शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

शेतीला सौरपंपांचा आधार

By admin | Updated: October 7, 2016 01:57 IST

विविध घटकाच्या कल्याणासोबतच सर्वांगिण विकासाच्या दृष्टीने शासन विविध योजनांची अंमलबजावणी करीत आहे

सितेपालात यशस्वी प्रयोग : आर्थिक जीवनासह सामाजिक स्थितीत सुधारणागोंदिया : विविध घटकाच्या कल्याणासोबतच सर्वांगिण विकासाच्या दृष्टीने शासन विविध योजनांची अंमलबजावणी करीत आहे. वैयक्तिक व सामूहिक लाभाच्या विविध योजनांच्या लाभातून व्यक्तीचे कौटुंबिक जीवनमान उंचवून दरडोई उत्पन्न वाढविण्यासोबतच सामूहिक विकासही करण्यात येत आहे. सालेकसा तालुक्यातील सितेपाला येथील हिरामन जिंदाकुर या अल्पभूधारक शेतकऱ्याने शासनाच्या सौर कृषिपंप योजनेचा लाभ घेवून शेतीला सिंचनाखाली आणले व उत्पादनात वाढ करून समृध्दीचा मार्ग शोधला आहे.सालेकसा हा राज्याच्या टोकावर असलेला गोंदिया जिल्ह्यातील तालुका. दुर्गम, मागास, आदिवासीबहुल आणि नक्षलदृट्या संवेदनशील तालुका म्हणून ओळखला जातो. मागास व दुर्गम भागातील नागरिकांचे व शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी शासन प्रयत्नशील असून त्यामधून त्यांचा मानव विकास निर्देशांक वाढविण्यास मदत होत आहे. सितेपाला येथील हिरामन जिंदाकुर हे अल्पभूधारक शेतकरी. जेमतेम तीन एकर शेतीवर कुटुंबाचा उदरिनर्वाह चालवितात. जिंदाकुर हे अनुसूचित जाती प्रवर्गात येत असल्यामुळे १९९५ या वर्षात त्यांनी विशेष घटक योजनेच्या लाभातून सिंचनासाठी विहीर तयार केली. पावसाच्या पाण्यावर पूर्वी अवलंबून राहून हिरामन धानपीक घेत असायचे. शेतात विहीर झाल्यामुळे त्यांनी कृषिपंप जोडणीसाठी वीज वितरण कंपनीकडे रितसर तेव्हाच अर्ज केला होता. परंतु त्यांच्या विहिरीच्या शेतापर्यंत वीज पुरवठा करणे हे वीज वितरण कंपनीला आर्थिकदृष्ट्या परवडणारे नव्हते. यासाठी त्यांच्या शेतापर्यंत वीज वितरण कंपनीला २५ विजेचे खांब उभे करावयाचे होते. त्यामुळे त्यांच्या शेतातील विहिरीला कृषिपंपाची जोडणी देणे शक्य झाले नाही.हिरामन यांचा मोठा मुलगा गजानन याने सालेकसा येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून इलेक्ट्रीशियनचा डिप्लोमा घेतल्यामुळे सालेकसा येथील वीज वितरण कंपनीच्या उपकेंद्रात वायरमन अप्रेंटीशीप करीत होता. या कार्यालयातच काम करीत असल्यामुळे वीज वितरण कंपनीच्या सौर कृषिपंप योजनेची माहिती गजाननला झाली. जवळपास २० वर्षापेक्षा जास्त कालावधी शेतात विहीर तयार करण्यास झाला. परंतु वीज पुरवठा शेतीला नसल्यामुळे डिझेल इंजीनचा शेतीला सिंचनासाठी वापर ते करीत होते. सौर कृषिपंप योजनेची माहिती गजाननने आपल्या वडिलांना दिली. त्यामुळे शेतातील विहिरीवर सौर कृषिपंप बसविण्याचा निर्णय हिरामनने घेतला.तीन एकर शेतीतील विहिरीवर ३ एचपी सौर कृषिपंप बसविण्यासाठी त्यांनी ४ मार्च २०१६ रोजी लाभार्थ्याचा हिस्सा म्हणून २० हजार २५० रु पयांची डिमांड वीज वितरण कंपनीच्या सालेकसा येथील कार्यालयात भरली. केंद्र शासनाने या सौर कृषिपंपासाठी चार लाख ५ हजार रु पये किंमत निश्चित केली आहे. यामध्ये लाभार्थ्याचा ५ टक्के हिस्सा २० हजार ५०० रूपये, १ लाख २१ हजार ५०० रूपये ३० टक्के केंद्र सरकारचे अनुदान. राज्य शासनाचा ५ टक्के हिस्सा म्हणजे २० हजार ५०० रु पये आणि ६० टक्के म्हणजे २ लाख ४३ हजार रु पये कर्ज उचलून वीज वितरण कंपनी लाभार्थ्याला देणार आहे.सौर कृषिपंप योजनेतून मे २०१६ मध्ये सौर कृषिपंप हिरामनच्या शेतातील विहिरीवर बसविण्यात आले आहे. सौर कृषिपंपामुळे खरीप हंगामात धानाला पाणी देता आले. कधी कधी एका पाण्याच्या कमतरतेमुळे उत्पादनात घट होत होती. आता मात्र उत्पादनात कधीच घट येणार नाही. विहिरीवर लावण्यात आलेल्या सौर कृषिपंपामुळे उलट वाढ होणार असून रबी हंगामातदेखील धानासोबतच भाजीपाला पिके व उन्हाळी धानपीक घेण्याचा विचार असल्याचे त्यांनी सांगितले. जलयुक्त शिवार अभियानाचेही महत्व हिरामनला कळले असून भविष्यात शेती ठिबक सिंचनाखाली आणण्याचा विचार आहे. त्यामुळे पाण्याची नासाडी होणार नाही आणि आवश्यक तेवढेच पाणी थेट पिकाला देता येईल.पूर्वी शेतात विहीर नव्हती. विहीर तयार करण्याचे स्वप्न विशेष घटक योजनेतून पूर्ण झाले. शेतातील विहिरीपर्यंत कृषिपंपाला वीज जोडणी करणे हे वीज वितरण कंपनीला आर्थिकदृष्ट्या परवडणारे नव्हते. मात्र राज्य सरकारने दुर्गम व मागास भागातील शेतकऱ्यांच्या कृषिपंपाला वीज जोडणी न देता थेट सौर कृषिपंप देवून अशा शेतकऱ्यांच्या जीवनात बदल घडवून आणण्यासाठी केलेल्या प्रयत्नाला यश आले आहे. वीज वितरण कंपनीने आपल्याला सिंचनाची सुविधा उपलब्ध व्हावी ही इच्छा सौर कृषिपंप देवून पूर्ण केल्यामुळे आता माझ्या आर्थिक जीवनात तर बदल होईलच. सोबतच सामाजिक स्थिती सुधारण्यास मदत होणार असल्याचे हिरामन यांनी सांगितले. (प्रतिनिधी)