शहरं
Join us  
Trending Stories
1
Cheteshwar Pujara: भारतीय क्रिकेटमधील मोठी 'इनिंग' संपली; 'मिस्टर डिपेंडेबल' आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त!
2
युक्रेनमध्ये हाहाकार, रशियानं 143 ठिकाणांवर केली  बॉम्बिंग; डोनेत्स्कमध्ये दोन गावांवर कब्जा!
3
"हुंड्यात स्कॉर्पिओ, बुलेट दिली तरी माझ्या मुलीची हत्या, आरोपींच्या घरावर बुलडोझर चालवा अन्यथा..."
4
एआयची कमाल, 25 वर्षांनंतर परतला महिलेचा आवाज...! कसा घडला हा चमत्कार? जाणून थक्क व्हाल!
5
लग्नाला ८ वर्षं होऊनही मुलबाळ नाही, तांत्रिक महिलेला म्हणाला तंत्रमंत्राने गर्भधारणा करतो, त्यानंतर...
6
फलकावरुन झालेल्या वादातून दगडफेक; कोल्हापुरात दोन्ही गटांतील ४०० जणांवर दंगलीचा गुन्हा, लाखोंचे नुकसान
7
राहुल द्रविडनंतर तोच! चेतेश्वर पुजाराच्या टॉप-५ रेकॉर्ड ब्रेक इनिंग
8
Mahindra च्या नवीन SUV ला ग्राहकांचा प्रचंड प्रतिसाद; फक्त अडीच मिनिटांत बुक झाला स्टॉक
9
अरे देवा! मृताच्या कुटुंबाला ६ लाखांची मदत जाहीर; ६ महिला म्हणतात, "मीच यांची खरी बायको..."
10
"वारकरी संप्रदायाची थट्टा चालविली... ऐका सुप्रिया ताई...!"; संत तुकाराम महाराजांचा अभंग सांगत भाजपचा हल्लाबोल
11
'अमेरिका रशियन तेल खरेदीची परवानगी देतो; हा ढोंगीपणा...' भारतीय कंपन्यांनी केली पोलखोल
12
हृदयद्रावक! पुरामुळे आयुष्य उद्ध्वस्त... घरं, दुकानं गेली वाहून; अन्नाचा, औषधांचा मोठा तुटवडा
13
दे दणादण! मेट्रोमध्ये एकमेकींच्या झिंज्या उपटल्या तरी गप्प नाही बसल्या, Video तुफान व्हायरल
14
बँक एफडीपेक्षा जास्त व्याज! पोस्ट ऑफिसची या योजनेत १ लाख रुपयांवर मिळेल २३,५०८ रुपयांचा नफा
15
येस बँकेच्या भागधारकांसाठी मोठी बातमी! जपानी बँक २५% पर्यंत हिस्सा खरेदी करणार, काय होणार बदल?
16
"पप्पांनी टॉप मॉडेल स्कॉर्पिओ दिली, तरी निक्कीला जाळलं..."; बहिणीचा धक्कादायक खुलासा
17
'राहुल गांधी बोलायला लागले की त्यांचे खासदार घाबरतात कारण...'; किरेन रिजिजूंची विरोधी पक्षावर जोरदार टीका
18
Bigg Boss 19: 'बिग बॉस १९'च्या ग्रँड प्रीमिअरला काही तास शिल्लक, शो कधी-कुठे पाहता येईल?
19
कधी करावी गणेश स्थापना, ज्येष्ठा गौरींचे पूजन कधी? जाणून घ्या मुहुर्त आणि इतर माहिती
20
ठरलं तर! बॉलिवूडमधील 'या' प्रसिद्ध गायकाची Bigg Boss 19 मध्ये एन्ट्री, वडिलांच्या कमेंटने वेधलं लक्ष

रेल्वे स्थानकालाही पुजारीटोलाचा आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2019 22:40 IST

येथील रेल्वे स्थानक आणि रेल्वे कर्मचाऱ्यांच्या वसाहतीमध्ये मागील आठ दहा दिवसांपासून पाणी टंचाईची समस्या निर्माण झाली होती. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या वसाहतीला दिवसातून एकच वेळ पाणी पुरवठा केला जात होता. रेल्वे स्थानकाला सुध्दा पाणी टंचाईची झळ बसली होती.

ठळक मुद्दे१०० दलघमी पाणी सोडले । बाघ नदीचे पात्र कोरडे पडल्याने समस्या

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : गोंदिया : येथील रेल्वे स्थानक आणि रेल्वे कर्मचाऱ्यांच्या वसाहतीमध्ये मागील आठ दहा दिवसांपासून पाणी टंचाईची समस्या निर्माण झाली होती. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या वसाहतीला दिवसातून एकच वेळ पाणी पुरवठा केला जात होता. रेल्वे स्थानकाला सुध्दा पाणी टंचाईची झळ बसली होती. यावर मात करण्यासाठी बाघ सिंचन प्रकल्पाने रेल्वे प्रशासनाच्या मागणीवरुन पुजारीटोला धरणाचे १०० दलघमी पाणी बाघ नदीच्या पात्रात शुक्रवारी (दि.२४) सोडले. त्यामुळे काही दिवस तरी पाणी टंचाईला तोंड द्यावे लागणार नाही.गोंदिया रेल्वे स्थानक आणि रेल्वे कर्मचारी वसाहतीला बिरसोली येथील बाघ नदीच्या पात्रात उभारण्यात आलेल्या पाणी पुरवठा योजनेतंर्गत पाणी पुरवठा केला जातो. मात्र यंदा बाघ नदीचे पात्र एप्रिल महिन्यातच पूर्णपणे कोरडे पडले. परिणामी रेल्वे स्थानक आणि कर्मचारी वसाहतीत पाणी टंचाईची समस्या निर्माण झाली होती. बाघ नदीत उभारण्यात आलेल्या पाणी पुरवठा विभागाच्या विहिरीने तळ गाठल्याने चार दिवस पुरेल ऐवढाच पाणी साठा शिल्लक होता. ही समस्या ओळखत दक्षिण पूर्व मध्य रेल्वे पाणी पुरवठा विभागाचे अभियंता मल्लिकाअर्जुन राव यांनी जिल्हाधिकारी आणि बाघ सिंचन प्रकल्पाला पत्र लिहून बाघ नदीच्या पात्रात पुजारीटोला धरणाचे पाणी सोडण्याची मागणी केली. त्यानंतर बाघ सिंचन प्रकल्प विभागाने बुधवारी (दि.२२) पुजारीटोला धरणाचे पाणी सोडले. मात्र हे पाणी रविवारी (दि.२५) सायंकाळपर्यंत बाघ नदीच्या पात्रात पोहचणार असल्याची माहिती संबधित विभागाच्या अधिकाºयांनी सांगितले. जिल्हा प्रशासनाने केवळ १०० दलघमी पाणी सोडण्याचे आदेश दिले आहेत. मात्र गरजेच्या तुलनेत सोडण्यात आलेले पाणी फार कमी असून पुन्हा पाणी सोडावे लागणार असल्याची माहिती आहे.देवरी तालुक्यातील ग्रामीण भागात तीव्र पाणी टंचाईची समस्या निर्माण झाली आहे. यावर मात करण्यासाठी सिरपूरबांध जलाशयाचे पाणी सोडण्याची मागणी गावकºयांनी जिल्हाधिकाºयांना केली होती. त्याचीच दखल घेत सिरपूर जलाशयातून पाणी सोडण्यात आले. यासाठी या जलाशयाचे दोन गेट उघडण्यात आले होते. जवळपास २७० दलघमी मिटर पाणी या जलाशयातून सोडण्यात आले. त्यानंतर शुक्रवारी सकाळी जलाशयाचे दोन्ही गेट बंद करण्यात आले.गरज भासल्यास पुन्हा सोडणार पाणीमागील वर्षी जिल्ह्यात कमी प्रमाणात पाऊस झाल्याने अनेक सिंचन प्रकल्पात मोजकाच पाणी साठा आहे. त्यामुळे केवळ इटियाडोह प्रकल्पाचे पाणी रब्बी हंगामासाठी सोडण्यात आले. विशेष म्हणजे सिंचन प्रकल्पातून पाणी सोडण्याची अंतीम मुदत ही २० मे पर्यंत असते. मात्र यंदा पाणी टंचाईची समस्या निर्माण झाल्याने प्रकल्पातील पाणी सोडण्यात आले होते. पाणी सोडण्याची मुदत संपली असली तरी गरज भासल्यास पुन्हा पाणी सोडण्यात येईल असे संबंधित विभागाच्या अधिकाºयांनी सांगितले.

टॅग्स :water shortageपाणीटंचाई