शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रालयातील लूटीला चाप बसणार! सल्लागारांच्या नियुक्त्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी निर्णय
2
GST घटला, पण सरकारचा खजिना भरला, सप्टेंबर महिन्यात झाली विक्रमी कमाई   
3
ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर
4
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी उद्धवसेनेला मोठा धक्का; ‘या’ गटाचे प्रमुख, पदाधिकारी शिवसेनेत
5
VIDEO: परंपरा.. प्रतिष्ठा.. अनुशासन.. 'या' ठिकाणी पुरूष साडी नेसून करतात गरबा, कारण...
6
“वाट कसली पाहता? शेतकरी भाजपात आल्यावर कर्जमुक्ती करणार का?”; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल
7
संविधान सत्याग्रह पदयात्रेदरम्यान पोलिसांकडून पाळत, काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचे सरकारला आव्हान, म्हणाले...
8
NHIDCL: एनएचआयडीसीएलमध्ये नोकरी, 'या' पदांसाठी भरती; १ लाख ५० हजारांपर्यंत पगार!
9
वय वर्ष ३१, संपत्ती ₹२१,१९० कोटी! कोण आहे भारतातील सर्वात तरुण अब्जाधीश? काय काम करतो?
10
लोकसंख्येतील बदल घुसखोरीपेक्षाही घातक...! असं का म्हणाले पंतप्रधान मोदी? देशाला दिला गंभीर इशारा
11
'ओला दुष्काळ जाहीर करा', उद्धव ठाकरेंनी दाखवले CM फडणवीसांचे पत्र, म्हणाले, "मलाही वेदना झाल्या.."
12
CM फडणवीसांचा ‘तो’ Video विरोधकांनी दाखवला; म्हणाले, “गांभीर्याने विचार करा, असले राजकारण...”
13
शौक बड़ी चीज है! १७ व्या वर्षी iPhone 4, iPad 2 साठी विकली किडनी, आता आयुष्यभराचं दुखणं
14
पुतीन यांची दहशत...! 27 देशांनी घेतला रशियाचा धसका; जगात पहिल्यांदाच तयार होणार 'ड्रोन वॉल', कसं काम करणार?
15
'देशद्रोह्यांनी मॅच एन्जॉय केली असेल', IND-PAK सामन्यावरुन उद्धव ठाकरेंची बोचरी टीका
16
Upcoming Smartphones: वनप्लस १५, विवो एक्स ३०० आणि बरंच काही; ऑक्टोबरमध्ये लॉन्च होत आहेत 'हे' ६ फोन!
17
"गुरूजी म्हणाले, 'दाताखाली जीभ आली म्हणून आपण दात पाडत नाही"; मोदींनी सांगितली आठवण
18
ST Bus Fare Update: दिवाळासाठी एसटीने केलेली १० टक्के भाडेवाढ रद्द; पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदेंनी केली घोषणा
19
Dussehra 2025: दसऱ्याला रावण दहनानंतरची राख, घरी का आणतात माहितीय? काय आहे परंपरा?
20
DA Hike: दिवाळीपूर्वी केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गुडन्यूज, महागाई भत्त्यात 3% वाढ; आता 'एवढा' पगार मिळणार

केशोरीच्या मिरचीवर रोगांचे आक्रमण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2018 21:21 IST

अख्ख्या विदर्भात सुप्रसिद्ध असलेली केशोरी येथील मिरची विविध रोगांनी ग्रासल्यामुळे यंदा या मिरचीच्या उत्पादनात घट होण्याची चिन्हे दिसत आहेत.

ठळक मुद्देयंदा उत्पादन घटणार : मसाले पीक असल्याने अनुदानापासून वंचित

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : अख्ख्या विदर्भात सुप्रसिद्ध असलेली केशोरी येथील मिरची विविध रोगांनी ग्रासल्यामुळे यंदा या मिरचीच्या उत्पादनात घट होण्याची चिन्हे दिसत आहेत. अशीच परिस्थिती राहिली तर स्वादिष्ट व चवदार असलेली केशोरीची मिरची नामशेष झाल्याशिवाय राहणार नाही.सध्या केशोरी परिसरातील मिरची पिकावर बोकडी, चुड्डी, मुरडा, मुळकुज, फळ कुजवी, बुरसी या रोगांनी आक्रमण केले आहे. मिरचीचे उभे झाडे करपत चालले आहेत. त्यामुळे मिरची रोपांना मिरची फळ लागण्याचे प्रमाण कमी झाले आहे. त्याचा परिणाम यंदा मिरची उत्पादनावर होऊन मोठ्या प्रमाणावर घट होण्याची शक्यता केशोरी परिसरातील शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. बोकडी व चुड्डी या रोगांनी ग्रस्त असलेल्या मिरची पिकावर औषध फवारणी करुन देखील नियंत्रण होत नसल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.पूर्वी रोगराई नव्हती व नांगराने बैलजोडीने नागरणी केली जात होती. तेव्हा रोग दिसत नव्हते व एकरी ८-१० खंड्या मिरचीचे उत्पादन होत होते. उत्पादनाचे प्रमाण आता एकरी २ खंड्यांवर आले असल्याचे केशोरी येथील शेतकरी हरिराम लंजे यांनीसांगितले. गेल्या ३०-४० वर्षांपासून वडिलोपार्जित मिरचीचे आपण उत्पादन घेत आहोत. ट्रॅक्टरने आता नागरणी करतो. आमचे वडील व आम्हीही एकरी ९-१० खंड्या मिरची पिकवीत होतो. दिवसेंदिवस मिरची उत्पादनात घट होत असून आता दोन ते तीन खंड्या एकरी उत्पादन होते. लागवड खर्चापेक्षा कमी भाव मिरचीला मिळतो. शासनाची कसलीही मदत मिळत नाही. त्यामुळे आता मिरचीचे उत्पादन घेणे परवडत नाही असे शेतकरी शामराव शेंडे यांनी सांगितले.मिरची हे मसालावर्गीय पिकांच्या वर्गवारीत येत असल्यामुळे व जिल्ह्यात या पिकांचे लागवडीखालील क्षेत्र कमी असल्यामुळे हळदीच्या पिकांप्रमाणे या पिकाला शासनाचे अनुदान मिळत नाही. शवाय या पिकाकडे केवळ मसाला वर्गीय पीक म्हणून या पिकाची होणारी परवड यामुळे केशोरी परिसरातील मिरची पिकांचे लागवड क्षेत्र १०० टक्क्यावरुन ४७ टक्के वर आले आहे. यामुळे येथील शेतकरी मिरची पिकाकडून मका व धान पिकांकडे वळत आहे. लोडशेडिंग, मजुरांचे वाढते दर व लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष हेही कारण मिरचीला भोवत आहे.अशात शासकीय उपाययोजना केली गेली नाही. तसेच परिसरातील लोकप्रतिनिधींनी लक्ष दिले नाही तर लज्जतदार, स्वादिष्ट व चवदार अशी केशोरीची मिरची दुर्मिळ व नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. अशात केशोरी मिरचीच्या शौकीनांना या मिरचीची चव चाखायला मिळणार नाही. करिता मिरचीला हळदी पिकाप्रमाणे अनुदान, ५० टक्के अनुदानावर औषधींचा पुरवठा, पीक विमा योजना आदी सवलती देण्यात याव्यात, अशी मागणी केशोरी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.केशोरी गावात १२ हेक्टरला मिरची पिकाची लागवड आहे. कृषी पर्यवेक्षक वेळोवेळी शेतकºयांना मार्गदर्शन करतात. संशोधन संस्थेतील शास्त्रज्ञांना बोलावून शेतकऱ्यांची कार्यशाळा येथे घेण्यात आली. सातत्याने एकचएक पीक घेतल्यामुळे जमिनीची पोत घसरते. त्यामुळे पिकांची अदलाबदल करणे गरजेचे असते. मसाला पिकात मिरचीचा समावेश होत असल्यामुळे व लागवड क्षेत्र मेजर नसल्याने शासकीय अनुदान दिले जात नाही. मार्गदर्शनाची नीट अमंलबजावणी शेतकरी करीत नाही.-संजय रामटेकेमंडळ कृषी अधिकारी, नवेगावबांध..................बिज प्रक्रिया, किटकनाशक फवारणी, एकाच जागेत वारंवार एकच घेतले जाणारे पीक, वर्षभर शेतातून पाण्याचा निचरा होत नसल्यामुळे जमिनीत बुरशी शिल्लक राहत असल्याने चुरडा, मुरडा, बोडखी, मुळकुज हे रोग या पिकावर आक्रमण करतात. पिकात फेरबदल आवश्यक आहे.-बी.टी. राऊतकृषी पर्यवेक्षक, कृषी विभाग..............मिरची पिकाचा समावेश मसाला वर्गीय पिकात केल्या गेल्यामुळे हळदी पिकासारखे अनुदान या पिकाला मिळत नाही. या पिकाला अनुदान मिळावा, पीक विमा योजना लागू करावी, मसाला पिकातून वगळण्यात यावे, अनुदानावर औषधांचा जादा पुरवठा करावा अशी मागणी आपण शासनाकडे करणार आहोत. हळदी पिकाप्रमाणे मिरची पिकालाही अनुदान मिळावा यासाठी जिल्हा परिषद सभेत मी प्रयत्न करेन.-तेजुकला गहाणेजि.प. सदस्य, केशोरी