शहरं
Join us  
Trending Stories
1
२ अभियंत्यांना वाचवण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाने घेतला २ निष्पाप प्रवाशांचा बळी
2
अजित पवारांचे पुत्र पार्थ यांचा जमीन घोटाळा; ३०० कोटींत खरेदी केली १८०० कोटींची जमीन
3
ठाणे, दिवा अन् कल्याणमध्येही प्रवाशांचे प्रचंड हाल; लोकल कर्जतकडे वळवल्याने प्रवासी संतप्त
4
मेट्रोची भाडेवाढ? समितीसाठी केंद्राकडे प्रस्ताव; अंधेरी, दहिसर मेट्रो भाडे वाढण्याची शक्यता
5
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
6
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
7
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
8
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
9
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
10
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
11
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
12
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
13
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
14
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
15
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
16
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
17
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
18
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
19
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
20
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला

काय सांगता! ३०६ मते घेणारा उमेदवार पराभूत, अन् २८७ मते घेणारा विजयी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2023 15:05 IST

निवडणूक विभागाचा अजब कारभार : दत्तोरा येथील वॉर्ड क्रमांक २ वांध्यात

गोंदिया : तालुक्यातील दत्तोरा येथील ग्रामपंचायतच्या वॉर्ड क्रमांक दोन येथील अधिक मते घेणाऱ्या उमेदवारांना पराभूत तर कमी मते घेणाऱ्या उमेदवाराला विजयी झाल्याचे प्रमाणपत्र गोंदियानिवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिले. यामुळे नेमका कोण विजयी हा पेच पुढे असून यासंदर्भात पुन्हा मतमोजणी करावी व निकाल द्यावा, अशी मागणी दोन उमेदवारांनी केली आहे.

निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दत्तोराच्या वॉर्ड क्रमांक २ येथे जोडपत्र १५ मध्ये हेमने विनोद सदाशिव यांना ३०६ मते, तर त्यांच्या विरोधात असलेल्या उमेदवाराला २८७ मते मिळाली आहेत, तसेच सुरेखा कोरे यांना ३०५ मते मिळालेली असून त्यांच्या विरोधातील उमेदवाराला २८६ मते मिळाली आहेत. कमी मते घेणाऱ्याला विजयी आणि जास्त मते घेणाऱ्याला पराभूत झाल्याचा गोंधळ निवडणूक निर्णय अधिकारी व्ही.एन. इलमकर आणि सह निवडणूक अधिकारी लिल्हारे यांनी केला आहे. यामुळे दत्तोरा येथील लोकांत संभ्रम निर्माण झाला असून, उपसरपंचाची निवडणूक स्थगित करण्यासंदर्भात तालुका निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी २ जानेवारी रोजी पत्र दिले आहे. जिल्हाधिकाऱ्यांना पाठविलेल्या माहितीतदेखील विनोद हेमने व सुरेखा कोरे हे विजयी झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी पाठविले आहे; परंतु त्यांना विजयी झाल्याचे प्रमाणापत्र निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहणारे व्ही.एन. इलमकर यांनी दिले नाही.

पुन्हा मतमोजणी करा

दत्तोरा येथील वॉर्ड क्रमांक दोन येथील मतमोजणी पुन्हा करून आम्हाला न्याय देण्यात यावा, अन्यथा विजयाचे प्रमाणपत्र देण्यात यावे. तोपर्यंत उपसरपंचाची निवडणूक घेऊ नये, असा पवित्रा दत्तोरा येथील लोकांनी घेतला आहे.

अहवालाच्या आधारे होईल कारवाई

मतमोजणीत जे विजयी झाले त्यांनाच विजयाचे प्रमाणपत्र देण्यात आले. चुकीने पराभूत झालेल्यांची नावे विजयाच्या यादीत आल्याचे इलमकर यांनी सांगितल्याचे तहसीलदार संतोष खांडरे यांनी सांगितले. आलेल्या अहवालाच्या आधारे पुढील कारवाई करण्यात येईल, असेही खांडरे यांनी सांगितले.

सुटीच्या दिवशी विजयाचे प्रमाणपत्र कसे दिलेे

१८ डिसेंबर रोजी निवडणूक झाली. त्याचवेळी विजयी झाल्याचे प्रमाणपत्र विजयी उमेदवारांना द्यायला पाहिजे होते; परंतु त्या दिवशी विजयाचे प्रमाणपत्र न देता सुटीच्या दिवशी विजयाचे प्रमाणपत्र १ जानेवारीला देण्यामागील निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचे हित काय, असा सवाल विनोद हेमने व सुरेखा कोरे यांनी केला आहे.

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतElectionनिवडणूकElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगgondiya-acगोंदिया