शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
9
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
10
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
11
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
12
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
13
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
14
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
15
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
16
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
17
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
18
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
19
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
20
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार

केशोरीच्या मिरचीवर रोगांचे आक्रमण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2018 21:21 IST

अख्ख्या विदर्भात सुप्रसिद्ध असलेली केशोरी येथील मिरची विविध रोगांनी ग्रासल्यामुळे यंदा या मिरचीच्या उत्पादनात घट होण्याची चिन्हे दिसत आहेत.

ठळक मुद्देयंदा उत्पादन घटणार : मसाले पीक असल्याने अनुदानापासून वंचित

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : अख्ख्या विदर्भात सुप्रसिद्ध असलेली केशोरी येथील मिरची विविध रोगांनी ग्रासल्यामुळे यंदा या मिरचीच्या उत्पादनात घट होण्याची चिन्हे दिसत आहेत. अशीच परिस्थिती राहिली तर स्वादिष्ट व चवदार असलेली केशोरीची मिरची नामशेष झाल्याशिवाय राहणार नाही.सध्या केशोरी परिसरातील मिरची पिकावर बोकडी, चुड्डी, मुरडा, मुळकुज, फळ कुजवी, बुरसी या रोगांनी आक्रमण केले आहे. मिरचीचे उभे झाडे करपत चालले आहेत. त्यामुळे मिरची रोपांना मिरची फळ लागण्याचे प्रमाण कमी झाले आहे. त्याचा परिणाम यंदा मिरची उत्पादनावर होऊन मोठ्या प्रमाणावर घट होण्याची शक्यता केशोरी परिसरातील शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. बोकडी व चुड्डी या रोगांनी ग्रस्त असलेल्या मिरची पिकावर औषध फवारणी करुन देखील नियंत्रण होत नसल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.पूर्वी रोगराई नव्हती व नांगराने बैलजोडीने नागरणी केली जात होती. तेव्हा रोग दिसत नव्हते व एकरी ८-१० खंड्या मिरचीचे उत्पादन होत होते. उत्पादनाचे प्रमाण आता एकरी २ खंड्यांवर आले असल्याचे केशोरी येथील शेतकरी हरिराम लंजे यांनीसांगितले. गेल्या ३०-४० वर्षांपासून वडिलोपार्जित मिरचीचे आपण उत्पादन घेत आहोत. ट्रॅक्टरने आता नागरणी करतो. आमचे वडील व आम्हीही एकरी ९-१० खंड्या मिरची पिकवीत होतो. दिवसेंदिवस मिरची उत्पादनात घट होत असून आता दोन ते तीन खंड्या एकरी उत्पादन होते. लागवड खर्चापेक्षा कमी भाव मिरचीला मिळतो. शासनाची कसलीही मदत मिळत नाही. त्यामुळे आता मिरचीचे उत्पादन घेणे परवडत नाही असे शेतकरी शामराव शेंडे यांनी सांगितले.मिरची हे मसालावर्गीय पिकांच्या वर्गवारीत येत असल्यामुळे व जिल्ह्यात या पिकांचे लागवडीखालील क्षेत्र कमी असल्यामुळे हळदीच्या पिकांप्रमाणे या पिकाला शासनाचे अनुदान मिळत नाही. शवाय या पिकाकडे केवळ मसाला वर्गीय पीक म्हणून या पिकाची होणारी परवड यामुळे केशोरी परिसरातील मिरची पिकांचे लागवड क्षेत्र १०० टक्क्यावरुन ४७ टक्के वर आले आहे. यामुळे येथील शेतकरी मिरची पिकाकडून मका व धान पिकांकडे वळत आहे. लोडशेडिंग, मजुरांचे वाढते दर व लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष हेही कारण मिरचीला भोवत आहे.अशात शासकीय उपाययोजना केली गेली नाही. तसेच परिसरातील लोकप्रतिनिधींनी लक्ष दिले नाही तर लज्जतदार, स्वादिष्ट व चवदार अशी केशोरीची मिरची दुर्मिळ व नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. अशात केशोरी मिरचीच्या शौकीनांना या मिरचीची चव चाखायला मिळणार नाही. करिता मिरचीला हळदी पिकाप्रमाणे अनुदान, ५० टक्के अनुदानावर औषधींचा पुरवठा, पीक विमा योजना आदी सवलती देण्यात याव्यात, अशी मागणी केशोरी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.केशोरी गावात १२ हेक्टरला मिरची पिकाची लागवड आहे. कृषी पर्यवेक्षक वेळोवेळी शेतकºयांना मार्गदर्शन करतात. संशोधन संस्थेतील शास्त्रज्ञांना बोलावून शेतकऱ्यांची कार्यशाळा येथे घेण्यात आली. सातत्याने एकचएक पीक घेतल्यामुळे जमिनीची पोत घसरते. त्यामुळे पिकांची अदलाबदल करणे गरजेचे असते. मसाला पिकात मिरचीचा समावेश होत असल्यामुळे व लागवड क्षेत्र मेजर नसल्याने शासकीय अनुदान दिले जात नाही. मार्गदर्शनाची नीट अमंलबजावणी शेतकरी करीत नाही.-संजय रामटेकेमंडळ कृषी अधिकारी, नवेगावबांध..................बिज प्रक्रिया, किटकनाशक फवारणी, एकाच जागेत वारंवार एकच घेतले जाणारे पीक, वर्षभर शेतातून पाण्याचा निचरा होत नसल्यामुळे जमिनीत बुरशी शिल्लक राहत असल्याने चुरडा, मुरडा, बोडखी, मुळकुज हे रोग या पिकावर आक्रमण करतात. पिकात फेरबदल आवश्यक आहे.-बी.टी. राऊतकृषी पर्यवेक्षक, कृषी विभाग..............मिरची पिकाचा समावेश मसाला वर्गीय पिकात केल्या गेल्यामुळे हळदी पिकासारखे अनुदान या पिकाला मिळत नाही. या पिकाला अनुदान मिळावा, पीक विमा योजना लागू करावी, मसाला पिकातून वगळण्यात यावे, अनुदानावर औषधांचा जादा पुरवठा करावा अशी मागणी आपण शासनाकडे करणार आहोत. हळदी पिकाप्रमाणे मिरची पिकालाही अनुदान मिळावा यासाठी जिल्हा परिषद सभेत मी प्रयत्न करेन.-तेजुकला गहाणेजि.प. सदस्य, केशोरी