शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
2
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
3
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
4
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
5
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
6
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
7
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
8
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
9
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
10
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
11
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...
12
"आई...मी त्याला मारून टाकलं, खोलीत बॉडी पडलीय"; मोठ्या बहिणीनं छोट्या भावाला का मारले?
13
ललित प्रभाकर-हृता दुर्गुळेची रोमँटिक केमिस्ट्री, 'आरपार' सिनेमाचं पहिलं गाणं रिलीज
14
Donald Trump Tariffs : 'जर ट्रम्प-पुतिन यांची चर्चा अयशस्वी झाली तर आम्ही भारतावर अधिक शुल्क लादू...', अमेरिकेची नवी धमकी
15
राज कुंद्राने आशीर्वाद घेताच केली किडनी ऑफर, ऐकून काय म्हणाले प्रेमानंद महाराज? जाणून आश्चर्य वाटेल
16
"अजित पवार यांनी लाडकी बहीण योजना आणल्यानेच महायुतीला २३८ जागा मिळाल्या’’, सुनिल तटकरेंचा दावा   
17
मुंबईत शिवसेना-मनसेची ताकद जास्त, राज ठाकरेंचा दावा; CM फडणवीस म्हणाले...
18
War 2 Review: ॲक्शनच्या नादात कथेवर फेरलं पाणी, कसा आहे हृतिक रोशन-ज्यु. एनटीआरचा 'वॉर २'?
19
थरकाप उडवणारा व्हिडीओ! मृत्यूने घातली झडप, बापाने लेकीसमोर जागेवरच सोडला जीव; दिल्लीतील घटना
20
अर्जुन तेंडुलकर संदर्भात हवाई सुंदरीला झालेला गैरसमज! क्रिकेटच्या देवानं आधी गंमत केली; मग...

एसटीच्या मालवाहतुकीला ‘बेस्ट रिस्पॉन्स’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2021 04:22 IST

कपिल केकत गोंदिया : कोरोनाच्या दहशतीने नागरिकांनी प्रवासाला बगल दिल्याने राज्य रस्ते परिवहन महामंडळाचे नुकसान झाले आहे. हे नुकसान ...

कपिल केकत

गोंदिया : कोरोनाच्या दहशतीने नागरिकांनी प्रवासाला बगल दिल्याने राज्य रस्ते परिवहन महामंडळाचे नुकसान झाले आहे. हे नुकसान भरून काढण्यासाठी महामंडळाने सुरू केलेल्या मालवाहतुकीला मात्र येथे चांगलाच प्रतिसाद मिळताना दिसत आहे. आगाराने मे महिन्यात तब्बल ५३ बुकिंग घेतल्या असून त्यातून दोन लाख ५७ हजार ७५० रुपयांचे उत्पन्न मिळविले आहे. विशेष म्हणजे, एसटीचा प्रवास सुरक्षित राहत असल्याने आता लांब अंतरावरच्या मालाचे बुकिंग आगाराला मिळत आहेत.

प्रवासी सेवेसाठी अत्यंत सुरक्षित मानली जाणारी एसटीची सेवा वाखाणण्याजोगी आहे. मात्र परिस्थिती बदलल्यास त्यानुसार स्वत:ला बदलून घ्यावे लागते. या म्हणीनुसार महामंडळालाही कोरोनामुळे स्वत:ला बदलून घेण्याची पाळी आली आहे. त्याचे असे की, मागील वर्षी कोरोनामुळे लॉकडाऊन करण्यात आल्याने महामंडळाला चांगलाच फटका बसला. हा फटका भरून काढण्यासाठी महामंडळाने मालवाहतुकीचा प्रयोग राज्यात राबविला. त्यानुसार, गोंदिया आगारानेही त्यात उडी घेतली व मालवाहतुकीसाठी प्रयत्न केले. सुरुवातीला त्याला चांगला प्रतिसाद मिळून आला नाही. मात्र आगारातील कर्मचाऱ्यांनी हार न मानता आपले प्रयत्न सुरूच ठेवले.

आता कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने महामंडळाला पुन्हा नुकसानीत टाकले असून प्रवासी वाहतूक मागील महिनाभर बंदच होती. मात्र यंदा आगारातील कर्मचाऱ्यांनी केलेल्या प्रयत्नांचे फलित मिळाल्याचे दिसले. कारण, आगारातील प्रवासी वाहतूक जरी बंद होती तरीही आगाराने मे महिन्यात मालवाहतुकीच्या तब्बल ५३ बुकिंग घेऊन त्यातून दोन लाख ५७ हजार ७५० रुपयांचे उत्पन्न मिळविले आहे. प्रवासी वाहतुकीच्या तुलनेत हाती आलेले हे उत्पन्न जरी कमी असले तरीही फुल नाही, पण फुलाची पाकळीच या दृष्टीने बघितल्यास आगारासाठी ही फायद्याचीच बाब ठरत आहे.

------------------------------------

३ दिवसांत १५ बुकिंग

मे महिन्यात केलेल्या उत्तम कामगिरीसह आता आगाराने जून महिन्यातील या ३ दिवसांत १५ बुकिंग करून त्यातून ७३ हजार ३३० रुपयांचे उत्पन्न मिळविले आहे. आता महिन्याची सुरुवात झाली असून आगाराकडे मालवाहतुकीसाठी आणखीही बुकिंग असल्याची माहिती आहे. म्हणजेच, महामंडळाचा मालवाहतुकीचा प्रयोग आता यशस्वी होताना दिसत आहे.

--------------------------------

मुंबई- कोल्हापूरपर्यंतचे बुकिंग

राज्य रस्ते परिवहन महामंडळाच्या एसटीसाठी अख्ख्या महाराष्ट्राची कवाडे खुली आहेत. यामुळे कुणालाही-कोठेही मालवाहतूक करावयाची असल्यास एसटीव्दारे काहीच अडचण येत नाही. यातूनच गोंदिया आगाराने अमरावती, नागपूर, अकोला व लगतच्या जिल्ह्यांसह थेट मुंबई, कोल्हापूर, सोलापूर, जालना अन्य लांब अंतरावरील बुकिंगही केले आहेत. एसटीच्या प्रवासाप्रमाणेच मालवाहतूकही सुरक्षित असल्याने आता नागरिकांचा कल एसटीच्या मालवाहतुकीकडे दिसत असून यातूनच एसटीच्या मालवाहतुकीला ‘बेस्ट रेस्पॉन्स’ दिसून येत आहे.