शहरं
Join us  
Trending Stories
1
स्टार फुटबॉलर लिओ मेस्सी पोहोचला 'वनतारा'मध्ये; केली महाआरती, वन्य प्राण्यांमध्येही रमला!
2
मेस्सीची 'वनतारा भेट'! महाआरती, शिवाभिषेक, बाप्पाचरणी नतमस्तक अन् वाघ-सिंहाशी धमाल (Photos)
3
IPL 2026 Auction: पृथ्वी शॉने लिलाव सुरू असताना केलेली मोठी चूक, नंतर करावं लागलं 'हे' काम
4
नागपुरात भाजपमध्ये उमेदवारीसाठी तोबा गर्दी, मुलाखतीच्या वेळापत्रकात करावा लागला बदल
5
VIDEO : अनसोल्ड परदेशी खेळाडूसाठी काव्या मारननं पर्समधून १३ कोटी काढले; संजीव गोएंका बघतच राहिले!
6
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
7
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
8
स्मृतिभ्रंशाने त्रस्त असलेल्या महिलेचा क्रिकेटपटू सलीम दुराणी यांची पत्नी असल्याचा दावा
9
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
10
पतसंस्था अध्यक्षाला ग्राहक आयोगाने सुनावली दोन वर्षांच्या कारावास, दंडाची शिक्षा
11
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
12
मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात
13
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
14
IPL Auction 2026 : काव्या मारन vs आकाश अंबानी यांच्यात जुगलबंदी; त्यात अनकॅप्ड खेळाडू झाला 'करोडपती'
15
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
16
IPL 2026 Auction: 'त्या' खेळाडूविषयी मनात आदरच..; आकाश अंबानींनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
17
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
18
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
19
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
Daily Top 2Weekly Top 5

सर्वाधिक ग्राम पंचायतींवर भाजपाचा दावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2017 23:53 IST

जिल्ह्यातील ३४१ ग्रामपंचायतीसाठी सोमवारी निवडणूक पार पडली. तर मंगळवारी (दि.१७) मतमोजणीनंतर निवडणुकीचे निकाल जाहीर करण्यात आले.

ठळक मुद्देआमगाव, सडक -अर्जुनीत राष्टÑवादी : सरपंच पदासाठी झाली चुरस, समर्थकांचा जल्लोष

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्ह्यातील ३४१ ग्रामपंचायतीसाठी सोमवारी निवडणूक पार पडली. तर मंगळवारी (दि.१७) मतमोजणीनंतर निवडणुकीचे निकाल जाहीर करण्यात आले. यात ३४१ ग्रामपंचायतींपैकी ६० ते ६५ टक्के ग्रामपंचायतींवर भाजपा समर्थीत उमेदवार विजयी झाले. मतदारांनी ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपाच्या बाजुने कौल दिल्याने दोन तालुके वगळता इतर तालुक्यात भाजपाने मुसंडी मारल्याचे चित्र आहे.निवडणूक विभागाने जिल्ह्यातील ३४७ ग्रामपंचायत निवडणुकींचा कार्यक्रम जाहीर केला होता. यापैकी तीन ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध पार पडली. तर तीन ग्रामपंचायतीची निवडणूक गावकºयांनी आक्षेप घेतल्याने निवडणूक विभागाने रद्द केली. त्यामुळे सोमवारी जिल्ह्यातील ३४१ ग्रामपंचायतीसाठी मतदान घेण्यात आले.या निवडणुकीत ८५.५८ टक्के मतदान झाले. यात जिल्ह्यातील एकूण ३ लाख ८२ हजार ८०१ मतदारांनी मतदानाचा हक्क बजाविला. यात महिला मतदारांची संख्या अधिक आहे. १ लाख ९३ हजार ७२ महिला मतदारांनी तर १ लाख ८९ हजार ९०९ पुरूष मतदारांनी मतदानाचा हक्क बजाविला होता. ३४७ सरपंचपदासाठी एकूण १ हजार ५८ उमेदवार तर ३ हजार २३ सदस्य पदासाठी ५ हजार ८१८ उमेदवार रिंगणात होते. यापैकी ८ सरपंच व ३१३ सदस्यांची बिनविरोध निवड झाली होती. त्यामुळे उर्वरित पदासाठी निवडणूक घेण्यात आली. मंगळवारी सकाळी ८ वाजतापासूनच सर्वच तालुक्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या परिसरात मतमोजणीची करण्यात आली. काही ठिकाणी सुरूवातीपासूनच भाजपा समर्थीत उमेदवारांनी आघाडी घेतल्याचे चित्र होते. यंदाच्या निवडणुकीपासून सरपंचाची निवड थेट जनतेतून होणार असल्याने सर्वांचे लक्ष सरपंच पदाच्या उमेदवाराकडे लागले होते.निकाल ऐकण्यासाठी उमेदवारांच्या समर्थकांनी मतमोजणी केंद्राबाहेर गर्दी केली होती. जसे जसे निकाल जाहीर होत होते. तस तसा समर्थकांचा जल्लोष होत होता. ही निवडणूक कुठल्या पक्ष्याच्या चिन्हावर लढविली जात नसली तरी सर्व राजकीय पक्ष पडद्याआड उमेदवारांना समर्थन देतात.दरम्यान वाढती महागाई, नोटबंदी, दुष्काळ, कर्जमाफी या मुद्दावरुन ग्रामीण भागात सरकार विरोध रोष असल्याची चर्चा होती. मात्र ग्रामपंचायत निवडणुकीत जनतेने पुन्हा एकदा भाजपाच्या बाजुने कौल दिल्याने हे मुद्दे गौण ठरले.सडक-अर्जुनी तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या २४ व अर्जुनी-मोरगाव येथे १८ सरपंच पदाचे उमेदवार निवडून आल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते मनोहर चंद्रिकापुरे यांनी केला आहे. दरम्यान गोंदिया तालुक्यातील विजयी उमेदवारांच्या संख्येवरुन भाजप व काँग्रेसने सर्वाधिक उमेदवार निवडून आल्याचा दावा केला.काही ठिकाणी मतमोजणीला उशिराने सुरुवातदेवरी मतदार संघातील केशोरी येथील मतदान यंत्रामध्ये बिघाड आल्याने मतमोजणीची प्रक्रिया काहीवेळ बंद होती. त्यामुळे मतमोजणीे विलंब झाल्याने काही वेळ गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती. मशीनमधील बिघाड दुरूस्त करुन मतमोजणीला पुन्हा सुरूवात करण्यात आली.सरकारच्या अकार्यक्षमतेचा पराभवग्रामपंचायत निवडणुकीतील विजय हा सर्व कार्यकर्त्यांचा आहे. सरकारच्या अकार्यक्षमतेप्रती ग्रामीण जनतेची संप्तत प्रतिक्रीया आहे. सरकार राज्यातील शेतकरी, लघु उद्योग, व्यापारी व जनतेसाठी सकारात्मक निर्णय घेण्यात पूर्णपणे अपयशी ठरले आहे. जनतेला अच्छे दिनचे स्वप्न दाखविणाºया भाजपाचा सरकारचा खरा चेहरा आता जनतेसमोर आला आहे. वाढती महागाई, पेट्रोलचे वाढते दर, शेत मालाला योग्य भाव नाही त्यामुळे जनता त्रस्त झाली. त्यामुळेच मतदारांनी काँग्रेसच्या बाजुने कौल दिला आहे.- आमदार गोपालदास अग्रवालकार्यकर्ता व जनतेचा विजयग्रामपंचायत निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला मिळालेला विजय हा कार्यकर्ता व जनतेचा विजय आहे. प्रधानंत्री नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वावर व त्यांनी केलेल्या कामांवर जनतेने विश्वास ठेवून भापजला विजयी केले. विरोधकांच्या खोट्या आश्वासनांना जनता ओळखू लागली आहे. येत्या विधानसभा निवडणुकीतही भाजपचाच उमेदवार निवडून येणार.-विनोद अग्रवाल, भाजपा माजी जिल्हाध्यक्ष