शहरं
Join us  
Trending Stories
1
"ट्रम्प यांनी हस्तक्षेप केला नसता तर...'; शहबाज शरीफ बनले अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचे प्रवक्ते, शांतीदूत म्हणत नोबेल देण्याची मागणी
2
सुपर ओव्हरचा थरार! श्रीलंका २ धावांवर All Out; पहिल्या बॉलवर मॅच जिंकत टीम इंडियाचा विजयी 'षटकार'
3
"सात भारतीय विमानं पाडली...!"; संयुक्त राष्ट्रांच्या मंचावर खोटारड्या शाहबाज शरीफ यांची नुसती 'फेका-फेक'
4
सोनम वांगचुक जोधपूर मध्यवर्ती कारागृहात; अटक केल्यानंतर लेहमधून विमानाने आणलं, CCTV खाली देखरेख
5
Pathum Nissanka Century : पहिली सेंच्युरी अन् श्रीलंकेच्या पठ्ठ्यानं किंग कोहलीचा मोठा विक्रमही मोडला
6
फुल-ऑन ड्रामा! संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत नेतन्याहू भाषणाला येताच अनेक देशांचं 'वॉकआउट'
7
संजूचा गगनचुंबी सिक्सर! चाहतीचे ठुमके अन् ड्रेसिंग रुममध्ये सनथ जयसूर्याला कळायचं झालं बंद (VIDEO)
8
अभिषेक शर्माचा महारेकॉर्ड! T20 आशिया कप स्पर्धेत ३०९ धावांसह पाकच्या रिझवानला दिली 'धोबीपछाड'
9
आशिया कप फायनल आधी ICC कडून सूर्यकुमार यादव याच्यावर कारवाई; PCB नं केली होती तक्रार
10
"त्या डोंगरेला निलंबित करा, माझं नाव खराब करता"; वाहतूक कोंडीवरुन एकनाथ शिंदे अधिकाऱ्यांवर संतापले
11
अग्निशमन दलाचे जवान घरात घुसताच सिलिंडरचा स्फोट; फ्लॅटमध्ये लागलेल्या आगीत मुलाचा मृत्यू, ५ जण जखमी
12
ठरलं, ८-९ ऑक्टोबरला PM मोदी महाराष्ट्रात येणार; CM फडणवीस म्हणाले, “नवी मुंबई विमानतळ...”
13
“राऊतांनी खासदारकीचा एक महिन्याचा पगार दिला असता तर आभार मानले असते”; कुणी केली खोचक टीका?
14
"रशियन सैन्यात जावू नका, तुमच्या जीवाला धोका"; सरकारने दिला इशारा, म्हणाले, "२७ भारतीय..."
15
या एसयूव्हीचं फक्त नावच काफी...! विक्रीच्या बाबतीत पुन्हा ठरली नंबर-1; 38% मार्केट केला एकटीनं 'कॅप्चर'
16
भारताच्या दिग्गज डिफेंस कंपनीला थेट इस्रायलमधून मिळाली मोठी ऑर्डर, अशी आहे शअरची स्थिती
17
VIDEO: बापरे... चिमुरड्याने बसल्या बैठकीला कचाकचा खाल्ल्या हिरव्या मिरच्या, नेटकरीही थक्क
18
कोण आहेत अरुणाचल प्रदेशात पंतप्रधान मोदींचं स्वागत करणाऱ्या या 'डॅशिंग' IAS अधिकारी? सोशल मीडियावर होतायत व्हायरल!
19
“६०० कोटींचा फंड, लोक मरत होते, पण एक पैसा खर्च केला नाही”; CM फडणवीसांचा ठाकरेंवर हल्लाबोल
20
MPSC Exam 2025: विद्यार्थ्यांच्या मागणीला यश, एमपीएससी परीक्षा पुढे ढकलली! आयोगाकडून नवीन तारीख जाहीर

तत्काळ आरक्षणात दलालच ठरताहेत वरचढ

By admin | Updated: November 11, 2014 22:42 IST

रेल्वे आरक्षण केंद्रात सध्या तत्काळ आरक्षणासाठी इच्छुकांची चांगलीच पंचाईत होत असल्याचे दिसून येत आहे. तत्काळचे तिकीट घेऊ इच्छिणाऱ्यांना आरक्षणासाठी केंद्राबाहेर रांग लावावी लागते.

गोंदिया : रेल्वे आरक्षण केंद्रात सध्या तत्काळ आरक्षणासाठी इच्छुकांची चांगलीच पंचाईत होत असल्याचे दिसून येत आहे. तत्काळचे तिकीट घेऊ इच्छिणाऱ्यांना आरक्षणासाठी केंद्राबाहेर रांग लावावी लागते. १० वाजता केंद्र सुरू झाल्यानंतरच त्यांना आत प्रवेश दिला जातो. विशेष म्हणजे एवढा आटापिटा करूनही त्यांच्यावर दलाल वरचढ ठरत आहे. त्यामुळे रेल्वे कर्मचारी आणि दलालांमधील हे मधूर संबंध संपुष्टात येऊन सर्वसामान्य ग्राहकांना रेल्वे प्रशासनाने दिलासा देण्याची मागणी होत आहे.सर्व सुविधा व सुरक्षित असे वाहतुकीचे साधन म्हणजे आज रेल्वे समजले जाते. यामुळेच रेल्वे विभागाच्या सेवेवर विश्वास ठेवून बहुतांश नागरिक रेल्वेने प्रवास करतात. साधारण व आरक्षण अशा दोन वर्गाने रेल्वेने प्रवाश्यांना प्रवासाची सुविधा उपलब्ध करवून दिली आहे. यात आरक्षण सुविधेसाठी रेल्वे स्थानकाच्या रेलटोली परिसरात विशेष आरक्षण केंद्र सुरू आहे. हे आरक्षण केंद्र आजघडीला समस्यांचे केंद्र बनले आहे. येथे प्रवाश्यांपेक्षा दलालांना जास्त सुविधा पुरविल्या जात असल्याचे दिसून येते. विशेष म्हणजे या केंद्रात तत्काळ श्रेणीतून आरक्षण करविण्यासाठी येणाऱ्यांची चांगलीच पंचाईत होते. आकस्मिक प्रवासाचा योग घडून आल्यास तत्काळ आरक्षण सेवा अत्यंत उपयोगी पडते. या सेवेचा अर्थच त्वरित आरक्षण मिळणे हे आहे. यामुळेच बहुतांश नागरिक आज काही पैसे जास्त मोजून तत्काळ आरक्षण सेवेचा लाभ घेण्यासाठी धजावतात, मात्र यासाठी येथील आरक्षण केंद्रावर केंद्राच्या निरीक्षकांनी विशेष नियम लाऊन ठेवल्याचे बोलले जात आहे. आरक्षण केंद्रात चार खिडक्या आहेत. यातील दोन खिडक्या सामान्य तर दोन खिडक्या आरक्षण तिकीटांच्या आहेत. सामान्य तिकीटांसाठी असलेल्या दोन खिडक्यांतील एक खिडकी पहाटे ४ वाजता तर दुसरी खिडकी सकाळी ७ वाजता उघडते. तसेच आरक्षण तिकीटांसाठी असलेल्या दोन खिडक्यांतील खिडक्या सकाळी आठ वाजता उघडतात. या खिडक्यांमधूनच सकाळी १० वाजतापासून तत्काल आरक्षणाची सुविधा सुरू होते. मात्र त्यासाठी भल्या पहाटेपासूनच नागरिकांची लांबलचक रांग लागते. खास बात म्हणजे, ही रांग आरक्षण केंद्राच्या चॅनल गेटच्या बाहेर लावावी लागते व तसे केंद्राचे निरीक्षक एल.सी.साहू यांचे आदेश असल्याचे सांगण्यात येते.शिवाय सकाळी १० वाजता तत्काळ आरक्षणाची खिडकी सुरू होत नाही तोपर्यंत तत्काळ तिकीटसाठी आलेल्यांना आत प्रवेश दिला जात नाही. त्यांना बाहेरच रांगेत तासनतास ताटकळत उभे रहावे लागते असे प्रवाश्यांनी सांगितले. अशात कुणाला पाण्याची किंवा बसण्याची सुविधाही तेथे नाही. जर कुणी रांगेतून बाहेर पडलाच तर त्याला आपली जागा चुकवावी लागते व यातूनच येथे दररोज भांडणे होतात. एकंदर तत्काळ आरक्षणासाठी रांगेत लागणाऱ्यांनाच येथे तत्काळ सुविधा पुरवून येथील दलालराज बंद करावे अशी मागणी नागरिक करू लागले आहेत. (शहर प्रतिनिधी)