शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

एटीएम सेवा बंद पडल्याने नागरिकांची पंचाईत

By admin | Updated: October 25, 2014 22:43 IST

दिवाळीची लगबग अद्यापही सरलेली नाही. सर्वत्र खरेदीची धावपळ दिसून येत आहे. यासाठी बँकांच्या एटीएम मधून पैसे काढण्यासाठी बहुतेक जण धाव घेत आहेत. परंतु शहरातील बहुतांश एटीएम

गोंदिया : दिवाळीची लगबग अद्यापही सरलेली नाही. सर्वत्र खरेदीची धावपळ दिसून येत आहे. यासाठी बँकांच्या एटीएम मधून पैसे काढण्यासाठी बहुतेक जण धाव घेत आहेत. परंतु शहरातील बहुतांश एटीएम नेमक्या याच वेळेवर बंद असल्याचे दिसत असल्याने ग्राहक त्रस्त झाले आहेत. यामुळे अनेकांना नाईलाजाने शाखेत जाऊन रांगेत उभे राहून पैसे काढावे लागत आहेत.आजघडीला नागरिक आपले सर्व आर्थिक व्यवहार बँकेमार्फत करीत आहेत. यामुळेच जवळ जास्त रोख रक्कम बागळण्याचे टाळत आहेत. अशात एटीएम सेवा अत्यंत महत्वाची व महत्त्वपूर्ण ठरत असून गरज असेल तेव्हा एटीएममधून पैसे काढले जातात. गावागावांत एटीएमची सेवा बँकांमार्फत उपलब्ध केल्याने व्यवहारातही सहजता आली आहे. पण, वर्षभर साथ देत असलेले एटीएम नेमके दिवाळसणाच्या मुहूर्तावर बेईमान होत असल्याचे पहावयास मिळत आहे. दिवाळी निमित्त नागरिकांनी मोठ्या प्रमाणात एटीएममधून पैसे काढल्याने बहुतांश एटीएम बंद पडले आहेत. मोठ्या आशेने लोकं पैसे काढण्यासाठी एटीएमकडे जात आहेत. मात्र त्यांना आल्यापावली परतावे लागत आहे. सध्या बघावे त्या एटीएमच्या दारावर एटीएम बंद असल्याचे फलक टांगलेले दिसून येत आहे. तर काहींकडून लिंक फेल असल्याचे कारण सांगीतले जात आहे. दिवाळीमुळे सर्वांचीच खरेदीसाठी लगबग सुरू झाली आहे. रोख रक्कम जवळ न बाळगता शहरात खरेदीला जाताना तेथीलच एटीएममधून पैसे काढून खरेदी करण्याचा विचार सर्व जण करीत असतात. पण, शहरात आल्यावर त्यांना बंद एटीएमचा त्रास सहन करावा लागत आहे. हा प्रकार २० आॅक्टोबरपासून बघावयास मिळत आहे. याबाबत एटीएमवर असलेल्या गार्डला विचारणा केली असता पैसे नसल्याचे कारण तो पुढे करून हात मोकळे करून घेतो. मात्र यामुळे शहरातील बहुतांश एटीएम बंद पडले असून नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. अन्य कोणत्याही बँकेच्या एटीएममधून पाच वेळा पैसे काढण्याची सुट देण्यात आली आहे. त्यापेक्षा अधिक वेळा पैसे काढल्यास काही रक्कम वजा केली जाते. यामुळे शक्य होईल तेव्हा ग्राहक आपले खाते असलेल्या बँकेच्या एटीएममधूनच पैसे काढण्यावर जोर देतात. दिवाळीत मात्र अनेकांना कित्येकदा पैसे काढावे लागत असून त्याची पर्वा न करता ते पैसे काढून घेतात. सध्या मात्र एटीएम बंद पडून असल्याने नागरिकांनी पैशां अभावी चांगलीच पंचाईत होत आहे. त्यातही येत्या २७ आॅक्टोबर पर्यंत बँकांना सुट्टी असल्याने एटीएम मध्ये पैसे भरणेही अशक्यच वाटत आहे. परिणामी आणखी दोन-तीन दिवस नागरिकांना एटीएम सेवा बंद असल्याचा फटका सहन करावा लागणार असल्याची शक्यता नाकारता येणार नाही. (शहर प्रतिनिधी)