शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारवर निशाणा?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
3
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
4
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
5
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
6
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
7
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
8
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
9
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
10
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
11
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
12
नोकरी गेली खड्ड्यात, आज राजीनामा देणारच, कारण...; ढसाढसा रडत शिक्षिकेने बनवला Video
13
बिबट्यानंतर आता लांडग्याची दहशत... तीन वर्षाच्या चिमुरड्याला उचलून नेलं; कुठे घडला प्रकार?
14
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दराचा नवा उच्चांक, चांदीच्या दरात ७,२१४ रुपयांची वाढ; सोन्याच्या दरातही जोरदार तेजी
15
"साजिद अकरमशी माझा कोणताही संबंध नाही"; दहशतवाद्याच्या पत्नीचा मृतदेह स्वीकारण्यास नकार
16
'मी हे विकत घेऊ शकत नाही' असे म्हणणे सोडा! रॉबर्ट कियोसाकींनी सांगितला श्रीमंतीचा नवा मंत्र
17
VIDEO : "सर्वस्व दिलं, तरीही मनासारखं नाही घडलं!" रोहित शर्मा 'त्या' गोष्टीबद्दल पहिल्यांदाच बोलला
18
'बॉर्डर २'मध्ये दिसणार सुनील शेट्टी आणि अक्षय खन्ना? सनी देओलच्या सिनेमासंदर्भात मोठी अपडेट आली समोर
19
आता मनमानी चालणार नाही! रुग्णालयांना आधीच सांगावा लागणार आयसीयू-व्हेंटिलेटरचा खर्च; 'यांची' मंजुरीही आवश्यक
20
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
Daily Top 2Weekly Top 5

केंद्रातील सरकार शेतकऱ्यांचे की उद्योगपतींचे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2021 04:30 IST

तिरोडा : खरीप हंगामाला लवकरच सुरूवात होणार असून शेतकऱ्यांसमोर खत व बियाण्यांच्या किंमत वाढीचे संकट निर्माण झाले आहे. केंद्र ...

तिरोडा : खरीप हंगामाला लवकरच सुरूवात होणार असून शेतकऱ्यांसमोर खत व बियाण्यांच्या किंमत वाढीचे संकट निर्माण झाले आहे. केंद्र सरकारने खताच्या किमती दुपटीने वाढविल्या आहेत. यामुळे शेतकऱ्यांना शेती करायची की नाही असा विचार करावा लागत आहे. शेतकरी आधीच संकटात असताना केंद्र सरकारने खताच्या किमतीमध्ये भरमसाठ वाढ करुन शेतकऱ्यांवर आर्थिक बोजा वाढविला आहे. त्यामुळे केंद्रातील सरकार हे शेतकऱ्यांचे की उद्योगपतींचे असा सवाल माजी आ. दिलीप बन्सोड यांनी केला.

यंदा सर्वच खतांच्या किमती वाढलेल्या आहेत. धानाची शासकीय आधारभूत किंमत १८६८ रूपये प्रति क्विंटल आहे. तेव्हा केंद्र सरकार शेतकऱ्यांना आवळा देऊन भोपळा घेत आहे. केंद्र सरकार हे उद्योगपतींना मोठे करण्याचे काम करीत असल्याचा आरोप आहे. गोंदिया-भंडारा जिल्ह्यातील भाजपचे खासदार, आमदार यावर काहीच बोलत नाही. केवळ बिरसी विमानतळावरुन कार्गो सेवा सुरूवात करणार, शेतकऱ्यांचा माल परदेशात किंवा देशाच्या इतर भागात पाठविणार असे सांगून स्वत:चा उदोउदो करुन घेत आहे. मात्र खतांच्या वाढलेल्या किमती, उत्पादन खर्चात झालेली वाढ आणि यामुळे शेतकऱ्यांची झालेली अवस्था यावर काहीच बोलत नाही. यावरुन त्यांना सुध्दा बळीराजाची चिंता नसल्याचा आरोप माजी आ. दिलीप बन्सोड यांनी केला आहे. गोंदिया-भंडारा जिल्ह्यातील धान उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांना एका एकरमध्ये उत्पादन खर्च किती येतो याची माहिती पंतप्रधानांना द्या? डिझेल, पेट्रोलची किंमत वाढवून शेतकऱ्यांना शेतीमध्ये ट्रॅक्टर कसे चालवावे हा प्रश्न निर्माण झाला आहे. एक तास ट्रॅक्टरने शेतात नांगरणी करण्यासाठी १ हजार रुपये भाडे द्यावे लागते. शेतात रोवणी करते वेळी मजुरांची मजुरी वाढलेली आहे. तसेच खाद्य तेलाच्या किमती अति गगनाला भिडल्या आहेत.

.....

केवळ आढावा बैठका घेऊन काहीच साध्य होणार नाही

खासदार सुनील मेंढे व खासदार अशोक नेते यांनी खताच्या, बी-बियाण्याच्या वाढलेल्या किमती नियंत्रणात आणण्यासाठी प्रथम दिल्लीत जाऊन कमी करण्याची गरज आहे. इकडे लॉकडाऊनमुळे शेतकरी हवालदिल झालेला आहे. त्याची व्यथा समजून घेण्याची गरज आहे. जिल्ह्यात आढावा बैठका घेऊन काहीच उपयोग नाही. खताच्या वाढलेल्या किमती कमी करणे किंवा शेतकऱ्यांना केंद्र व राज्य सरकारने सबसिडी देणे, पेट्रोल, डिझेल शेती हंगामाकरिता शेतकऱ्यांना सातबारावर स्वस्त दरावर देणे, खाद्य तेलाच्या किमती तत्काळ कमी कराव्या अशी आमची मागणी आहे.

.........

शेती करायची कशी

इफको खताची जुनी किंमत ११७५ रुपये ५० किलोची बॅग आता वाढविलेली किंमत १७७५ रूपये, १२-३२-१६ खत जुनी ११९० रूपये व नवीन किंमत १८०० रूपये तसेच डीएपी खताची जुनी किंमत १२०० रूपये नवीन किंमत १९०० रूपये एवढी वाढ झाली आहे. यामुळे शेती करणार कशी असा प्रश्न निर्माण झाला आहे.