शहरं
Join us  
Trending Stories
1
सोनम वांगचुक यांनीच लोकांना भडकावले; लेहमधील हिंसाचारासाठी गृहमंत्रालयाने धरले जबाबदार
2
'तुमचेही फोटो लावा'; प्रताप सरनाईकांच्या पूरग्रस्तांच्या मदतीच्या किटवरुन अजितदादांनी विरोधकांना सुनावलं
3
Asia Cup 2025: सलग पाचव्या विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल! आता बांगलादेश-पाक यांच्यात रंगणार सेमीफायनल
4
"मुस्लिमांनी अयोध्या सोडावी, या मंदिरनगरीत मशिदीच्या बांधकामाला परवानगी दिली जाणार नाही..."; भाजप नेते विनय कटियार यांचं विधान
5
MBBS आणि वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी १० हजार जागा वाढवण्यास मान्यता; प्रत्येक जागोसाठी १.५० कोटींचा खर्च
6
"रशिया कागदी वाघ नाही, तर...!"; डोनाल्ड ट्रम्प म्हणाले होते 'कागदी वाघ', रशियानं केला पलटवार; म्हणाला...
7
Pahalgam Terror Attack : मोठं यश...! पहलगाम हल्ल्यात दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या मोहम्मद कटारियाला अटक; असा पकडला
8
अभिषेकनं साधला मोठा डाव! आधी हिटमॅन रोहितला ओव्हरटेक केलं, मग गुरबाझचा विक्रमही मोडला
9
३ दिवस भारताचे मंत्री, अधिकारी अमेरिकेत तळ ठोकून; ट्रेड डील, ट्रम्प टॅरिफ, H1B व्हिसावर चर्चा
10
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी भाजपा खासदार, आमदारांचा मोठा निर्णय, एक महिन्याचे वेतन देणार!
11
IND vs BAN : बांगलादेशच्या नव्या कॅप्टननं नशीब काढलं, पण तो गडबडला! सूर्या म्हणाला, आमच्या मनासारखं झालं
12
एकीकडे डोनाल्ड ट्रम्प यांची 'बोंबाबोंब', दुसरीकडे रशियाने मात्र थेट इराणसोबत केला अणू करार
13
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
14
“शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत, ड्रोनने केलेले पंचनामे मान्य करणार”; CM फडणवीसांची ग्वाही
15
त्याला अजून फाशी का दिली नाही? मुख्यमंत्र्यांची हत्या करणाऱ्या आरोपीच्या याचिकेवर कोर्टाने सरकारला फटकारलं
16
सरकार शेतकऱ्यांचे आहे, चिंता करू नका! एकनाथ शिंदे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिला धीर
17
वायरल 'बाल्कनी' हिमनगाचे केवळ टोक? ९९८ कोटींचा इंडोरा–दिगोरी उड्डाणपूलामुळे प्रभावित मालमत्तांची यादी तयार करण्याचे आदेश
18
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ
19
"प्रत्येकाला स्वाभिमान असतो, त्याने..."; शाहीन शाह आफ्रिदीकडून हॅरिस रौफच्या कृतीचे समर्थन
20
“बॅगवरचा फोटो कसला पाहता, मदत पाहा”; एकनाथ शिंदे शेतकऱ्यांच्या बांधावर, केली नुकसानीची पाहणी

वन्यप्राण्यांच्या गणनेसाठी वनविभाग झाला सज्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2016 01:38 IST

नवेगाव-नागझिरा व्याघ्र राखीव प्रकल्पात दरवर्षी बुद्ध पौर्णिमेच्या चांदण्यारात्री वन्यप्राण्यांची गणना केली जाते.

गोंदिया : नवेगाव-नागझिरा व्याघ्र राखीव प्रकल्पात दरवर्षी बुद्ध पौर्णिमेच्या चांदण्यारात्री वन्यप्राण्यांची गणना केली जाते. यावर्षी २१ मे रोजी बुद्ध पौर्णिमेच्या मुहूर्तावर ही गणना होणार आहे. नवेगावबांध, न्यू नागझिरा, नागझिरा, कोका इत्यादी अभयारण्याच्या राखीव ५५६ चौकिमी वनांमध्ये गणनेसाठी वन्यजीव विभागाने २१६ मचाण तयार केल्या असून त्यावरून निरीक्षण करण्यात येणार आहे.दरवर्षी बुद्ध पौर्णिमेच्या चांदण्यारात्री देशातील सर्वच राखीव वनक्षेत्रात विचरण करणाऱ्या वन्यजीवांच्या गणनेचे कार्य केले जाते. यावर्षी २१ मे रोजी बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी संरक्षित वन्यक्षेत्र नागझिरा, न्यू नागझिरा, नवेगावबांध व कोका येथील ५५६ चौकिमीमध्ये पसरलेल्या वनक्षेत्रात वन्यप्राण्यांची गणना केली जाईल. त्यासाठी वन्यजीव विभागाद्वारे २१६ मचान बनविण्यात आले आहेत. या मचाणांवर बसून वन्यजीव प्रेमी व सामाजिक संस्थांचे कार्यकर्ते २१ मे च्या सकाळी ८ वाजतापासून २२ मे च्या सकाळपर्यंत मचाणांजवळील जलस्रोतांवर येणाऱ्या वन्यजीवांची गणना करतील. त्यावेळी मचानांवर त्यांच्यासह वनकर्मचारीसुद्धा उपस्थित राहणार आहेत. २१६ पैकी २५ मचान स्थायी व १९१ मचाण अस्थायी रूपाने जलस्रोतांपासून ५० मीटर दूर अंतरावर तयार करण्यात आल्या आहेत. या कार्यासाठी जिल्ह्याशिवाय देशातील विविध भागात राहणारे वन्यजीवप्रेमींद्वारे आवेदन भरण्यात आले आहेत. मागील वर्षाच्या गणनेनुसार, या संरक्षित वनक्षेत्रात एकूण ११ हजार २७५ वनजीवांचे संचार आहे. यापैकी सहा वाघ, ८ बिबट, २४७ रानटी कुत्रे, १७२ अस्वल, दोन चांदी अस्वल, एक हजार २२४ रानटी म्हशी, एक हजार ४१० चितळ, ४४६ सांभर, ५९७ नीलगाय, २७ चौसिंगा, १५२ हरीण, एक हजार ४४४ रानडुकरे, २४० मोर, २९ मुंगूस, ४५४ लालतोंडी माकडे, आठ साही, १६ रानमांजरी, सहा रानकोंबडे आदींचा समावेश आहे.पाण्याच्या अभावाने होणार परिणाम४वन्यजीव गणना राखीव वनांमध्ये नैसर्गिक व अस्थायीपणे बनविलेल्या जलस्रोतांजवळ मचानांवर जावून केली जाते. परंतु यावर्षी पावसाच्या कमतरतेमुळे वनातील अनेक नैसर्गिक जलस्रोतांमध्ये पाण्याचा अभाव असल्याने याचा परिणाम गणनेवर पडणार आहे. त्यामुळे यावर्षी वन विभागाद्वारे बनविण्यात आलेले जे जलस्रोत वाळले आहेत, अशा १० ठिकाणांवर मचाण बनविण्यात आले नाहीत.४वन्यजीव विभागानुसार, जिल्ह्याच्या व्याघ्र राखीव प्रकल्पात एकूण सात वाघ व तीन छावे होते. परंतु काही दिवसांपूर्वी एका वाघिणीचा मृत्यू झाला. त्यामुळे आता सहा वाघ व तीन छावे बाकी आहेत. वन्यप्राण्यांच्या गणनेसाठी येणाऱ्या वन्यप्रेमींसाठी हे सहा वाघ व तीन छावे आकर्षणाचे केंद्र ठरणार आहेत.