शहरं
Join us  
Trending Stories
1
IND W vs PAK W "म्हारी छोरियां छोरो से कम है के.." हरमनप्रीत ब्रिगेडनंही पाकची जिरवली!
2
'अमेरिकेसोबत काही मुद्दे सोडवायला हवेत', ट्रेड डील आणि टॅरिफबाबत जयशंकर यांचे मोठे विधान
3
मुंबईतील राजकीय नेत्याच्या मुलाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार, शौचालयात गाठले आणि...
4
IND vs AUS : बढती मिळताच अय्यरनं टीम इंडियाला जिंकून दिली ट्रॉफी; घरच्या मैदानात कांगारुंची शिकार
5
गाझातील सत्ता सोडण्यास नकार दिल्यास हमासची धुळधाण उडवू, डोनाल्ट ट्रम्प यांची ताकिद 
6
नेपाळमध्ये हाहाकार... मुसळधार पावसाचा कहर! आतापर्यंत 51 जणांचा मृत्यू; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केलं दुःख, म्हणाले - भारत...!
7
Muneeba Ali Controversial Run Out : हुज्जत घालून पाक क्रिकेटच्या इज्जतीचा फालुदा; असं काय घडलं?
8
हिमालयात दार्जिलिंगपासून माऊंट एव्हरेस्टपर्यंत विध्वंस, ६० हून अधिक मृत्यू, कारण काय?
9
IND vs AUS : ३०० पारच्या लढाईत अभिषेक-तिलकनं तलवार केली म्यान; वादळी शतकासह प्रभसिमरन सिंगची हवा
10
'जेव्हा शिंदे CM आणि फडणवीस DCM होते तेव्हा...!', अमित शाह यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
11
प्रवाशांनी भरलेली विरार ते पालघर रो-रो बोट जेट्टीवर अडकली; हायड्रॉलिक पाईप तुटल्याने मनस्ताप
12
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
13
’अमित शाह महाराष्ट्रात आले पण नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत शब्दही बोलले नाहीत’, काँग्रेसची टीका   
14
Irani Cup 2025: नागपूरच्या मैदानात फुल्ल राडा! यश धुलला तंबूत धाडल्यावर ठाकूर त्याच्या अंगावर धावला (VIDEO)
15
ऑटो कंपनीची 'कमाल', गुंतवणूकदारांना केलं मालामाल...! 1 वर्षात पैसा डबल; सोमवारी दिसणार चमत्कार?
16
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
17
जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
18
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
19
एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 
20
सयाजी शिंदेंचा मोठा निर्णय, 'सखाराम बाईंडर'च्या १० प्रयोगांचे मानधन पूरग्रस्त शेतकऱ्यांना देणार

कलावंताच्या कलेला मानाचा मुजरा नाही !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2021 04:32 IST

मुन्नाभाई नंदागवळी बाराभाटी : अनेक वर्षे झाली, गावापासून तर शहराच्या रंगभूमी थिएटरमध्ये कलावंत हा कलेची छाप पाडत आहे. कलाकार ...

मुन्नाभाई नंदागवळी

बाराभाटी : अनेक वर्षे झाली, गावापासून तर शहराच्या रंगभूमी थिएटरमध्ये कलावंत हा कलेची छाप पाडत आहे. कलाकार हा मूळचा गुणी व्यक्तिमत्त्व असतो. महाराष्ट्रात या प्रकाराला पिढ्यान् पिढ्या वाव आहे. कलाकार जगावा, जगला पाहिजे यासाठी शासनाच्या जिल्हा परिषद समाज कल्याण विभागाकडून वृद्ध कलावंत मानधन योजना सुरू आहे. पण जिल्ह्यात ही समितीच दोन वर्षांपासून नाही. हा अन्याय सहन करीत कलावंत जनप्रतिनिधींना वृद्ध कलावंताकडे लक्ष द्या, अशी हाक देत आहेत.

सध्या अनेक भागात कलाकाराच्या समित्यांवर समित्या तयार होतात. पण लोककला रंगविणारा खरा हौशी कलावंत अजून वंचित राहत आहे. यामध्ये तमाशा, डहाके, खडीगंमत, दंडार, गोंधळ, भजन, कीर्तन, दिंडी भजन या कलावंतांना सहभागी करतच नाही. यांच्या पोटावर आजही पाणी पडते. खरी कला हीच आहे. यांच्याकडे शासनाने अजिबात दुर्लक्ष करू नये. गावकुसात अनेक कलाकार निर्माण झाले असून होत आहेत. कलाकार हा कलेचा भुकेला आणि कलेवरच पोटाची खळगी भरणारा आहे. जमते तेव्हापर्यंत परिश्रम करून कला दाखवून पोट भरतो. मात्र उतार वयात कलेची पावती जपावी म्हणून वृद्ध कलाकार मानधनावर निर्भर राहतो. पण येथे तर जिल्हा परिषद समाज कल्याण विभागात समितीच नाही. अशावेळी कलावंतांनी काय करावे. नटसम्राट कालेलकर यांच्यासारखी अवस्था होऊ नये ना? असा सवालही कलाकार करत आहेत.

...........

मानधनही झाले बेपत्ता

ज्या कलाकारांना मानधन मिळत होते ते सुद्धा कोरोनाच्या नावाखाली देत नाही. निधी नसल्याचा बहाणा कलावंतांना ऐकावा लागतो. असा मानधनही परतीच्या पावसासारखा बेपत्ता झाला आहे. ज्या ठिकाणी कलाकृती निर्माण करणाऱ्या कलाकारांना मान नाही. तेथे कलेचा कसला मान असेल? दोन सालापासून तर कलेचे कार्यक्रमच चक्क बंद करून टाकले. पण जनप्रतिनिधीचे कार्यक्रम नित्यनेम सुरू आहेत.

......

नियम, निकष व अटीनुसार समिती असावी

ही समिती शासनाच्या निकष, नियमानुसार आणि अटी-शर्तीवर तयार करण्यात यावी. नाही तर कलाकार नसताना ही समितीत घेतले जाते. हा सावळागोंधळ नकोच. कलावंतांना न्याय द्यावा, अशी मागणी कलाकार करीत आहेत.

.......

पन्नाशीनंतर मानधन

वयाची पन्नासी झाली की मानधन योजना सर्व कलाकारांना लागू होत आहे. यासाठी या योजनेचे आवेदन पत्र, उत्पन्न दाखला, बँक खाते पुस्तक, कलेविषयी मिळालेले प्रमाणपत्र, दोन छायाचित्र आदी दस्तऐवज तयार करून संबंधित पंचायत समिती किंवा जिल्हा परिषदेत द्यावे लागतात. पंचायत समिती व जिल्हा परिषद कार्यालयात यापूर्वीच्या तब्बल दोन वर्षांपासून मानधनाची फाईल जमा होऊन धूळखात असतील. पण अधिकारी व पालकमंत्री तसेच कोणताही जनप्रतिनिधी लक्ष घालेना अशी स्थिती आहे. मात्र उद्घाटन, भूमिपूजन, सभा व बांधकामांवर तर जास्तच लक्ष देतात पण समिती गठीत होत नाही.