शहरं
Join us  
Trending Stories
1
'अमेरिकेसोबत काही मुद्दे सोडवायला हवेत', ट्रेड डील आणि टॅरिफबाबत जयशंकर यांचे मोठे विधान
2
नेपाळमध्ये हाहाकार... मुसळधार पावसाचा कहर! आतापर्यंत 51 जणांचा मृत्यू; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केलं दुःख, म्हणाले - भारत...!
3
Muneeba Ali Controversial Run Out : हुज्जत घालून पाक क्रिकेटच्या इज्जतीचा फालुदा; असं काय घडलं?
4
हिमालयात दार्जिलिंगपासून माऊंट एव्हरेस्टपर्यंत विध्वंस, ६० हून अधिक मृत्यू, कारण काय?
5
IND vs AUS : ३०० पारच्या लढाईत अभिषेक-तिलकनं तलवार केली म्यान; वादळी शतकासह प्रभसिमरन सिंगची हवा
6
'जेव्हा शिंदे CM आणि फडणवीस DCM होते तेव्हा...!', अमित शाह यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
7
प्रवाशांनी भरलेली विरार ते पालघर रो-रो बोट जेट्टीवर अडकली; हायड्रॉलिक पाईप तुटल्याने मनस्ताप
8
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
9
’अमित शाह महाराष्ट्रात आले पण नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत शब्दही बोलले नाहीत’, काँग्रेसची टीका   
10
Irani Cup 2025: नागपूरच्या मैदानात फुल्ल राडा! यश धुलला तंबूत धाडल्यावर ठाकूर त्याच्या अंगावर धावला (VIDEO)
11
ऑटो कंपनीची 'कमाल', गुंतवणूकदारांना केलं मालामाल...! 1 वर्षात पैसा डबल; सोमवारी दिसणार चमत्कार?
12
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
13
जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
14
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
15
एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 
16
सयाजी शिंदेंचा मोठा निर्णय, 'सखाराम बाईंडर'च्या १० प्रयोगांचे मानधन पूरग्रस्त शेतकऱ्यांना देणार
17
“धर्म-भाषा काहीही असो, आपण सर्व हिंदू आहोत; ब्रिटिशांनी आपल्यात फूट पाडली”- मोहन भागवत
18
"...तोपर्यंत मी तुरुंगात राहण्यास तयार आहे"; सोनम वांगचुक यांनी जोधपूरहून भावाकडे पाठवला मेसेज
19
INDW vs PAKW: अचानक मैदानात पसरला पांढरा धूर: भारत-पाक सामन्यात नेमकं काय घडलं?
20
IND W vs PAK W : पुरुष असो वा महिला, नो हँडशेक फॉर्म्युला! हरमनप्रीतनं पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ

शेतीला सौरपंपांचा आधार

By admin | Updated: October 7, 2016 01:57 IST

विविध घटकाच्या कल्याणासोबतच सर्वांगिण विकासाच्या दृष्टीने शासन विविध योजनांची अंमलबजावणी करीत आहे

सितेपालात यशस्वी प्रयोग : आर्थिक जीवनासह सामाजिक स्थितीत सुधारणागोंदिया : विविध घटकाच्या कल्याणासोबतच सर्वांगिण विकासाच्या दृष्टीने शासन विविध योजनांची अंमलबजावणी करीत आहे. वैयक्तिक व सामूहिक लाभाच्या विविध योजनांच्या लाभातून व्यक्तीचे कौटुंबिक जीवनमान उंचवून दरडोई उत्पन्न वाढविण्यासोबतच सामूहिक विकासही करण्यात येत आहे. सालेकसा तालुक्यातील सितेपाला येथील हिरामन जिंदाकुर या अल्पभूधारक शेतकऱ्याने शासनाच्या सौर कृषिपंप योजनेचा लाभ घेवून शेतीला सिंचनाखाली आणले व उत्पादनात वाढ करून समृध्दीचा मार्ग शोधला आहे.सालेकसा हा राज्याच्या टोकावर असलेला गोंदिया जिल्ह्यातील तालुका. दुर्गम, मागास, आदिवासीबहुल आणि नक्षलदृट्या संवेदनशील तालुका म्हणून ओळखला जातो. मागास व दुर्गम भागातील नागरिकांचे व शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी शासन प्रयत्नशील असून त्यामधून त्यांचा मानव विकास निर्देशांक वाढविण्यास मदत होत आहे. सितेपाला येथील हिरामन जिंदाकुर हे अल्पभूधारक शेतकरी. जेमतेम तीन एकर शेतीवर कुटुंबाचा उदरिनर्वाह चालवितात. जिंदाकुर हे अनुसूचित जाती प्रवर्गात येत असल्यामुळे १९९५ या वर्षात त्यांनी विशेष घटक योजनेच्या लाभातून सिंचनासाठी विहीर तयार केली. पावसाच्या पाण्यावर पूर्वी अवलंबून राहून हिरामन धानपीक घेत असायचे. शेतात विहीर झाल्यामुळे त्यांनी कृषिपंप जोडणीसाठी वीज वितरण कंपनीकडे रितसर तेव्हाच अर्ज केला होता. परंतु त्यांच्या विहिरीच्या शेतापर्यंत वीज पुरवठा करणे हे वीज वितरण कंपनीला आर्थिकदृष्ट्या परवडणारे नव्हते. यासाठी त्यांच्या शेतापर्यंत वीज वितरण कंपनीला २५ विजेचे खांब उभे करावयाचे होते. त्यामुळे त्यांच्या शेतातील विहिरीला कृषिपंपाची जोडणी देणे शक्य झाले नाही.हिरामन यांचा मोठा मुलगा गजानन याने सालेकसा येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून इलेक्ट्रीशियनचा डिप्लोमा घेतल्यामुळे सालेकसा येथील वीज वितरण कंपनीच्या उपकेंद्रात वायरमन अप्रेंटीशीप करीत होता. या कार्यालयातच काम करीत असल्यामुळे वीज वितरण कंपनीच्या सौर कृषिपंप योजनेची माहिती गजाननला झाली. जवळपास २० वर्षापेक्षा जास्त कालावधी शेतात विहीर तयार करण्यास झाला. परंतु वीज पुरवठा शेतीला नसल्यामुळे डिझेल इंजीनचा शेतीला सिंचनासाठी वापर ते करीत होते. सौर कृषिपंप योजनेची माहिती गजाननने आपल्या वडिलांना दिली. त्यामुळे शेतातील विहिरीवर सौर कृषिपंप बसविण्याचा निर्णय हिरामनने घेतला.तीन एकर शेतीतील विहिरीवर ३ एचपी सौर कृषिपंप बसविण्यासाठी त्यांनी ४ मार्च २०१६ रोजी लाभार्थ्याचा हिस्सा म्हणून २० हजार २५० रु पयांची डिमांड वीज वितरण कंपनीच्या सालेकसा येथील कार्यालयात भरली. केंद्र शासनाने या सौर कृषिपंपासाठी चार लाख ५ हजार रु पये किंमत निश्चित केली आहे. यामध्ये लाभार्थ्याचा ५ टक्के हिस्सा २० हजार ५०० रूपये, १ लाख २१ हजार ५०० रूपये ३० टक्के केंद्र सरकारचे अनुदान. राज्य शासनाचा ५ टक्के हिस्सा म्हणजे २० हजार ५०० रु पये आणि ६० टक्के म्हणजे २ लाख ४३ हजार रु पये कर्ज उचलून वीज वितरण कंपनी लाभार्थ्याला देणार आहे.सौर कृषिपंप योजनेतून मे २०१६ मध्ये सौर कृषिपंप हिरामनच्या शेतातील विहिरीवर बसविण्यात आले आहे. सौर कृषिपंपामुळे खरीप हंगामात धानाला पाणी देता आले. कधी कधी एका पाण्याच्या कमतरतेमुळे उत्पादनात घट होत होती. आता मात्र उत्पादनात कधीच घट येणार नाही. विहिरीवर लावण्यात आलेल्या सौर कृषिपंपामुळे उलट वाढ होणार असून रबी हंगामातदेखील धानासोबतच भाजीपाला पिके व उन्हाळी धानपीक घेण्याचा विचार असल्याचे त्यांनी सांगितले. जलयुक्त शिवार अभियानाचेही महत्व हिरामनला कळले असून भविष्यात शेती ठिबक सिंचनाखाली आणण्याचा विचार आहे. त्यामुळे पाण्याची नासाडी होणार नाही आणि आवश्यक तेवढेच पाणी थेट पिकाला देता येईल.पूर्वी शेतात विहीर नव्हती. विहीर तयार करण्याचे स्वप्न विशेष घटक योजनेतून पूर्ण झाले. शेतातील विहिरीपर्यंत कृषिपंपाला वीज जोडणी करणे हे वीज वितरण कंपनीला आर्थिकदृष्ट्या परवडणारे नव्हते. मात्र राज्य सरकारने दुर्गम व मागास भागातील शेतकऱ्यांच्या कृषिपंपाला वीज जोडणी न देता थेट सौर कृषिपंप देवून अशा शेतकऱ्यांच्या जीवनात बदल घडवून आणण्यासाठी केलेल्या प्रयत्नाला यश आले आहे. वीज वितरण कंपनीने आपल्याला सिंचनाची सुविधा उपलब्ध व्हावी ही इच्छा सौर कृषिपंप देवून पूर्ण केल्यामुळे आता माझ्या आर्थिक जीवनात तर बदल होईलच. सोबतच सामाजिक स्थिती सुधारण्यास मदत होणार असल्याचे हिरामन यांनी सांगितले. (प्रतिनिधी)