शहरं
Join us  
Trending Stories
1
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
2
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
3
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
4
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
5
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
6
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
7
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
8
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
9
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
10
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
11
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
12
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
13
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
14
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
15
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
16
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
17
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
18
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
19
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
20
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर

काेरोनाने पकडली जिल्ह्यातून परतीची वाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2021 04:22 IST

गोंदिया : कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस कमी होत असून कोरोनावर मात करणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे जिल्ह्यात कोरोनाची दुसरी लाट ...

गोंदिया : कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस कमी होत असून कोरोनावर मात करणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे जिल्ह्यात कोरोनाची दुसरी लाट ओसरत आहे. रुग्णसंख्येत सातत्याने घट होत असल्याने आता जिल्ह्यातून कोरोनाने परतीची वाट पकडल्याचे समाधानकारक चित्र आहे. रुग्णसंख्या जरी आटोक्यात येत असली तरी नागरिकांनी बिनधास्त न राहता पूर्वीइतकी काळजी घेणे गरजेचे आहे.

गुरुवारी (दि.२७) जिल्ह्यात १२१ बाधितांनी कोरोनावर मात केली, तर ४८ नवीन रुग्णांची नोंद झाली. तर एका रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मे महिन्याच्या सुरुवातीपासूनच कोरोनाबाधितांची संख्या कमी होत असल्याने कोरोना ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या आता ५६० वर पोहोचली आहे. कोरोनावर मात करणाऱ्या रुग्णांची संख्या अशीच कायम राहिल्यास जिल्हा कोरोनामुक्त होण्यास वेळ लागणार नाही. मागील आठ दिवसांपासून शहरी भागासह ग्रामीण भागातील रुग्णसंख्यासुद्धा आटोक्यात आली आहे. त्यामुळे कोविड केअर सेंटर आणि खासगी कोविड रुग्णालयातील बेडसुद्धा रिकामे झाले आहेत. तर आरोग्य यंत्रणेवरील ताणसुद्धा कमी झाला आहे. कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने १ लाख ५९ हजार ४४१ जणांचे स्वॅब नमुने तपासणी करण्यात आले. त्यापैकी १ लाख ३४ हजार ५३२ नमुने निगेटिव्ह आले आहेत. कोरोनाबाधितांचा त्वरित शोध घेण्यासाठी रॅपिड अँटिजन टेस्ट केली जात आहे. यांतर्गत १५४७९० नमुने तपासणी करण्यात आले. त्यापैकी १३३३७३ नमुने निगेटिव्ह आले. जिल्ह्यात आतापर्यंत ४०५०४ कोरोनाबाधित आढळले. तर आतापर्यंत ३९२६३ बाधितांनी कोरोनावर मात केली आहे. सद्य:स्थितीत ५६० कोरोना ॲक्टिव्ह रुग्ण असून १९४ स्वॅब नमुन्याचा अहवाल गोंदिया येथील प्रयोगशाळेकडून प्राप्त व्हायचा आहे.

...........

२५२० चाचण्या ४८ पॉझिटिव्ह

कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने १९२२ आरटीपीसीआर तर ५९८ रॅपिट अँटिजन अशा एकूण २५२० टेस्ट करण्यात आल्या. त्यात ४८ पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. रुग्णाचा पाॅझिटिव्हिटी रेट १.९० टक्के आहे. यावरून कोरोनाचा संसर्ग बऱ्याच प्रमाणात आटोक्यात येत असल्याचे चित्र आहे.

......

२ लाख ३४ हजार नागरिकांचे लसीकरण

कोरोनाविरुद्धच्या लढ्यात लसीकरण हे महत्त्वपूर्ण शस्त्र आहे. त्यामुळे कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणावर भर दिला जात आहे. जिल्ह्यात सध्या १४० केंद्रावरून लसीकरण मोहीम सुरू आहे. यांतर्गत आतापर्यंत २ लाख ३४ हजार ५९९ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे.

...................

संसर्ग आटोक्यात, पण दुर्लक्ष नकोच

जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग आटोक्यात येत असून रुग्णसंख्येला बऱ्याच प्रमाणात ब्रेक लागला आहे. दुसरी लोट आता पूर्णपणे ओसरायला लागली आहे. त्यामुळे नागरिकांनी बिनधास्त न होता पूर्वीइतकी काळजी घेण्याची गरज आहे. तसेच कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे काटेकोरपणे पालन करणे गरजेचे आहे.