शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपा, शिंदेसेनेत युतीसाठी कोणतीही अडचण नाही; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची स्पष्टोक्ती
2
भररस्त्यात पाठलाग करून मंगेश काळोखेंवर केले २७ वार; आरोपींच्या निर्दयीपणाचे 'सीसीटीव्ही' फुटेज समोर
3
Solapur Municipal Election: काँग्रेसने २० उमेदवारांच्या नावाची केली घोषणा, पहिल्या यादीत कुणाची नावे?
4
खोपोलीतील घटना अत्यंत निंदनीय, निषेध करत सुनिल तटकरे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली मोठी मागणी
5
शिंदेसेनेच्या बैठकीत राडा? शहरप्रमुख नाना भानगिरे रागारागात बाहेर पडले आणि गेले निघून; व्हिडीओ आला समोर
6
बांगलादेशमध्ये एका मिस्ट्री गर्लची एंट्री, बनू शकते भविष्यातील शेख हसीना किंवा खलिदा झिया
7
Sukesh Chandrashekhar : "२१७ कोटी देण्यास तयार, पण...", महाठग सुकेश चंद्रशेखरचा मास्टरस्ट्रोक; खंडणी प्रकरणात मोठी ऑफर
8
AUS vs ENG: डोक्यात निवृत्तीचा विचार, मनात भीती… आणि त्यानेच सामना फिरवला!
9
कौतुकास्पद! आईने दागिने विकून शिकवलं, १० वेळा अपयश आलं पण लेकाने वडिलांचं स्वप्न पूर्ण केलं
10
विराट कोहलीचा VIDEO घेण्यासाठी बस ड्रायव्हरची भन्नाट 'आयडिया', सोशल मीडियावर क्लिप VIRAL
11
राजकारण पेटलं! कर्नाटकमध्ये काँग्रेस सरकारची बुलडोझर कारवाई; ४०० हून अधिक घरं पाडली
12
शाकंभरी नवरात्र २०२५: शाकंभरी मातेच्या कृपेने 'या' राशींचे उजळणार भाग्य; २०२६ ची होणार स्वप्नवत सुरुवात!
13
"भाजपाने आमच्या पाठीत खंजीर खुपसला, मतदारांचाही विश्वासघात करेल"; राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष मुळीक यांचे टीकास्त्र
14
Battle Of Galwan Teaser: मौत से क्या डरना...! 'बॅटल ऑफ गलवान'चा टीझर, 'या' दिवशी सिनेमा रिलीज होणार
15
जिवलग जीवाचा... विराट कोहली!! स्वत:चीच विकेट घेणाऱ्या गोलंदाजाला दिलं एकदम खास 'गिफ्ट'
16
सोन्या-चांदीची भरारी, विदेशींची माघार अन् भारतीयांचा एल्गार! हे वर्ष कोणासाठी ठरलं फायद्याचं
17
जिममध्ये जाणाऱ्यांनो सावधान! १९ वर्षीय विद्यार्थ्याचा प्रोटीन शेक प्यायल्याने मृत्यू; नेमकं काय घडलं?
18
प्रशासनाचा गलथान कारभार! निवडणूक एका ठिकाणी, अधिकाऱ्यांनी प्रक्रिया केली दुसरीकडे; उमेदवाराच्या विजयानंतर शासनाला आली जाग
19
बांगलादेशमध्ये उलटफेर! शेख हसीना यांना विरोध करणारा पक्ष फुटला,जमातमध्ये आश्रय घेतला
20
TATA Steel विरोधात खटला दाखल; १४८ अब्ज रुपयांच्या नुकसान भरपाईची मागणी, प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

न्यायालयाच्या निकालानंतरही शासन निर्णयास टाळाटाळ

By admin | Updated: August 3, 2014 00:10 IST

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयापूर्वी मुंबई उच्च न्यायालयाच्या विविध खंडपीठाने दिलेल्या सात आणि व सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर उच्च न्यायालयाच्या विविध खंडपिठांनी दिलेल्या

सालेकसा : सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयापूर्वी मुंबई उच्च न्यायालयाच्या विविध खंडपीठाने दिलेल्या सात आणि व सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर उच्च न्यायालयाच्या विविध खंडपिठांनी दिलेल्या नऊ निर्णयांची अंमलबजावणी करणारे शासन निर्णय निर्गमित करण्यात आले नाही. याचे अत्यंत समर्पक पुरावे देऊन राष्ट्रपतीनी ३५६ कलमान्वये शासनच बरखास्त करावे, अशी मागणी एमफुक्टोच्या वतीने राष्ट्रपती, गृहमंत्री आणि महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्याकडे केली आहे.उच्च व सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाच्या अंमलबजावणीचा कालावधी निघून गेला तरी शासनाने कोणताही निर्णय घेतला नाही. यामध्ये विधी मंडळात शासनाने दिलेली आश्वासने, शासन व एमफुक्टो याच्यामध्ये वेळोवेळी झालेले मतैक्य पत्र, विद्यापीठ अनुदान आयोगाने दिले निर्देश, उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालयाने दिलेले निर्णय याचा समावेश आहे. शासनाने शिक्षकांप्रती असलेल्या कमालीच्या व्देषभावनेतून केवळ समन्वयाच्या तत्वांनाच हरताळ फासला नसून घटनेतील १२९ आणि २१५ या कलमाचा देखील भंग केला आहे. नेट-सेटमुक्त प्राध्यापकांच्या बाबतीत सर्वोच्च न्यायालयाच्या १८ नोव्हेंबर २०१३ रोजीच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्यास राज्य शासन तयार नाही. यासाठी गोंदिया जिल्हा नुटाने पाठिंबा दिलेला आहे. महाराष्ट्र प्राध्यापक महासंघाने ४ आॅगस्ट २०१४ ला दिल्लीच्या जंतरमंतरवर धरणे कार्यक्रम आयोजित केला आहे. शिक्षकांच्या अनेक मागण्या अनेक वर्षापासून शासनाकडे पडून आहेत. त्यावर कोणतेही निर्णय न घेतलयामुळे परिक्षेवरील असहकार आंदोलन करण्यास शिक्षकांना बाध्य केले. हे संघटनेचे म्हणणे उच्च न्यायालयाने १० मे २०१३ रोजी दिलेल्या निर्णयात मान्य केले आहे. एक व्यथा निवारण समितीची स्थापना करण्याची सूचना उच्च न्यायालयाने केली होती. पण तिची अंमलबजावणी करण्यात आली नाही. प्राध्यापकांप्रती व्देषभावना बाळगून घटनाविरोधी कृती करणारे आणि सतत न्यायालयाच्या अवमान करणाऱ्या सरकारला लवकरात लवकर बरखास्त करावे, अशी मागणी नुटाच्या गोंदिया जिल्हा संघटनेचे सचिव डॉ. दिलीप जेना, डॉ. नामदेव हटवार, डॉ.बी.बी.परशुरामकर, डॉ.ए.एम.गहाने, प्रा. विजय राणे, डॉ.चांडक, डॉ.नंदेश्वर, प्रा. भूषण फुंडे यांनी केली. दिल्ली येथील धरणे आंदोलनात सर्वानी सहभागी होण्याचे आवाहन संघटनेच्या पदाधिकऱ्यांनी केले आहे. (तालुका प्रतिनिधी)