शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
4
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
5
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
6
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
7
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
8
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
9
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
10
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
11
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
12
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
13
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
14
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
15
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
16
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
17
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
18
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
19
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
20
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
Daily Top 2Weekly Top 5

वन्यप्राण्यांच्या गणनेसाठी वनविभाग झाला सज्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2016 01:38 IST

नवेगाव-नागझिरा व्याघ्र राखीव प्रकल्पात दरवर्षी बुद्ध पौर्णिमेच्या चांदण्यारात्री वन्यप्राण्यांची गणना केली जाते.

गोंदिया : नवेगाव-नागझिरा व्याघ्र राखीव प्रकल्पात दरवर्षी बुद्ध पौर्णिमेच्या चांदण्यारात्री वन्यप्राण्यांची गणना केली जाते. यावर्षी २१ मे रोजी बुद्ध पौर्णिमेच्या मुहूर्तावर ही गणना होणार आहे. नवेगावबांध, न्यू नागझिरा, नागझिरा, कोका इत्यादी अभयारण्याच्या राखीव ५५६ चौकिमी वनांमध्ये गणनेसाठी वन्यजीव विभागाने २१६ मचाण तयार केल्या असून त्यावरून निरीक्षण करण्यात येणार आहे.दरवर्षी बुद्ध पौर्णिमेच्या चांदण्यारात्री देशातील सर्वच राखीव वनक्षेत्रात विचरण करणाऱ्या वन्यजीवांच्या गणनेचे कार्य केले जाते. यावर्षी २१ मे रोजी बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी संरक्षित वन्यक्षेत्र नागझिरा, न्यू नागझिरा, नवेगावबांध व कोका येथील ५५६ चौकिमीमध्ये पसरलेल्या वनक्षेत्रात वन्यप्राण्यांची गणना केली जाईल. त्यासाठी वन्यजीव विभागाद्वारे २१६ मचान बनविण्यात आले आहेत. या मचाणांवर बसून वन्यजीव प्रेमी व सामाजिक संस्थांचे कार्यकर्ते २१ मे च्या सकाळी ८ वाजतापासून २२ मे च्या सकाळपर्यंत मचाणांजवळील जलस्रोतांवर येणाऱ्या वन्यजीवांची गणना करतील. त्यावेळी मचानांवर त्यांच्यासह वनकर्मचारीसुद्धा उपस्थित राहणार आहेत. २१६ पैकी २५ मचान स्थायी व १९१ मचाण अस्थायी रूपाने जलस्रोतांपासून ५० मीटर दूर अंतरावर तयार करण्यात आल्या आहेत. या कार्यासाठी जिल्ह्याशिवाय देशातील विविध भागात राहणारे वन्यजीवप्रेमींद्वारे आवेदन भरण्यात आले आहेत. मागील वर्षाच्या गणनेनुसार, या संरक्षित वनक्षेत्रात एकूण ११ हजार २७५ वनजीवांचे संचार आहे. यापैकी सहा वाघ, ८ बिबट, २४७ रानटी कुत्रे, १७२ अस्वल, दोन चांदी अस्वल, एक हजार २२४ रानटी म्हशी, एक हजार ४१० चितळ, ४४६ सांभर, ५९७ नीलगाय, २७ चौसिंगा, १५२ हरीण, एक हजार ४४४ रानडुकरे, २४० मोर, २९ मुंगूस, ४५४ लालतोंडी माकडे, आठ साही, १६ रानमांजरी, सहा रानकोंबडे आदींचा समावेश आहे.पाण्याच्या अभावाने होणार परिणाम४वन्यजीव गणना राखीव वनांमध्ये नैसर्गिक व अस्थायीपणे बनविलेल्या जलस्रोतांजवळ मचानांवर जावून केली जाते. परंतु यावर्षी पावसाच्या कमतरतेमुळे वनातील अनेक नैसर्गिक जलस्रोतांमध्ये पाण्याचा अभाव असल्याने याचा परिणाम गणनेवर पडणार आहे. त्यामुळे यावर्षी वन विभागाद्वारे बनविण्यात आलेले जे जलस्रोत वाळले आहेत, अशा १० ठिकाणांवर मचाण बनविण्यात आले नाहीत.४वन्यजीव विभागानुसार, जिल्ह्याच्या व्याघ्र राखीव प्रकल्पात एकूण सात वाघ व तीन छावे होते. परंतु काही दिवसांपूर्वी एका वाघिणीचा मृत्यू झाला. त्यामुळे आता सहा वाघ व तीन छावे बाकी आहेत. वन्यप्राण्यांच्या गणनेसाठी येणाऱ्या वन्यप्रेमींसाठी हे सहा वाघ व तीन छावे आकर्षणाचे केंद्र ठरणार आहेत.