शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीयांनी घाम गाळून ज्या वस्तू बनवल्या, त्याच तुम्ही खरेदी करा; व्यापाऱ्यांनीही पुढाकार घ्यावा; पंतप्रधान मोदींचं आवाहन
2
'अटके'वरून शाब्दिक युद्ध रंगलं; "...तर अटक करून दाखवाच"; राज ठाकरे यांचं मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान!
3
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
4
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
5
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल
6
मिठी नदीच्या सफाई कामात झालेल्या कथित घोटाळ्याप्रकरणी ईडीचे आठ ठिकाणी छापे 
7
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
8
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
9
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
10
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
11
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
12
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
13
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
14
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
15
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
16
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
17
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
18
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
19
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
20
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी

आदर्श गावाच्या संकल्पनेला लोकचळवळीचा आधार

By admin | Updated: February 14, 2017 01:07 IST

महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेतून गावाचा सर्वांगीण विकास करायचा असल्याने शासनाच्या या मोहिमेला लोकचळवळ प्राप्त झाली.

वाचनालयांना मदत : अल्प पर्जन्यमान असलेल्या भागात लावली झाडेगोंदिया : महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेतून गावाचा सर्वांगीण विकास करायचा असल्याने शासनाच्या या मोहिमेला लोकचळवळ प्राप्त झाली. गावाच्या विकासासाठी असलेली शांततेतून समृध्दीकडे जाणाऱ्या योजनेतून गावात आमूलाग्र परिवर्तन घडविण्यात आले.तंटामुक्त गावांना मिळालेल्या पुरस्काराच्या रकमेतून गावाच्या परिक्षेत्रात गायरान व सरकारी जमिनीवर , पिंपळ, वड, उंबर, चिंच, लिंब, पिंपरी, जांभूळ, आंबा, कवठ, साग अशी दिर्घायूषी व अल्प पर्जन्यमान असलेल्या भागातही वाढणाऱ्या झाडांची लागवड करून त्यांचे संगोपन करण्यात येत आहे. गावाच्या परिक्षेत्रातील पर्यावरण रक्षण/सरंक्षण, जलस्त्रोतांचे सरंक्षण, शुध्दीकरण व अभिवर्धन करणे, गावासाठी पाणी पुरवठा करणाऱ्या विहिरी, गावतळी यातील गाळ उपसून जलसाठ्यात अभिवृध्दी केली.गावातील रस्त्यावर सौरउर्जेच्या माध्यमातून प्रकाश व्यवस्था केली. गावातील सर्व पशूधनाचे लसीकरण, आरोग्य तपासणी व रोगप्रतिबंधक उपाययोजना करणे, गावातील जैववैविधतेनुसार वेगवेगळया अन्नधान्याच्या बी-बियाणांची निर्मिती, वाणांचे जतन व संवर्धन, गावाच्या प्राकृतिक सौदर्याचे जतन व संवर्धन करणे, गावाच्या परिक्षेत्रातून जाणाऱ्या ओढे, नदीपात्राचे अतिक्रमण हटवून ओढे, नदीचे शुध्दीकरण करणे, गावातील सर्व नागरिकांचे आरोग्य तपासणी शिबीर घेणे, गावात स्थापित ग्राम सुरक्षा दलासाठी गणवेश पुरविणे, गावातील शाळेतील वाचनालयासाठी ५ हजार रूपयापर्यंतचे संदर्भग्रंथ/पुस्तके देणे, जलविकास व्यवस्था, कचराकुंड्या, सार्वजनिक शौचालये, शाळा खोल्या, प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामपंचायत इमारती,चावड्या यांच्या देखभाल व दुरूस्तीवर खर्च करण्यात आला. ग्रामसभेने घेतलेल्या निर्णयानुसार अमलबजावणी करण्याची आणि ग्रामसभेच्या निर्णयानुसार खर्च करून त्यांचे हिशेब ठेवणे व ग्रामसभेला अहवाल सादर करणे आणि सबंधित शासकीय यंत्रणाना याबाबत आवश्यक ती माहिती पुरविण्याची जबाबदारी ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकामार्फत तंटामुक्त गाव समितीची आहे.(तालुका प्रतिनिधी)अंकेक्षण अहवाल गेलाच नाहीतंटामुक्त मोहीमेतून मिळालेल्या पुरस्कार रकमेचा खर्च शासनाच्या नियोजन पत्रीकेनुसार करण्याच्या सूचना शासनाने दिल्या होत्या. त्या खर्चाचे तंतोतंत पालन ग्रामपंचायतीकडून करण्यात येते किंवा नाही याची कालबध्द तपासणी सबंधित तहसिलदार, गट विकास अधिकारी, सबंधित पोलीस ठाण्याचे पोलीस प्रमुख आणि पुरस्कार रकमेचा विहित सूचनांनुसार विनियोग होईल याबाबत सबंधित तालुका समिती नियंत्रण ठेवील, असे शासनाने सूचविले होते. परंतु या समित्यांनी पुरस्कार रकमेच्या विनियोगाकडे दुर्लक्ष केल्यामुळे योग्य कामावर पुरस्कारचे पैसे खर्च झाले का याचा अहवाल अद्याप शासनाला गेलाच नाही.