शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
2
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
3
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
4
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
5
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
6
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
7
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
8
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
9
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
10
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
11
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
12
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
13
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
14
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
15
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
16
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
17
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
18
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
19
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
20
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
Daily Top 2Weekly Top 5

खरेदी विक्री समितीत बोगस मतदार !

By admin | Updated: August 15, 2015 01:43 IST

स्थानिक तालुका खरेदी विक्री समितीमध्ये ज्यांच्याजवळ सात-बाराचा उतारा नाही, शेती नाही, अल्पवयीन आहेत अशा बोगस मतदारांची नावे मतदार यादीत ....

पत्रपरिषदेत आरोप : माजी संचालकांचे पुरावेअर्जुनी-मोरगाव : स्थानिक तालुका खरेदी विक्री समितीमध्ये ज्यांच्याजवळ सात-बाराचा उतारा नाही, शेती नाही, अल्पवयीन आहेत अशा बोगस मतदारांची नावे मतदार यादीत असल्याची माहिती यशवंत परशुरामकर, राकेश लंजे यांनी पत्रपरिषदेत दिली.खरेदी विक्री समितीमध्ये यावर्षी नवीन उपविधी तयार करण्यात आली. या उपविधीमध्ये जुन्या भागधारकांविषयी कुठलाच उल्लेख नाही. केवळ नवीन भागधारकांनाच लागू होईल असा उल्लेख आहे. सुमारे ३ हजार जुने सभासद कमी करण्यात आले आहेत. कमी केल्याची कारणे नमूद नाहीत. अनेक नवीन बोगस सभासदांची नोंदणी करण्यात आली. सभासदत्वासाठी शेती व सात-बाराच्या उताऱ्यावर नोंद असणे आवश्यक आहे. मात्र सभाद क्र.२२९२, २८९२ यांच्याकडे शेती नाही व सातबाराचा उतारा नाही. सभासदत्व व मतदाराच्या पात्रतेसाठी १८ वर्षे वय असणे बंधनकाक असतानाही सभासद क्र. १०१८चे वय १४ वर्षे आहे व त्याचे नाव मतदार यादीत आहे.या संख्येत कारभार हा बहुतांशा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांवर अवलंबून आहे. संचालक मंडळाला नवीन भरती प्रक्रि येशी देणे-घेणे नाही. अनेक वर्षापासून काम करणाऱ्या या कर्मचाऱ्यांना संस्थेतील काळेबेरे माहिती आहेत. नवीन भरती प्रक्रिया झाल्यानंतर आपल्या पाठीमागील अडचणी वाढू शकतात. या भितीपोटी निकृत झालेल्या कर्मचाऱ्यांकडूनच संख्येचे काम करुन घेतले जात आहे. रबी हंगामातील धान पीक घेण्याचे प्रमाण एकरी १५ क्विंटल आहे. कृषी आढावा घेतल्यास तालुक्यात रबी हंगामात १ लाख क्विंटल उत्पादन होऊन आधारभूत धान खरेदी केंद्रावर विक्रीसाठी यायला पाहिजे. मात्र या संस्थेमार्फत दीड लाख क्विंटल धान खरेदी कशी होते असा प्रश्न उपस्थित केला. खरेदी विक्री संस्थेचे गोदाम भाड्याने दिले जाते व संचालक मंडळातील पदाधिकाऱ्यांचे गोदाम या संस्थेतील धान ठेवण्यासाठी भाड्याने घेतले जातात. असा गोप्यस्पोट परशुरामकर व लंजे यांनी केला. यावेळी अशोक चांडक, प्रकाश शहारे, नवीन नशिने, परेश उजवणे, किशोर शहारे, सर्वेश भुतडा, नेताजी पाऊलझगडे, भोजराज रहिले, राजू पालीवाल, बालू बडवाईक, भाऊराव खोब्रागडे, परसराम शेंडे, मुकेश जायस्वाल उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)रस्त्यांवरच साचत आहे पावसाचे पाणीगोंदिया : शहरातील रस्त्यांचे बांधकाम नियोजन शून्य असल्यामुळे पावसाचे पाणी रस्त्यांवरच साचत असल्याचे चित्र आहे. ठिकठिकाणी हे चित्र सध्या शहरात दिसून येत आहे. यामुळे मात्र नागरिकांना रस्त्यांवरून ये-जा करणे डोकेदुखीचे ठरत आहे. नगर परिषदेने याकडे लक्ष देत दुरूस्ती करण्याची गरज आहे.