शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Scam Pune: नवी माहिती! पार्थ पवारांनी सहीचे अधिकार दिले होते दिग्विजय पाटलांना, ठराव समोर आल्यानं वेगळं वळण
2
पार्थ पवारांना डेटा सेंटर म्हणून एवढी मोठी सूट मिळाली, पण...; पुण्यातील जमीन घोटाळ्यात मोठी माहिती समोर
3
'जरांगे, थोतांड करू नका! आरोपी यांचेच, आरोपही हेच करणार'; हत्येची सुपारी दिल्याच्या आरोपावर धनंजय मुंडेंचा संताप
4
"मते चोरून सत्तेत आलेल्यांनीच जमीन चोरली, कारण त्यांना..."; राहुल गांधींचा पार्थ पवार भूखंड खरेदी प्रकरणावरून घणाघात
5
हात मिळवता मिळवता एकमेकांचे पाय खेचू लागले चीन-अमेरिका; China च्या एका निर्णयानं ट्रम्प यांचा तिळपापड
6
Dental Care: टार्टर आणि प्लाक दातांचे मुख्य शत्रू, करू शकतात गंभीर नुकसान; वेळीच घ्या 'ही' काळजी 
7
केक कापला, डीजे लावला आणि..., शेतकऱ्याने दणक्यात साजरा केला रेड्याचा वाढदिवस
8
१० लोकांना संपवलं, २७ जणांना मारण्याच्या तयारीत; नर्स रुग्णांच्या जीवावर का उठली? कारण ऐकाल तर..
9
माझी अन् त्यांची एकदा नार्को टेस्ट करा; जरांगे पाटलांच्या आरोपांवर धनंजय मुंडेंचे प्रत्युत्तर
10
चिकन नेकजवळ भारतीय लष्करानं केलं असं काम, शत्रूची प्रत्येक चाल होणार फेल
11
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दर घसरले; खरेदी करण्यापूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याचे लेटेस्ट रेट
12
मी काका झालो! कौशल कुटुंबात आला छोटा पाहुणा; विकीचा भाऊ सनीने व्यक्त केला आनंद
13
IPS Aakash Shrishrimal : एक नंबर! वडील उद्योगपती, आई LIC एजंट, बहीण CA... अभिनेत्रीचा पती आहे IPS ऑफिसर
14
Crime: चाकूचा धाक दाखवून परप्रांतीय कामगाराला मारहाण; पाय चाटण्यास भाग पाडले!
15
सर्वात व्यस्त दिल्ली विमानतळावर ‘ट्रॅफिक जाम’! ३०० हून अधिक विमानांना विलंब; पार्किंगलाही जागा नाही!
16
घर खरेदी करण्याची योग्य वेळ कोणती? तुमच्या पगारावर EMI चा किती बोजा असावा, 'हे' गणित तपासा!
17
ज्ञानेश कुमार निवृत्तीनंतर शांतपणे आयुष्य जगता येणार नाही..; प्रियंका गांधींचा निवडणूक आयुक्तांना इशारा
18
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतली अण्णा हजारेंची भेट; नेमके काय बोलणे झाले? चर्चांना उधाण
19
'इंग्रजांची साथ; 52 वर्षे तिरंगा फडकवला नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा भाजपा-RSS वर गंभीर आरोप
20
बँक कर्मचाऱ्यांनी स्थानिक भाषेतच बोलावं, अर्थमंत्री निर्मला सीतारामन का म्हणाल्या असं?

जि.प.मधील युतीचा ब्रेकअप आठ दिवसात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2019 22:29 IST

एकमेकांचे विरोधक असलेल्या भाजप आणि काँग्रेसची मागील चार वर्षांपासून गोंदिया जिल्हा परिषदेत अभद्र युती आहे. मात्र भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांची विचारधारा वेगळी असून भाजपची विचारधारा ही केव्हाच काँग्रेसला मान्य नाही.

ठळक मुद्देनाना पटोले : जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करा, जिल्हा काँग्रेसमध्ये चैतन्य निर्माण करणार

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : एकमेकांचे विरोधक असलेल्या भाजप आणि काँग्रेसची मागील चार वर्षांपासून गोंदिया जिल्हा परिषदेत अभद्र युती आहे. मात्र भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांची विचारधारा वेगळी असून भाजपची विचारधारा ही केव्हाच काँग्रेसला मान्य नाही. त्यामुळे येत्या आठ दिवसात जि.प.तील अभद्र युती तोडण्यात येईल अशी ग्वाही काँग्रेसच्या प्रचार समितीचे प्रमुख माजी खा.नाना पटोले यांनी रविवारी (दि.२१) येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली.स्थानिक विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेला जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष पुरुषोत्तम कटरे, महासचिव अमर वºहाडे, विनोद जैन, के.आर.शेन्डे, डॉ.नामदेव किरसान उपस्थित होते. जि.प.ची पोटनिवडणूक पार पडल्यानंतर गोंदिया जि.प.मध्ये असलेली काँग्रेस-भाजप अभद्र युती तोडण्यात येईल, असे जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम कटरे यांनी पक्ष श्रेष्ठींना सांगितले होते.मात्र पोटनिवडणूक होवून महिनाभराचा कालावधी लोटूनही युती तोडण्यात आली नसल्याचा प्रश्न माजी खा.नाना पटोले यांना केला असता त्यांनी ही अभद्र युती पक्षाला सुध्दा मान्य नाही.येत्या आठ दिवसात जि.प.तील अभद्र युती तोडण्यात येईल असे सांगितले.गोंदिया जिल्ह्यात पावसाअभावी दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे.त्यामुळे राज्यातील सत्तारुढ भाजप सरकारने जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करुन शेतकऱ्यांना एकरी २५ हजार रुपये आर्थिक मदत देण्याची मागणी केली. सरकारने यावर त्वरीत निर्णय न घेतल्यास भाजपच्या एकाही मंत्र्याला जिल्ह्यात आणि गावात पाय ठेवू देणार नाही, या विरोधात लवकरच आंदोलन छेडण्यात येणार असल्याचे सांगितले.भाजप सरकारने सत्तेवर येण्यापूर्वी शेतकरी कर्जमाफी, बेरोजगारांना रोजगार व कल्याणकारी योजना राबविण्याचे आश्वासन दिले होते.मात्र यापैकी एकाही आश्वासनाची पुर्तत: केली नाही. शेतकरी कर्जमाफीची घोषणा करुन तीन वर्षांचा कालावधी लोटला मात्र अद्याप शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला नाही.उलट शेतकरी थकबाकीदार झाल्याने त्यांना राष्टÑीयकृत बँकाकडून कर्ज देण्यास टाळाटाळ केली जात आहे.पावसाअभावी दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असून ज्या शेतकºयांकडे सिंचनाची सोय आहे. त्यांना १६ तास वीज देण्याची मागणीही पटोले यांनी केली.निवडणूक लढण्याचा निर्णय पक्षावरआगामी विधानसभा निवडणूक आपण लढणार का असा प्रश्न नाना पटोले यांना केला असता सध्या आपल्यावर पक्षाने राज्याच्या प्रचारप्रमुखाची जबाबदारी सोपविली आहे.त्यामुळे ती यशस्वीपणे पार पाडणे ही पहिली जबाबदारी आहे.पक्षाने विधानसभा निवडणूक लढण्याचे आदेश दिल्यास आपण निर्णय घेवू असे पटोले म्हणाले.

टॅग्स :Nana Patoleनाना पटोलेzpजिल्हा परिषद