शहरं
Join us  
Trending Stories
1
यावेळी मोठा धमाका करायचा... PM मोदींनी पहलगाम हल्ल्याची बातमी मिळताच मनात आखलेला 'प्लॅन'
2
भारताच्या हल्ल्यात ११ नाही तर अनेक पाकिस्तानी सैनिक ठार; पाक लष्कराने केले मान्य
3
उल्हासनगरात संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त! पत्नी व मुलीची हत्या करून पवन पाहुजा यांनी घेतला गळफास
4
Video - दहशतवाद्याच्या हातात बंदूक, चेहऱ्यावर भीती...; त्राल चकमकीचं ड्रोन फुटेज आलं समोर
5
WTC Finalच्या विजेत्याला मिळणार मोठ्ठी रक्कम, टीम इंडियाही मालामाल, पाकिस्तानला किती बक्षीस?
6
आमिर खान-राजकुमार हिरानी पुन्हा एकत्र, महाराष्ट्राच्या 'या' सुपुत्रावर घेऊन येणार बायोपिक!
7
पाकिस्तानातून गाढवांची खरेदी का करतो भारताचा शेजारी देश? काय आहे चिनी कनेक्शन?
8
इंग्लंड दौऱ्याआधी टीम इंडियाचा कोच गौतम गंभीरने पत्नीसह घेतले सिद्धिविनायकाचे दर्शन
9
सोशल मीडियावर लाईव्ह होती प्रसिद्ध इन्फ्लुएंसर, भेटवस्तू देण्याच्या बहाण्याने आलेल्या इसमाने झाडल्या गोळ्या!
10
Swami Samartha: स्वामी कृपा व्हावी वाटत असेल तर त्यांना नावडणारी 'ही' गोष्ट ताबडतोब सोडा!
11
कहाणी १९६५ च्या युद्धाची! आदमपूर एअरबेसवर कब्जा करण्यासाठी उतरले ५५ पाकिस्तानी कमांडो, १२ ठार तर बाकी...
12
मुकेश अंबानी यांनी घेतली डोनाल्ड ट्रम्प यांची भेट; आखाती देशात किती पसरलाय व्यवसाय?
13
IAS-IPS बनण्याची सूवर्णसंधी; UPSC ने जारी केले परीक्षांचे वेळापत्रक, जाणून घ्या संपूर्ण माहिती...
14
Sensex मध्ये १३०० तर Nifty मध्ये ४०० अंकांपेक्षा अधिक तेजी, काय आहे तेजीमागचं कारण?
15
राजस्थानात पाकिस्तान सीमेपासून १५ किमी दूर कोसळलेला ड्रोन सापडला; बीएसएफकडून चौकशी सुरु
16
समुद्राचे खारट पाणी गोड करता येणार; तटरक्षक दल, डीआरडीओच्या संशोधकांना मोठे यश
17
'पाकिस्तानची अवस्था घाबरलेल्या कुत्र्यासारखी', अमेरिकेतील माजी अधिकाऱ्याने पार इज्ज काढली
18
अवघ्या २३ वर्षांच्या मुलीने लावली पाकिस्तान-बांगलादेशच्या नात्यात आग! राजदूतांना काढावा लागला पळ
19
संकष्ट चतुर्थी २०२५: एकदंत संकष्ट चतुर्थी असणार खास, 'या' राशींची पूर्ण होणार धन-संपत्तीची आस!

महाशिवरात्री यात्रेत भाविकांची गैरसोय टाळावी

By admin | Updated: February 16, 2015 00:05 IST

महाशिवरात्रीनिमित्त प्रतापगड येथील यात्रेत येणाऱ्या भाविकांची गैरसोय टाळावी. त्यासाठी यंत्रणांनी आवश्यक त्या उपाययोजना करुन भाविकांची काळजी घ्यावी, ...

गोंदिया : महाशिवरात्रीनिमित्त प्रतापगड येथील यात्रेत येणाऱ्या भाविकांची गैरसोय टाळावी. त्यासाठी यंत्रणांनी आवश्यक त्या उपाययोजना करुन भाविकांची काळजी घ्यावी, असे निर्देश पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी दिले.अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील प्रतापगड येथे मंगळवारी १७ फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या महाशिवरात्री यात्रा आणि ख्वाजा हारुनी ऊर्सच्या निमित्ताने करण्यात आलेल्या तयारीचा आढावा पालकमंत्री बडोले यांनी सदर बैठकीत घेतला. त्यावेळी ते बोलत होते.सभेला उपविभागीय अधिकारी के.एन.के. राव, माजी आ. दयाराम कापगते, जि.प. अर्थ व बांधकाम समिती सभापती प्रकाश गहाणे, पंचायत समितीचे सभापती तानेश ताराम, उपमुख्य कार्यकारी अधिकारी पुराम, तहसीलदार संतोष महाले, गटविकास अधिकारी कोरडे, प्रतापगडचे सरपंच येशुकला कुंभरे प्रामुख्याने उपस्थित होते.पालकमंत्री पुढे म्हणाले, प्रतापगडच्या यात्रेला जिल्ह्यातून व बाहेर जिल्ह्यातून लाखो भाविक येतात. यात्रेदरम्यान येणाऱ्या भाविकांना शुद्ध व स्वच्छ पाणी उपलब्ध झाले पाहिजे. यासाठी आरोग्य विभागाने विशेष लक्ष द्यावे. त्यामुळे पाण्यापासून होणारे आजार यात्रेदरम्यान टाळण्यास मदत होईल. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने बंद असलेली पाणी पुरवठा योजना यात्रेपूर्वी सुरू करावी अन्यथा संबंधित अधिकाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येईल. यात्रेदरम्यान पाणी पुरवठा योजना सुरू झाल्यास भाविकांची गैरसोय टाळण्यास मदत होईल.पहाडावरील मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याची तातडीने संबंधित विभागाने दुरुस्ती करावी असे सांगून ते म्हणाले, या रस्त्यामुळे मंदिरापर्यंत भाविकांना लवकर पोहोचता येईल. आरोग्य विभागाने पिण्याच्या पाण्यामध्ये ब्लिचिंग पावडर आणि मेडीक्लोर टाकून पाण्याचे निर्जंतुकीकरण करावे. भाविकांच्या आरोग्याबाबत काळजी घ्यावी. अ‍ॅम्बुलन्ससेवा तसेच वैद्यकीय पथके यात्रेदरम्यान सक्रियतेने कार्यरत ठेवावे. स्वाईन फ्ल्यूबाबत विशेष काळजी घेण्याचे निर्देशही पालकमंत्र्यांनी यावेळी दिले.भाविकांना आणणाऱ्या बसेस, चारचाकी वाहने, ट्रॅक्टर तसेच दुचाकी वाहनांची पार्किंग व्यवस्था ज्या ठिकाणी करण्यात येईल त्या ठिकाणी पार्किंगचे बोर्ड लावावे. यात्रेमध्ये लावण्यात येणारी दुकाने व्यवस्थित ठिकाणी लावण्याबाबत संबंधित दुकानदारांना निर्देश द्यावे. तसेच यात्रेदरम्यान परिसर स्वच्छ राहील याची काळजी घ्यावी. ग्रामपंचायत मार्फत मोबाईल शौचालय तसेच महिलांकरिता मूत्रीघरांची व्यवस्था करावी. पहाडावरील मंदिराजवळ सीसीटीव्ही कॅमेरे लावावेत. यात्रेदरम्यान परवानगीशिवाय साऊंड सिस्टिम लावू देवू नये. लाऊडस्पीकरचा आवाज आवाश्यक तेवढ्या डेसीबलमध्ये असावा. त्यामुळे ध्वनीप्रदूषण टाळण्यास मदत होईल. अन्न व औषध प्रशासन विभागाने महाप्रसादाची व भंडाऱ्याची तपासणी करूनच भाविकांना द्यावे. यात्रेदरम्यान दारू पिणाऱ्या व्यक्तींवर पोलीस विभागाने कारवाई करावी. कृषी विभाग, आरोग्य विभाग व समाजकल्याण विभाग यांनी आपल्या विभागाच्या विविध योजनांची माहिती भाविकांना व्हावी यासाठी स्टॉल लावावे. यात्रेदरम्यान वीज पुरवठा खंडित होणार नाही, याकडे वीज वितरण कंपनीने लक्ष द्यावे, असे निर्देश त्यांनी दिले.विविध यंत्रणांनी यात्रेदरम्यान करण्यात येणाऱ्या उपाययोजना व करण्यात येत असलेल्या सोयी सुविधांची माहिती सभेत दिली. सभेला वीज वितरण कंपनीचे अधीक्षक अभियंता फुलकर, जिल्हा आरोग्य अधिकारी हरिश कळमकर, समाजकल्याण सहायक आयुक्त सुरेश पेंदाम, जि.प. सार्वजनिक बांधकाम विभागप्रमुख, वनविभाग, सिंचन विभाग, पाणीपुरवठा विभाग, कृषी विभाग तसेच यात्रेसंबंधित इतर विभागाचे अधिकारी उपस्थित होते. संचालन व आभार प्रतापगडचे सेवक एल.के. बागडे यांनी केले. (प्रतिनिधी)