शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
2
प्रशासकीय सीमा ३१ डिसेंबरला होणार ‘फ्रीझ’, जनगणना : नंतर होणार नाही नवे गाव, जिल्हा, महापालिका
3
विकले जात राहणे हेच पाकिस्तानचे नशीब
4
अधिवेशनाकडून अपेक्षा; विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटले
5
कार्ला येथील एकवीरा मंदिरात ड्रेसकोड; ७ जुलैपासून नव्या नियमांची अंमलबजावणी
6
लुटालुटीला आरटीओची मूक संमती? अधिकृत रिक्षा स्टॅंडवर दरपत्रकच नाही; कल्याण आरटीओ क्षेत्रातील वास्तव
7
मुंबई काँग्रेसबद्दल दिल्लीत आज काही निर्णय होईल का?
8
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
9
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
10
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
11
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
12
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
13
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
14
...म्हणून मराठी माणूस मुंबईत राहू शकत नाही !
15
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
16
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
17
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
18
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
19
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
20
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका

जिल्ह्यात सरासरी ८०.८७ मिमी पावसाची तूट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2020 05:00 IST

मात्र जिल्ह्यात ३ जुलैपर्यंत ५३८८.८७ मीमी पाऊस बरसल्याची नोंद असून त्याची सरासरी १६३.३० एवढी आहे. वरील आकडेवारी बघता जिल्ह्यात या सुरूवातीच्या महिन्यातच २६६८.८४ मीमी पावसाची तूट दिसत असून त्याची सरासरी ८०.८७ एवढी आहे. आजची ही स्थिती बघता व ही तूट भरून काढण्यासाठी आता जिल्ह्यात संततधार दमदार पाऊस बरसणे गरजेचे झाले आहे.

ठळक मुद्देबळीराजा चिंतातूर : महिनाभरात केवळ १६३.३० सरासरी पावसाची नोंद

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : अवघ्या राज्याला ओलेचिंब करणारा पाऊस जिल्ह्यात मात्र दडी मारून बसल्याचे दिसत आहे. सरकारी आकडेवारीनुसार, जिल्ह्यात ३ जुलैपर्यंत ८०५७.७१ मीमी म्हणजेच सरासरी २४४.१७ एवढा पाऊस पडणे अपेक्षित आहे. मात्र प्रत्यक्षात ५३८८.८७ मीमी म्हणजेच सरासरी १६३.३० एवढाच पाऊस बरसलेला आहे. एकंदर जिल्ह्यात अपेक्षेच्या तुलनेत २६६८.८४ मीमी पावसाची तूट असून त्याची ८०.८७ सरासरी आहे. पावसाने पाठ फिरविल्याने बळीराजा चिंतातूर आहे.यंदाचा उन्हाळा कोरोनाने गाजविला असतानाच जिल्ह्यातील तापमानानेही ४६ डिग्री पार मजल मारली होती. एकीकडे कोरोनाची दहशत तर दुसरीकडे उन्हाचे चटके खात जिल्हावासीयांनी कसाबसा उन्हाळा काढला.७ जूनपासून मृग नक्षत्र लागले व आता तरी उकाड्यापासून सुटका होणार अशी आस धरून बसलेल्या जिल्हावासीयांना मात्र पावसानेही दगा दिल्याचे दिसत आहे. मान्सून लागल्यानंतरही तुरळक पाऊस जिल्ह्यात बरसला असून अजूनही जिल्हावासीयांना दमदार पावसाची प्रतीक्षा आहे.आकाशात दररोज ढग दाटून येतात व निघून जातात असाच खेळ जिल्ह्यात सुरू असल्याने कधी पाऊस धो-धो बरसणार याची वाट आता सर्वच बघत आहेत. जिल्ह्याची पावसाची आकडेवारीनुसार, ३ जुलैपर्यंत ८०५७.७१ मीमी पाऊस बरसणे अपेक्षित आहे. त्याची सरासरी २४४.१७ एवढी आहे.मात्र जिल्ह्यात ३ जुलैपर्यंत ५३८८.८७ मीमी पाऊस बरसल्याची नोंद असून त्याची सरासरी १६३.३० एवढी आहे. वरील आकडेवारी बघता जिल्ह्यात या सुरूवातीच्या महिन्यातच २६६८.८४ मीमी पावसाची तूट दिसत असून त्याची सरासरी ८०.८७ एवढी आहे. आजची ही स्थिती बघता व ही तूट भरून काढण्यासाठी आता जिल्ह्यात संततधार दमदार पाऊस बरसणे गरजेचे झाले आहे.मात्र शनिवारीही (दि.४) दुपारपर्यंतच्या ढगाळ वातावरणानंतर उन्ह तापू लागल्याने पावसाने पुन्हा दगा दिला आहे. यंदा जून महिन्याच्या सुरूवातीपासून पावसाची तूट निर्माण झाली असल्याने यंदा जिल्ह्यात पाऊस सरासरी गाठणार का असा प्रश्न निर्माण झाला आहे.शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची पाळी७ जून रोजी जिल्ह्यात सर्वत्र पावसाने हजेरी लावल्याने शेतकºयाने मोठ्या उत्साहात खरिपाची पेरणीपूर्व कामे आटोपली.काही शेतकऱ्यांनी पावसाच्या भरवशावर पेरणी करून टाकली. मात्र आता पावसाने पाठ फिरविल्याने पेरणी वाळत चालली असून अशात शेतकºयांवर दुबार पेरणीची पाळी आली आहे. कोरोनामुळे अगोदरच अडचणीत असलेल्या व हाती पैसा नसल्याने कशी तरी जुळवाजुळव करून खरिपासाठी शेतात उतरलेल्या शेतकºयांची फजिती झाली आहे. येत्या दोन तीन दिवसांत पावसाने आपली कृपा न केल्यास मात्र दुबार पेरणीसाठी पुन्हा बियाण्यांची जुळवाजुळव कशी करायची हीच चिंता शेतकºयांना सतावित आहे.अर्जुनी-मोरगाव तालुक्यात सर्वाधिक तूटजिल्ह्यात मान्सून सुरू झाल्यानंतर महिनाभरात ८०.८७ सरासरी पावसाची तूट दिसून येत असतानाच जिल्ह्यातील आठही तालुक्यांत हेच चित्र दिसून येत आहे. यात अर्जुनी-मोरगाव तालुक्यात सर्वाधिक १२८.८ सरासरी पावसाची तूट दिसून येत आहे. त्यानंतर गोंदिया तालुका दुसºया क्रमांकावर असून येथे ११६.५९ सरासरी पावसाची तूट आहे. तर गोरेगाव तालुक्यात ३८.५४, तिरोडा तालुक्यात ५४.६५, देवरी तालुक्यात ७८.३१, आमगाव तालुक्यात ५९.२१, सालेकसा तालुक्यात ८९.९२ तर सडक-अर्जुनी तालुक्यात ४२.७७ सरासरी पावसाची तूट दिसून येत आहे.

टॅग्स :Rainपाऊस