शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
2
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
3
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
4
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
5
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
6
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
7
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना कोरा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
8
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
9
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
10
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
11
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
12
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
13
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
14
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
15
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
16
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
17
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
18
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
19
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
20
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी

सर्वाधिक ग्राम पंचायतींवर भाजपाचा दावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2017 23:53 IST

जिल्ह्यातील ३४१ ग्रामपंचायतीसाठी सोमवारी निवडणूक पार पडली. तर मंगळवारी (दि.१७) मतमोजणीनंतर निवडणुकीचे निकाल जाहीर करण्यात आले.

ठळक मुद्देआमगाव, सडक -अर्जुनीत राष्टÑवादी : सरपंच पदासाठी झाली चुरस, समर्थकांचा जल्लोष

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्ह्यातील ३४१ ग्रामपंचायतीसाठी सोमवारी निवडणूक पार पडली. तर मंगळवारी (दि.१७) मतमोजणीनंतर निवडणुकीचे निकाल जाहीर करण्यात आले. यात ३४१ ग्रामपंचायतींपैकी ६० ते ६५ टक्के ग्रामपंचायतींवर भाजपा समर्थीत उमेदवार विजयी झाले. मतदारांनी ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपाच्या बाजुने कौल दिल्याने दोन तालुके वगळता इतर तालुक्यात भाजपाने मुसंडी मारल्याचे चित्र आहे.निवडणूक विभागाने जिल्ह्यातील ३४७ ग्रामपंचायत निवडणुकींचा कार्यक्रम जाहीर केला होता. यापैकी तीन ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध पार पडली. तर तीन ग्रामपंचायतीची निवडणूक गावकºयांनी आक्षेप घेतल्याने निवडणूक विभागाने रद्द केली. त्यामुळे सोमवारी जिल्ह्यातील ३४१ ग्रामपंचायतीसाठी मतदान घेण्यात आले.या निवडणुकीत ८५.५८ टक्के मतदान झाले. यात जिल्ह्यातील एकूण ३ लाख ८२ हजार ८०१ मतदारांनी मतदानाचा हक्क बजाविला. यात महिला मतदारांची संख्या अधिक आहे. १ लाख ९३ हजार ७२ महिला मतदारांनी तर १ लाख ८९ हजार ९०९ पुरूष मतदारांनी मतदानाचा हक्क बजाविला होता. ३४७ सरपंचपदासाठी एकूण १ हजार ५८ उमेदवार तर ३ हजार २३ सदस्य पदासाठी ५ हजार ८१८ उमेदवार रिंगणात होते. यापैकी ८ सरपंच व ३१३ सदस्यांची बिनविरोध निवड झाली होती. त्यामुळे उर्वरित पदासाठी निवडणूक घेण्यात आली. मंगळवारी सकाळी ८ वाजतापासूनच सर्वच तालुक्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या परिसरात मतमोजणीची करण्यात आली. काही ठिकाणी सुरूवातीपासूनच भाजपा समर्थीत उमेदवारांनी आघाडी घेतल्याचे चित्र होते. यंदाच्या निवडणुकीपासून सरपंचाची निवड थेट जनतेतून होणार असल्याने सर्वांचे लक्ष सरपंच पदाच्या उमेदवाराकडे लागले होते.निकाल ऐकण्यासाठी उमेदवारांच्या समर्थकांनी मतमोजणी केंद्राबाहेर गर्दी केली होती. जसे जसे निकाल जाहीर होत होते. तस तसा समर्थकांचा जल्लोष होत होता. ही निवडणूक कुठल्या पक्ष्याच्या चिन्हावर लढविली जात नसली तरी सर्व राजकीय पक्ष पडद्याआड उमेदवारांना समर्थन देतात.दरम्यान वाढती महागाई, नोटबंदी, दुष्काळ, कर्जमाफी या मुद्दावरुन ग्रामीण भागात सरकार विरोध रोष असल्याची चर्चा होती. मात्र ग्रामपंचायत निवडणुकीत जनतेने पुन्हा एकदा भाजपाच्या बाजुने कौल दिल्याने हे मुद्दे गौण ठरले.सडक-अर्जुनी तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या २४ व अर्जुनी-मोरगाव येथे १८ सरपंच पदाचे उमेदवार निवडून आल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते मनोहर चंद्रिकापुरे यांनी केला आहे. दरम्यान गोंदिया तालुक्यातील विजयी उमेदवारांच्या संख्येवरुन भाजप व काँग्रेसने सर्वाधिक उमेदवार निवडून आल्याचा दावा केला.काही ठिकाणी मतमोजणीला उशिराने सुरुवातदेवरी मतदार संघातील केशोरी येथील मतदान यंत्रामध्ये बिघाड आल्याने मतमोजणीची प्रक्रिया काहीवेळ बंद होती. त्यामुळे मतमोजणीे विलंब झाल्याने काही वेळ गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती. मशीनमधील बिघाड दुरूस्त करुन मतमोजणीला पुन्हा सुरूवात करण्यात आली.सरकारच्या अकार्यक्षमतेचा पराभवग्रामपंचायत निवडणुकीतील विजय हा सर्व कार्यकर्त्यांचा आहे. सरकारच्या अकार्यक्षमतेप्रती ग्रामीण जनतेची संप्तत प्रतिक्रीया आहे. सरकार राज्यातील शेतकरी, लघु उद्योग, व्यापारी व जनतेसाठी सकारात्मक निर्णय घेण्यात पूर्णपणे अपयशी ठरले आहे. जनतेला अच्छे दिनचे स्वप्न दाखविणाºया भाजपाचा सरकारचा खरा चेहरा आता जनतेसमोर आला आहे. वाढती महागाई, पेट्रोलचे वाढते दर, शेत मालाला योग्य भाव नाही त्यामुळे जनता त्रस्त झाली. त्यामुळेच मतदारांनी काँग्रेसच्या बाजुने कौल दिला आहे.- आमदार गोपालदास अग्रवालकार्यकर्ता व जनतेचा विजयग्रामपंचायत निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला मिळालेला विजय हा कार्यकर्ता व जनतेचा विजय आहे. प्रधानंत्री नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वावर व त्यांनी केलेल्या कामांवर जनतेने विश्वास ठेवून भापजला विजयी केले. विरोधकांच्या खोट्या आश्वासनांना जनता ओळखू लागली आहे. येत्या विधानसभा निवडणुकीतही भाजपचाच उमेदवार निवडून येणार.-विनोद अग्रवाल, भाजपा माजी जिल्हाध्यक्ष