शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
4
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
5
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
6
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
7
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
8
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
9
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
10
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
11
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
12
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
13
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
14
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
15
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
16
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
17
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
18
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
19
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
20
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास

गोरेगावजवळील चिखलीत फुलतेय आमराई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2019 22:43 IST

हवामानातील बदलाचा शेतीवर झपाट्याने परिणाम होत आहे. दर दोन तीन वर्षांनी निर्माण होणाºया दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकऱ्यांवरील कर्जाचे डोंगर वाढत आहे. केलेला लागवड खर्च सुध्दा भरुन निघने कठीण झाल्याने शेती म्हणजे तोट्याचा सौदा अशी भावना शेतकºयांमध्ये निर्माण होत आहे.

ठळक मुद्देसंडे अँकर । कमी लागवड खर्चात अधिक उत्पादन : जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळतोय पर्याय

लोकमत न्यूज नेटवर्कगोरेगाव : हवामानातील बदलाचा शेतीवर झपाट्याने परिणाम होत आहे. दर दोन तीन वर्षांनी निर्माण होणाºया दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकऱ्यांवरील कर्जाचे डोंगर वाढत आहे. केलेला लागवड खर्च सुध्दा भरुन निघने कठीण झाल्याने शेती म्हणजे तोट्याचा सौदा अशी भावना शेतकºयांमध्ये निर्माण होत आहे. मात्र काही शेतकरी अजुनही शेतीत नवीन नवीन प्रयोग करुन यशस्वी शेती करीत आहे. असाच प्रयोग आ.विजय रहांगडाले यांनी केला असून त्यांनी आपल्या दहा एकर वडिलोपार्जीत शेतीत विविध प्रजातीच्या आंब्याच्या झाडांची लागवड केली. यातून आता उत्पादन निघण्यास सुरूवात झाली आहे. गोरेगावजवळील चिखली परिसरात आमराई फुलत आहे.तिरोडा विधानसभा मतदारसंघाचे आ.विजय रहांगडाले यांची गोरेगाव तालुक्यातील चिखली येथे १० एकर शेती आहे. राजकारणात व्यस्त असताना सुध्दा जेव्हा वेळ मिळेल तेव्हा शेतीवर आवर्जुन जातात. त्यांना सुरूवातीपासूनच शेतीमध्ये रुची आहे. त्यांनी आपल्या दहा एकर शेतीत पांरपरिक पिकाची लागवड करण्याऐवजी विविध प्रजातीच्या आंब्यांच्या झाडांची लागवड करण्याचा निर्णय घेतला.सन २०१३ मध्ये त्यांनी कनेरी, दशहेरी आणि इतर प्रजातीच्या ५०० आंब्याच्या झाडांची लागवड केली. या झाडांना सिंचनाची सोय करण्यासाठी बोअरवेल व शेततळे तयार केले. या झाडांची योग्य काळजी घेतल्याने त्यांची चांगली वाढ झाली. मागील वर्षीपासून त्यातून उत्पादन निघण्यास सुरूवात झाली आहे. कनेरी, दशहेरी आंब्याला बाजारात मोठी मागणी आहे. ८० ते १०० रुपये किलो या आंब्याला दर मिळत असल्याचे रहांगडाले यांनी सांगितले. आंब्याची झाडे लावण्यासाठी एकदाच खर्च आला. त्यानंतर मात्र झाडांची योग्य काळजी घेतल्याने उत्पन्न मिळण्यास सुरूवात झाली.आंब्याच्या विक्रीतून दरवर्षी जवळपास दोन ते तीन लाख रुपयांचे उत्पन्न त्यांना मिळत आहे. एकंदरीत त्यांनी धानाची शेती करण्याऐवजी शेतात नवीन प्रयोग करुन शेतकºयांसमोर आदर्श ठेवला आहे. विशेष म्हणजे ते आता या शेतीत एक हजार फणसाच्या झाडांची लागवड करणार आहेत.वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथून फणसाची रोपटी मागविली असून पावसाळ्याला सुरूवात झाल्यानंतर त्याची लागवड करणार असल्याचे रहांगडाले यांनी सांगितले.शेतकऱ्यांनी तीच तीच पिके घेणे टाळावेरासायनिक खतांचा अधिक वापर आणि तिच तिच पिके घेतली जात असल्याने जमिनीची उत्पादकता कमी होत आहे.त्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांनी केलेला लागवड खर्च सुध्दा भरुन काढणे कठीण झाले आहे. त्यामुळे शेतकºयांनी पांरपरिक पिके घेण्याचे टाळून इतर पिकांची लागवड करावी असे आ.विजय रहांगडले यांनी सांगितले.२५ लोकांना मिळाला रोजगारचिखली येथील शेतात लावलेल्या आंब्याच्या झाडांचे योग्य संगोपन करण्यासाठी २५ मजूर नियमित काम करतात. फळबाग लागवडीमुळे परिसरातील मजुरांना सुध्दा रोजगार मिळत आहे.

टॅग्स :MangoआंबाFarmerशेतकरी