शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
2
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
3
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
4
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
5
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
6
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 
7
ओढ्याला आलेल्या पाण्यात वाहून गेलेला विद्यार्थी अमान भालदारचा मृत्यू: परिसरात हळहळ 
8
WTC Final 2025 : मार्करम-बावुमा जोमात! गत चॅम्पियन ऑस्ट्रेलिया कोमात!
9
Ahmedabad Plane Crash: विमानाच्या कॅप्टनकडे थोडाथोडका नाही, ८२०० तास उड्डाणाचा अनुभव होता; पण दुर्दैव हे की...
10
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशीचा इंदूरमधील सीक्रेट फ्लॅट अखेर सापडला! कुठे होतं 'हे' लपण्याचं ठिकाण?
11
"मी झोपले होते, अचानक जोरदार स्फोट झाला, डोळे उघडले तेव्हा..."; अकोल्याची ऐश्वर्या कशी बचावली?
12
इराणवरील हल्ल्यानंतर इस्रायलचा मोठा निर्णय! जगभरातील दूतावास बंद केले; आता बदल्याची भीती
13
'जे धाडसी होत होते ते मारले गेले'; ट्रम्प यांनी इराणला धमकी दिली; म्हणाले, "करार करा नाहीतर..."
14
Israel Iran Conflict: इस्रायलच्या हवाई हल्ल्यात मारले गेलेले इराणचे 'ते' सहा अणुशास्त्रज्ञ कोण?
15
इराणच्या अण्वस्त्र ठिकानांवर इस्रायलचा पुन्हा हल्ला, केली तुफान बॉम्बिंग; ट्रम्प यांच्या धमकीनंतर, अ‍ॅक्शन मोडवर नेतन्याहू!
16
विमान अपघातावर डीजीसीएचा मोठा निर्णय! सर्व बोईंग ड्रीमलाइनरची प्रत्येक उड्डाणापूर्वी तपासणी होणार
17
WTC Final : मिचेल स्टार्कनं अर्धशतकासह रचला इतिहास; हेजलवूडच्या साथीनं ५० वर्षांचा विक्रमही मोडला
18
"आदमी खिलौना है" शेवटचं स्टेटस; अहमदाबाद विमान दुर्घटनेत हरियाणातील अंजू शर्मा यांचा दुर्दैवी अंत!
19
जन्मदाताच बनला हैवान! पत्नीशी झालेल्या भांडणाच्या रागात लेकरांवर केला वार, मुलीचा जागीच मृत्यू 
20
ज्याची होती चर्चा, तेच कारण समोर आलं...! राजाला का मारलं? सोनमनं सगळंच सांगून टाकलं; खरा मास्टरमाइंड आला समोर

धान खरेदीच्या मर्यादेने संस्थांची खरेदीकडे पाठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2022 05:00 IST

जिल्हा मार्केटिंग फेडरेशन आणि आदिवासी विकास महामंडळांतर्गत जिल्ह्यात खरीप व रब्बी हंगामात धान खरेदी केली जाते. केंद्र सरकारची एजन्सी म्हणून राज्य सरकार धान खरेदी करीत असते; पण यंदा प्रथमच केंद्र सरकारने रब्बीतील धान खरेदीसाठी मर्यादा ठरवून दिली आहे. महाराष्ट्रातील ९ धान उत्पादक जिल्ह्यांना १३ लाख ७९ क्विंटल धान खरेदीची मर्यादा ठरवून दिली आहे. गोंदिया जिल्ह्यासाठी ४ लाख ७९ हजार क्विंटल धान खरेदीची मर्यादा आखून दिली आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : रब्बी हंगामातील शासकीय धान खरेदीला यंदा केंद्र शासनाने मर्यादा घालून दिल्याने सहकारी संस्था अडचणीत आल्या असून, धान खरेदी करायची कशी, असा प्रश्न त्यांच्यासमोर निर्माण झाला आहे. धान खरेदीसाठी १०७ केंद्रांना मंजुरी मिळाली असली तरी आतापर्यंत केवळ ४ धान खरेदी केंद्र सुरू झाले आहे. धान खरेदीकडे सहकारी संस्थांनी पाठ फिरविल्याचे चित्र आहे. जिल्हा मार्केटिंग फेडरेशन आणि आदिवासी विकास महामंडळांतर्गत जिल्ह्यात खरीप व रब्बी हंगामात धान खरेदी केली जाते. केंद्र सरकारची एजन्सी म्हणून राज्य सरकार धान खरेदी करीत असते; पण यंदा प्रथमच केंद्र सरकारने रब्बीतील धान खरेदीसाठी मर्यादा ठरवून दिली आहे. महाराष्ट्रातील ९ धान उत्पादक जिल्ह्यांना १३ लाख ७९ क्विंटल धान खरेदीची मर्यादा ठरवून दिली आहे. गोंदिया जिल्ह्यासाठी ४ लाख ७९ हजार क्विंटल धान खरेदीची मर्यादा आखून दिली आहे. जिल्ह्यात रब्बी हंगामात ७० हजार हेक्टरवर लागवड करण्यात आली होती. रब्बीसाठी अनुकूल वातावरण मिळाल्याने पीकदेखील भरघोस आले. कृषी विभागाने रब्बीतील धानाची हेक्टरी काढलेली उत्पादकता ४३ क्विंटल आहे. त्यानुसार जवळपास ३० लाख क्विंटल धानाचे उत्पादन होण्याची शक्यता आहे; मात्र शासनाने केवळ ४ लाख ७९ हजार क्विंटल धान खरेदीची परवानगी दिली आहे, तर एकूण १०७ धान खरेदी केंद्राचा विचार करता एका केंद्राला दोन ते अडीच हजार क्विंटल  धान खरेदी करता येणार असून, हे टार्गेट एकाच दिवशी पूर्ण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे केंद्रावर धान विक्रीसाठी येणाऱ्या शेतकऱ्यांना परत पाठवायचे कसे, असा प्रश्न संस्थेसमोर निर्माण झाला आहे. त्यामुळे १०३ धान खरेदी केंद्रांनी धान खरेदीला सुरुवात केलेली नाही. जोपर्यंत धान खरेदीची मर्यादा वाढवून मिळत नाही, तोपर्यंत धान खरेदी न करण्याची भूमिका या संस्थांनी घेतली आहे. त्यामुळेच आतापर्यंत केवळ चार खरेदी केंद्र सुरू झाले असून, या केंद्रांवरून १२४९ क्विंटल धान खरेदी करण्यात आली आहे. तर लाखो क्विंटल धान अजूनही शेतकऱ्यांच्या दारात पडलेले आहे. 

खरिपाची तयारी करायची की धान विकायला जायचे?- खरीप हंगाम तोंडावर असून, यंदा हवामान विभागाने मान्सून लवकर दाखल होण्याचा अंदाज वर्तविला आहे; मात्र रब्बीतील धान घरी तसाच पडला असून, खरेदी केंद्र सुरू न झाल्याने शेतकऱ्यांची कोेंडी झाली आहे. खरिपासाठी खते, बियाणे खरेदीसाठी पैशांची गरज आहे; पण रब्बी धान अद्यापही विकला नसल्याने त्यांची अडचण झाली आहे. धान विक्रीसाठी जायचे की खरिपाची कामे करायची, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर निर्माण झाला आहे. खरेदीला यंदाच मर्यादा का? -  दरवर्षी खरीप आणि रब्बी हंगामात शासकीय धान खरेदी केंद्रावरून खरेदी केली जाते. मग केंद्र सरकारने यंदा कुठल्या आधारावर धान खरेदीला मर्यादा घातली, हे कळण्यास मार्ग नाही. कुरघोडीच्या राजकारणात बळी मात्र शेतकऱ्यांचा जात आहे.

६० हजारावर शेतकऱ्यांनी केली नोंदणी - रब्बी हंगामातील धानाची शासकीय धान खरेदी केंद्रावर विक्री करण्यासाठी शेतकऱ्यांना ऑनलाइन नोंदणी करावी लागते. यांतर्गत जिल्ह्यातील ६० हजारावर शेतकऱ्यांनी आतापर्यंत नोंदणी केली आहे. 

खासगी व्यापाऱ्यांना अच्छे दिन - धान खरेदीच्या मर्यादेचा तिढा अद्यापही सुटलेला नाही. तर खरीप हंगाम तोंडावर असून, शेतकऱ्यांना पैशाची गरज आहे. त्यामुळे अनेक शेतकरी गरजेपोटी प्रति क्विंटल चारशे ते पाचशे रुपये कमी दराने खासगी व्यापाऱ्यांना धानाची विक्री करीत आहे. त्यामुळे खासगी व्यापाऱ्यांना अच्छे दिन आल्याचे चित्र आहे. 

 

टॅग्स :Market Yardमार्केट यार्ड