शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

अर्जुनी-मोरगाव तालुक्याला पावसाने झोडपले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2018 22:13 IST

मागील २४ तासात अर्जुनी-मोरगाव तालुक्यात अतिवृष्टी झाली. तीन तास बरसलेल्या मुसळधार पावसामुळे तलाव, बोड्या, नाले तुडूंब भरुन वाहत आहे. अनेक घरांची पडझड झाली आहे.

ठळक मुद्दे१० लाखावर नुकसान : अनेक मार्ग बंद,

खांबी पुलावर बस बंद पडलीलोकमत न्यूज नेटवर्कअर्जुनी-मोरगाव : मागील २४ तासात अर्जुनी-मोरगाव तालुक्यात अतिवृष्टी झाली. तीन तास बरसलेल्या मुसळधार पावसामुळे तलाव, बोड्या, नाले तुडूंब भरुन वाहत आहे. अनेक घरांची पडझड झाली आहे. मंगळवारी (दि.२१) सकाळी खांबी नाल्यावर अचानक बस बंद पडली होती, मात्र गावकऱ्यांच्या सहकार्याने सुखरुप बाहेर काढल्याने अनर्थ टळला.सोमवारी (दि.२०) दुपारी अचानक मेघ दाटून आले. रिपरिप पावसाला सुरुवात झाली. मात्र दुपारी पाऊसाचा जोर वाढला. सुमारे तीन तास पावसाने चांगलेच झोडपले. अर्जुनी-मोरगाव तालुक्यात ११७ व सडक-अर्जुनी तालुक्यात ९२.३३ मि.मी पावसाची नोंद झाली. सर्वत्र पाणीच पाणी दृष्टीस येत होते. मात्र रात्रभर रिपरिप सुरुच होती. खांबी नाल्याच्या पुलावर पाणी असल्याने खांबी-बोंडगावदेवी मार्ग बंद होता. शाळकरी विद्यार्थी शाळेत जाऊ शकले नाही. खामखुरा-महागाव व बोरी-मांडोखाल हे रस्ते अजूनही बंदच आहेत. सोमवारी सायंकाळपासून इटखेडा-महागाव, मोरगाव-निलज व खैरी-गोठणगाव मार्गावरची वाहतूक बंद होती. ती मंगळवारी सकाळी सुरु झाली.अर्जुनी-मोरगाव येथील अनेक प्रभागात अजूनही पाणी साचलेले आहे. अर्जुनी-मोरगाव तालुक्यात चार घरे पूर्णत: पडली तर १६६ घरे अंशत: व ८ गोठ्यांना नुकसान पोहचले आहे. एकूण नुुकसान १० लाखाचे वर झाले आहे. मालकनपूर येथील हेमराज पाडूरंग मेश्राम यांच्या घराजवळ असलेली सार्वजनिक विहिर खचली आहे.त्यामुळे मोठा खड्डा पडला असून याठिकाणी धोक्याची शक्यता वर्तविली जात आहे. प्रतापगड, महागाव व इटखेडा रस्त्यावरील पुलावर पाणी असल्यामुळे सोमवारी रात्री वाहतूक बंद होती. त्यामुळे महाराज्य राज्य परिवहन महामंडळाच्या बस अर्जुनी-मोरगाव येथील बसस्थानकावरच अडकून पडल्या होत्या. त्यामुळे प्रवाशांची मात्र प्रचंड गैरसोय झाली. पावसामुळे झालेल्या नुकसानीचे सर्वेक्षण सुरू केले आहे.अन् बस पुलावर बंद पडलीमंगळवारी सकाळी ६.३० ते ७ वाजताचे दरम्यान साकोली-अर्जुनी मोरगाव मार्गे खांबी ही बस खांबी पुलावर आली. पुलावर काही प्रमाणात पाणी होते. चालकाने पुलावर बस काढण्याचा प्रयत्न केला. मात्र अचानक तांत्रिक बिघाड आल्याने ती पुलावरच बंद पडली. पुराचे पाणी वाढत होते. पावसाची रिपरिप सुरुच होती. उपस्थितांनी खांबीचे सरपंच प्रकाश शिवणकर यांना भ्रमणध्वनीवर सूचना दिली. त्यांनी लगेच ट्रॅक्टर आणला. ट्रॅक्टरला दोरखंड बांधून बसला सुरक्षित बाहेर काढण्यात आले. बसमध्ये एकही प्रवाशी नव्हता. खांबी येथील गावकºयांच्या सहकार्यामुळे अनर्थ टळला.

टॅग्स :Rainपाऊसfloodपूर