंत शासन पुलाची मागणी पूर्ण करीत नाही तोपर्यंत उपोषण सुरूच ठेवण्याचा इशारा प्रहार संघटना व येथील नागरिकांनी दिला आहे. 

टॅग्स :gondiya-acगोंदिया