शहरं
Join us  
Trending Stories
1
जगातील सर्वात आनंदी देश धोक्यात! रशियन सैन्याने तळ उभारले; युरोपमध्ये खळबळ, युक्रेननंतर..
2
पाकिस्तानच्या किराना हिल्समध्ये रेडिएशन गळती? अणुऊर्जा संस्थेने सत्य सांगितले, अमेरिकेचे मौन
3
अचानक बसला आग लागली, ५ जणांचा मृत्यू, काच फोडून चालक पळून गेला
4
४ दिवसांच्या संघर्षात भारत ठरला वरचढ, पाकिस्तानला मोठं नुकसान; न्यूयॉर्क टाईम्सचा रिपोर्ट
5
भाजप-संघातील घटक नाराज; म्हणे, ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरचा युद्धविराम ही तर चूक, शत्रुत्व थांबले
6
पाकिस्ताननंतर बांगलादेशनं IMF कडे पसरले हात, बुडत्या अर्थव्यवस्थेचं कारण देत 'इतक्या' पैशांची मागणी
7
आजचे राशीभविष्य १५ मे २०२५: आर्थिक लाभ संभवतात, दुपारनंंतर मात्र अनेकांचे नशीब बदलेल...
8
शूरवीरांचा देश आहे, असा संदेश पाकला देणे आवश्यक होते; RSSचे सुनील अंबेकर यांचे प्रतिपादन
9
कर्नल सोफियांवर टीका भोवली, मंत्री विजय शाहवर FIR; हायकोर्टाने फटकारले, रात्री गुन्हा दाखल
10
न्या. भूषण गवई देशाचे ५२वे सरन्यायाधीश; अनेक महत्त्वपूर्ण निर्णय देणाऱ्या पीठांमध्ये सहभाग
11
अनामिक भीती वाटते, अस्थिर मन शांत होत नाही? कळकळीने स्वामींना हाक मारा, ‘ही’ प्रार्थना कराच
12
ब्रह्मोस अण्वस्त्रांच्या डेपोवर आदळले असते तर काय झाले असते? किती मोठा स्फोट झाला असता?
13
महिला राफेल उडवू शकतात, तर लष्करात त्यांची संख्या मर्यादित का? सुप्रीम कोर्टाचा सरकारला सवाल
14
गरिबांच्या सेवेमुळे माझ्या मुलाला हे पद मिळाले; सरन्यायाधीश गवई यांच्या मातोश्री भावुक
15
२१ दिवसांत ३१ माओवादी यमसदनी; छत्तीसगड-तेलंगणा सीमेवर कारवाईला मोठे यश
16
पाकने २१ दिवसांनी BSF जवानाला भारताच्या ताब्यात दिले; वडील म्हणाले, मुलाची गळाभेट घ्यायची आहे
17
डोनाल्ड ट्रम्प यांचा पाचव्यांदा दावा; म्हणाले, “होय, भारत-पाकमधील युद्ध अमेरिकेनेच संपविले”
18
२०२७ पासून मेट्रोचा मार्ग वेगाने विस्तारेल: मुख्यमंत्री; काशीगाव-दहिसरदरम्यान तांत्रिक चाचणी
19
शरद पवार गटाच्या बैठकीत स्थानिक निवडणुकांवर चर्चा; नेमके काय घडले, कोणता निर्णय झाला?
20
‘लाडक्या बहिणी’च्या नावे खाती उघडून सायबर भामट्यांना ३० हजारांत विक्री; तिघे अटकेत

शेतीला सौरपंपांचा आधार

By admin | Updated: October 7, 2016 01:57 IST

विविध घटकाच्या कल्याणासोबतच सर्वांगिण विकासाच्या दृष्टीने शासन विविध योजनांची अंमलबजावणी करीत आहे

सितेपालात यशस्वी प्रयोग : आर्थिक जीवनासह सामाजिक स्थितीत सुधारणागोंदिया : विविध घटकाच्या कल्याणासोबतच सर्वांगिण विकासाच्या दृष्टीने शासन विविध योजनांची अंमलबजावणी करीत आहे. वैयक्तिक व सामूहिक लाभाच्या विविध योजनांच्या लाभातून व्यक्तीचे कौटुंबिक जीवनमान उंचवून दरडोई उत्पन्न वाढविण्यासोबतच सामूहिक विकासही करण्यात येत आहे. सालेकसा तालुक्यातील सितेपाला येथील हिरामन जिंदाकुर या अल्पभूधारक शेतकऱ्याने शासनाच्या सौर कृषिपंप योजनेचा लाभ घेवून शेतीला सिंचनाखाली आणले व उत्पादनात वाढ करून समृध्दीचा मार्ग शोधला आहे.सालेकसा हा राज्याच्या टोकावर असलेला गोंदिया जिल्ह्यातील तालुका. दुर्गम, मागास, आदिवासीबहुल आणि नक्षलदृट्या संवेदनशील तालुका म्हणून ओळखला जातो. मागास व दुर्गम भागातील नागरिकांचे व शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी शासन प्रयत्नशील असून त्यामधून त्यांचा मानव विकास निर्देशांक वाढविण्यास मदत होत आहे. सितेपाला येथील हिरामन जिंदाकुर हे अल्पभूधारक शेतकरी. जेमतेम तीन एकर शेतीवर कुटुंबाचा उदरिनर्वाह चालवितात. जिंदाकुर हे अनुसूचित जाती प्रवर्गात येत असल्यामुळे १९९५ या वर्षात त्यांनी विशेष घटक योजनेच्या लाभातून सिंचनासाठी विहीर तयार केली. पावसाच्या पाण्यावर पूर्वी अवलंबून राहून हिरामन धानपीक घेत असायचे. शेतात विहीर झाल्यामुळे त्यांनी कृषिपंप जोडणीसाठी वीज वितरण कंपनीकडे रितसर तेव्हाच अर्ज केला होता. परंतु त्यांच्या विहिरीच्या शेतापर्यंत वीज पुरवठा करणे हे वीज वितरण कंपनीला आर्थिकदृष्ट्या परवडणारे नव्हते. यासाठी त्यांच्या शेतापर्यंत वीज वितरण कंपनीला २५ विजेचे खांब उभे करावयाचे होते. त्यामुळे त्यांच्या शेतातील विहिरीला कृषिपंपाची जोडणी देणे शक्य झाले नाही.हिरामन यांचा मोठा मुलगा गजानन याने सालेकसा येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून इलेक्ट्रीशियनचा डिप्लोमा घेतल्यामुळे सालेकसा येथील वीज वितरण कंपनीच्या उपकेंद्रात वायरमन अप्रेंटीशीप करीत होता. या कार्यालयातच काम करीत असल्यामुळे वीज वितरण कंपनीच्या सौर कृषिपंप योजनेची माहिती गजाननला झाली. जवळपास २० वर्षापेक्षा जास्त कालावधी शेतात विहीर तयार करण्यास झाला. परंतु वीज पुरवठा शेतीला नसल्यामुळे डिझेल इंजीनचा शेतीला सिंचनासाठी वापर ते करीत होते. सौर कृषिपंप योजनेची माहिती गजाननने आपल्या वडिलांना दिली. त्यामुळे शेतातील विहिरीवर सौर कृषिपंप बसविण्याचा निर्णय हिरामनने घेतला.तीन एकर शेतीतील विहिरीवर ३ एचपी सौर कृषिपंप बसविण्यासाठी त्यांनी ४ मार्च २०१६ रोजी लाभार्थ्याचा हिस्सा म्हणून २० हजार २५० रु पयांची डिमांड वीज वितरण कंपनीच्या सालेकसा येथील कार्यालयात भरली. केंद्र शासनाने या सौर कृषिपंपासाठी चार लाख ५ हजार रु पये किंमत निश्चित केली आहे. यामध्ये लाभार्थ्याचा ५ टक्के हिस्सा २० हजार ५०० रूपये, १ लाख २१ हजार ५०० रूपये ३० टक्के केंद्र सरकारचे अनुदान. राज्य शासनाचा ५ टक्के हिस्सा म्हणजे २० हजार ५०० रु पये आणि ६० टक्के म्हणजे २ लाख ४३ हजार रु पये कर्ज उचलून वीज वितरण कंपनी लाभार्थ्याला देणार आहे.सौर कृषिपंप योजनेतून मे २०१६ मध्ये सौर कृषिपंप हिरामनच्या शेतातील विहिरीवर बसविण्यात आले आहे. सौर कृषिपंपामुळे खरीप हंगामात धानाला पाणी देता आले. कधी कधी एका पाण्याच्या कमतरतेमुळे उत्पादनात घट होत होती. आता मात्र उत्पादनात कधीच घट येणार नाही. विहिरीवर लावण्यात आलेल्या सौर कृषिपंपामुळे उलट वाढ होणार असून रबी हंगामातदेखील धानासोबतच भाजीपाला पिके व उन्हाळी धानपीक घेण्याचा विचार असल्याचे त्यांनी सांगितले. जलयुक्त शिवार अभियानाचेही महत्व हिरामनला कळले असून भविष्यात शेती ठिबक सिंचनाखाली आणण्याचा विचार आहे. त्यामुळे पाण्याची नासाडी होणार नाही आणि आवश्यक तेवढेच पाणी थेट पिकाला देता येईल.पूर्वी शेतात विहीर नव्हती. विहीर तयार करण्याचे स्वप्न विशेष घटक योजनेतून पूर्ण झाले. शेतातील विहिरीपर्यंत कृषिपंपाला वीज जोडणी करणे हे वीज वितरण कंपनीला आर्थिकदृष्ट्या परवडणारे नव्हते. मात्र राज्य सरकारने दुर्गम व मागास भागातील शेतकऱ्यांच्या कृषिपंपाला वीज जोडणी न देता थेट सौर कृषिपंप देवून अशा शेतकऱ्यांच्या जीवनात बदल घडवून आणण्यासाठी केलेल्या प्रयत्नाला यश आले आहे. वीज वितरण कंपनीने आपल्याला सिंचनाची सुविधा उपलब्ध व्हावी ही इच्छा सौर कृषिपंप देवून पूर्ण केल्यामुळे आता माझ्या आर्थिक जीवनात तर बदल होईलच. सोबतच सामाजिक स्थिती सुधारण्यास मदत होणार असल्याचे हिरामन यांनी सांगितले. (प्रतिनिधी)