शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

शेततळे योजना ठरली शेतकर्‍यांसाठी वरदान

By admin | Updated: May 25, 2014 23:41 IST

शासनाने शेतीकरिता जल सिंचनाच्या विविध योजना कार्यान्वीत केल्या. जेणेकरून शेतकरी शेतीच्या उत्पादनात वाढ करून आपली आर्थिक स्थिती मजबूत करू शकेल. यात काही शेतकर्‍यांनी मोठय़ा प्रमाणात

साखरीटोला : शासनाने शेतीकरिता जल सिंचनाच्या विविध योजना कार्यान्वीत केल्या. जेणेकरून शेतकरी शेतीच्या उत्पादनात वाढ करून आपली आर्थिक स्थिती मजबूत करू शकेल. यात काही शेतकर्‍यांनी मोठय़ा प्रमाणात फायदा घेतला तर अजूनही बरेच शेतकरी योजनांपासून वंचित आहेत. मात्र हरदोली येथील एका महिला शेतकरीने शेततळ्याचा जल सिंचनाकरिता उपयोग करून केवळ एका एकरात भाजीपाल्याच्या उत्पादनात लाखोची मिळकत घेतली आहे.

शासनाच्या राष्ट्रीय कृषी विकास योजना आणि महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत शेतकर्‍यांना शेततळ्याचा सिंचनासाठी उपयोग व्हावा म्हणून शेततळे बांधून दिली जातात. त्या अंतर्गत निर्मला चरणदास बोम्बार्डे हरदोली ता. देवरी या महिला शेतकर्‍यांनी ३0 फूट चौरस भागात शेततळीचे खोदकाम केले. पाणी अडवा, पाणी जिरवा या म्हणीनुसार त्या शेततळ्यात पाणी अडवून त्या तळ्याच्या साहाय्याने आपल्या एक एकर जागेत विविध प्रकारचा भाजीपाल्याची लागवड केली. त्यामुळे त्यांना बराच फायदा झाला. सन २0११-१२ मध्ये चवळीच्या शेंगा, उन्हाळी, वाल, मका, टमाटर व विविध भाजीचे उत्पादन घेतले.

सन २0१२-१३ मध्ये टरबूज, मका, टमाटर, मिरची तर सन २0१३-१४ मध्ये हरभरा, मका, चवळी शेंगा, टमाटर, भुईमूंग, मिरची अशा विविध भाज्यांचे उत्पादन काढले. शेततळीमध्ये २५ किलो मोठी मत्स्य वीज टाकण्यात आले. त्यामुळे मत्स्य उत्पादन सुध्दा घेण्याकरिता मदत झाली. या तिन्ही वर्षात १ लाख २0 हजार रुपये अंदाजे नफा झाल्याचे तिने सांगितले आहे.

उन्हाळ्याच्या दिवसात कोथिंबीर, कारलेचे उत्पादन घेतले जात आहे. प्रायोगिक तत्त्वावर बांबू, नेट खरेदी करून हरितगृह तयार करण्यात आले आहे. सदर शेतकरी महिलेने २ हजार रुपये खर्च करून ६0 बाय ३0 फुटाचे नेट हाऊस तयार करण्यात आले. विशेषत: हा ज्या जागवर गुरेढोरे चरत होते. अशा नापिकी जमिनीवर सदर शेतकरी महिलेने शेततळ्याच्या भरवशावर हिरवळ तयार करून स्वत:च्या मेहनतीने भाजीपाल्याचे उत्पादन केले. ‘पाणी त्याची बाणी’ या युक्तीप्रमाणे पुढे याच ठिकाणी केळीची बाग व फुलशेती करण्याचा निर्धार केला आहे.

शेततळे बहुतांश शेतकर्‍यांसाठी वरदान ठरलेले आहे. सदर शेतकरी महिलेला शासकीय मदत व मार्गदर्शन कृषी पर्यवक्षक प्रकाश मेश्राम देवरी, पर्यवेक्षक जिभकाटे, पारधी, कु.डी. गौतम, कृषी सहायक तिडके यांनी वेळोवेळी यांनी केली आहे.

कृषी अधीक्षक गोंदिया यांनी अनुदान तत्त्वावर नेट व काटेरी कुंपणाची योजना द्यावी, अशी मागणी आदर्श शेतकरी होऊ पाहणार्‍या निर्मला चरणदास बोम्बार्र्डे यांनी केली आहे. (वार्ताहर)