शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुतीत एकनाथ शिंदेंची कोंडी; मुंबईत भाजपानं शिंदेसेनेला केवळ ५२ जागांचा दिला प्रस्ताव?
2
अमेरिकेत पॅलेस्टिनींसह इतर ७ देशांवर प्रवास बंदी; डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय
3
'१२ लाख सैनिकांची गरज काय? त्यांना दुसरे काम लावा'; पृथ्वीराज चव्हाण यांनी स्पष्टच सांगितलं
4
आई मंदिराबाहेर फुले विकायची...! आयपीएलने मुलाला बनविले 'करोडपती', वडील मैदानावर...
5
LIC ची कोणत्या कंपनीत किती गुंतवणूक? सरकारनं दिली महत्त्वाची माहिती; टाटा, रिलायन्स, अदानीसह कोणत्या कंपन्या?
6
अंबरनाथमध्ये भाजपाचे उमेदवार पवन वाळेकर यांच्या कार्यालयावर गोळीबार; घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद
7
मुंबई-दिल्ली एक्स्प्रेसवेवर भीषण अपघात! धडक होताच उडाला भडका, तीन जणांचा आगीत झाला कोळसा
8
कॅरेबियन समुद्रात अमेरिकन युद्धनौकांनी 'या' देशाला घेरले; ट्रम्प यांनी दिला थेट युद्धाचा इशारा
9
'बिग बॉस मराठी ६'मध्ये दिसणार गौतमी पाटील? म्हणाली, "शो खूप छान आहे पण..."
10
ब्रिटनमध्ये 'नो एन्ट्री' : व्हिसाचे नियम कडक; ६७ टक्क्यांची मोठी कपात, आयटी, हेल्थ प्रोफेशनल्सना मोठा झटका!
11
प्रदूषणावरून संसदेत राजकीय 'युद्धबंदी'! जगातील सर्वाधिक प्रदूषित शहरांमध्ये भारताचा वरचा क्रमांक
12
'धुरंधर'च्या यशात अक्षय खन्ना कुठे गायब? अलिबागच्या घराची केली वास्तुशांती; व्हिडीओ व्हायरल
13
अग्निवीर आणि अन्य जवान यांच्यामध्ये भेदभाव का होतो?; मुंबई उच्च न्यायालयात याचिका; केंद्र सरकारला हायकोर्टाची नोटीस
14
ठाकरे बंधू जाहीरनामा, युती एकाच दिवशी जाहीर करणार? शिवाजी पार्क येथे प्रचाराची सांगता सभाही एकत्रित..?
15
१५ दिवसांत १४ हत्या, १७ अल्पवयीन आरोपींचा समावेश; राजधानी दिल्ली वाढत्या गुन्हेगारीनं हादरली
16
दोस्ती कुणाची? कुस्ती कुणाशी? महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीचा बिगुल
17
कोवळ्या वयात मित्राला संपवण्याची मानसिकता येते कुठून? मुलांच्या मानसिक आरोग्यावर तातडीने लक्ष देण्याची गरज
18
आजचे राशीभविष्य, १७ डिसेंबर २०२५: चांगली बातमी मिळेल,शक्यतो आज वाद टाळावेत
19
ममता बॅनर्जी यांच्या मतदारसंघातून तब्बल ४५ हजार मतदार हटवले; सत्ताधारी TMC राबवणार मोहीम
20
मुंबईत दोन मोठे विमानतळ, मात्र स्टेट हँगरच नाही; सरकारलाही भाड्याने घ्यावे लागते हँगर!
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वे स्थानकालाही पुजारीटोलाचा आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2019 22:40 IST

येथील रेल्वे स्थानक आणि रेल्वे कर्मचाऱ्यांच्या वसाहतीमध्ये मागील आठ दहा दिवसांपासून पाणी टंचाईची समस्या निर्माण झाली होती. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या वसाहतीला दिवसातून एकच वेळ पाणी पुरवठा केला जात होता. रेल्वे स्थानकाला सुध्दा पाणी टंचाईची झळ बसली होती.

ठळक मुद्दे१०० दलघमी पाणी सोडले । बाघ नदीचे पात्र कोरडे पडल्याने समस्या

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : गोंदिया : येथील रेल्वे स्थानक आणि रेल्वे कर्मचाऱ्यांच्या वसाहतीमध्ये मागील आठ दहा दिवसांपासून पाणी टंचाईची समस्या निर्माण झाली होती. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या वसाहतीला दिवसातून एकच वेळ पाणी पुरवठा केला जात होता. रेल्वे स्थानकाला सुध्दा पाणी टंचाईची झळ बसली होती. यावर मात करण्यासाठी बाघ सिंचन प्रकल्पाने रेल्वे प्रशासनाच्या मागणीवरुन पुजारीटोला धरणाचे १०० दलघमी पाणी बाघ नदीच्या पात्रात शुक्रवारी (दि.२४) सोडले. त्यामुळे काही दिवस तरी पाणी टंचाईला तोंड द्यावे लागणार नाही.गोंदिया रेल्वे स्थानक आणि रेल्वे कर्मचारी वसाहतीला बिरसोली येथील बाघ नदीच्या पात्रात उभारण्यात आलेल्या पाणी पुरवठा योजनेतंर्गत पाणी पुरवठा केला जातो. मात्र यंदा बाघ नदीचे पात्र एप्रिल महिन्यातच पूर्णपणे कोरडे पडले. परिणामी रेल्वे स्थानक आणि कर्मचारी वसाहतीत पाणी टंचाईची समस्या निर्माण झाली होती. बाघ नदीत उभारण्यात आलेल्या पाणी पुरवठा विभागाच्या विहिरीने तळ गाठल्याने चार दिवस पुरेल ऐवढाच पाणी साठा शिल्लक होता. ही समस्या ओळखत दक्षिण पूर्व मध्य रेल्वे पाणी पुरवठा विभागाचे अभियंता मल्लिकाअर्जुन राव यांनी जिल्हाधिकारी आणि बाघ सिंचन प्रकल्पाला पत्र लिहून बाघ नदीच्या पात्रात पुजारीटोला धरणाचे पाणी सोडण्याची मागणी केली. त्यानंतर बाघ सिंचन प्रकल्प विभागाने बुधवारी (दि.२२) पुजारीटोला धरणाचे पाणी सोडले. मात्र हे पाणी रविवारी (दि.२५) सायंकाळपर्यंत बाघ नदीच्या पात्रात पोहचणार असल्याची माहिती संबधित विभागाच्या अधिकाºयांनी सांगितले. जिल्हा प्रशासनाने केवळ १०० दलघमी पाणी सोडण्याचे आदेश दिले आहेत. मात्र गरजेच्या तुलनेत सोडण्यात आलेले पाणी फार कमी असून पुन्हा पाणी सोडावे लागणार असल्याची माहिती आहे.देवरी तालुक्यातील ग्रामीण भागात तीव्र पाणी टंचाईची समस्या निर्माण झाली आहे. यावर मात करण्यासाठी सिरपूरबांध जलाशयाचे पाणी सोडण्याची मागणी गावकºयांनी जिल्हाधिकाºयांना केली होती. त्याचीच दखल घेत सिरपूर जलाशयातून पाणी सोडण्यात आले. यासाठी या जलाशयाचे दोन गेट उघडण्यात आले होते. जवळपास २७० दलघमी मिटर पाणी या जलाशयातून सोडण्यात आले. त्यानंतर शुक्रवारी सकाळी जलाशयाचे दोन्ही गेट बंद करण्यात आले.गरज भासल्यास पुन्हा सोडणार पाणीमागील वर्षी जिल्ह्यात कमी प्रमाणात पाऊस झाल्याने अनेक सिंचन प्रकल्पात मोजकाच पाणी साठा आहे. त्यामुळे केवळ इटियाडोह प्रकल्पाचे पाणी रब्बी हंगामासाठी सोडण्यात आले. विशेष म्हणजे सिंचन प्रकल्पातून पाणी सोडण्याची अंतीम मुदत ही २० मे पर्यंत असते. मात्र यंदा पाणी टंचाईची समस्या निर्माण झाल्याने प्रकल्पातील पाणी सोडण्यात आले होते. पाणी सोडण्याची मुदत संपली असली तरी गरज भासल्यास पुन्हा पाणी सोडण्यात येईल असे संबंधित विभागाच्या अधिकाºयांनी सांगितले.

टॅग्स :water shortageपाणीटंचाई