शहरं
Join us  
Trending Stories
1
नोकरी शोधणाऱ्यांसाठी खुशखबर ! 'या' सरकारी संस्थांमध्ये १०० टक्के पदभरतीस मान्यता
2
डोनाल्ड ट्रम्प यांनी मित्र राष्ट्रांवर टाकला टॅरिफ बॉम्ब; जपान आणि दक्षिण कोरियातल्या वस्तूंवर २५ टक्के कर
3
Video: मान गए माही... MS Dhoni ने क्रिकेट संघटनेच्या कर्मचाऱ्यांसोबत साजरा केला वाढदिवस
4
एकाच कुटुंबातील ५ जणांना जिवंत जाळलं; संपूर्ण गाव शांत पण मुलाने सगळं समोर आणलं
5
"चालक नसल्याने नवीन बससेवा सुरु करता येणार नाही"; परिवहन विभागाच्या पत्रावर राजू शेट्टींचा संताप
6
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
7
भारतीयांचा जगात डंका ! ICCच्या CEO पदी संजोग गुप्ता यांची निवड, ठरले केवळ दुसरे भारतीय
8
OYO हॉटेलमध्ये एका तासासाठी खोली कशासाठी दिली जाते? सरकारने माहिती घेण्याची मुनगंटीवारांची मागणी
9
"डार्लिंग, काम झालं..."; माय-लेकींचं अफेअर, बॉयफ्रेंडसाठी वडिलांचा काढला काटा, झाला पर्दाफाश
10
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
11
Video: "लाज वाटू द्या, गिधाडांनो"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावले, रोहिणी खडसेंचा संताप
12
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
13
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
14
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
15
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
16
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
17
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
18
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
19
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
20
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"

पुरस्कारप्राप्त तंटामुक्त समित्या झाल्या उदासीन

By admin | Updated: May 7, 2015 00:32 IST

महाराष्ट्र शासनाने सन २००७ वर्षापासून महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम हाती घेतली. गावात शांतता राहावी, ...

गोंदिया : महाराष्ट्र शासनाने सन २००७ वर्षापासून महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम हाती घेतली. गावात शांतता राहावी, वादविवाद होणार नाहीत. गावातील कोणतेही वाद न्यायापर्यंत पोहोचणार नाही याची दखल घेऊन गावात समित्या स्थापन केल्या. आता मात्र त्या समित्यांची आगेकूच थांबली असल्याचे चित्र दृष्टीस पडत आहे. या योजनेची उद्दिष्ट्ये सफल करण्यासाठी अनेक गावे या मोहिमेंतर्गत तंटामुक्त झालीत. वर्षानुवर्षे न्यायालयात धुळखात पडलेली प्रकरणे निकाली लागली व गावात चैतन्य निर्माण झाले. या नऊ वर्षाच्या काळात आमूलाग्र बदल घडून आला. मागील चार वर्षातच तंटामुक्त अभियानाच्या बाबतीत गोंदिया जिल्हा महाराष्ट्राच्या नकाशावर चमकू लागला. तंटामुक्त गाव घोषीत करण्यासाठी शासनाने काही अटी व नियम ठेवले होते. त्यामध्ये दारुबंदी, सामूहीक विवाह सोहळा करणे, सर्वधर्म समभाव, धार्मिक सलोखा निर्माण करणारे उपक्रम, महिला सक्षमीकरण, पुतळ्यांची देखरेख व त्यांच्या जयंती उत्सव व पुण्यतिथी, आंतरजातीय विवाह आदी अनेक उपक्रमाचा अंतर्भाव यामध्ये करण्यात आला. पुरस्काराच्या हेतूने काही तंटामुक्त समित्यांनी गावामध्ये विविध उपक्रम राबविले. गावात दारुबंदी व व्यसनमुक्ती करून अनेकांचे उद्ध्वस्त संसार पुन्हा थाटले. पती-पत्नी मधील वाद मिटवून त्यांच्या प्रकरणाला मार्गी लावून त्यांच्या जीवनात नवचैतन्य निर्माण केले. याशिवाय अनेक चांगले उपक्रम राबवून गावाला नंदनवन करणे, याद्वारे गावाला लाखो रुपयाचे बक्षीस मिळाले परंतु आजही अनेक गावाचे हाल जैसे थे असे झाले आहे. अभियानापुर्वी वाहणारा दारुचा महापूर पुन्हा सुरु झाला. आता तर पुरस्कारप्राप्त गावातील तंटामुक्त समितीचे पदाधिकारीच व्यसनाधिन झाल्याचे चित्र दिसत आहेत. एकंदरीत समित्या उद्दिष्टाच्या पलिकडे घसरायला सुरुवात झाली आहे. काही गावात मिळालेल्या पुरस्काराच्या रकमेचे विनियोग करण्यात बऱ्याच आल्या आहेत. या मोहीमेतील वास्तव म्हणजे अनेक गावात केवळ कागदोपत्रीच अनेक उपक्रम राबविण्यात आले. दारुचा महापुर सुरु असताना कागदोपत्रीच दारु मुक्तता झाली. प्रत्यक्ष परिस्थिती वेगळी आणि रेकॉर्ड वेगळा अशी आगळीवेगळी परिस्थिती असतानासुद्धा गावे तंटामुक्त झाली हे केवळ कशासाठी तर पुरस्कारासाठी काही का असेना परंतु काही गावात शांतता निर्माण झाली. गावे दारुमुक्त झाले व आदर्शतेची वाटचाल सुरु झाली. पदाधिकाऱ्यांनी मेहनत घेऊन गाव तंटामुक्त केले मिळालेल्या पुरस्काराकडे अनेकांचे लक्ष लागले आहे. पण त्या समित्याची आगेकुच थांबली असल्याचे दिसत आहेत. (तालुका प्रतिनिधी)