शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
6
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
7
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
8
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
9
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
10
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
11
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
12
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
13
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
14
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
15
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
16
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
17
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
18
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
19
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
20
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा

आज पोळा; उत्सव सर्जा-राजाप्रति कृतज्ञता व्यक्त करणारा सण

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2024 15:38 IST

Gondia : शेतकऱ्यांसाठी त्याच्या सर्वात जास्त विश्वासू सवंगडी म्हणजे त्याच्या घरी असलेले बैल.

विजय मानकर लोकमत न्यूज नेटवर्क सालेकसा : शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून वर्षातील सर्वात महत्त्वाचा सण म्हणजे पोळा. हा सण सर्जा-राजाला समर्पित असून, या सणानिमित्त गावागावांत सामाजिक सलोखा राखण्यासाठी पोषक वातावरण निर्माण होते. पोळ्याच्या सणाला गावातील सर्व जाती-धर्माचे लोक बैलांच्या मिरवणुकीसोबत पोळा भरण्याच्या ठिकाणी एकत्रित होऊन एकमेकांशी भेट घेण्याची परंपरा कायम आहे. या सणानिमित्त गावात सलोखा आणि शांततेचे वातावरण निर्माण होण्यास मदत होते.

कृषी कार्यात हजारो वर्षांपासून जनावरांचा उपयोग फार महत्त्वाच्या ठरलेला आहे. त्यात शेतीची मशागत करण्यासाठी बैलजोडीचा उपयोग सर्वात महत्त्वाचा राहिलेला आहे. शेतीमध्ये आज मोठ्या प्रमाणावर आधुनिक तंत्रज्ञान आणि यंत्राच्या वापर वाढला असला तरी छोट्या शेतकऱ्यांना प्रत्येक बाबतीत यंत्राच्या साह्याने शेती करणे महागात पडत असते. म्हणून आजही गावागावांत पाच एकरपर्यंत शेती असलेले छोटे शेतकरी आपल्या घरी वर्षभर किमान एक बैलजोडी ठेवून त्यांच्या भरवशावर शेती करतात. अशात शेतकऱ्यांसाठी त्याच्या सर्वात जास्त विश्वासू सवंगडी म्हणजे त्याच्या घरी असलेले बैल.

वर्षभर त्या बैलांकडून आपल्या शेतीची कामे करीत असताना वर्षातून एकदा श्रावण महिन्याच्या अमावास्येला येणाऱ्या पोळ्याच्या सणाला एक दिवस बैलांसाठी समर्पित केला जातो. या दिवशी बैलांकडून कोणतेही कामे केली जात नसून त्यांना अंघोळ करून वेगवेगळ्या पद्धतीने सजवून पुरणपोळी खाऊ घालून पूजा केली जाते.

असा साजरा होतो सण पोळ्याचा सण श्रावण महिन्याच्या शेवटी पिठोरी अमावास्येच्या दिवशी येत असून, या दिवशी शेतकरी पहाटे उठून आपल्या बैलांना नदीवर किवा तलावात नेऊन चांगल्या पद्धतीने धुऊन घरी आणतो. या दिवशी बैलांना खांद्यावर किंवा जखमा असलेल्या ठिकाणी हळद आणि तुपाचा लेप लावला जातो. शेतकरी आपल्या जीवलग मित्र असलेल्या बैलांना आपल्या ऐपती- प्रमाणे सजवण्याच्यासाठी बाजारातून वेगवेगळे श्रृंगार साहित्याची खरेदी करून आणतो. बैलांना मारुतीच्या देवळासमोर नेऊन नमन करतो व घरी आणतो. शेतकऱ्याची कारभारीण ओवाळणी करीत बैलांना पुरणपोळी खाऊ घालते. नंतर बैलगडी आपल्या बैलांना गावात घरोघरी नेतो त्याला प्रत्येक घरी बोजारा दिला जातो.

अशी झाली परंपरेची सुरुवात धार्मिक आख्यायिकेनुसार एकदा भगवान शंकरांच्या मनात आले की, त्यांचे प्रिय वाहन नंदी त्यांना नेहमी सुख-दुःखात साथ देत असतात. त्यांची आपण ही एकदा तरी पूजा करावी, ही इच्छा भगवान शंकराने पार्वतीजवळ व्यक्त केली. पार्वतीने होकार दिल्यानंतर भगवान शंकराने श्रावण महिन्याच्या कुशावटी अमावास्येच्या दिवशी नंदीची अंघोळ करून त्याला चांगल्या प्रकारे सजविले आणि माता पार्वतीने तयार केलेल्या पुरणपोळ्या नंदीला खाऊ घातल्या व तो दिवस पूर्ण नंदीसाठी समर्पित केला. तेव्हापासूनच दरवर्षी श्रावण महिन्याच्या कुशावटी अमावास्येच्या दिवशी बैलपोळा साजरा करण्याची परंपरा सुरू करण्यात आली.

टॅग्स :gondiya-acगोंदिया