शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

मुख्यमंत्र्यांचा कचारगड दौरा ठरणार ऐतिहासिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2019 00:17 IST

रविवारपासून कचारगड यात्रेला सुरुवात होत असून लगेच दुसऱ्या दिवशी सोमवारी (दि.१८) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस धनेगाव (कचारगड) येथे थेट हेलीकॉप्टरने येऊन कोया पुनेमी महोत्सवाचा विधीवत शुभारंभ करतील.

ठळक मुद्देसोमवारी हेलिकॉप्टरने आगमन : पुराम यांच्या प्रयत्नांना यश

लोकमत न्यूज नेटवर्कसालेकसा : रविवारपासून कचारगड यात्रेला सुरुवात होत असून लगेच दुसऱ्या दिवशी सोमवारी (दि.१८) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस धनेगाव (कचारगड) येथे थेट हेलीकॉप्टरने येऊन कोया पुनेमी महोत्सवाचा विधीवत शुभारंभ करतील. कचारगड यात्रेच्या मागील ३२ वर्षाच्या इतिहासात प्रथमच या ठिकाणी मुख्यमंत्र्यांसारखा व्यक्ती येत असून या वर्षाची कचारगड यात्रा आणि मुख्यमंत्र्याचा दौरा ऐतिहासिक ठरणार आहे. विशेष म्हणज,े मुख्यमंत्र्यासोबत केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी सुध्दा कचारगडला भेट देण्यासाठी येत असून या आयोजनाला विशेष महत्व प्राप्त झाले आहे.या देशाचे मूळ निवासी असलेले आदिवासी यांचे श्रध्दास्थान म्हणून ओळखला जाणारा कचारगड आदिवासीचे उगम स्थळ मानला जातो. त्यामुळे संपूर्ण आदिवासी समाजासाठी कचारगड हे स्थळ महत्वाचे असून दरवर्षी माघ पौर्णिमेला या ठिकाणी आपल्या पूर्वजांची आठवण करण्यासाठी त्यांची नैसर्गिक पूजा करण्यासाठी देशभरातील आदिवासी समाज लाखोच्या संख्येने येते.विविध दृष्टीकोनातून या स्थळाला मोठा महत्व असून सुध्दा शासन स्तरावर याची फारसी दखल घेतली गेली जात नव्हती. परंतु ‘लोकमत’ने या स्थळाला सतत पाठपुरावा करीत याचे महत्व वाढविणारे लेख व बातम्या प्रकाशित करण्याचे काम सातत्याने सुरु ठेवले. एवढेच नाही तर येथे भाविकांना होणाºया त्रासाबद्दल व तोकड्या सोयी सुविधा बद्दल सुध्दा शासन-प्रशासनाचे ध्यानाकर्षण करण्याचे काम केले.कचारगड यात्रेत दरम्यानच नाही तर वर्षभर कचारगडचा महत्व कायम राहावे यासाठी शासन-प्रशासन स्तरावर सतत दखल घेतली जावी म्हणून आ. पुराम मागील पाच वर्षापासून सतत प्रयत्नशील राहीले. दोन वर्षापूर्वी केंद्रीय मंत्री फग्गनसिंह कुलस्ते आणि महाराष्ट्राचे अर्थंमंत्री सुधीर मुनगंटीवार कचारगड यात्रेत भेट देऊन गेले. पालकमंत्री राजकुमार बडोले सुध्दा अनेक वेळा भेट देऊन गेले. मुनगंटीवार यांनी या स्थळाला पाच कोटीचा निधी सुध्दा मंजूर केला. परंतु या स्थळाच्या महत्वाला लक्षात घेता तेवढे सहकार्य शासन स्तरावर करण्यात आले नाही म्हणून अनेक बाबतीत कचारगड विकासापासून दूरच राहीला या बाबीचा विचार करीत आ.पुराम यांनी थेट मुख्यमंत्र्यांशी भेट घेऊन या स्थळाबद्दल सविस्तर सांगीतले व त्यांना कचारगडला येण्यास प्रेरीत केले. त्यांच्या प्रयत्नांना आता यश येताना दिसत आहे. मात्र मुख्यमंत्री येथे आल्यावर कचारगडला काय देवून जाणार हे बघावे लागेल.प्रथमच हेलीकॉप्टर लँॅडींगधनेगाव दरेकसा परिसर अतिसंवेदनशील नक्षलग्रस्त भागात असून या भागात मंत्री व नेत्यांचे दौरे फार कमी होतात. मात्र महाराष्ट्र निर्मीतीनंतर मागील ६७ वर्षाच्या इतिहासात प्रथमच या राज्याचा मुख्यमंत्री सालेकसा तालुक्यात उतरणार आहे. ते ही सरळ यात्रेच्या ठिकाणाजवळ त्यांचे हेलीकॉप्टर लॅडींग करणार आहे. दरेकसा येथील शसस्त्र दूर क्षेत्राच्या परिसरात हॅलीपॅड बनविले जात असून चारही बाजूंनी डोंगराळ भागाने वेढलेल्या या ठिकाणात कडेकोट बंदोबस्त लावण्याची तयारी केली जात आहे. मुख्यमंत्री ते केंद्रीय मंत्री, पालकमंत्री आणि खासदार, आमदार यांच्या आगमनाने निश्चितच कचारगड यात्रा यावर्षी ऐतिहासीक ठरणार आहे.

टॅग्स :Kacharagarh templeकचारगड देवस्थानChief Ministerमुख्यमंत्री