शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

पार्टीत वादावादी, खूप दारू पाजून मित्राचा गळा घोटून खून

By नरेश रहिले | Updated: October 30, 2023 17:59 IST

घरच्यांना पत्ता लागू नये म्हणून मृतदेह छोट्या बाघनदीच्या राणीडोह येथे फेकला

गोंदिया : पार्टी करताना झालेल्या वाद-विवादात मित्राला खूप दारू पाजून त्याचा खून करण्यात आला. त्याचा पत्ता घरच्यांना लागू नये म्हणून त्याचा मृतदेह छोट्या बाघनदीच्या राणीडोह येथे फेकून देण्यात आला. ही घटना २८ ऑक्टोबर रोजी उघडकीस आली. राकेश सुकचरण उईके (३८, रा. पिपरिया, ता. सालेकसा) असे मृताचे नाव आहे. या घटनेसंदर्भात एकावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परंतु, आरोपीची प्रकृती खराब असल्याने त्याला पोलिसांनी अटक केली नाही. आमगावसारख्या घटनेची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून गोंदिया पोलिस कारवाई करताना सतर्कता बाळगत आहेत.

सालेकसा पोलिस ठाण्यांतर्गत येणाऱ्या पिपरिया येथील आरोपी प्रकाश चमरूलाल भौतिक (४०), मृतक राकेश सुकचरण उईके (३८) व गावातीलच अन्य दोन असे चार जण १७ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६:०० वाजता गावातीलच जंगलात पार्टी करायला गेले. मद्यप्राशन करून त्यांनी मटण पार्टी केली. मृतक राकेश उईके याचा आरोपीने गळा आवळून खून केला.

चौघाही मित्रांनी दारू प्यायल्यावर पार्टी केली. त्यानंतर तिघेही परत गावाकडे आले. मृत व्यक्तीने अति प्रमाणात मद्यप्राशन केले असल्याने तो पार्टी करण्याच्या ठिकाणीच पडून होता. घराकडे माघारी आलेल्या आरोपीने परत जाऊन सालेकसा तालुक्याच्या गल्लाटोला येथील तिलक उपराडे यांच्या शेतात त्याचा गळा आवळून खून केला. २० ऑक्टोबर रोजी छोटी बाघनदी पात्रातील राणीडोहाच्या पाण्यात कुजलेल्या अवस्थेत त्याचा मृतदेह मिळून आला. यासंदर्भात मृतकची पत्नी बबीता राकेश उईके (३५, रा. पिपरिया) यांच्या तक्रारीवरून आरोपीविरूद्ध भादंविच्या कलम ३०२, २०१ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. सहायक पोलिस निरीक्षक अरविंद राऊत तपास करीत आहेत.

बेपत्ताची नोंदही नव्हती

१७ ऑक्टोबरपासून बेपत्ता असलेल्या राकेश सुकचरण उईके (३८) याच्या बेपत्ताची तक्रार घरच्यांनी पोलिसात केली नव्हती. १७ ऑक्टोबर रोजी पार्टी करण्यासाठी घरातून बाहेर पडलेल्या राकेशचा मृतदेह चौथ्या दिवशी आढळला. त्यानंतर त्याच्या पत्नीने पोलिसात खुनाची तक्रार केली आहे.पार्टी करायला गेलेल्या लोकांनी घरच्यांना का माहिती दिली नाही?

राकेश उईकेसोबत पार्टी करायला आरोपीसह तीन लोक असे एकूण चौघे गेले होते. परंतु, राकेश घरी न आल्याने कुटुंबीयांनी त्याचा शोधाशोध करून विचारपूस सुरू केली. परंतु, त्याच्यासोबत पार्टी करायला गेलेल्या तिन्ही लोकांनी कसलीही माहिती दिली नाही. एकानेच खून केला. परंतु, दोघांनी या घटनेची माहिती घरच्यांना का दिली नाही. या प्रकरणात खूप काही दडले असल्याचा संशय येतो.पुरावा नष्ट करण्यासाठी टाकले नदीत

राकेश उईके याचा दोराने गळा आवळून खून केल्यानंतर त्याचा मृतदेह नष्ट व्हावा, माशांनी खावा, यासाठी त्याचा मृतदेह छोट्या बाघनदीच्या राणीडोहाच्या पाण्यात टाकण्यात आला. परंतु, त्याचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत तीन दिवसांनंतर मिळाला. मृतदेह मिळाल्यानंतर हळूहळू गावात या घटनेची सत्यता पुढे आली. यानंतर त्याच्या पत्नीने पोलिसात तक्रार केली.नेमके काय दडवले जाते

या घटनेत चांगलीच चुरस येणार आहे. या खुनामागील खरे कारण काय हेदेखील आतापर्यंत पुढे आले नाही. तपासाचा भाग म्हणून पोलिस टाळतात. या घटनेतील लोकांनी काय माहिती दिली, आरोपीला अटक केेलेली नाही. यामुळे गावात असंतोषाचे वातावरण आहे. मृतक आणि आरोपी हे दोघेही मित्र असल्याने मित्रत्त्वात खून होण्यासारखे एवढे मोठे कारण कोणते, याचा तपास होणे गरजेचे आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीgondiya-acगोंदिया