शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
3
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
4
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
5
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
6
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
7
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
8
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
9
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
10
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
11
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
12
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
13
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
14
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
15
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
16
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
17
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
18
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
19
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
20
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या

घरकुलच्या हप्त्यासाठी लाभार्थ्यांची होताहे परवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2020 05:00 IST

प्रत्येकाला हक्काचा निवारा मिळून गोरगरीब सामान्य जनतेला हक्काचे टूमदार घरकुल मिळावे यासाठी प्रधानमंत्री घरकुल योजना, रमाई आवास योजना, शबरी घरकुल योजनेंतर्गत निवड झालेल्या गरजू लाभार्थ्यांना एक लाखांच्यावर अनुदानाची राशी दिली जाते. निवड झालेल्या लाभार्थ्यांना घरकुलाचे निर्माणाधिन काम करण्यासाठी पंचायत समिती स्तरावर स्वतंत्र असा विभाग आहे.

ठळक मुद्देसबंधितांचा कामचुकारपणा : टूमदार घरकुलाचे स्वप्न पूर्ण कसे होणार ?

लोकमत न्यूज नेटवर्कबोंडगावदेवी : शासनाच्या विविध योजनांतर्गत गरजू लाभार्थ्यांना घरकुल योजनेचा लाभ दिला जातो. निवड झालेल्या घरकुल लाभार्थ्यांना पंचायत समिती स्तरावरुन कामाचा बांधकाम प्रगती अहवाल पाहून टप्याटप्यांनी लाभार्थ्यांच्या खात्यावर अनुदानाची राशी जमा केली जाते. परंतु अर्जुनी-मोरगाव पंचायत समितीतील सबंधीतांच्या कामचुकार प्रणालीने अनुदानाची रक्कम लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा होण्यास कमालीचा विलंब होत आहे. यामुळे त्यांना कामधंदे सोडून पंचायत समितीच्या पायऱ्या झिजवाव्या लागत असल्याचे चित्र आहे.प्रत्येकाला हक्काचा निवारा मिळून गोरगरीब सामान्य जनतेला हक्काचे टूमदार घरकुल मिळावे यासाठी प्रधानमंत्री घरकुल योजना, रमाई आवास योजना, शबरी घरकुल योजनेंतर्गत निवड झालेल्या गरजू लाभार्थ्यांना एक लाखांच्यावर अनुदानाची राशी दिली जाते. निवड झालेल्या लाभार्थ्यांना घरकुलाचे निर्माणाधिन काम करण्यासाठी पंचायत समिती स्तरावर स्वतंत्र असा विभाग आहे. ग्रामीण गृहनिर्माण अभियंता, स्थापत्य अभियंता यांच्यासह संगणक हाताळणाऱ्या अनुभवी प्रशिक्षीत कर्मचाऱ्यांचा लवाजमा घरकुल निर्माणाधीन कार्यासाठी आहे. आवश्यक ती यंत्रणा कार्यरत राहून देखील तालुक्यातील घरकुल लाभार्थ्यांची अनुदानाच्या राशीसाठी कमालीची परवड होताना दिसून येत आहे.आजघडीला प्रधानमंत्री आवास योजनेचाच निधी उपलब्ध असल्याचे सांगीतले जात आहे. प्रधानमंत्री आवास योजनेच्या लाभार्थ्यांना अनुदानाचा हप्ता मिळविण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे. संबंधितांच्या कामचुकार प्रणालीचा फटका मात्र सामान्य लाभार्थ्यांना सहन करावा लागत आहे. घरकुल निर्माणाधिन बांधकाम नियमित सुरु असताना सुद्धा वेळेच्या आत बिल अपलोड केले जात नाही.पैसाच नसल्याने गरजू लाभार्थ्यांना घरकुलाचे बांधकाम बंद ठेवावे लागते. आजघडीला वेळेच्या आत अनुदानाचे हप्ते संबंधीत लाभार्थ्यांच्या बॅँक खात्यावर जमा होत नाही अशी कैफीयत बऱ्याच लाभार्थ्यांनी लोकमत प्रतिनिधीजवळ मांडली.घरकुल कामावर देखरेख ठेवण्यासाठी नियुक्त असलेल्यांची गाऱ्हाणी वरिष्ठांच्या नजरेसमोर आणून देण्यात आली. परंतु संबंधीतांकडून सुधारणा झालेली दिसत नाही. अनुदानाची राशी देण्यात विलंब होत असल्याने लाभार्थ्यांचे हक्काच्या घरकुलाचे स्वप्न कसे पूर्ण होणार? याचा विचार करणे गरजेचे आहे.

टॅग्स :Pradhan Mantri Awas Yojanaप्रधानमंत्री आवास योजना