शहरं
Join us  
Trending Stories
1
विरारमध्ये इमारत कोसळून १४ जणांचा मृत्यू, ३० तासांनंतरही बचाकार्य सुरु; शेजारील चाळही उद्ध्वस्त
2
ट्रम्प यांच्या पत्नीची 'AI चॅलेन्ज', जिंकणाऱ्याला मिळणार लाखोंचं बक्षीस...! जाणून घ्या, करायचं काय?
3
टॅरिफबाबत भारत आणि अमेरिकेमध्ये चर्चेचे दरवाजे अजूनही खुले, दोन्हीकडून मिळाले संकेत  
4
Russia Ukraine War: रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर भयावह हल्ला, तीन ठार, १२ जण जखमी
5
"रशिया युक्रेन युद्ध मोदींचे" अमेरिकन राजदूताने भारताला धरलं जबाबदार, टॅरिफ कमी करण्यासाठी ठेवली अट
6
पुतिन नव्हे..., आता झेलेन्स्कींवरच भडकले ट्रम्प, म्हणाले, "युद्ध..., युक्रेनने ऐकले नाही, तर बंदी घालेन!"
7
गजानन महाराज पुण्यतिथि: जाणून घ्या त्यांनी दिलेला सिद्धमंत्र; जो तुमचे आयुष्य बदलून टाकेल!
8
Mumbai: डॉकयार्ड रेल्वे स्टेशनजवळ सापडलेल्या मृतदेहाचा उलगडा, जमिनीच्या वादातून हत्या, तिघांना अटक
9
जामीन अर्जावरील सुनावणी ४३ वेळा पुढे ढकलल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाची नाराजी, आरोपीला दिलासा
10
आजचे राशीभविष्य, २८ ऑगस्ट २०२५: मानहानी होण्याची शक्यता, विधायक कार्य हातून घडेल
11
जम्मू-काश्मीरमध्ये पावसाने हाहाकार, वैष्णोदेवी मार्गावरील भूस्खलन घटनेतील मृतांची संख्या ४१ वर, जम्मू-उधमपूरमध्ये ११५ वर्षांतील रेकॉर्ड झाले ब्रेक
12
ट्रम्प यांच्या सूचनेनंतर पाच तासांतच शस्त्रसंधी, मतदार अधिकार यात्रेत राहुल गांधी यांचा आरोप
13
वर्षानुवर्षे खटला चालणे, हे शिक्षेसारखेच. सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केली खंत
14
मराठा वादळ मुंबईच्या दिशेने, आंदोलनाला केवळ एक दिवसासाठी सशर्त परवानगी
15
शाळांमध्येच होणार विद्याथ्यांचे आधार बायोमेट्रिक अपडेट, १७ कोटी आधार क्रमांक अजूनही प्रलंबित; पालकांचा वेळ, श्रम व त्रास वाचणार
16
तब्बल २० लाख नोकऱ्या धोक्यात ? ट्रम्प टॅरिफचा भारताला जबर फटका
17
वीज कोसळल्याने चौघांचा मृत्यू; मृतांमध्ये आईसह तरुण मुलाचा समावेश, धापेवाडा व धामणगाव शिवारातील घटना
18
पश्चिम विदर्भात अतिवृष्टीचा सहा लाख हेक्टरला फटका, ऑगस्टमध्ये सर्वाधिक नुकसान; कृषी विभागाचा अहवाल
19
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
20
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार

केंद्रातील सरकार शेतकऱ्यांचे की उद्योगपतींचे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2021 04:30 IST

तिरोडा : खरीप हंगामाला लवकरच सुरूवात होणार असून शेतकऱ्यांसमोर खत व बियाण्यांच्या किंमत वाढीचे संकट निर्माण झाले आहे. केंद्र ...

तिरोडा : खरीप हंगामाला लवकरच सुरूवात होणार असून शेतकऱ्यांसमोर खत व बियाण्यांच्या किंमत वाढीचे संकट निर्माण झाले आहे. केंद्र सरकारने खताच्या किमती दुपटीने वाढविल्या आहेत. यामुळे शेतकऱ्यांना शेती करायची की नाही असा विचार करावा लागत आहे. शेतकरी आधीच संकटात असताना केंद्र सरकारने खताच्या किमतीमध्ये भरमसाठ वाढ करुन शेतकऱ्यांवर आर्थिक बोजा वाढविला आहे. त्यामुळे केंद्रातील सरकार हे शेतकऱ्यांचे की उद्योगपतींचे असा सवाल माजी आ. दिलीप बन्सोड यांनी केला.

यंदा सर्वच खतांच्या किमती वाढलेल्या आहेत. धानाची शासकीय आधारभूत किंमत १८६८ रूपये प्रति क्विंटल आहे. तेव्हा केंद्र सरकार शेतकऱ्यांना आवळा देऊन भोपळा घेत आहे. केंद्र सरकार हे उद्योगपतींना मोठे करण्याचे काम करीत असल्याचा आरोप आहे. गोंदिया-भंडारा जिल्ह्यातील भाजपचे खासदार, आमदार यावर काहीच बोलत नाही. केवळ बिरसी विमानतळावरुन कार्गो सेवा सुरूवात करणार, शेतकऱ्यांचा माल परदेशात किंवा देशाच्या इतर भागात पाठविणार असे सांगून स्वत:चा उदोउदो करुन घेत आहे. मात्र खतांच्या वाढलेल्या किमती, उत्पादन खर्चात झालेली वाढ आणि यामुळे शेतकऱ्यांची झालेली अवस्था यावर काहीच बोलत नाही. यावरुन त्यांना सुध्दा बळीराजाची चिंता नसल्याचा आरोप माजी आ. दिलीप बन्सोड यांनी केला आहे. गोंदिया-भंडारा जिल्ह्यातील धान उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांना एका एकरमध्ये उत्पादन खर्च किती येतो याची माहिती पंतप्रधानांना द्या? डिझेल, पेट्रोलची किंमत वाढवून शेतकऱ्यांना शेतीमध्ये ट्रॅक्टर कसे चालवावे हा प्रश्न निर्माण झाला आहे. एक तास ट्रॅक्टरने शेतात नांगरणी करण्यासाठी १ हजार रुपये भाडे द्यावे लागते. शेतात रोवणी करते वेळी मजुरांची मजुरी वाढलेली आहे. तसेच खाद्य तेलाच्या किमती अति गगनाला भिडल्या आहेत.

.....

केवळ आढावा बैठका घेऊन काहीच साध्य होणार नाही

खासदार सुनील मेंढे व खासदार अशोक नेते यांनी खताच्या, बी-बियाण्याच्या वाढलेल्या किमती नियंत्रणात आणण्यासाठी प्रथम दिल्लीत जाऊन कमी करण्याची गरज आहे. इकडे लॉकडाऊनमुळे शेतकरी हवालदिल झालेला आहे. त्याची व्यथा समजून घेण्याची गरज आहे. जिल्ह्यात आढावा बैठका घेऊन काहीच उपयोग नाही. खताच्या वाढलेल्या किमती कमी करणे किंवा शेतकऱ्यांना केंद्र व राज्य सरकारने सबसिडी देणे, पेट्रोल, डिझेल शेती हंगामाकरिता शेतकऱ्यांना सातबारावर स्वस्त दरावर देणे, खाद्य तेलाच्या किमती तत्काळ कमी कराव्या अशी आमची मागणी आहे.

.........

शेती करायची कशी

इफको खताची जुनी किंमत ११७५ रुपये ५० किलोची बॅग आता वाढविलेली किंमत १७७५ रूपये, १२-३२-१६ खत जुनी ११९० रूपये व नवीन किंमत १८०० रूपये तसेच डीएपी खताची जुनी किंमत १२०० रूपये नवीन किंमत १९०० रूपये एवढी वाढ झाली आहे. यामुळे शेती करणार कशी असा प्रश्न निर्माण झाला आहे.