शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
2
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
3
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
4
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
5
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
6
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
7
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
8
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
9
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
10
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
11
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
12
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
13
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
14
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
15
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
16
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
17
“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले
18
इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का!
19
२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले
20
ठाकरेंना जय महाराष्ट्र, भाजपचा आणखी एक धक्का! लोकसभा लढवणारे संजोग वाघेरेंचा मोठा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

धान खरेदीच्या मर्यादेने संस्थांची खरेदीकडे पाठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2022 05:00 IST

जिल्हा मार्केटिंग फेडरेशन आणि आदिवासी विकास महामंडळांतर्गत जिल्ह्यात खरीप व रब्बी हंगामात धान खरेदी केली जाते. केंद्र सरकारची एजन्सी म्हणून राज्य सरकार धान खरेदी करीत असते; पण यंदा प्रथमच केंद्र सरकारने रब्बीतील धान खरेदीसाठी मर्यादा ठरवून दिली आहे. महाराष्ट्रातील ९ धान उत्पादक जिल्ह्यांना १३ लाख ७९ क्विंटल धान खरेदीची मर्यादा ठरवून दिली आहे. गोंदिया जिल्ह्यासाठी ४ लाख ७९ हजार क्विंटल धान खरेदीची मर्यादा आखून दिली आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : रब्बी हंगामातील शासकीय धान खरेदीला यंदा केंद्र शासनाने मर्यादा घालून दिल्याने सहकारी संस्था अडचणीत आल्या असून, धान खरेदी करायची कशी, असा प्रश्न त्यांच्यासमोर निर्माण झाला आहे. धान खरेदीसाठी १०७ केंद्रांना मंजुरी मिळाली असली तरी आतापर्यंत केवळ ४ धान खरेदी केंद्र सुरू झाले आहे. धान खरेदीकडे सहकारी संस्थांनी पाठ फिरविल्याचे चित्र आहे. जिल्हा मार्केटिंग फेडरेशन आणि आदिवासी विकास महामंडळांतर्गत जिल्ह्यात खरीप व रब्बी हंगामात धान खरेदी केली जाते. केंद्र सरकारची एजन्सी म्हणून राज्य सरकार धान खरेदी करीत असते; पण यंदा प्रथमच केंद्र सरकारने रब्बीतील धान खरेदीसाठी मर्यादा ठरवून दिली आहे. महाराष्ट्रातील ९ धान उत्पादक जिल्ह्यांना १३ लाख ७९ क्विंटल धान खरेदीची मर्यादा ठरवून दिली आहे. गोंदिया जिल्ह्यासाठी ४ लाख ७९ हजार क्विंटल धान खरेदीची मर्यादा आखून दिली आहे. जिल्ह्यात रब्बी हंगामात ७० हजार हेक्टरवर लागवड करण्यात आली होती. रब्बीसाठी अनुकूल वातावरण मिळाल्याने पीकदेखील भरघोस आले. कृषी विभागाने रब्बीतील धानाची हेक्टरी काढलेली उत्पादकता ४३ क्विंटल आहे. त्यानुसार जवळपास ३० लाख क्विंटल धानाचे उत्पादन होण्याची शक्यता आहे; मात्र शासनाने केवळ ४ लाख ७९ हजार क्विंटल धान खरेदीची परवानगी दिली आहे, तर एकूण १०७ धान खरेदी केंद्राचा विचार करता एका केंद्राला दोन ते अडीच हजार क्विंटल  धान खरेदी करता येणार असून, हे टार्गेट एकाच दिवशी पूर्ण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे केंद्रावर धान विक्रीसाठी येणाऱ्या शेतकऱ्यांना परत पाठवायचे कसे, असा प्रश्न संस्थेसमोर निर्माण झाला आहे. त्यामुळे १०३ धान खरेदी केंद्रांनी धान खरेदीला सुरुवात केलेली नाही. जोपर्यंत धान खरेदीची मर्यादा वाढवून मिळत नाही, तोपर्यंत धान खरेदी न करण्याची भूमिका या संस्थांनी घेतली आहे. त्यामुळेच आतापर्यंत केवळ चार खरेदी केंद्र सुरू झाले असून, या केंद्रांवरून १२४९ क्विंटल धान खरेदी करण्यात आली आहे. तर लाखो क्विंटल धान अजूनही शेतकऱ्यांच्या दारात पडलेले आहे. 

खरिपाची तयारी करायची की धान विकायला जायचे?- खरीप हंगाम तोंडावर असून, यंदा हवामान विभागाने मान्सून लवकर दाखल होण्याचा अंदाज वर्तविला आहे; मात्र रब्बीतील धान घरी तसाच पडला असून, खरेदी केंद्र सुरू न झाल्याने शेतकऱ्यांची कोेंडी झाली आहे. खरिपासाठी खते, बियाणे खरेदीसाठी पैशांची गरज आहे; पण रब्बी धान अद्यापही विकला नसल्याने त्यांची अडचण झाली आहे. धान विक्रीसाठी जायचे की खरिपाची कामे करायची, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर निर्माण झाला आहे. खरेदीला यंदाच मर्यादा का? -  दरवर्षी खरीप आणि रब्बी हंगामात शासकीय धान खरेदी केंद्रावरून खरेदी केली जाते. मग केंद्र सरकारने यंदा कुठल्या आधारावर धान खरेदीला मर्यादा घातली, हे कळण्यास मार्ग नाही. कुरघोडीच्या राजकारणात बळी मात्र शेतकऱ्यांचा जात आहे.

६० हजारावर शेतकऱ्यांनी केली नोंदणी - रब्बी हंगामातील धानाची शासकीय धान खरेदी केंद्रावर विक्री करण्यासाठी शेतकऱ्यांना ऑनलाइन नोंदणी करावी लागते. यांतर्गत जिल्ह्यातील ६० हजारावर शेतकऱ्यांनी आतापर्यंत नोंदणी केली आहे. 

खासगी व्यापाऱ्यांना अच्छे दिन - धान खरेदीच्या मर्यादेचा तिढा अद्यापही सुटलेला नाही. तर खरीप हंगाम तोंडावर असून, शेतकऱ्यांना पैशाची गरज आहे. त्यामुळे अनेक शेतकरी गरजेपोटी प्रति क्विंटल चारशे ते पाचशे रुपये कमी दराने खासगी व्यापाऱ्यांना धानाची विक्री करीत आहे. त्यामुळे खासगी व्यापाऱ्यांना अच्छे दिन आल्याचे चित्र आहे. 

 

टॅग्स :Market Yardमार्केट यार्ड