शहरं
Join us  
Trending Stories
1
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
2
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
3
सुनेला जाळून मारण्यात मुलाची केली मदत; दिल्लीच्या निक्की भाटी प्रकरणात सासूला अटक!
4
स्कॉर्पिओ, बुलेट, रोख रक्कम आणि सोने; एवढे सगळे देऊनही निक्कीला रोज रात्री मारहाण करायचे, बहिणीने केले धक्कादायक खुलासे
5
विद्यार्थ्याचा पाय घसरला, शिक्षक वाचवायला गेले; वेरुळच्या जोगेश्वरी कुंडात बुडून दोघांचा मृत्यू 
6
'सन्मानजनक निरोप द्यायला हवा होता...', पुजाराच्या निवृत्तीवर शशी थरुर यांची भावनिक पोस्ट
7
Ganpati 2025: शिव ठाकरेच्या घरी वाजत गाजत आले गणपती बाप्पा, इतकी सुंदर मूर्ती की नजरच हटेना, पाहा व्हिडीओ
8
भारतानंतर आता युरोपचाही अमेरिकेला मोठा धक्का; 'या' दोन देशांनी 'एफ ३५' फायटर जेट्स खरेदीला दिला नकार!
9
राहुल गांधींच्या सुरक्षेत मोठी चूक; तरुण Kiss घेऊन पळाला, व्हिडिओ व्हायरल...
10
राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांना बाप्पा पावला! पगाराबाबत सरकारने घेतला महत्त्वाचा निर्णय
11
"मी सोहमला सांगितलंय लग्नानंतर वेगळं राहायचं...", सुचित्रा बांदेकर स्पष्टच बोलल्या, म्हणाल्या- "एकत्र राहून रोज..."
12
मिस्त्री, प्लंबर, फिटरपासून कनिष्ठ अभियंतापर्यंत; मिरा-भाईंदर महानगरपालिकेत विविध पदांसाठी भरती
13
आता त्या गोष्टीवर मी काहीच बोलणार नाही; सचिन-द्रविड अन् MS धोनीचं नाव घेत पुजारा म्हणाला की,..
14
आईस्क्रीम विक्रेत्याला कॉलेज प्लेसमेंटमधून १.८ कोटींचं पॅकेज? व्हायरल Video मागचं 'सत्य'
15
सासू केस ओढून मारायची, पती हुंडा घेऊन...; निक्कीच्या आईने जावयाबद्दल केला धक्कादायक खुलासा!
16
"वडिलांच्या नवीन मर्सिडीजवर विपिनची नजर, ६० लाखांची मागणी", निक्कीच्या भावाने मांडली व्यथा
17
दुसरे घर घेण्याचा विचार करताय? आधी ‘या’ महत्त्वाच्या गोष्टी तपासा, अन्यथा होईल मोठं नुकसान!
18
बायकोला जिवंत जाळल्याचा आरोप असलेल्या पतीची पहिली प्रतिक्रिया, पत्नीच्या हत्येमागील कारण काय सांगितले?
19
पहिल्यांदाच मिझोरममध्ये पोहोचली रेल्वे; १४२ पूल अन् ४८ बोगद्यांद्वारे तयार झाला मार्ग...
20
निवृत्तीनंतर चेतेश्वर पुजाराला BCCI किती पेन्शन देणार? निवृत्त वेतनासाठी कोणतं सूत्र वापरतात?

गोरेगावजवळील चिखलीत फुलतेय आमराई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2019 22:43 IST

हवामानातील बदलाचा शेतीवर झपाट्याने परिणाम होत आहे. दर दोन तीन वर्षांनी निर्माण होणाºया दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकऱ्यांवरील कर्जाचे डोंगर वाढत आहे. केलेला लागवड खर्च सुध्दा भरुन निघने कठीण झाल्याने शेती म्हणजे तोट्याचा सौदा अशी भावना शेतकºयांमध्ये निर्माण होत आहे.

ठळक मुद्देसंडे अँकर । कमी लागवड खर्चात अधिक उत्पादन : जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळतोय पर्याय

लोकमत न्यूज नेटवर्कगोरेगाव : हवामानातील बदलाचा शेतीवर झपाट्याने परिणाम होत आहे. दर दोन तीन वर्षांनी निर्माण होणाºया दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकऱ्यांवरील कर्जाचे डोंगर वाढत आहे. केलेला लागवड खर्च सुध्दा भरुन निघने कठीण झाल्याने शेती म्हणजे तोट्याचा सौदा अशी भावना शेतकºयांमध्ये निर्माण होत आहे. मात्र काही शेतकरी अजुनही शेतीत नवीन नवीन प्रयोग करुन यशस्वी शेती करीत आहे. असाच प्रयोग आ.विजय रहांगडाले यांनी केला असून त्यांनी आपल्या दहा एकर वडिलोपार्जीत शेतीत विविध प्रजातीच्या आंब्याच्या झाडांची लागवड केली. यातून आता उत्पादन निघण्यास सुरूवात झाली आहे. गोरेगावजवळील चिखली परिसरात आमराई फुलत आहे.तिरोडा विधानसभा मतदारसंघाचे आ.विजय रहांगडाले यांची गोरेगाव तालुक्यातील चिखली येथे १० एकर शेती आहे. राजकारणात व्यस्त असताना सुध्दा जेव्हा वेळ मिळेल तेव्हा शेतीवर आवर्जुन जातात. त्यांना सुरूवातीपासूनच शेतीमध्ये रुची आहे. त्यांनी आपल्या दहा एकर शेतीत पांरपरिक पिकाची लागवड करण्याऐवजी विविध प्रजातीच्या आंब्यांच्या झाडांची लागवड करण्याचा निर्णय घेतला.सन २०१३ मध्ये त्यांनी कनेरी, दशहेरी आणि इतर प्रजातीच्या ५०० आंब्याच्या झाडांची लागवड केली. या झाडांना सिंचनाची सोय करण्यासाठी बोअरवेल व शेततळे तयार केले. या झाडांची योग्य काळजी घेतल्याने त्यांची चांगली वाढ झाली. मागील वर्षीपासून त्यातून उत्पादन निघण्यास सुरूवात झाली आहे. कनेरी, दशहेरी आंब्याला बाजारात मोठी मागणी आहे. ८० ते १०० रुपये किलो या आंब्याला दर मिळत असल्याचे रहांगडाले यांनी सांगितले. आंब्याची झाडे लावण्यासाठी एकदाच खर्च आला. त्यानंतर मात्र झाडांची योग्य काळजी घेतल्याने उत्पन्न मिळण्यास सुरूवात झाली.आंब्याच्या विक्रीतून दरवर्षी जवळपास दोन ते तीन लाख रुपयांचे उत्पन्न त्यांना मिळत आहे. एकंदरीत त्यांनी धानाची शेती करण्याऐवजी शेतात नवीन प्रयोग करुन शेतकºयांसमोर आदर्श ठेवला आहे. विशेष म्हणजे ते आता या शेतीत एक हजार फणसाच्या झाडांची लागवड करणार आहेत.वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथून फणसाची रोपटी मागविली असून पावसाळ्याला सुरूवात झाल्यानंतर त्याची लागवड करणार असल्याचे रहांगडाले यांनी सांगितले.शेतकऱ्यांनी तीच तीच पिके घेणे टाळावेरासायनिक खतांचा अधिक वापर आणि तिच तिच पिके घेतली जात असल्याने जमिनीची उत्पादकता कमी होत आहे.त्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांनी केलेला लागवड खर्च सुध्दा भरुन काढणे कठीण झाले आहे. त्यामुळे शेतकºयांनी पांरपरिक पिके घेण्याचे टाळून इतर पिकांची लागवड करावी असे आ.विजय रहांगडले यांनी सांगितले.२५ लोकांना मिळाला रोजगारचिखली येथील शेतात लावलेल्या आंब्याच्या झाडांचे योग्य संगोपन करण्यासाठी २५ मजूर नियमित काम करतात. फळबाग लागवडीमुळे परिसरातील मजुरांना सुध्दा रोजगार मिळत आहे.

टॅग्स :MangoआंबाFarmerशेतकरी