शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
2
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधुबद्दलही बरंच बोलले
3
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
4
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
5
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
6
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
7
Video - हृदयद्रावक! डीजेवर नाचताना आक्रित घडलं, २३ वर्षीय तरुण खाली कोसळला अन्...
8
"तिथं मी बुलेटप्रूफ कारशिवाय बाहेर पडू शकत नाही!"; कारण... अफगाणिस्तान स्टार क्रिकेटर राशीद खानचा खुलासा
9
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
10
“काँग्रेसचा विषय नक्कीच संपलेला आहे, पण निकालानंतर गरज लागली तर…”; संजय राऊतांचे मोठे विधान
11
ठाकरे बंधुंमधील दादर, शिवडीचा तिढा अखेर सुटला, मोठ्या भावासाठी धाकट्याने घेतले झुकते माप
12
महापालिका निवडणूक २०२६ : प्रस्तावच नाही; काँग्रेस-'वंचित'ची युती होणार की नाही? गोंधळ कायम 
13
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
14
खळबळजनक! सकाळी एन्काऊंटर, संध्याकाळी फरार; पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला आरोपी
15
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
16
पहाटे ५ ची वेळ, उर्फी जावेद घाबरलेल्या अवस्थेत पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली; नक्की काय घडलं?
17
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
18
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
19
आठ कोटी, बारा पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
20
८ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा ३,२८,००० रुपये फिक्स व्याज! ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची 'खास' भेट
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना प्रतिबंधासाठी जागरुक आणि जबाबदार व्हा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2020 06:00 IST

शासनातर्फे देण्यात आलेल्या सुट्या मौज आणि गप्पा मारण्यासाठी नाहीत. तर आपण घरात राहून कोरोना विषाणूंची साखळी तोडण्यासाठी आहेत, याचे भान प्रत्येक व्यक्तीने ठेवावे. जिल्ह्याची लोकसंख्या १३ लाखांपेक्षा अधिक आहे. कोरोना विषाणूंची लागण झाल्यास ते सर्वांच्याच आरोग्यासाठी अपायकारक ठरणार आहे. गर्मीमुळे हा विषाणू टीकत नाही ही बाब सिद्ध झालेली नाही.

ठळक मुद्देराजा दयानिधी । कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन व ‘हँडवॉश स्टेशन’ची निर्मिती

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : नोव्हेल कोरोना विषाणूवर प्रतिबंधात्मक लस उपलब्ध नाही. मात्र खबरदारी घेतल्यास या विषाणूंचा प्रसार रोखता येवू शकतो. एका व्यक्तीपासून दुसऱ्याला लागण होण्याची साखळी आपण तोडली पाहिजे. त्यासाठी नागरिकांनी जवाबदार आणि जागरुक रहावे असे आवाहन जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी केले आहे.स्व.वसंतराव नाईक जिल्हा परिषद सभागृहात शुक्रवारी (दि.२०) कर्मचाऱ्यांची कोरोना विषाणूंचा प्रतिबंधात्मक उपाययोजनेसाठी घेण्यात आलेल्या कार्यशाळेत मार्गदर्शन करताना ते बोलत होते. अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद अध्यक्ष सीमा मडावी होत्या. याप्रसंगी जिल्हा परिषद उपाध्यक्ष हमीद अल्ताफ अकबर अली, समाज कल्याण सभापती विश्वजीत डोंगरे, अतिरिक्त उपमुख्य कार्यकारी अधिकारी एस. ई.ए.हाशमी, सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी नरेश भांडारकर, पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेश राठोड तथा सर्वच विभागाचे विभागप्रमुख यावेळी उपस्थित होते.पुढे बोलताना डॉ.दयानिधी यांनी, कोरोना विषाणूंबाबत १४ दिवसांचा लागण कालावधी आहे. या दिवसात परदेशातून आलेल्या व्यक्तींनी घरातच राहावे. अशा व्यक्तींसाठी तालुकास्तरावर सुद्धा विलगीकरणाची सोय करण्यात आलेली आहे.शासनातर्फे देण्यात आलेल्या सुट्या मौज आणि गप्पा मारण्यासाठी नाहीत. तर आपण घरात राहून कोरोना विषाणूंची साखळी तोडण्यासाठी आहेत, याचे भान प्रत्येक व्यक्तीने ठेवावे. जिल्ह्याची लोकसंख्या १३ लाखांपेक्षा अधिक आहे. कोरोना विषाणूंची लागण झाल्यास ते सर्वांच्याच आरोग्यासाठी अपायकारक ठरणार आहे. गर्मीमुळे हा विषाणू टीकत नाही ही बाब सिद्ध झालेली नाही. त्यामुळे कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका व अफवा पसरवू नका. वारंवार तांत्रिक पद्धतीने २० ते ४० सेकंदांपर्यंत हात धुवून आपण स्वत:चा बचाव करु शकतो असे सांगत हात धुण्याच्या पद्धतीवर सुद्धा मार्गदर्शन केले.मडावी यांनी, नागरिकांनी घाबरुन जावू नये व स्वत:ची काळजी घेवून गर्दीच्या ठिकाणात जाणे टाळावे असे सांगीतले. अल्ताफ हमीद यांनी, अफवांवर विश्वास ठेवू नका व अफवा पसरवू नका असे सांगीतले. याप्रसंगी कोरोना विषाणूंच्या प्रतिबंधासाठी जिल्हा परिषदेतर्फे करण्यात येणाऱ्या उपाययोजनांबाबत पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेश राठोड यांनी माहिती दिली. त्याचप्रकारे, कर्मचाऱ्यांना चित्रफितीच्या माध्यमातून कोरोना विषाणूंच्या प्रतिबंधाबाबत माहिती देण्यात आली. संचालन माहिती, शिक्षण व संवाद तज्ज्ञ अतुल गजभिये यांनी केले. आयोजनासाठी स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) च्या सर्व कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.अभ्यागतांसाठी ‘हॅँडवॉश स्टेशन’जिल्हा परिषद कार्यालयात दररोज अनेक नागरिक भेट देतात. कोरोना विषाणूंंचा फैलाव होवू नये तथा नागरिकांना हात धुण्याची सवय लागावी यासाठी जिल्हा परिषद प्रशासकीय इमारत परिसरात ‘हॅँडवॉश स्टेशन’ तयार करण्यात आले आहे. अभ्यागतांनी कार्यालयात प्रवेश करण्यापुर्वी हात तांत्रिक पद्धतीने धुवूनच कार्यालयात प्रवेश करण्याचे आवाहन सुद्धा करण्यात आले आहे.ठळक मुद्देगर्मीमध्ये हा विषाणू वाढत नाही, ही बाब सिद्ध झालेली नाही.गर्दीच्या ठिकाणात जाणे टाळा.हात नियमित व वारंवार धुवा.बाहेर फिरण्याऐवजी घरीच रहा.कोणत्याही अफवा पसरवू नको, अफवांवर विश्वास ठेवू नका.माहितीसाठी आरोग्य विभागाच्या शासकीय संकेतस्थळाला भेट द्या.सत्यता पडताळूनच संदेशांची देवाण-घेवाण करा.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस