शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
5
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
6
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
7
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
8
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
9
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
10
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
11
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
12
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
13
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
14
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
15
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
16
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
17
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
18
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
19
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
20
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली

कृषीसेवक सरळ सेवा परीक्षा रद्द करा

By admin | Updated: September 21, 2016 00:54 IST

कृषी सेवक सरळ सेवा पदभरती परिक्षेच्या निकालात राज्यातील सर्वच विभागात मोठ्या प्रमाणात घोळ झाल्याचे लक्षात आल्यानंतर

अन्यथा आंदोलनाचा इशारा : पदवीधर महासंघाची मागणीभंडारा : कृषी सेवक सरळ सेवा पदभरती परिक्षेच्या निकालात राज्यातील सर्वच विभागात मोठ्या प्रमाणात घोळ झाल्याचे लक्षात आल्यानंतर तसेच भंडारा जिल्ह्यातील विद्यार्थ्यांवर सुध्दा अन्याय झाल्याचे स्पष्ट दिसून आल्यानंतर पदवीधर महासंघाच्या कार्यकर्त्यांनी शहर अध्यक्ष पराग भुतांगे व राहुल शामकुंवर यांच्या नेतृत्वात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जिल्हाधिकारी चौधरी यांच्या मार्फत निवेदन पाठवून सदर परिक्षा रद्द करुन पुर्नपरिक्षा घ्यावी अश्या प्रकारचे निवेदन देण्यात आले. राज्यात कृषी सेवकांच्या ७३० पदांसाठी परिक्षा ६ आॅगस्ट २०१६ रोजी घेण्यात आली. या परिक्षेत ६५ हजारावर विद्यार्थ्यांनी दखल केले होते. त्यापैकी ५७ हजार विद्यार्थ्यांनी परिक्षा दिली या परिक्षेचा निकाल ६ सप्टेंबर २०१६ रोजी जाहिर करण्यात आला.पंरतु सदर निवड प्रक्रियेमध्ये घोळ आढळून आलेत. विशाल उखा पाटील (अर्ज क्र. १३६६४) हा विद्यार्थी औरंगाबाद विभागातून ओबीसी प्रवर्गातून १८२ गुण प्राप्त करीत ह्याची निवड ओपन जनरल १३ मध्ये झाली. हाच विद्यार्थी ठाणे विभागातून (अर्ज क्र. ४८१७) ओबीसी प्रवर्गातून १८२ गुण प्राप्त करीत ह्याची निवड ओपन जनरल ९ मध्ये झाली. पुणे विभागातून हरिश कैलास देवरे व नरेश कैलास देवरे भाऊ उत्तीर्ण झाले. या दोन्ही भावाना १८३ गुण प्राप्त झाले. विशेष म्हणजे या दोन भावाच्या वयात केवळ सहा महिन्याचे अंतर आहे. औरंगाबाद विभागात प्रथम क्रमांकाच्या विद्यार्थ्याला १८७ गुण त्याखालोखाल १८४ गुण प्राप्त केलेले पाच विद्यार्थी, १८३ गुण प्राप्त केलेले सहा विद्यार्थी, १८२ गुण प्राप्त केलेले तीन विद्यार्थी व त्यानंतर थेट १३७ गुण प्राप्त केलेला परिक्षार्थी. कोल्हापुर विभागात प्रथम क्रमांकाच्या विद्यार्थ्याला १८२ गुण त्याखालोखाल १८१ गुण प्राप्त केलेले चार विद्यार्थी व त्यानंतर थेट १५० गुण प्राप्त केलेला परिक्षार्थी. अमरावती विभागात सर्वसाधारण गटात फक्त १२४ गुणांवर प्रथम क्रमांकाचा विद्यार्थी आहे. नागपूर विभागात १६५ ते १८२ गुणांच्या दरम्यान १६ मुले आहेत व १४८ ते १६२ गुणांच्या दरम्यान एकही उमेदवार नाही व नंतर थेट १४८ गुणांच्या खाली इतर परिक्षार्थी आहेत. मेरिट लिस्ट व प्रतिक्षा यादीतील गुणांमध्ये मोठी तफावत आहे. निवड यादीत ओपन प्रवर्गातील पुरुष निवड यादी ९२ गुणांवर तसेच महिला निवड यादी ९१ गुणावंर झाली. याच्या तुलनेत ओबीसी महिला यादी ११३ व ओबीसी पुरुष यादी १२९ गुणांवर अंतिम निवड करण्यात आली. ओबीसी उमेदवारांना जास्त गुण असूनसुध्दा डावलण्यात आल्याचे स्पष्ट होते व ओपन प्रवर्गातील विद्यार्थ्यांची निवड कमी गुणांवर सुध्दा करण्यात आली. सर्वसाधारण गटात गुणवत्ता यादीत १८६ गुणांचा विद्यार्थी पहिला आला आहे. परंतु प्रश्न पत्रिकेचे अवघड स्वरुप बघता मेरिटचे आकडे संशयास्पद आहेत. करिता सद विद्यार्थ्यांची परिक्षा केंद्रावरील व्हिडीओ रेकॉर्डींग तपासण्यात यावी जेणेकरुन कुणी याना मदत तर करीत किंवा अत्याधुनिक उपकरणाचे वापर तर करीत नाहीत तसेच सदर प्रकरणाची सीआयडी चौकशी करण्यात यावी व त्यात पदवीधर महासंघ भंडारा जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचे मत सुध्दा नोंदविण्यात यावे. परीक्षा रद्द न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा पदवीधर महासंघाचे शहर अध्यक्ष पराग भुतांगे, राहुल शामकुवर, जाबीर मालाधारी, शितल भुरे, प्रवीण अंबादे, सुदेश रामटेके, जितेंद्र मेश्राम, प्रफुल्ल कोटांगले, ब्रजेश खोब्रागडे, मयूर रामटेके, नितीन कांबळे, प्रमोद धुर्वे, रवी समरीत, संदीप वंजारी, प्रफुल्ल भोयर यांनी दिला आहे. (नगर प्रतिनिधी)