शहरं
Join us  
Trending Stories
1
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
2
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
3
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
4
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
5
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
6
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
7
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
8
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
9
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
10
'या' कंपनीला रिलायन्सकडून मिळाली 700 कोटींची ऑर्डर; आता सोमवारी फोकसमध्ये राहणार शेअर?
11
स्वत:चं नग्न छायाचित्र दाखवलं संसदेत, खासदार लॉरा मॅकक्लूर यांनी सगळ्यांना दिला धोक्याचा इशारा
12
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!
13
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
14
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार?; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
15
पोलिसांनी घेरताच आरोपी शूटर AK47 ने दिली इमारतीवरून उडी मारण्याची धमकी, नंतर...
16
नको त्या अवस्थेत दुसऱ्यासोबत पाहिले; संतापलेल्या पतीने बायकोचे मुंडके उडविले अन् थेट...
17
Viral Video: लग्नात नवरदेवाच्या मित्रांनी दिलं 'असं' गिफ्ट; पाहून वधूही लाजली, व्हिडीओ व्हायरल!
18
'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!
19
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
20
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!

एसटीच्या मालवाहतुकीला ‘बेस्ट रिस्पॉन्स’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2021 04:22 IST

कपिल केकत गोंदिया : कोरोनाच्या दहशतीने नागरिकांनी प्रवासाला बगल दिल्याने राज्य रस्ते परिवहन महामंडळाचे नुकसान झाले आहे. हे नुकसान ...

कपिल केकत

गोंदिया : कोरोनाच्या दहशतीने नागरिकांनी प्रवासाला बगल दिल्याने राज्य रस्ते परिवहन महामंडळाचे नुकसान झाले आहे. हे नुकसान भरून काढण्यासाठी महामंडळाने सुरू केलेल्या मालवाहतुकीला मात्र येथे चांगलाच प्रतिसाद मिळताना दिसत आहे. आगाराने मे महिन्यात तब्बल ५३ बुकिंग घेतल्या असून त्यातून दोन लाख ५७ हजार ७५० रुपयांचे उत्पन्न मिळविले आहे. विशेष म्हणजे, एसटीचा प्रवास सुरक्षित राहत असल्याने आता लांब अंतरावरच्या मालाचे बुकिंग आगाराला मिळत आहेत.

प्रवासी सेवेसाठी अत्यंत सुरक्षित मानली जाणारी एसटीची सेवा वाखाणण्याजोगी आहे. मात्र परिस्थिती बदलल्यास त्यानुसार स्वत:ला बदलून घ्यावे लागते. या म्हणीनुसार महामंडळालाही कोरोनामुळे स्वत:ला बदलून घेण्याची पाळी आली आहे. त्याचे असे की, मागील वर्षी कोरोनामुळे लॉकडाऊन करण्यात आल्याने महामंडळाला चांगलाच फटका बसला. हा फटका भरून काढण्यासाठी महामंडळाने मालवाहतुकीचा प्रयोग राज्यात राबविला. त्यानुसार, गोंदिया आगारानेही त्यात उडी घेतली व मालवाहतुकीसाठी प्रयत्न केले. सुरुवातीला त्याला चांगला प्रतिसाद मिळून आला नाही. मात्र आगारातील कर्मचाऱ्यांनी हार न मानता आपले प्रयत्न सुरूच ठेवले.

आता कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने महामंडळाला पुन्हा नुकसानीत टाकले असून प्रवासी वाहतूक मागील महिनाभर बंदच होती. मात्र यंदा आगारातील कर्मचाऱ्यांनी केलेल्या प्रयत्नांचे फलित मिळाल्याचे दिसले. कारण, आगारातील प्रवासी वाहतूक जरी बंद होती तरीही आगाराने मे महिन्यात मालवाहतुकीच्या तब्बल ५३ बुकिंग घेऊन त्यातून दोन लाख ५७ हजार ७५० रुपयांचे उत्पन्न मिळविले आहे. प्रवासी वाहतुकीच्या तुलनेत हाती आलेले हे उत्पन्न जरी कमी असले तरीही फुल नाही, पण फुलाची पाकळीच या दृष्टीने बघितल्यास आगारासाठी ही फायद्याचीच बाब ठरत आहे.

------------------------------------

३ दिवसांत १५ बुकिंग

मे महिन्यात केलेल्या उत्तम कामगिरीसह आता आगाराने जून महिन्यातील या ३ दिवसांत १५ बुकिंग करून त्यातून ७३ हजार ३३० रुपयांचे उत्पन्न मिळविले आहे. आता महिन्याची सुरुवात झाली असून आगाराकडे मालवाहतुकीसाठी आणखीही बुकिंग असल्याची माहिती आहे. म्हणजेच, महामंडळाचा मालवाहतुकीचा प्रयोग आता यशस्वी होताना दिसत आहे.

--------------------------------

मुंबई- कोल्हापूरपर्यंतचे बुकिंग

राज्य रस्ते परिवहन महामंडळाच्या एसटीसाठी अख्ख्या महाराष्ट्राची कवाडे खुली आहेत. यामुळे कुणालाही-कोठेही मालवाहतूक करावयाची असल्यास एसटीव्दारे काहीच अडचण येत नाही. यातूनच गोंदिया आगाराने अमरावती, नागपूर, अकोला व लगतच्या जिल्ह्यांसह थेट मुंबई, कोल्हापूर, सोलापूर, जालना अन्य लांब अंतरावरील बुकिंगही केले आहेत. एसटीच्या प्रवासाप्रमाणेच मालवाहतूकही सुरक्षित असल्याने आता नागरिकांचा कल एसटीच्या मालवाहतुकीकडे दिसत असून यातूनच एसटीच्या मालवाहतुकीला ‘बेस्ट रेस्पॉन्स’ दिसून येत आहे.