शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
2
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
3
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
4
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
5
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
6
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
7
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
8
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
9
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
10
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
11
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
12
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?
13
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
14
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
15
महापालिका निवडणुकीचे वारे वाहताच, उल्हासनगरात ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या घरावर पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न
16
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याने चर्चेत आलाय 'हा' छोटासा देश, तुम्हीही बनवू शकता फिरायचा प्लान!
17
'आमच्यावर युद्ध लादले; आत्मसमर्पण करणार नाही', खमेनी यांचा इस्रायसह अमेरिकेलाही थेट इशारा
18
राजा रघुवंशी नव्हे, 'या' व्यक्तीशी होणार होतं सोनमचं लग्न, २५ गुणही जुळलेले! मग का मोडलं नातं? 
19
जिद्दीला सॅल्यूट! २३ वेळा अपयश पण मानली नाही हार; शेतकऱ्याचा लेक झाला असिस्टंट कमांडंट

कोरोना प्रतिबंधासाठी जागरुक आणि जबाबदार व्हा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2020 06:00 IST

शासनातर्फे देण्यात आलेल्या सुट्या मौज आणि गप्पा मारण्यासाठी नाहीत. तर आपण घरात राहून कोरोना विषाणूंची साखळी तोडण्यासाठी आहेत, याचे भान प्रत्येक व्यक्तीने ठेवावे. जिल्ह्याची लोकसंख्या १३ लाखांपेक्षा अधिक आहे. कोरोना विषाणूंची लागण झाल्यास ते सर्वांच्याच आरोग्यासाठी अपायकारक ठरणार आहे. गर्मीमुळे हा विषाणू टीकत नाही ही बाब सिद्ध झालेली नाही.

ठळक मुद्देराजा दयानिधी । कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन व ‘हँडवॉश स्टेशन’ची निर्मिती

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : नोव्हेल कोरोना विषाणूवर प्रतिबंधात्मक लस उपलब्ध नाही. मात्र खबरदारी घेतल्यास या विषाणूंचा प्रसार रोखता येवू शकतो. एका व्यक्तीपासून दुसऱ्याला लागण होण्याची साखळी आपण तोडली पाहिजे. त्यासाठी नागरिकांनी जवाबदार आणि जागरुक रहावे असे आवाहन जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी केले आहे.स्व.वसंतराव नाईक जिल्हा परिषद सभागृहात शुक्रवारी (दि.२०) कर्मचाऱ्यांची कोरोना विषाणूंचा प्रतिबंधात्मक उपाययोजनेसाठी घेण्यात आलेल्या कार्यशाळेत मार्गदर्शन करताना ते बोलत होते. अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद अध्यक्ष सीमा मडावी होत्या. याप्रसंगी जिल्हा परिषद उपाध्यक्ष हमीद अल्ताफ अकबर अली, समाज कल्याण सभापती विश्वजीत डोंगरे, अतिरिक्त उपमुख्य कार्यकारी अधिकारी एस. ई.ए.हाशमी, सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी नरेश भांडारकर, पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेश राठोड तथा सर्वच विभागाचे विभागप्रमुख यावेळी उपस्थित होते.पुढे बोलताना डॉ.दयानिधी यांनी, कोरोना विषाणूंबाबत १४ दिवसांचा लागण कालावधी आहे. या दिवसात परदेशातून आलेल्या व्यक्तींनी घरातच राहावे. अशा व्यक्तींसाठी तालुकास्तरावर सुद्धा विलगीकरणाची सोय करण्यात आलेली आहे.शासनातर्फे देण्यात आलेल्या सुट्या मौज आणि गप्पा मारण्यासाठी नाहीत. तर आपण घरात राहून कोरोना विषाणूंची साखळी तोडण्यासाठी आहेत, याचे भान प्रत्येक व्यक्तीने ठेवावे. जिल्ह्याची लोकसंख्या १३ लाखांपेक्षा अधिक आहे. कोरोना विषाणूंची लागण झाल्यास ते सर्वांच्याच आरोग्यासाठी अपायकारक ठरणार आहे. गर्मीमुळे हा विषाणू टीकत नाही ही बाब सिद्ध झालेली नाही. त्यामुळे कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका व अफवा पसरवू नका. वारंवार तांत्रिक पद्धतीने २० ते ४० सेकंदांपर्यंत हात धुवून आपण स्वत:चा बचाव करु शकतो असे सांगत हात धुण्याच्या पद्धतीवर सुद्धा मार्गदर्शन केले.मडावी यांनी, नागरिकांनी घाबरुन जावू नये व स्वत:ची काळजी घेवून गर्दीच्या ठिकाणात जाणे टाळावे असे सांगीतले. अल्ताफ हमीद यांनी, अफवांवर विश्वास ठेवू नका व अफवा पसरवू नका असे सांगीतले. याप्रसंगी कोरोना विषाणूंच्या प्रतिबंधासाठी जिल्हा परिषदेतर्फे करण्यात येणाऱ्या उपाययोजनांबाबत पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेश राठोड यांनी माहिती दिली. त्याचप्रकारे, कर्मचाऱ्यांना चित्रफितीच्या माध्यमातून कोरोना विषाणूंच्या प्रतिबंधाबाबत माहिती देण्यात आली. संचालन माहिती, शिक्षण व संवाद तज्ज्ञ अतुल गजभिये यांनी केले. आयोजनासाठी स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) च्या सर्व कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.अभ्यागतांसाठी ‘हॅँडवॉश स्टेशन’जिल्हा परिषद कार्यालयात दररोज अनेक नागरिक भेट देतात. कोरोना विषाणूंंचा फैलाव होवू नये तथा नागरिकांना हात धुण्याची सवय लागावी यासाठी जिल्हा परिषद प्रशासकीय इमारत परिसरात ‘हॅँडवॉश स्टेशन’ तयार करण्यात आले आहे. अभ्यागतांनी कार्यालयात प्रवेश करण्यापुर्वी हात तांत्रिक पद्धतीने धुवूनच कार्यालयात प्रवेश करण्याचे आवाहन सुद्धा करण्यात आले आहे.ठळक मुद्देगर्मीमध्ये हा विषाणू वाढत नाही, ही बाब सिद्ध झालेली नाही.गर्दीच्या ठिकाणात जाणे टाळा.हात नियमित व वारंवार धुवा.बाहेर फिरण्याऐवजी घरीच रहा.कोणत्याही अफवा पसरवू नको, अफवांवर विश्वास ठेवू नका.माहितीसाठी आरोग्य विभागाच्या शासकीय संकेतस्थळाला भेट द्या.सत्यता पडताळूनच संदेशांची देवाण-घेवाण करा.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस