शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटलांना आझाद मैदानावर आंदोलनासाठी परवानगी, अटीशर्तीही घातल्या
2
अभिनेतापासून राजकारणी बनलेल्या थलापती विजय वादात! TVK रॅलीत बाउन्सरने कार्यकर्त्यांना व्यासपीठावरुन खाली फेकले, गुन्हा दाखल, व्हिडीओ व्हायरल
3
"ज्यांनी बिहारींना शिवीगाळ केली, त्यांना..."; भाजपाचा काँग्रेस खासदार राहुल गांधींवर हल्लाबोल
4
गुजरातमध्ये निनावी पक्षांना ₹४३०० कोटींची देणगी..; राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर हल्लाबोल
5
५५ वर्षांची आई आणि १७ मुले! हे कुटुंब कसं चालवतंय आपला उदरनिर्वाह?
6
जम्मू-काश्मीरमध्ये जोरदार पाऊस; भारताने पुन्हा दाखवली माणुसकी, पाकिस्तानला दिला मोठा इशारा!
7
"हिंदू राष्ट्र म्हणजे केवळ हिंदू नाही, तर..."; समाजातील दुहीवर मोहन भागवतांचं स्पष्ट भाष्य
8
गोविंदाने पत्नी सुनीतासोबत साजरी केली गणेश चतुर्थी, घटस्फोटांच्या अफवांना लावला पूर्णविराम
9
धक्कादायक! भटक्या कुत्र्यांची दहशत, चावल्यामुळे नववीच्या विद्यार्थ्याचा तडफडून मृत्यू
10
अचानक राजीनामा दिल्यानंतर, काय करतायत जगदीप धनखड? पत्नी वारंवार का जात आहे राजस्थानला?
11
Mobile Ban School: शाळेत मोबाईल वापरण्यावर बंदी; दक्षिण कोरियाने का घेतला निर्णय?
12
Rishi Panchami 2025: ऋषींनी आपल्यासाठी काय केले? हे जाणून घेण्यासाठी 'हा' एक श्लोक पुरेसा आहे!
13
हृदयद्रावक! "भाऊ, सर्वनाश झाला, आपला मुन्नू गेला..."; ढसाढसा रडत मोठ्या भावाला फोन
14
पंजाबमध्ये पुरामुळे कहर, नवोदय विद्यालयात ४०० मुले आणि शाळेतील कर्मचारी अडकले; पालक प्रशासनावर संतापले
15
"यावर्षी तुमच्याशिवाय घर अपूर्ण वाटतंय...", बाप्पाला घरी न आणल्यामुळे भावुक झाली शिल्पा शेट्टी
16
"खू्प कर्ज झालंय..."; सचिन-शिवानीने आधी चार वर्षाच्या मुलाला विष दिलं अन् स्वतःला संपवलं; चिठ्ठीत काय?
17
युतीचा श्रीगणेशा! उद्धव ठाकरे सहकुटुंब राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपतीचं घेतले दर्शन
18
भारतावर 50% टॅरिफ लावून ट्रम्प यांनी स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारली, आता लागणार अमेरिकेची 'लंका'! आला असा अहवाल
19
R Ashwin: आर. अश्विन आयपीएलमधून निवृत्त, फक्त विदेशी क्रिकेट लीगमध्ये खेळणार!
20
Crime: विधवा वहिनीच्या बेडरूममध्ये घुसून दीराचं घाणेरडं कृत्य, गुन्हा दाखल!

जिल्ह्यात सरासरी ८०.८७ मिमी पावसाची तूट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2020 05:00 IST

मात्र जिल्ह्यात ३ जुलैपर्यंत ५३८८.८७ मीमी पाऊस बरसल्याची नोंद असून त्याची सरासरी १६३.३० एवढी आहे. वरील आकडेवारी बघता जिल्ह्यात या सुरूवातीच्या महिन्यातच २६६८.८४ मीमी पावसाची तूट दिसत असून त्याची सरासरी ८०.८७ एवढी आहे. आजची ही स्थिती बघता व ही तूट भरून काढण्यासाठी आता जिल्ह्यात संततधार दमदार पाऊस बरसणे गरजेचे झाले आहे.

ठळक मुद्देबळीराजा चिंतातूर : महिनाभरात केवळ १६३.३० सरासरी पावसाची नोंद

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : अवघ्या राज्याला ओलेचिंब करणारा पाऊस जिल्ह्यात मात्र दडी मारून बसल्याचे दिसत आहे. सरकारी आकडेवारीनुसार, जिल्ह्यात ३ जुलैपर्यंत ८०५७.७१ मीमी म्हणजेच सरासरी २४४.१७ एवढा पाऊस पडणे अपेक्षित आहे. मात्र प्रत्यक्षात ५३८८.८७ मीमी म्हणजेच सरासरी १६३.३० एवढाच पाऊस बरसलेला आहे. एकंदर जिल्ह्यात अपेक्षेच्या तुलनेत २६६८.८४ मीमी पावसाची तूट असून त्याची ८०.८७ सरासरी आहे. पावसाने पाठ फिरविल्याने बळीराजा चिंतातूर आहे.यंदाचा उन्हाळा कोरोनाने गाजविला असतानाच जिल्ह्यातील तापमानानेही ४६ डिग्री पार मजल मारली होती. एकीकडे कोरोनाची दहशत तर दुसरीकडे उन्हाचे चटके खात जिल्हावासीयांनी कसाबसा उन्हाळा काढला.७ जूनपासून मृग नक्षत्र लागले व आता तरी उकाड्यापासून सुटका होणार अशी आस धरून बसलेल्या जिल्हावासीयांना मात्र पावसानेही दगा दिल्याचे दिसत आहे. मान्सून लागल्यानंतरही तुरळक पाऊस जिल्ह्यात बरसला असून अजूनही जिल्हावासीयांना दमदार पावसाची प्रतीक्षा आहे.आकाशात दररोज ढग दाटून येतात व निघून जातात असाच खेळ जिल्ह्यात सुरू असल्याने कधी पाऊस धो-धो बरसणार याची वाट आता सर्वच बघत आहेत. जिल्ह्याची पावसाची आकडेवारीनुसार, ३ जुलैपर्यंत ८०५७.७१ मीमी पाऊस बरसणे अपेक्षित आहे. त्याची सरासरी २४४.१७ एवढी आहे.मात्र जिल्ह्यात ३ जुलैपर्यंत ५३८८.८७ मीमी पाऊस बरसल्याची नोंद असून त्याची सरासरी १६३.३० एवढी आहे. वरील आकडेवारी बघता जिल्ह्यात या सुरूवातीच्या महिन्यातच २६६८.८४ मीमी पावसाची तूट दिसत असून त्याची सरासरी ८०.८७ एवढी आहे. आजची ही स्थिती बघता व ही तूट भरून काढण्यासाठी आता जिल्ह्यात संततधार दमदार पाऊस बरसणे गरजेचे झाले आहे.मात्र शनिवारीही (दि.४) दुपारपर्यंतच्या ढगाळ वातावरणानंतर उन्ह तापू लागल्याने पावसाने पुन्हा दगा दिला आहे. यंदा जून महिन्याच्या सुरूवातीपासून पावसाची तूट निर्माण झाली असल्याने यंदा जिल्ह्यात पाऊस सरासरी गाठणार का असा प्रश्न निर्माण झाला आहे.शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची पाळी७ जून रोजी जिल्ह्यात सर्वत्र पावसाने हजेरी लावल्याने शेतकºयाने मोठ्या उत्साहात खरिपाची पेरणीपूर्व कामे आटोपली.काही शेतकऱ्यांनी पावसाच्या भरवशावर पेरणी करून टाकली. मात्र आता पावसाने पाठ फिरविल्याने पेरणी वाळत चालली असून अशात शेतकºयांवर दुबार पेरणीची पाळी आली आहे. कोरोनामुळे अगोदरच अडचणीत असलेल्या व हाती पैसा नसल्याने कशी तरी जुळवाजुळव करून खरिपासाठी शेतात उतरलेल्या शेतकºयांची फजिती झाली आहे. येत्या दोन तीन दिवसांत पावसाने आपली कृपा न केल्यास मात्र दुबार पेरणीसाठी पुन्हा बियाण्यांची जुळवाजुळव कशी करायची हीच चिंता शेतकºयांना सतावित आहे.अर्जुनी-मोरगाव तालुक्यात सर्वाधिक तूटजिल्ह्यात मान्सून सुरू झाल्यानंतर महिनाभरात ८०.८७ सरासरी पावसाची तूट दिसून येत असतानाच जिल्ह्यातील आठही तालुक्यांत हेच चित्र दिसून येत आहे. यात अर्जुनी-मोरगाव तालुक्यात सर्वाधिक १२८.८ सरासरी पावसाची तूट दिसून येत आहे. त्यानंतर गोंदिया तालुका दुसºया क्रमांकावर असून येथे ११६.५९ सरासरी पावसाची तूट आहे. तर गोरेगाव तालुक्यात ३८.५४, तिरोडा तालुक्यात ५४.६५, देवरी तालुक्यात ७८.३१, आमगाव तालुक्यात ५९.२१, सालेकसा तालुक्यात ८९.९२ तर सडक-अर्जुनी तालुक्यात ४२.७७ सरासरी पावसाची तूट दिसून येत आहे.

टॅग्स :Rainपाऊस