शहरं
Join us  
Trending Stories
1
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
2
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
3
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
4
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
5
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
6
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
7
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
8
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
9
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
10
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
11
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
12
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
13
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
14
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
15
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
16
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
17
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
18
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
19
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
20
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'

भिंत कोसळण्याची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2017 00:12 IST

शासनाकडून आरोग्यविषयक विविध उपाययोजना राबवून जनतेच्या आरोग्याची काळजी घेतली जाते. परंतु काही पदाधिकाºयांच्या मनमर्जी कारभारामुळे गावाचेच आरोग्य धोक्यात येत आहे.

ठळक मुद्दे डबक्यात साचते दोन फूट वर पाणी : आजारही पसरण्याची भीती वाढली

लोकमत न्यूज नेटवर्कसौंदड : शासनाकडून आरोग्यविषयक विविध उपाययोजना राबवून जनतेच्या आरोग्याची काळजी घेतली जाते. परंतु काही पदाधिकाºयांच्या मनमर्जी कारभारामुळे गावाचेच आरोग्य धोक्यात येत आहे. श्रीरामनगर येथे दोन ते तीन फूट खोल डबक्यांत पावसाचे पाणी साचले आहे. त्यामुळे रहदारीच्या समस्येसह गोठ्याची भिंत कोसळण्याची दाट शक्यता आहे.नागरिकांच्या आरोग्याची दखल घेवून दरवर्षी विविध योजना शासनाकडून राबविल्या जातात. मात्र काही पदाधिकाºयांच्या मनमर्जी व हलगर्जीपणामुळे नियमाचे उल्लंघन होते. सौंदड परिसरातील पुनर्वसीत श्रीरामनगर येथील ग्रामपंचायतीने ग्रामस्थांनाच आजारी पाडण्याचे षडयंत्र रचले आहे, अशी चर्चा गावात सुरू आहे.४ जून रोजी दिगंबर दयाराम रहेले यांनी श्रीरामनगर येथील ग्रामपंचायतला लेखी अर्ज केला होता. त्यात रहेले यांच्या घराशेजारी डबक्यामध्ये दोन ते तीन फूट पावसाचे पाणी साचले. त्यामुळे त्यांच्या जनावरांचा गोठा पडण्याची भीती बळावली आहे. तर घराशेजारी डबक्यामध्ये साचलेल्या दुर्गंधीयुक्त पाण्यामुळे रोगराई पसरण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे सदर जागेतील पाणी काढण्याकरिता ग्रामपंचायतने पुढाकार घ्यावा. अन्यथा परिसरात आणखी विविध समस्या निर्माण होवू शकतात, अशी तक्रार केली होती. परंतु त्यांच्या दिलेल्या अर्जाला दुर्लक्षीत करण्यात आले. त्यामुळे त्यांनी सडक अर्जुनी येथील खंड विकास अधिकारी यांच्याकडे धाव घेतली. खंडविकास अधिकारी यांना २० जून रोजी लिखित अर्ज देण्यात आले. परंतु त्यांनीही आजपर्यंत याबाबत कसलीही दखल घेतली नाही. शासनाच्या योजना मानवाच्या संरक्षणाकरिता राबविल्या जातात. परंतु याठिकाणी उलट घडत असल्याचे दिसून येत आहे. रहेले यांच्या घराशेजारी साचलेल्या पाण्यामुळे घरातील व मोहल्ल्यातील बालके आजारी पडले तर त्याला जबाबदार राहणार कोण? अशा सवाल येथील नागरिक करीत आहेत.सध्या पावसाळा असल्यामुळे नालीचे बांधकाम करता येत नाही. आम्ही ते ठरावामध्ये घेतले आहे. पावसाळा संपताच त्या ठिकाणी भरण भरुन काम पूर्ण करु.-भरत पंधरेसरपंच, श्रीरामनगर