शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

बंधाऱ्यांच्या सर्वेक्षणातही बोगसपणा

By admin | Updated: June 7, 2015 01:26 IST

जिल्ह्यात लघुसिंचन विभागातर्फे करण्यात आलेल्या जलसंधारणाच्या कामांचे एक-एक नमुने समोर येत आहेत.

गोंदिया : जिल्ह्यात लघुसिंचन विभागातर्फे करण्यात आलेल्या जलसंधारणाच्या कामांचे एक-एक नमुने समोर येत आहेत. अनेक ठिकाणी केलेल्या पाणी साठवण बंधाऱ्यांच्या कामातच निकृष्टपणा नसून हे बंधारे बांधण्यासाठी जे सर्वेक्षणाचे काम झाले त्यातही बोगसपणा झाल्याचे स्पष्ट होत आहे.२०११-१२ मध्ये गोंदिया, तिरोडा, सालेकसा, गोरेगाव आणि देवरी या पाच तालुक्यात विविध बंधाऱ्यांच्या कामांसाठी सर्व्हेक्षण करण्यात आल्याचे दाखविण्यात आले. त्यासाठी २६ लाख रुपयांपेक्षा जास्त खर्च दाखविण्यात आला. मात्र प्रत्यक्षात हे सर्व्हेक्षण कागदावरच करण्यात आले. त्यासाठी काही सर्व्हेक्षण एजन्सींना हाताशी धरून केवळ बिले काढण्यात आली आहेत.केवळ शासनाचा निधी खर्च केल्याचे दाखविण्यासाठी अनेक ठिकाणी आवश्यकता नसतानाही बंधाऱ्यांचे काम जबरदस्तीने करण्यात आले. यासाठी सर्व्हे करणाऱ्या एजन्सीकडून त्या ठिकाणी बंधाऱ्याची आवश्यकता असल्याचे दाखविण्यात आले. प्रत्यक्षात झालेले कामही थातूरमातूर करून शासनाच्या पैशाची निव्वळ उधळपट्टी करण्यात आली आहे. सर्व्हेक्षण करताना ज्या बाबींची तपासणी करणे गरजेचे आहे त्या तांत्रिक बाबी विचारातच घेण्यात आल्या नाहीत. बंधाऱ्यांच्या कामांची सखोल तपासणी केल्यास ही बाब स्पष्ट होऊ शकते. मात्र गोंदियात चौकशीसाठी आलेल्या अधिकाऱ्यांनी याकडे जाणीवपूर्णक डोळेझाकपणा करून संबंधित अधिकारी आणि कंत्राटदारांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न केला आहे.साठवण बंधारे व तलावांच्या डागडुजीच्या कामांमधील हा गैरप्रकार म्हणजे लघुसिंचन (जलसंधारण) विभागाच्या कामांचा एक नमुना आहे. गेल्या दोन-तीन वर्षात झालेल्या आणि आजही होत असलेल्या बहुतांश कामांच्या बाबतीत हाच प्रकार सुरू आहे. वर्ष २०१३-१३ यादरम्यान गोंदियासह भंडारा जिल्ह्यात ही कोट्यवधीची जलसंधारणाची कामे वाटण्यात आली. गोंदियातील लघुसिंचन विभागाचे (जलसंधारण) कार्यकारी अभियंता, सहायक अभियंता (श्रेणी-१) यांच्या देखरेखीत झालेल्या या बंधाऱ्यांमध्ये कामांमधील गैरप्रकार थांबवून संबंधितांवर कारवाई करणे गरजेचे आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याबाबत योग्य ते निर्देश द्यावेत आणि या कामातील गैरप्रकाराला आळा घालावा अशी अपेक्षा नागरिकांकडून केली जात आहे. (जिल्हा प्रतिनिधी)काय असते सर्वेक्षणात?सर्वेक्षणात संबंधित एजन्सी कोणत्या ठिकाणी बंधारे बांधण्याची गरज आहे, त्या ठिकाणी बंधारा बांधणे योग्य ठरणार की नाही याची तपासणी करते. त्यासाठी टीबीएम, क्रॉस सेक्शन, एल सेक्शन, टीपिकल क्रॉस सेक्शन, ट्रायल पिट्स (जमीन दोन मीटर खोदून आतील माती, मुरूमाचा व दगडाचा थर) आदींची तपासणी केली जाते. या तांत्रिक बाबींमध्ये ती जागा बसत असेल तरच त्या ठिकाणी बंधारा बांधणे योग्य ठरते. मात्र बहुतांश सर्व्हेक्षणात ही सर्व तपासणी थातूरमातूर कागदोपत्रीच दाखविण्यात आली.ज्या वादग्रस्त बंधाऱ्यांवर कोट्यवधी रुपये खर्च दाखविण्यात आला त्या बंधाऱ्यांमध्ये आजघडीला पाणीच नाही. पाणी अडण्यासाठी बंधाऱ्यांमध्ये लावल्या जाणाऱ्या प्लेट्स अनेक ठिकाणी लागल्याच नाहीत. त्यामुळे ज्या उद्देशाने हे बंधारे बांधण्यात आले तो उद्देशच सार्थकी लागत नसेल तर हे बंधारे कोणत्या कामाचे असा प्रश्न उपस्थित होत आहे. विशेष म्हणजे अशा बिनकामाच्या बंधाऱ्यांचे लोकार्पणही करून कंत्राटदारांची बिले काढण्यात आली आहेत.