शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: मोहसीन नक्वी टीम इंडियाला ट्रॉफी द्यायला झाले तयार, पण आता ठेवली 'ही' एक अट
2
तब्बल २२ वाहने चोरणाऱ्या आंतरराज्य चोरट्याला सांगलीत अटक; १६ लाखांचा मुद्देमाल जप्त
3
चांदी दीड लाख रूपये किलो, सप्टेंबरमध्ये २१,५२७ रुपयांची झेप; सोन्याचीही ११ हजारांची उडी
4
भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार पती-पत्नी जागीच ठार; कोहमारा-वडसा मार्गावरील घटना
5
भाजपा पदाधिकाऱ्याची पत्नीसह ३ ठिकाणी मतदारयादीत नावे, एका दुकानावर २५ नावे- काँग्रेसचा आरोप
6
पंतप्रधान मोदी करणार ‘मुख्यमंत्री अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम’ कार्यक्रमाचे उद्घाटन
7
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
8
दहिसर टोलनाका वाहतूककोंडी दूर करण्यासाठी मंत्री प्रताप सरनाईक यांनी सुचवल्या उपाययोजना
9
१०० वर्षांनी हंस महालक्ष्मी योग: ८ राशींचे कल्याण, कल्पनेपलीकडे लाभ; अपार यश, भरघोस भरभराट!
10
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
11
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
12
अंधेरी क्रीडा संकुल महापालिकेने स्वतः उभारावे; गोपाळ शेट्टी यांची पालिका आयुक्तांकडे मागणी
13
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
14
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...
15
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय! आता 'या' उद्योगावर लादला १००% कर; भारताला सर्वाधिक फटका...
16
“दसरा मेळाव्याबाबत सदसद्विवेकबुद्धीला स्मरून निर्णय घ्यावा”; अजित पवारांचा रोख कुणाकडे?
17
१० वर्षांपासून सत्ता असलेल्या राज्यात भाजपाला जबर धक्का, निवडणुकीत मिळाल्या ४० पैकी केवळ ५ जागा   
18
कुठलाही क्रिकेट सामना हे सत्य बदलू शकत नाही; PM मोदींच्या ट्विटवर मोहसीन नक्वींची दर्पोक्ती
19
विघ्नहर्ता बाप्पा संकटात धावला! श्री सिद्धीविनायक मंदिर अतिवृष्टीबाधितांसाठी १० कोटी देणार
20
IND vs PAK Final : "ते स्वतः स्ट्राइकवर येऊन..." PM मोदींसंदर्भात नेमकं काय म्हणाला सूर्यकुमार यादव?

अर्जुनी-मोरगाव तालुक्याला पावसाने झोडपले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2018 22:13 IST

मागील २४ तासात अर्जुनी-मोरगाव तालुक्यात अतिवृष्टी झाली. तीन तास बरसलेल्या मुसळधार पावसामुळे तलाव, बोड्या, नाले तुडूंब भरुन वाहत आहे. अनेक घरांची पडझड झाली आहे.

ठळक मुद्दे१० लाखावर नुकसान : अनेक मार्ग बंद,

खांबी पुलावर बस बंद पडलीलोकमत न्यूज नेटवर्कअर्जुनी-मोरगाव : मागील २४ तासात अर्जुनी-मोरगाव तालुक्यात अतिवृष्टी झाली. तीन तास बरसलेल्या मुसळधार पावसामुळे तलाव, बोड्या, नाले तुडूंब भरुन वाहत आहे. अनेक घरांची पडझड झाली आहे. मंगळवारी (दि.२१) सकाळी खांबी नाल्यावर अचानक बस बंद पडली होती, मात्र गावकऱ्यांच्या सहकार्याने सुखरुप बाहेर काढल्याने अनर्थ टळला.सोमवारी (दि.२०) दुपारी अचानक मेघ दाटून आले. रिपरिप पावसाला सुरुवात झाली. मात्र दुपारी पाऊसाचा जोर वाढला. सुमारे तीन तास पावसाने चांगलेच झोडपले. अर्जुनी-मोरगाव तालुक्यात ११७ व सडक-अर्जुनी तालुक्यात ९२.३३ मि.मी पावसाची नोंद झाली. सर्वत्र पाणीच पाणी दृष्टीस येत होते. मात्र रात्रभर रिपरिप सुरुच होती. खांबी नाल्याच्या पुलावर पाणी असल्याने खांबी-बोंडगावदेवी मार्ग बंद होता. शाळकरी विद्यार्थी शाळेत जाऊ शकले नाही. खामखुरा-महागाव व बोरी-मांडोखाल हे रस्ते अजूनही बंदच आहेत. सोमवारी सायंकाळपासून इटखेडा-महागाव, मोरगाव-निलज व खैरी-गोठणगाव मार्गावरची वाहतूक बंद होती. ती मंगळवारी सकाळी सुरु झाली.अर्जुनी-मोरगाव येथील अनेक प्रभागात अजूनही पाणी साचलेले आहे. अर्जुनी-मोरगाव तालुक्यात चार घरे पूर्णत: पडली तर १६६ घरे अंशत: व ८ गोठ्यांना नुकसान पोहचले आहे. एकूण नुुकसान १० लाखाचे वर झाले आहे. मालकनपूर येथील हेमराज पाडूरंग मेश्राम यांच्या घराजवळ असलेली सार्वजनिक विहिर खचली आहे.त्यामुळे मोठा खड्डा पडला असून याठिकाणी धोक्याची शक्यता वर्तविली जात आहे. प्रतापगड, महागाव व इटखेडा रस्त्यावरील पुलावर पाणी असल्यामुळे सोमवारी रात्री वाहतूक बंद होती. त्यामुळे महाराज्य राज्य परिवहन महामंडळाच्या बस अर्जुनी-मोरगाव येथील बसस्थानकावरच अडकून पडल्या होत्या. त्यामुळे प्रवाशांची मात्र प्रचंड गैरसोय झाली. पावसामुळे झालेल्या नुकसानीचे सर्वेक्षण सुरू केले आहे.अन् बस पुलावर बंद पडलीमंगळवारी सकाळी ६.३० ते ७ वाजताचे दरम्यान साकोली-अर्जुनी मोरगाव मार्गे खांबी ही बस खांबी पुलावर आली. पुलावर काही प्रमाणात पाणी होते. चालकाने पुलावर बस काढण्याचा प्रयत्न केला. मात्र अचानक तांत्रिक बिघाड आल्याने ती पुलावरच बंद पडली. पुराचे पाणी वाढत होते. पावसाची रिपरिप सुरुच होती. उपस्थितांनी खांबीचे सरपंच प्रकाश शिवणकर यांना भ्रमणध्वनीवर सूचना दिली. त्यांनी लगेच ट्रॅक्टर आणला. ट्रॅक्टरला दोरखंड बांधून बसला सुरक्षित बाहेर काढण्यात आले. बसमध्ये एकही प्रवाशी नव्हता. खांबी येथील गावकºयांच्या सहकार्यामुळे अनर्थ टळला.

टॅग्स :Rainपाऊसfloodपूर