शहरं
Join us  
Trending Stories
1
एकाचवेळा तीन बिबट्यांच्या घराला घिरट्या; शिकारीच्या शोधात आलेले सीसीटीव्ही कॅमेरात कैद 
2
अल-फलाह विद्यापीठाचा संस्थापक जावेद सिद्दीकीवर मोठी कारवाई; ईडीने केली अटक! मनी लॉन्ड्रिंग, घोटाळ्याचा आरोप
3
मोठी दुर्घटना: पुलावरच दोन बसची समोरासमोर धडक; एका नेपाळी महिलेचा मृत्यू, ३५ हून अधिक प्रवासी जखमी
4
राज ठाकरेंनी फटकारले, पिट्याभाईने मनसेलाच सोडले; नाराज रमेश परदेशीचा भाजपमध्ये प्रवेश 
5
Asia Cup Rising Stars 2025 : विदर्भकराची मॅच विनिंग फिफ्टी! भारतीय संघाची सेमीफायनलमध्ये एन्ट्री
6
डॉ. उमरला करायचा होता 9/11 सारखा घातपात, पण मुजम्मिल सोबत झाले मतभेद अन् फेल झाला संपूर्ण मनसुबा!
7
ऑटोमोबाईल क्षेत्रातील चमत्कार! होंडाकडे आहे जगातील सर्वात 'स्वस्त' प्रायव्हेट जेट; जाणून घ्या किंमत आणि वैशिष्ट्ये
8
चीन-जपानमध्ये अचानक तणाव वाढला, युद्धाच्या उंबरठ्यावर; जपानच्या दूताने बिजिंग सोडले...
9
दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीला साबरमती तुरुंगात कैद्यांकडून मारहाण; एटीएस, पोलिसांत उडाली खळबळ 
10
"८-९ महिन्यापूर्वी उदय सामंत यांच्यासह एकनाथ शिंदे यांचे २० आमदार फुटत होते, पण...!"; शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांचा मोठा गौप्यस्फोट
11
अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का! उज्वला थिटे यांचा नगराध्यक्षपदासाठीचा अर्ज बाद
12
मुळशी पॅटर्न फेम 'पिट्या भाई' भाजपात जाणार? राज ठाकरेंनी सुनावल्यानंतर पुन्हा केली फेसबुक पोस्ट, म्हणाले...
13
Travel : भारताचे १०००० रुपये 'या' देशात जाऊन होतील २५ लाख! ४ दिवसांच्या ट्रिपसाठी बेस्ट आहे ऑप्शन
14
झटक्यात ₹3900 रुपयांनी आपटलं सोनं! चांदीही झाली स्वस्त; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
15
"हिडीस, किळसवाणं, एखाद्या अबलेवर बलात्कार करावा, तसे भाजपा वागतेय", एकनाथ शिंदेंच्या नेत्याला संताप अनावर
16
लॉरेन्सच्या भावाला अमेरिकेतून गचांडी धरून भारतात आणले जाणार; बाबा सिद्दीकी हत्याकांड प्रकरणी मोठे खुलासे होणार... 
17
"शिंदे आणि अजित पवार यांच्या बाजूला बसून त्यांच्याच विरोधात ऑपरेशन कमळ..."; भाजपने डिवचताच काँग्रेसने काढली खपली
18
Tej Pratap Yadav : "आई-वडिलांचा मानसिक छळ...", तेज प्रताप यादव यांनी मोदी, शाह यांच्याकडे मागितली मदत
19
"एक बाटली रक्तावर ज्यांचे रक्त सुखते तेच उपदेश...", रोहिणी आचार्य यांनी तेजस्वी यादव यांच्यावर साधला निशाणा
20
"हो, एकनाथ शिंदेंसह CM फडणवीसांना भेटलो आणि आता निर्णय झालाय"; सरनाईकांनी सांगितलं नाराजी प्रकरणी काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

बिरसी येथील अतिक्रमणावर बुधवारी चालला बुलडोझर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2021 05:00 IST

बिरसी येथे बिरसी विमानतळ प्रशासनाने बुधवारी सकाळपासून चोख पोलीस बंदोबस्तात बुलडोझर लावूृन अतिक्रमण हटविण्यास सुरुवात केली. बिरसी विमानतळ प्राधिकरणाने कुठलीही पर्यायी व्यवस्था न करता, अतिक्रमण हटविण्यास सुरुवात केल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण होते. अतिक्रमणधारकांनी बुलडोझरपुढे झोपूृन अतिक्रमण तोडण्याला विरोध केला. त्यामुळे काहीकाळ तणावाची स्थिती निर्माण झाली होती.

ठळक मुद्दे१०६ कुटुंब उघड्यावर : पुनर्वसन न केल्याने रोष ; मोहिमेला केला विरोध, चोख पोलीस बंदोबस्त

लोकमत न्यूज नेटवर्कखातिया :  गोंदिया तालुक्यातील बिरसी येथील विमानतळ प्राधिकरणाच्या अंतर्गत येणारे अतिक्रमण बुधवारी (दि. २४) बुलडोझर लावून काढण्यात आले. येथील प्रकल्पग्रस्त १०६ कुटुंबांचे पुनर्वसन न करताच हे अतिक्रमण हटविल्याने या कुटुंबांवर उघड्यावर राहण्याची वेळ आली आहे. या अतिक्रमण हटाव मोहिमेला येथील नागरिकांनी विरोध केला. यामुळे काहीकाळ तणावपूर्ण स्थिती निर्माण झाली होती. मात्र, पोलिसांनी वेळीच परिस्थितीवर नियंत्रण मिळवले. बिरसी येथे बिरसी विमानतळ प्रशासनाने बुधवारी सकाळपासून चोख पोलीस बंदोबस्तात बुलडोझर लावूृन अतिक्रमण हटविण्यास सुरुवात केली. बिरसी विमानतळ प्राधिकरणाने कुठलीही पर्यायी व्यवस्था न करता, अतिक्रमण हटविण्यास सुरुवात केल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण होते. अतिक्रमणधारकांनी बुलडोझरपुढे झोपूृन अतिक्रमण तोडण्याला विरोध केला. त्यामुळे काहीकाळ तणावाची स्थिती निर्माण झाली होती. मात्र, पोलिसांनी या परिस्थितीवर वेळीच नियंत्रण मिळवले, त्यामुळे मोठा अनर्थ टळला. येथील अतिक्रमण हटविल्यामुळे अनेक कुटुंब बेघर झाली आहेत. त्यामुळे या कुटुंबांचा वाली कोण? असा प्रश्न विचारला जात आहे. एकीकडे गेल्या १० वर्षांपासून पुनर्वसनाची वाट बघणारी १०६ कुटुंब बिरसी विमानतळासमोर धरणे आंदोलन करत आहेत तर दुसरीकडे बिरसी विमानतळ प्राधिकरणाने त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करत बुलडोझर लावून अतिक्रमण हटवले. त्यामुळे या कुटुंबांसमोर मोठा बिकट प्रश्न निर्माण झाला आहे.  अतिक्रमण काढल्यामुळे जे परिवार बेघर झाले आहेत ते गेल्या २० ते २५ वर्षांपासून या जागेवर राहात होते. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे प्रशासनाने याची दखल घेतलेली नाही. त्यामुळे या नागरिकांमध्ये प्रशासनाविरोधात मोठा रोष आहे. या अतिक्रमण हटाव मोहिमेदरम्यान एकाही लोकप्रतिनिधीने उपस्थित राहून ही मोहीम थांबवली नाही. याबद्दल नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला. 

काही कुटुंबांनी घेतला ग्रामपंचायतीमध्ये आसरा बुधवारी बिरसी येथील अतिक्रमण हटविण्यात आल्यानंतर येथील बेघर झालेल्या २५ ते ३० कुटुंबांनी ग्रामपंचायतीमध्ये तात्पुरता आसरा घेतला तर काही कुटुंबांना कुठलाही आधार नसल्याने त्यांनी रस्त्याच्या कडेलाच आसरा घेतला आहे. बेघर झालेल्या या कुटुंबांच्या आसऱ्याची जिल्हा प्रशासनाने व्यवस्था करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. निधी उपलब्ध असूनही पुनर्वसन नाहीबिरसी विमानतळामुळे प्रकल्पग्रस्त झालेल्या कुटुंबांचे पुनर्वसन करण्यासाठी विमानतळ प्राधिकरणाने गोंदिया उपविभागीय कार्यालयाकडे निधी जमा केला. त्याला आता पाच ते सहा वर्षांचा कालावधी झाला. मात्र, अद्यापही या निधीचे वितरण करुन प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन करण्यात आलेले नाही. त्यामुळे येथील प्रकल्पग्रस्त कुटुंबांवर उघड्यावर राहण्याची वेळ आली आहे.

 

टॅग्स :Enchroachmentअतिक्रमण