शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेची आणखी २० देशांना 'नो एंट्री'; राष्ट्रीय सुरक्षेसाठी डोनाल्ड ट्रम्पच्या सरकारने घेतला निर्णय
2
आजचे राशीभविष्य, १८ डिसेंबर २०२५: या राशींना धनप्राप्ती होईल, आज यांचे विवाह जुळतील
3
कोकाटेंना भोवला सदनिका घोटाळा; आमदारकी गेली, खाते काढून घेतले!
4
किडनी विक्रीमागे सावकारी की आंतरराष्ट्रीय तस्करी?; शेतकऱ्याला कंबोडियाला पाठविणारा डॉ. क्रिष्णा पोलिसांच्या रडारवर
5
डॉ. आंबेडकर यांचा पुतळा युनेस्कोच्या मुख्यालयात हे देशासाठी गौरवास्पद! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे उद्‌गार 
6
भारतीय चवीचा जागतिक गौरव! जगभरातील सर्वोत्तम गोड पदार्थांत कुल्फी, फिरनीचा समावेश
7
आता टोल नाक्यांवर एआय, जाता येणार ८०च्या स्पीडने; थांबण्याची अन् ट्रॅफिकची कटकट संपणार, २०२६ मध्ये अंमलबजावणी
8
अणुऊर्जा क्षेत्र आता खासगी क्षेत्रासाठी खुले होणार; शांती विधेयक लोकसभेत बहुमताने मंजूर!
9
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
10
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
11
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
12
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
13
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
14
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
15
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
16
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
17
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
18
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
19
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
20
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
Daily Top 2Weekly Top 5

अर्जुनी-मोरगाव तालुक्याला पावसाने झोडपले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2018 22:13 IST

मागील २४ तासात अर्जुनी-मोरगाव तालुक्यात अतिवृष्टी झाली. तीन तास बरसलेल्या मुसळधार पावसामुळे तलाव, बोड्या, नाले तुडूंब भरुन वाहत आहे. अनेक घरांची पडझड झाली आहे.

ठळक मुद्दे१० लाखावर नुकसान : अनेक मार्ग बंद,

खांबी पुलावर बस बंद पडलीलोकमत न्यूज नेटवर्कअर्जुनी-मोरगाव : मागील २४ तासात अर्जुनी-मोरगाव तालुक्यात अतिवृष्टी झाली. तीन तास बरसलेल्या मुसळधार पावसामुळे तलाव, बोड्या, नाले तुडूंब भरुन वाहत आहे. अनेक घरांची पडझड झाली आहे. मंगळवारी (दि.२१) सकाळी खांबी नाल्यावर अचानक बस बंद पडली होती, मात्र गावकऱ्यांच्या सहकार्याने सुखरुप बाहेर काढल्याने अनर्थ टळला.सोमवारी (दि.२०) दुपारी अचानक मेघ दाटून आले. रिपरिप पावसाला सुरुवात झाली. मात्र दुपारी पाऊसाचा जोर वाढला. सुमारे तीन तास पावसाने चांगलेच झोडपले. अर्जुनी-मोरगाव तालुक्यात ११७ व सडक-अर्जुनी तालुक्यात ९२.३३ मि.मी पावसाची नोंद झाली. सर्वत्र पाणीच पाणी दृष्टीस येत होते. मात्र रात्रभर रिपरिप सुरुच होती. खांबी नाल्याच्या पुलावर पाणी असल्याने खांबी-बोंडगावदेवी मार्ग बंद होता. शाळकरी विद्यार्थी शाळेत जाऊ शकले नाही. खामखुरा-महागाव व बोरी-मांडोखाल हे रस्ते अजूनही बंदच आहेत. सोमवारी सायंकाळपासून इटखेडा-महागाव, मोरगाव-निलज व खैरी-गोठणगाव मार्गावरची वाहतूक बंद होती. ती मंगळवारी सकाळी सुरु झाली.अर्जुनी-मोरगाव येथील अनेक प्रभागात अजूनही पाणी साचलेले आहे. अर्जुनी-मोरगाव तालुक्यात चार घरे पूर्णत: पडली तर १६६ घरे अंशत: व ८ गोठ्यांना नुकसान पोहचले आहे. एकूण नुुकसान १० लाखाचे वर झाले आहे. मालकनपूर येथील हेमराज पाडूरंग मेश्राम यांच्या घराजवळ असलेली सार्वजनिक विहिर खचली आहे.त्यामुळे मोठा खड्डा पडला असून याठिकाणी धोक्याची शक्यता वर्तविली जात आहे. प्रतापगड, महागाव व इटखेडा रस्त्यावरील पुलावर पाणी असल्यामुळे सोमवारी रात्री वाहतूक बंद होती. त्यामुळे महाराज्य राज्य परिवहन महामंडळाच्या बस अर्जुनी-मोरगाव येथील बसस्थानकावरच अडकून पडल्या होत्या. त्यामुळे प्रवाशांची मात्र प्रचंड गैरसोय झाली. पावसामुळे झालेल्या नुकसानीचे सर्वेक्षण सुरू केले आहे.अन् बस पुलावर बंद पडलीमंगळवारी सकाळी ६.३० ते ७ वाजताचे दरम्यान साकोली-अर्जुनी मोरगाव मार्गे खांबी ही बस खांबी पुलावर आली. पुलावर काही प्रमाणात पाणी होते. चालकाने पुलावर बस काढण्याचा प्रयत्न केला. मात्र अचानक तांत्रिक बिघाड आल्याने ती पुलावरच बंद पडली. पुराचे पाणी वाढत होते. पावसाची रिपरिप सुरुच होती. उपस्थितांनी खांबीचे सरपंच प्रकाश शिवणकर यांना भ्रमणध्वनीवर सूचना दिली. त्यांनी लगेच ट्रॅक्टर आणला. ट्रॅक्टरला दोरखंड बांधून बसला सुरक्षित बाहेर काढण्यात आले. बसमध्ये एकही प्रवाशी नव्हता. खांबी येथील गावकºयांच्या सहकार्यामुळे अनर्थ टळला.

टॅग्स :Rainपाऊसfloodपूर