शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
2
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
3
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
4
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
5
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
6
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
7
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
8
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
9
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
10
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
11
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
12
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
13
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
14
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
15
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
16
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
17
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
18
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
19
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
20
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव

एटीएम सेवा बंद पडल्याने नागरिकांची पंचाईत

By admin | Updated: October 25, 2014 22:43 IST

दिवाळीची लगबग अद्यापही सरलेली नाही. सर्वत्र खरेदीची धावपळ दिसून येत आहे. यासाठी बँकांच्या एटीएम मधून पैसे काढण्यासाठी बहुतेक जण धाव घेत आहेत. परंतु शहरातील बहुतांश एटीएम

गोंदिया : दिवाळीची लगबग अद्यापही सरलेली नाही. सर्वत्र खरेदीची धावपळ दिसून येत आहे. यासाठी बँकांच्या एटीएम मधून पैसे काढण्यासाठी बहुतेक जण धाव घेत आहेत. परंतु शहरातील बहुतांश एटीएम नेमक्या याच वेळेवर बंद असल्याचे दिसत असल्याने ग्राहक त्रस्त झाले आहेत. यामुळे अनेकांना नाईलाजाने शाखेत जाऊन रांगेत उभे राहून पैसे काढावे लागत आहेत.आजघडीला नागरिक आपले सर्व आर्थिक व्यवहार बँकेमार्फत करीत आहेत. यामुळेच जवळ जास्त रोख रक्कम बागळण्याचे टाळत आहेत. अशात एटीएम सेवा अत्यंत महत्वाची व महत्त्वपूर्ण ठरत असून गरज असेल तेव्हा एटीएममधून पैसे काढले जातात. गावागावांत एटीएमची सेवा बँकांमार्फत उपलब्ध केल्याने व्यवहारातही सहजता आली आहे. पण, वर्षभर साथ देत असलेले एटीएम नेमके दिवाळसणाच्या मुहूर्तावर बेईमान होत असल्याचे पहावयास मिळत आहे. दिवाळी निमित्त नागरिकांनी मोठ्या प्रमाणात एटीएममधून पैसे काढल्याने बहुतांश एटीएम बंद पडले आहेत. मोठ्या आशेने लोकं पैसे काढण्यासाठी एटीएमकडे जात आहेत. मात्र त्यांना आल्यापावली परतावे लागत आहे. सध्या बघावे त्या एटीएमच्या दारावर एटीएम बंद असल्याचे फलक टांगलेले दिसून येत आहे. तर काहींकडून लिंक फेल असल्याचे कारण सांगीतले जात आहे. दिवाळीमुळे सर्वांचीच खरेदीसाठी लगबग सुरू झाली आहे. रोख रक्कम जवळ न बाळगता शहरात खरेदीला जाताना तेथीलच एटीएममधून पैसे काढून खरेदी करण्याचा विचार सर्व जण करीत असतात. पण, शहरात आल्यावर त्यांना बंद एटीएमचा त्रास सहन करावा लागत आहे. हा प्रकार २० आॅक्टोबरपासून बघावयास मिळत आहे. याबाबत एटीएमवर असलेल्या गार्डला विचारणा केली असता पैसे नसल्याचे कारण तो पुढे करून हात मोकळे करून घेतो. मात्र यामुळे शहरातील बहुतांश एटीएम बंद पडले असून नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. अन्य कोणत्याही बँकेच्या एटीएममधून पाच वेळा पैसे काढण्याची सुट देण्यात आली आहे. त्यापेक्षा अधिक वेळा पैसे काढल्यास काही रक्कम वजा केली जाते. यामुळे शक्य होईल तेव्हा ग्राहक आपले खाते असलेल्या बँकेच्या एटीएममधूनच पैसे काढण्यावर जोर देतात. दिवाळीत मात्र अनेकांना कित्येकदा पैसे काढावे लागत असून त्याची पर्वा न करता ते पैसे काढून घेतात. सध्या मात्र एटीएम बंद पडून असल्याने नागरिकांनी पैशां अभावी चांगलीच पंचाईत होत आहे. त्यातही येत्या २७ आॅक्टोबर पर्यंत बँकांना सुट्टी असल्याने एटीएम मध्ये पैसे भरणेही अशक्यच वाटत आहे. परिणामी आणखी दोन-तीन दिवस नागरिकांना एटीएम सेवा बंद असल्याचा फटका सहन करावा लागणार असल्याची शक्यता नाकारता येणार नाही. (शहर प्रतिनिधी)