शहरं
Join us  
Trending Stories
1
India-Pakistan War: उद्या देशात युद्धसज्जतेचा ‘मॉक ड्रिल’; सायरन, नागरिकांच्या बचावाचा सराव 
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: नोकरीत बढती मिळेल; अचानक आर्थिक फायदा होईल
3
राहुल गांधी अचानक ‘पीएमओ’त; पंतप्रधान माेदींसाेबत झाली बैठक
4
बारावीचा निकाल घसरला, यंदाही मुलींचाच डंका; कोकणची बाजी, लातूर पॅटर्न माघारला
5
चोंडीमध्ये आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक; विकास आराखड्यावर होईल शिक्कामोर्तब
6
पुतीन यांचा पंतप्रधान मोदी यांना फोन;  पहलगाम कट रचणाऱ्यांना सोडू नका
7
‘ती’ लईच हुशार ! यंदाही एक पाऊल पुढेच; ३८ महाविद्यालयांना मिळाला भाेपळा
8
प्राची ! पेट्रोलपंपावर काम करून कष्टाने गाठली यशाची उंची
9
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चौकशी, डीजीपींनी एसआयटी नेमावी : कोर्ट
10
मुंबईकरांना दिलासा, पाणीपुरवठ्यात कपात नाही
11
२० वर्षांपूर्वी बांगलादेशमधून तो आला; नवी मुंबईतील महिलेशी संसार थाटला 
12
नवजात अर्भकांचे लसीकरण प्रसूती विभागातच करा; राज्य सरकारच्या सूचना, लागू होणार नवे नियम
13
"महायुती म्हणजे 'तीन तिघाडा, काम बिघाडा"; काँग्रेस फोडण्याच्या मुद्द्यावरून प्रणिती शिंदेंची टीका
14
ड्रग्स टेस्टमध्ये दोषी आढळलेला कगिसो रबाडा पुन्हा IPL खेळणार, 'या' संघाविरूद्ध होणार 'कमबॅक'
15
हवाई हल्ल्याची तयारी... पाकिस्तानसोबत तणावाच्या पार्श्वभूमीवर गृह मंत्रालयाचे सर्व राज्यांना निर्देश
16
भारताच्या संरक्षण वेबसाईट्सवर पाकिस्तानकडून सायबर हल्ला, महत्त्वपूर्ण गोपनीय माहिती लीक झाल्याचा संशय
17
काही लोक काँग्रेस सोडत आहेत, आमची वेळ आल्यावर आम्हीही बदला घेऊ- विजय वडेट्टीवार
18
वाहतुकीचे नियम तोडले तर मिळतील निगेटिव्ह पॉईंट्स, ड्रायव्हिंग लायसन होणार सस्पेंड, अशी आहे नवी पॉईंट सिस्टिम
19
ही आहे भारताची ताकद; जर्मनी-फ्रान्सचा पाकिस्तानबाबत मोठा निर्णय, जाणून घ्या...
20
पाकवर आर्थिक हल्ला; ADB अध्यक्षांना भेटल्या निर्मला सीतारामण, निधी रोखण्याची केली मागणी

कलावंताच्या कलेला मानाचा मुजरा नाही !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2021 04:32 IST

मुन्नाभाई नंदागवळी बाराभाटी : अनेक वर्षे झाली, गावापासून तर शहराच्या रंगभूमी थिएटरमध्ये कलावंत हा कलेची छाप पाडत आहे. कलाकार ...

मुन्नाभाई नंदागवळी

बाराभाटी : अनेक वर्षे झाली, गावापासून तर शहराच्या रंगभूमी थिएटरमध्ये कलावंत हा कलेची छाप पाडत आहे. कलाकार हा मूळचा गुणी व्यक्तिमत्त्व असतो. महाराष्ट्रात या प्रकाराला पिढ्यान् पिढ्या वाव आहे. कलाकार जगावा, जगला पाहिजे यासाठी शासनाच्या जिल्हा परिषद समाज कल्याण विभागाकडून वृद्ध कलावंत मानधन योजना सुरू आहे. पण जिल्ह्यात ही समितीच दोन वर्षांपासून नाही. हा अन्याय सहन करीत कलावंत जनप्रतिनिधींना वृद्ध कलावंताकडे लक्ष द्या, अशी हाक देत आहेत.

सध्या अनेक भागात कलाकाराच्या समित्यांवर समित्या तयार होतात. पण लोककला रंगविणारा खरा हौशी कलावंत अजून वंचित राहत आहे. यामध्ये तमाशा, डहाके, खडीगंमत, दंडार, गोंधळ, भजन, कीर्तन, दिंडी भजन या कलावंतांना सहभागी करतच नाही. यांच्या पोटावर आजही पाणी पडते. खरी कला हीच आहे. यांच्याकडे शासनाने अजिबात दुर्लक्ष करू नये. गावकुसात अनेक कलाकार निर्माण झाले असून होत आहेत. कलाकार हा कलेचा भुकेला आणि कलेवरच पोटाची खळगी भरणारा आहे. जमते तेव्हापर्यंत परिश्रम करून कला दाखवून पोट भरतो. मात्र उतार वयात कलेची पावती जपावी म्हणून वृद्ध कलाकार मानधनावर निर्भर राहतो. पण येथे तर जिल्हा परिषद समाज कल्याण विभागात समितीच नाही. अशावेळी कलावंतांनी काय करावे. नटसम्राट कालेलकर यांच्यासारखी अवस्था होऊ नये ना? असा सवालही कलाकार करत आहेत.

...........

मानधनही झाले बेपत्ता

ज्या कलाकारांना मानधन मिळत होते ते सुद्धा कोरोनाच्या नावाखाली देत नाही. निधी नसल्याचा बहाणा कलावंतांना ऐकावा लागतो. असा मानधनही परतीच्या पावसासारखा बेपत्ता झाला आहे. ज्या ठिकाणी कलाकृती निर्माण करणाऱ्या कलाकारांना मान नाही. तेथे कलेचा कसला मान असेल? दोन सालापासून तर कलेचे कार्यक्रमच चक्क बंद करून टाकले. पण जनप्रतिनिधीचे कार्यक्रम नित्यनेम सुरू आहेत.

......

नियम, निकष व अटीनुसार समिती असावी

ही समिती शासनाच्या निकष, नियमानुसार आणि अटी-शर्तीवर तयार करण्यात यावी. नाही तर कलाकार नसताना ही समितीत घेतले जाते. हा सावळागोंधळ नकोच. कलावंतांना न्याय द्यावा, अशी मागणी कलाकार करीत आहेत.

.......

पन्नाशीनंतर मानधन

वयाची पन्नासी झाली की मानधन योजना सर्व कलाकारांना लागू होत आहे. यासाठी या योजनेचे आवेदन पत्र, उत्पन्न दाखला, बँक खाते पुस्तक, कलेविषयी मिळालेले प्रमाणपत्र, दोन छायाचित्र आदी दस्तऐवज तयार करून संबंधित पंचायत समिती किंवा जिल्हा परिषदेत द्यावे लागतात. पंचायत समिती व जिल्हा परिषद कार्यालयात यापूर्वीच्या तब्बल दोन वर्षांपासून मानधनाची फाईल जमा होऊन धूळखात असतील. पण अधिकारी व पालकमंत्री तसेच कोणताही जनप्रतिनिधी लक्ष घालेना अशी स्थिती आहे. मात्र उद्घाटन, भूमिपूजन, सभा व बांधकामांवर तर जास्तच लक्ष देतात पण समिती गठीत होत नाही.