शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
2
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
3
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
4
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
5
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
6
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
7
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
8
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
9
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
10
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
11
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
12
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
13
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
14
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
15
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
16
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
17
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
18
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
19
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
20
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!

जिल्ह्यात ‘बे मौसम बरसात’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2019 22:44 IST

मागील दोन दिवसांपासून वातावरण ढगाळलेले असतानाच शनिवारी (दि.२४) सायंकाळी पावसाच्या हलक्या सरी बरसल्या. मात्र शुक्रवारी (दि.२५) पहाटे दमदार बरसलेल्या पावसाने जिल्ह्याला झोडपून काढले आहे.

ठळक मुद्दे२६४.५० मीमी. पावसाची नोंद : पावसामुळे थंडीचा जोर वाढला

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : मागील दोन दिवसांपासून वातावरण ढगाळलेले असतानाच शनिवारी (दि.२४) सायंकाळी पावसाच्या हलक्या सरी बरसल्या. मात्र शुक्रवारी (दि.२५) पहाटे दमदार बरसलेल्या पावसाने जिल्ह्याला झोडपून काढले आहे. जिल्ह्यात मागील २४ तासांत २६४.५० मीमी. पावसाची नोंद करण्यात आली असून त्याची सरासरी ८.०२ एवढी आहे. या ‘बे मौसम बरसात’मुळे मात्र मागील काही दिवसांपासून कमी झालेल्या थंडीचा जोर पुन्ह वाढला आहे.जिल्ह्यात थंडीचा कमी जोर कमी होत होता. मात्र दोन दिवसांपासून जिल्ह्याचे वातावरण ढगाळलेले होते. अशात गुरूवारी (दि.२४) पावसाच्या हलक्या सरी बरसल्या. तर शुक्रवारी (दि.२५) पहाटे मुसळधार पावसाने हजेरी लावून जिल्ह्याला झोडपून काढले. या पावसामुळे जिल्ह्यात पुन्हा थंडीचा जोर वाढला आहे. जिल्हयात २६४.५० मीमी. पावसाची नोंद करण्यात आली असून त्याची ८.०२ एवढी सरासरी आहे. विशेष म्हणजे, आमगाव तालुक्यात ६५.२० मीमी. एवढा सर्वाधीक पाऊस बरसला आहे. तर देवरी तालुक्यात ११.२० मीमी. म्हणजेच सर्वात कमी पाऊस बरसल्याची नोंद आहे.या अवकाळी पावसामुळे शहरातील स्वच्छतेची पोलखोल झाली. शहरातील रेल्वे स्टेशन लगत रस्त्यावर नालीतील घाण रस्त्यावर आल्याने नागरिकांनी त्या चिखलातूनच ये-जा करावी लागली. याशिवाय या पावसामुळे धान खरेदी केंद्रांवर बाहेर पडून असलेल्या धानाला नुकसानीची शक्यता नाकारता येत नाही. मात्र आदिवासी महामंडळाचे धान उघडयावर पडून राहत असल्याने पूर्वीच ताडपत्रीची व्यवस्था करण्यात आल्याचे महामंडळाचे अधिकारी सुरेश आंबटकर यांनी सांगीतले. तर सोबतच जिल्ह्यातील पिकांना या पावसामुळे फटका बसण्याची शक्यचाही नाकारता येत नाही.

टॅग्स :Rainपाऊस