शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतावर २४ तासांत ‘टॅरिफ बॉम्ब’? अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पुन्हा बरळले, म्हणाले...
2
जे स्वतःची कबर खोदताहेत, त्यांना का थांबवायचे? पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर घणाघात
3
पालिका निवडणुकांचा दिवाळीनंतर उडणार बार; ‘स्थानिक’ निवडणुकीत व्हीव्हीपॅटचा वापर नाही
4
ढगफुटीने प्रलय; अनेक लोक, घरे वाहून गेली; बचावकार्यासाठी उतरले जवान
5
१९५४ पासून पाकला शस्त्रांची मदत करतोय अमेरिका, भारतीय लष्कराने ट्रम्पना आरसा दाखवला
6
विदर्भ-मराठवाड्यातील माल जाणार समुद्रमार्गे, समृद्धी महामार्गाला जोडणार वाढवण बंदर
7
‘माधुरी’ला परत आणण्यासाठी सरकार सुप्रीम कोर्टात जाणार; मुख्यमंत्री फडणवीस यांची ग्वाही
8
‘खरा भारतीय’ ठरविण्याचे अधिकार न्यायमूर्तींना नाहीत; प्रियांका गांधी म्हणाल्या, राहुल गांधी सैन्याविरोधात बोलले नाहीत
9
"भारतासारख्या कणखर सहकाऱ्यासोबतचे संबंध खराब करू नका"; ट्रम्प यांना निकी हेली यांनी सुनावले
10
खेड प्रेम प्रकरण: "मठाच्या नावाखाली अनेक..."; प्राजक्ताच्या वडिलांचे विश्वनाथ गोसावीवर गंभीर आरोप
11
Video: "आता मी हिंदीत बोलू????"; मराठीत बोलत असतानाच काजोल भडकली, बघा काय घडलं?
12
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 
13
हीरक महोत्सवी महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
14
खूशखबर... नागपूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसचा लवकरच शुभारंभ; PM मोदी दाखविणार हिरवा झेंडा 
15
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
16
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
17
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
18
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
19
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
20
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात

खरेदी विक्री समितीत बोगस मतदार !

By admin | Updated: August 15, 2015 01:43 IST

स्थानिक तालुका खरेदी विक्री समितीमध्ये ज्यांच्याजवळ सात-बाराचा उतारा नाही, शेती नाही, अल्पवयीन आहेत अशा बोगस मतदारांची नावे मतदार यादीत ....

पत्रपरिषदेत आरोप : माजी संचालकांचे पुरावेअर्जुनी-मोरगाव : स्थानिक तालुका खरेदी विक्री समितीमध्ये ज्यांच्याजवळ सात-बाराचा उतारा नाही, शेती नाही, अल्पवयीन आहेत अशा बोगस मतदारांची नावे मतदार यादीत असल्याची माहिती यशवंत परशुरामकर, राकेश लंजे यांनी पत्रपरिषदेत दिली.खरेदी विक्री समितीमध्ये यावर्षी नवीन उपविधी तयार करण्यात आली. या उपविधीमध्ये जुन्या भागधारकांविषयी कुठलाच उल्लेख नाही. केवळ नवीन भागधारकांनाच लागू होईल असा उल्लेख आहे. सुमारे ३ हजार जुने सभासद कमी करण्यात आले आहेत. कमी केल्याची कारणे नमूद नाहीत. अनेक नवीन बोगस सभासदांची नोंदणी करण्यात आली. सभासदत्वासाठी शेती व सात-बाराच्या उताऱ्यावर नोंद असणे आवश्यक आहे. मात्र सभाद क्र.२२९२, २८९२ यांच्याकडे शेती नाही व सातबाराचा उतारा नाही. सभासदत्व व मतदाराच्या पात्रतेसाठी १८ वर्षे वय असणे बंधनकाक असतानाही सभासद क्र. १०१८चे वय १४ वर्षे आहे व त्याचे नाव मतदार यादीत आहे.या संख्येत कारभार हा बहुतांशा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांवर अवलंबून आहे. संचालक मंडळाला नवीन भरती प्रक्रि येशी देणे-घेणे नाही. अनेक वर्षापासून काम करणाऱ्या या कर्मचाऱ्यांना संस्थेतील काळेबेरे माहिती आहेत. नवीन भरती प्रक्रिया झाल्यानंतर आपल्या पाठीमागील अडचणी वाढू शकतात. या भितीपोटी निकृत झालेल्या कर्मचाऱ्यांकडूनच संख्येचे काम करुन घेतले जात आहे. रबी हंगामातील धान पीक घेण्याचे प्रमाण एकरी १५ क्विंटल आहे. कृषी आढावा घेतल्यास तालुक्यात रबी हंगामात १ लाख क्विंटल उत्पादन होऊन आधारभूत धान खरेदी केंद्रावर विक्रीसाठी यायला पाहिजे. मात्र या संस्थेमार्फत दीड लाख क्विंटल धान खरेदी कशी होते असा प्रश्न उपस्थित केला. खरेदी विक्री संस्थेचे गोदाम भाड्याने दिले जाते व संचालक मंडळातील पदाधिकाऱ्यांचे गोदाम या संस्थेतील धान ठेवण्यासाठी भाड्याने घेतले जातात. असा गोप्यस्पोट परशुरामकर व लंजे यांनी केला. यावेळी अशोक चांडक, प्रकाश शहारे, नवीन नशिने, परेश उजवणे, किशोर शहारे, सर्वेश भुतडा, नेताजी पाऊलझगडे, भोजराज रहिले, राजू पालीवाल, बालू बडवाईक, भाऊराव खोब्रागडे, परसराम शेंडे, मुकेश जायस्वाल उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)रस्त्यांवरच साचत आहे पावसाचे पाणीगोंदिया : शहरातील रस्त्यांचे बांधकाम नियोजन शून्य असल्यामुळे पावसाचे पाणी रस्त्यांवरच साचत असल्याचे चित्र आहे. ठिकठिकाणी हे चित्र सध्या शहरात दिसून येत आहे. यामुळे मात्र नागरिकांना रस्त्यांवरून ये-जा करणे डोकेदुखीचे ठरत आहे. नगर परिषदेने याकडे लक्ष देत दुरूस्ती करण्याची गरज आहे.