शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
4
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
5
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
6
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
7
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
8
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
9
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
10
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
11
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
12
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
13
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
14
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
15
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
16
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
17
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
18
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
19
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
20
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
Daily Top 2Weekly Top 5

बनगाव पाणी पुरवठा योजना पुन्हा संकटात

By admin | Updated: January 21, 2017 00:33 IST

आमगाव आणि सालेकसा तालुक्यातील ४८ गावांतील ग्रामीण जनतेला शुद्ध पिण्याचे पाणी पुरवठा करणारी

अत्यल्प वसुली : २३ गावांत उद्भवणार समस्या गोंदिया : आमगाव आणि सालेकसा तालुक्यातील ४८ गावांतील ग्रामीण जनतेला शुद्ध पिण्याचे पाणी पुरवठा करणारी प्रादेशिक पाणी पुरवठा योजना पुन्हा एकदा संकटात आली आहे. पाणीपट्टीच्या अत्यल्प वसुलीमुळे २३ गावातील पाणी पुरवठा १ फेब्रुवारीपासून बंद करण्याचा निर्णय जिल्हा परिषदेच्या ग्रामीण व पाणी पुरवठा विभागाने घेतला आहे. आमगाव तालुक्यातील १९ गावांची पाणीपट्टी वसुली ७० टक्क्यांपेक्षा कमी असून ती पाणीपट्टी वसुली ३२ लाख १० हजार ७६४ रुपये इतकी आहे. बोरकन्हार या ग्राम पंचायतवर १ लाख ६८ हजार ७२० रुपये, बाम्हणी १ लाख २० हजार ३२० रुपये, पदमपूर २ लाख ३० हजार ६४ रुपये, रिसामा ६ लाख ६५ हजार ७० रुपये, बनगाव ३ लाख ५ हजार २२० रुपये, शिवनी १ लाख ६० हजार १२० रुपये, चिरचाळबांध २ लाख ५५ हजार १०० रुपये, खुर्शीपार १ लाख ९८ हजार २८४ रुपये, जवरी १ लाख २ हजार २० रुपये, मानेगांव १ लाख २ हजार २०० रुपये, किकरीपार १ लाख १७ हजार ४६० रुपये, कातुर्ली २ लाख २८ हजार ६७६ रुपये, वंजारीटोला ५५ हजार ५०० रुपये, ननसरी ४८ हजार ४२० रुपये, सरकारटोला ७० हजार ३८० रुपये, घाटटेमनी १ लाख २६ हजार रुपये, पानगाव १ लाख ४० हजार ८२० रुपये, कुंभारटोली ४८ हजार ३२० रुपये, आमगाव ६८ हजार ७० रुपये या तालुक्यातील बिर्सी ७० टक्के, किडंगीपार ७६ टक्के, ठाणा ८० टक्के, सुपलीपार ७१ टक्के, मोहगाव १०५ टक्के आणि फुक्कीमेटा ९० टक्के पाणीपट्टी वसूली झाली आहे. सालेकसा तालुक्यातील चार गावातील ६ लाख ३३ हजार ९७० रुपये पाणीपट्टीची थकबाकी आहे. त्यात साखरीटोला ३ लाख २९ हजार २६० रुपये, कारूटोला १ लाख ४४ हजार ५० रुपये, सातगाव ६२ हजार २०० रुपये, हेटी ९८ हजार ४६० रुपये या गावाचा समावेश है. सालेकसा तालुक्यातील पाणीपट्टी वसूलीचे प्रमाण अत्यल्प असल्याने या गावातील पाणी पुरवठा बंद करण्यात येणार आहे. (तालुका प्रतिनिधी) महिन्याकाठी ७ लाख ५० हजारांचा खर्च सदर पाणी पुरवठा योजना सुरू ठेवण्याकरिता महिन्याकाठी ७ लाख ५० हजार रुपये खर्च येतो. त्यात ३ लाख रूपयाचे वीज देयक, १ लाखाचे रसायन व ३ लाख ५० हजार रुपये मनुष्यबळ खर्च येतो. प्रत्येक गावाची पाणीपट्टी वसूली ७० टक्के होणे आवश्यक आहे. योग्य व सक्षम नियोजनाअभावी २००८ पासून सुरू झालेल्या या योजनेची पाणीपट्टी वसूल झाली नाही. परिणामी ही योजना नेहमीच संकटात येते. ग्राम पंचायत मधील मतांचे राजकारण व ग्राम पंचायत मधील कर्मचारी या वसुलीला कारणीभूत आहेत.