शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

दोघांचे पाच लाख रुपये करणार परत

By admin | Updated: December 27, 2016 02:11 IST

दिड महिन्यापूर्वी विधान परिषदेच्या निवडणुकीदरम्यान निवडणूक यंत्रणेच्या दक्षता व भरारी पथकांनी पाच

विधान परिषद निवडणूक : तिघांच्या ५० लाखांवर निर्णय नाही गोंदिया : दिड महिन्यापूर्वी विधान परिषदेच्या निवडणुकीदरम्यान निवडणूक यंत्रणेच्या दक्षता व भरारी पथकांनी पाच ठिकाणांवरून पकडलेल्या एकूण ५५ लाखांच्या रकमेपैकी ५० लाखांच्या रकमेचा हिशेब अद्याप लागलेला नाही. त्यातील दोन जणांकडून पकडण्यात आलेली जवळपास ५ लाख १० हजारांची रक्कम त्यांना परत करण्याचा निर्णय समितीने घेतला आहे. तिघांच्या रकमेचा तपास अजून पूर्णत्वास गेला नसून ती प्रकरणे पुन्हा समितीकडे ठेवण्यात येणार आहेत. वास्तविक निवडणूक काळात संशयास्पद आर्थिक व्यवहारात जप्त करण्यात आलेल्या रकमेचा तपास आयकर विभागाकडे सोपविल्यानंतर १० दिवसात या प्रकरणाचा सोक्षमोक्ष लावणे गरजेचे आहे. त्यासाठी १० अधिकाऱ्यांची एक समितीही गठीत करण्यात आली आहे. मात्र संबंधित विभागाच्या लेटलतिफ कारभारामुळे तब्बल दिड महिना पूर्ण होत आला तरी तीन प्रकरणे निकाली काढण्यात आलेली नाही. यासंदर्भात आयकर विभागातील अधिकाऱ्यांकडून माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी कोणतीही माहिती देण्यास नकार दिला. १६ नोव्हेंबर रोजी गडचिरोलीच्या जीवन के नाथ यांच्याकडून २ लाख ५ हजार ५०० रूपये जप्त करण्यात आले होते. १७ नोव्हेंबर रोजी जुरीया येथील सतीशकुमार पटेल यांच्या जवळून पाच लाख ७ हजार ५०० रूपये जप्त करण्यात आले. या दोघांना त्यांची रक्कम परत करण्यात येणार आहे. परंतु मध्यप्रदेशातील जबलपूर येथून गोंदियाकडे येत असलेल्या इनोव्हा कारमधून १५ नोव्हेंबर रोजी एक हजार रुपयांच्या नोटांचे २० बंडल (२० लाख रुपये) पियुषकुमार प्रकाशचंद चौबे (४९), रा.वर्धमान नगर, राजनांदगाव (छत्तीसगड), यशवंतकुमार धनीराम जंघेल (२६) रा.चिखली (जि.राजनांदगाव) आणि गाडीचालक संतोष निसार (३३) रा.राजनांदगाव या तिघांकडून जप्त करण्यात आले होते. ओरिसा राज्यातून नागपूरकडे जात असलेल्या टोयोटा फॉर्च्युनर या वाहनातून देवरी सीमेवरील नाक्यावर २५ लाख रुपये कर्नलसिंह ताठे व तजेंद्रसिंह सिद्धू (दोघेही रा.नागपूर) यांच्याकडून जप्त करण्यात आले. एमएच ३१, डीसी ७१५७ या टोयोटा फॉर्च्युन वाहनातून २५ लाख रुपये वाहून नेत होते. तसेच सडक-अर्जुनी येथील अजय लांजेवार यांच्याकडून गोरेगावजवळ १८ नोव्हेंबर रोजी २ लाख ८३ हजार रूपये मिळाले होते. या तिघांची रक्कम आता परत केली जाणार नाही. समितीसमोर हे प्रकरण आहे. यावर पुन्हा विचार केल्यानंतर पुढची कार्यवाही करण्यात येईल, असे निवासी उपजिल्हाधिकारी प्रवीण महिरे यांनी सांगितले.(तालुका प्रतिनिधी)