शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
2
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
3
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
4
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
5
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
6
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
7
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
8
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
9
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
10
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
11
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!
12
निवडणुका जवळ आल्यावर आमच्यावर आरोप होतात; आता आमची बदनामी झाली, अजित पवारांची खंत
13
Digital Gold SEBI: डिजिटल गोल्ड खरेदी असाल, तर थांबा! ऑनलाईन सोने खरेदी करणाऱ्यांना सेबीचा सावधगिरीचा इशारा
14
शशी थरूर यांनी अडवाणींचे कौतुक केले, नेहरू आणि इंदिरा गांधींबद्दल धक्कादायक विधान केले
15
FD सुरक्षित, पण श्रीमंत होण्यासाठी पुरेश नाही! जास्त परतावा हवा असल्यास 'हे' ५ पर्याय बेस्ट
16
...अन् ड्रग माफियाच्या घरात पैसे मोजायला बसले पोलिसवाले; सगळ्या १०, २०, ५० च्याच नोटा, २२ तास लागले
17
Video: 6,6,6,6,6,6,6...भारतीय क्रिकेटरनं रचला नवा इतिहास; अवघ्या ११ चेंडूत सर्वात जलद अर्धशतक
18
चीनमधून MBBS अन् तयार केले खतरनाक विष; गुजरातमध्ये पकडलेल्या ३ दहशतवाद्यांचा प्लॅन काय होता?
19
सामान्यांसाठी मोठा दिलासा! ऑक्टोबरमध्ये शाकाहारी आणि मांसाहारी थाळी स्वस्त; क्रिसीलचा अहवाल आला...
20
मुलीच्या जन्मापासून ते १० वीपर्यंत सरकार देतं आर्थिक मदत! 'या' वर्गातील कुटुंबांसाठी चालवली जाते योजना

भिंत कोसळण्याची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2017 00:12 IST

शासनाकडून आरोग्यविषयक विविध उपाययोजना राबवून जनतेच्या आरोग्याची काळजी घेतली जाते. परंतु काही पदाधिकाºयांच्या मनमर्जी कारभारामुळे गावाचेच आरोग्य धोक्यात येत आहे.

ठळक मुद्दे डबक्यात साचते दोन फूट वर पाणी : आजारही पसरण्याची भीती वाढली

लोकमत न्यूज नेटवर्कसौंदड : शासनाकडून आरोग्यविषयक विविध उपाययोजना राबवून जनतेच्या आरोग्याची काळजी घेतली जाते. परंतु काही पदाधिकाºयांच्या मनमर्जी कारभारामुळे गावाचेच आरोग्य धोक्यात येत आहे. श्रीरामनगर येथे दोन ते तीन फूट खोल डबक्यांत पावसाचे पाणी साचले आहे. त्यामुळे रहदारीच्या समस्येसह गोठ्याची भिंत कोसळण्याची दाट शक्यता आहे.नागरिकांच्या आरोग्याची दखल घेवून दरवर्षी विविध योजना शासनाकडून राबविल्या जातात. मात्र काही पदाधिकाºयांच्या मनमर्जी व हलगर्जीपणामुळे नियमाचे उल्लंघन होते. सौंदड परिसरातील पुनर्वसीत श्रीरामनगर येथील ग्रामपंचायतीने ग्रामस्थांनाच आजारी पाडण्याचे षडयंत्र रचले आहे, अशी चर्चा गावात सुरू आहे.४ जून रोजी दिगंबर दयाराम रहेले यांनी श्रीरामनगर येथील ग्रामपंचायतला लेखी अर्ज केला होता. त्यात रहेले यांच्या घराशेजारी डबक्यामध्ये दोन ते तीन फूट पावसाचे पाणी साचले. त्यामुळे त्यांच्या जनावरांचा गोठा पडण्याची भीती बळावली आहे. तर घराशेजारी डबक्यामध्ये साचलेल्या दुर्गंधीयुक्त पाण्यामुळे रोगराई पसरण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे सदर जागेतील पाणी काढण्याकरिता ग्रामपंचायतने पुढाकार घ्यावा. अन्यथा परिसरात आणखी विविध समस्या निर्माण होवू शकतात, अशी तक्रार केली होती. परंतु त्यांच्या दिलेल्या अर्जाला दुर्लक्षीत करण्यात आले. त्यामुळे त्यांनी सडक अर्जुनी येथील खंड विकास अधिकारी यांच्याकडे धाव घेतली. खंडविकास अधिकारी यांना २० जून रोजी लिखित अर्ज देण्यात आले. परंतु त्यांनीही आजपर्यंत याबाबत कसलीही दखल घेतली नाही. शासनाच्या योजना मानवाच्या संरक्षणाकरिता राबविल्या जातात. परंतु याठिकाणी उलट घडत असल्याचे दिसून येत आहे. रहेले यांच्या घराशेजारी साचलेल्या पाण्यामुळे घरातील व मोहल्ल्यातील बालके आजारी पडले तर त्याला जबाबदार राहणार कोण? अशा सवाल येथील नागरिक करीत आहेत.सध्या पावसाळा असल्यामुळे नालीचे बांधकाम करता येत नाही. आम्ही ते ठरावामध्ये घेतले आहे. पावसाळा संपताच त्या ठिकाणी भरण भरुन काम पूर्ण करु.-भरत पंधरेसरपंच, श्रीरामनगर