शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
2
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
3
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
4
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
5
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
6
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
7
१२४ वर्षांनंतर अक्षय तृतीया-चतुर्थी-रोहिणी नक्षत्र अन् बुधवारचा दुर्मीळ योग!
8
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
9
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
10
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
11
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
12
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
13
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
14
टी२० मुंबई लीगसाठी आयकॉन खेळाडूंची घोषणा; यादीत सूर्यकुमार, श्रेयससह ८ भारतीय खेळाडू
15
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
16
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
17
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
18
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
19
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
20
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल

तत्काळ आरक्षणात दलालच ठरताहेत वरचढ

By admin | Updated: November 11, 2014 22:42 IST

रेल्वे आरक्षण केंद्रात सध्या तत्काळ आरक्षणासाठी इच्छुकांची चांगलीच पंचाईत होत असल्याचे दिसून येत आहे. तत्काळचे तिकीट घेऊ इच्छिणाऱ्यांना आरक्षणासाठी केंद्राबाहेर रांग लावावी लागते.

गोंदिया : रेल्वे आरक्षण केंद्रात सध्या तत्काळ आरक्षणासाठी इच्छुकांची चांगलीच पंचाईत होत असल्याचे दिसून येत आहे. तत्काळचे तिकीट घेऊ इच्छिणाऱ्यांना आरक्षणासाठी केंद्राबाहेर रांग लावावी लागते. १० वाजता केंद्र सुरू झाल्यानंतरच त्यांना आत प्रवेश दिला जातो. विशेष म्हणजे एवढा आटापिटा करूनही त्यांच्यावर दलाल वरचढ ठरत आहे. त्यामुळे रेल्वे कर्मचारी आणि दलालांमधील हे मधूर संबंध संपुष्टात येऊन सर्वसामान्य ग्राहकांना रेल्वे प्रशासनाने दिलासा देण्याची मागणी होत आहे.सर्व सुविधा व सुरक्षित असे वाहतुकीचे साधन म्हणजे आज रेल्वे समजले जाते. यामुळेच रेल्वे विभागाच्या सेवेवर विश्वास ठेवून बहुतांश नागरिक रेल्वेने प्रवास करतात. साधारण व आरक्षण अशा दोन वर्गाने रेल्वेने प्रवाश्यांना प्रवासाची सुविधा उपलब्ध करवून दिली आहे. यात आरक्षण सुविधेसाठी रेल्वे स्थानकाच्या रेलटोली परिसरात विशेष आरक्षण केंद्र सुरू आहे. हे आरक्षण केंद्र आजघडीला समस्यांचे केंद्र बनले आहे. येथे प्रवाश्यांपेक्षा दलालांना जास्त सुविधा पुरविल्या जात असल्याचे दिसून येते. विशेष म्हणजे या केंद्रात तत्काळ श्रेणीतून आरक्षण करविण्यासाठी येणाऱ्यांची चांगलीच पंचाईत होते. आकस्मिक प्रवासाचा योग घडून आल्यास तत्काळ आरक्षण सेवा अत्यंत उपयोगी पडते. या सेवेचा अर्थच त्वरित आरक्षण मिळणे हे आहे. यामुळेच बहुतांश नागरिक आज काही पैसे जास्त मोजून तत्काळ आरक्षण सेवेचा लाभ घेण्यासाठी धजावतात, मात्र यासाठी येथील आरक्षण केंद्रावर केंद्राच्या निरीक्षकांनी विशेष नियम लाऊन ठेवल्याचे बोलले जात आहे. आरक्षण केंद्रात चार खिडक्या आहेत. यातील दोन खिडक्या सामान्य तर दोन खिडक्या आरक्षण तिकीटांच्या आहेत. सामान्य तिकीटांसाठी असलेल्या दोन खिडक्यांतील एक खिडकी पहाटे ४ वाजता तर दुसरी खिडकी सकाळी ७ वाजता उघडते. तसेच आरक्षण तिकीटांसाठी असलेल्या दोन खिडक्यांतील खिडक्या सकाळी आठ वाजता उघडतात. या खिडक्यांमधूनच सकाळी १० वाजतापासून तत्काल आरक्षणाची सुविधा सुरू होते. मात्र त्यासाठी भल्या पहाटेपासूनच नागरिकांची लांबलचक रांग लागते. खास बात म्हणजे, ही रांग आरक्षण केंद्राच्या चॅनल गेटच्या बाहेर लावावी लागते व तसे केंद्राचे निरीक्षक एल.सी.साहू यांचे आदेश असल्याचे सांगण्यात येते.शिवाय सकाळी १० वाजता तत्काळ आरक्षणाची खिडकी सुरू होत नाही तोपर्यंत तत्काळ तिकीटसाठी आलेल्यांना आत प्रवेश दिला जात नाही. त्यांना बाहेरच रांगेत तासनतास ताटकळत उभे रहावे लागते असे प्रवाश्यांनी सांगितले. अशात कुणाला पाण्याची किंवा बसण्याची सुविधाही तेथे नाही. जर कुणी रांगेतून बाहेर पडलाच तर त्याला आपली जागा चुकवावी लागते व यातूनच येथे दररोज भांडणे होतात. एकंदर तत्काळ आरक्षणासाठी रांगेत लागणाऱ्यांनाच येथे तत्काळ सुविधा पुरवून येथील दलालराज बंद करावे अशी मागणी नागरिक करू लागले आहेत. (शहर प्रतिनिधी)