शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळवर बोलण्यापूर्वी पक्षाची परवानगी घ्या; वादानंतर भाजपचे सर्व मंत्री, नेते अन् इतरांना निर्देश
2
धक्कादायक! तक्रार करणाऱ्याला गाडीने चिरडले, DMK नेत्याला पोलिसांनी केली अटक
3
नेपाळमध्ये भारतीय बसवर हल्ला, प्रवाशांना लुटले, पर्यटकांना विमानाने परत आणले
4
'पोलंडमध्ये रशियाची घुसखोरी चुकीची, हे सर्व लवकरच संपेल'; ट्रम्प यांनी नाराजी व्यक्त केली, फ्रान्सने राफेल पाठवले
5
ब्राझीलच्या माजी राष्ट्रपतींना सुनावली २७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा, निवडणूक हरल्यानंतर केलेली ती कृती भोवली
6
Python Hunting: अजगर मारून त्याचं मांस शिजवलं, दोन जणांना अटक! 
7
सिक्कीममध्ये निसर्गाचा कोप! भूस्खलनात ४ जणांचा मृत्यू, ३ जण बेपत्ता, बचावकार्य सुरू
8
PPF अकाऊंट होल्डरचा अचानक मृत्यू झाल्यास कशी होईल सेटलमेंट? रक्कम मॅच्युअर होण्याची वाट पाहावी लागेल का?
9
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
10
नेपाळचा पुढचा पंतप्रधान कोण? जेन झी तरुणांची राष्ट्राध्यक्ष रामचंद्र पौडेल यांच्याशी दुसऱ्यांदा चर्चा
11
अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या, पत्नी आणि मुलासमोरच केले कुऱ्हाडीने वार
12
नवरा सुपरस्टार तरीही पाय जमिनीवर, गर्वाचा लवलेशही नाही; भरत जाधव यांच्याप्रमाणेच त्यांची पत्नीही आहे अगदी साधी
13
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
14
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
15
कोकणातला 'कांतारा' रंगला की फसला? कसा आहे दिलीप प्रभावळकरांचा 'दशावतार' सिनेमा? वाचा रिव्ह्यू
16
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
17
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
18
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
19
बुलेट ट्रेनच्या १५७ किमीवरील कामांसाठी महत्त्वाकांक्षी करार, मुंबई-अहमदाबाद प्रवास होणार वेगाने
20
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल

गोंदिया जिल्ह्यात मुलांपेक्षा मुलींचा जन्मदर कमीच; स्त्रीभ्रूण हत्या रोखण्यास प्रशासन अपयशी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2024 15:25 IST

हजार मुलांमागे केवळ ९५६ मुली : जनजागृतीचा प्रभाव नाही

लोकमत न्यूज नेटवर्क गोंदिया : जिल्ह्यात गेल्या ५ वर्षांपासून मुलांपेक्षा मुलींचा जन्मदर कमी होत आहे. एक हजार मुलांमागे ९५६ मुली हे प्रमाण आहे. यामुळे सामाजिक असंतुलन होण्याची चिन्हे दिसत आहेत. नागरिकांमध्ये बेटी बचाव मोहिमेचा फारसा प्रभाव होत नसल्याचे स्पष्ट झाले आहे. मुलींचा जन्मदर वाढण्याऐवजी कमी होत चालल्याने हा चिंतेचा विषय होत चालला आहे.

वाढत्या स्त्रीभ्रूण हत्या रोखण्यासाठी प्रसूतीपूर्व निदान तंत्र कायदा १९९४ लागू करण्यात आला आहे. त्यानुसार प्रसूतीपूर्व लिंगनिदान करणे गुन्हा आहे. दर हजारी मुलांमागे मुलींचे प्रमाण वाढावे, हा यामागील उद्देश होता. त्यामुळे या कायद्याची कठोर अंमलबजावणी केली जात असल्याचा कांगावा आरोग्य विभागाकडून केला जात आहे. सर्वच यंत्रणांकडून 'बेटी बचाओ व बेटी पढाओ' असा नारा दिला जात असला तरी गोंदियात मुलींच्या जन्मदरात घट झाली आहे. त्यामुळे भविष्यात हजार मुलांमध्ये ४४ मुलांना जोडीदार मिळण्याची शक्यता कमीच आहे. जिल्ह्यात गर्भलिंग निदान चाचणीला कायद्यानुसार बंदी आहे. असे असताना मुलींच्या जन्मदरात जर घट होत असेल तर गर्भलिंग निदान चाचणी न करण्याच्या कायद्याची कठोर अंमलबजावणी जिल्ह्यात होते की नाही? असा सवाल उपस्थित होत आहे. मुलींचा जन्मदर घटल्यामुळे 'बेटी बचाओ' चा नारा केवळ नाममात्र ठरत असल्याचे चित्र आहे. 

याकडे होतेय दुर्लक्ष मुलींच्या जन्माचे स्वागत करा, असे सांगणाऱ्या प्रशासनाच्या नाकावर लिंबू टिचून स्त्रीभ्रूणहत्या होत असताना आरोग्य विभागाची गेल्या तीन-चार वर्षांत एकही कारवाई नाही. गोंदियात गर्भनिदान आणि मध्य प्रदेशात गर्भपात केले जात असल्याची चर्चा आहे. हा प्रकार अत्यंत गंभीर असतानाही शासकीय यंत्रणांचे याकडे दुर्लक्ष झाले आहे. 

"मुलींच्या घटत्या जन्मदरावरून अजूनही मुलीसंदर्भात मानसिकता बदलेली नाही. अजूनही मुलगा-मुलगी असा भेद केला जात असल्याचे दिसून येते. त्यामुळे समाजाने अधिक जागृत होऊन मुलींच्या जन्माचे स्वागत करण्याची व व्यापक जनजागृती करण्याची खरी गरज आहे." - सविता बेदरकर, सामाजिक कार्यकर्त्या. 

टॅग्स :gondiya-acगोंदिया