शहरं
Join us  
Trending Stories
1
Raj Thackeray: राज ठाकरे मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंना वाढदिवसाचे काय गिफ्ट देणार; युती की शुभेच्छाच...
2
"पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विष्णूचे ११ वे अवतार, डोनाल्ड ट्रम्प त्यांना..."; भाजपा नेत्याचा मोठा दावा
3
Eknath Khadse : "दोषी असेल तर..."; रेव्ह पार्टीत जावयाला अटक होताच एकनाथ खडसेंनी स्पष्टच सांगितलं
4
'मंत्रिपदासाठी माझी जात आडवी येते; राष्ट्रवादीने मराठ्यांचा वापर केला', प्रकाश सोळंकेंचा पक्षाला घरचा आहेर
5
'गिरीश महाजन नावाचा सांड मोकाट सुटलाय; फडणवीसांना...', संजय राऊतांचे टीकास्त्र
6
Pune Rave Party: पुण्यात मोठी रेव्ह पार्टी...! एकनाथ खडसेंचा जावई ताब्यात, प्रसिद्ध बुकीसोबत दोन तरुणीही...
7
Pranjal Khewalkar Pune Rave Party: तीन फ्लॅट बुक, तीन महिला गायब...! नुसती रेव्ह पार्टी होती की आणखी काही...; मोठी अपडेट समोर
8
"पु.ल. देशपांडेंनी मला बघून विचारलं...", आठ वर्षांच्या सचिन पिळगावकरांचा आणखी एक किस्सा
9
एकनाथ खडसेंचा जावई रेव्ह पार्टीत रंगेहाथ सापडला, तरी सुषमा अंधारे म्हणतात...
10
पुण्यातील रेव्ह पार्टीत सापडलेले खडसेंचे जावई प्रांजल खेवलकर नेमका काय व्यवसाय करतात?
11
Girish Mahajan : रेव्ह पार्टीत रोहिणी खडसेंच्या पतीला अटक; गिरीश महाजन म्हणतात, "नाथाभाऊंनी जावईबापुंना..."
12
एअर इंडिया अपघात एक रहस्यच राहणार? शेवटच्या १० मिनिटांत ब्लॅक बॉक्समध्ये रेकॉर्डिंगच झाले नाही 
13
ट्रम्प यांचा युद्धविरामाचा दावा ठरला फोल; थायलंड आणि कंबोडियामधील तणाव चौथ्या दिवशीही कायम
14
धक्कादायक! हरिद्वारमधील मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी, ६ भाविकांचा मृत्यू, अनेक जण जखमी
15
हे काय चाललेय! एअर इंडियात पदावर एक, निर्णय घेतो भलताच; सरकारने एअर इंडियाला सुनावले...
16
"निलेश साबळे आणि भाऊ कदम हवे होते...", नवीन 'चला हवा येऊ द्या'च्या पहिल्या एपिसोडनंतर प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया
17
"भयंकर परिणाम होतील...", ऊर्जामंत्री एके शर्मा संतापले; वीज अधिकाऱ्याचा ऑडिओ केला शेअर
18
सोने ₹३२,००० वरून थेट १ लाखांवर! गेल्या ६ वर्षात २००% वाढ, पुढील ५ वर्षात 'इतकं' महाग होणार!
19
रात्री १२ वाजता सलमान खानची पोस्ट, म्हणाला, "बाबांचं आधीच ऐकलं असतं तर..."
20
Video - अमेरिकेत मोठी दुर्घटना टळली! टेकऑफ दरम्यान लँडिंग गियरला आग, विमानात होते १७९ जण

३५० शेतकऱ्यांचे विमा कंपनीकडे अर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2019 06:00 IST

गोंदिया जिल्ह्यात सर्वाधिक धानाची लागवड केली जाते. यंदा खरीप हंगामात एकूण १ लाख ९६ हजार हेक्टरवर धानाची लागवड करण्यात आली होती. काही शेतकरी हलक्या धानाची लागवड करतात. हा धान दिवाळी दरम्यान निघत असल्याने शेतकऱ्यांना धानाची विक्री करुन दिवाळी साजरी करण्यास आणि उधार उसणवारी फेडण्यास मदत होते.

ठळक मुद्देअवकाळीचा फटका : संयुक्त सर्वेक्षणाला सुरूवात : गाव निहाय याद्या तयार करणे सुरू : मदतीकडे शेतकऱ्यांचे लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : यंदा खरीप हंगामात जिल्ह्यातील ७० हजारावर शेतकऱ्यांनी पंतप्रधान पीक विमा योजनेतंर्गत पीक विमा काढला होता. जिल्ह्यात मागील आठवड्यात झालेल्या अवकाळीचा पावसाचा फटका धान पिकांना बसला. त्यामुळे जिल्ह्यातील ३५० शेतकऱ्यांनी विमा कंपनीकडे नुकसान भरपाईसाठी अर्ज केले. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना विमा कंपन्या कुठल्या निकषाच्या आधारावर नुकसान भरपाई देते याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.गोंदिया जिल्ह्यात सर्वाधिक धानाची लागवड केली जाते. यंदा खरीप हंगामात एकूण १ लाख ९६ हजार हेक्टरवर धानाची लागवड करण्यात आली होती. काही शेतकरी हलक्या धानाची लागवड करतात. हा धान दिवाळी दरम्यान निघत असल्याने शेतकऱ्यांना धानाची विक्री करुन दिवाळी साजरी करण्यास आणि उधार उसणवारी फेडण्यास मदत होते. हलका धान दिवाळीपूर्वीच निसविल्याने बऱ्याच शेतकऱ्यांनी धानाची कापणी केली होती. त्यामुळे कापणी केलेला धान तसाच बांध्यामध्ये पडून होता. मात्र मागील आठवड्यात जिल्ह्यात अवकाळी पाऊस जोरदार बरसला. तर दोन दिवस पाऊस झाल्याने कापणी केलेल्या धानाच्या कडपा भिजल्या. परिणामी दोन तीन दिवस बांध्यामध्ये पाणी साचून राहिल्याने काही धानाला अंकुर फुटले तर मोठ्या प्रमाणात धान पाखड झाला. जवळपास ३ हजार हेक्टरमधील पिके अवकाळी पावसामुळे प्रभावित झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. शासनाच्या निर्देशानंतर कृषी, महसूल आणि विमा कंपन्यांनी संयुक्तपणे नुकसानीचे पंचनामे तयार करण्यास सुरूवात केली आहे. ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा काढला आहे त्यांच्या धान पिकाचे नुकसान झाले असल्यास विमा कंपनीकडे अर्ज करणे अनिवार्य आहे. त्यानंतरच विमा कंपनी नुकसानीचे पंचनामे करुन नुकसान भरपाई देते. त्यामुळे आत्तापर्यंत नुकसान झालेल्या ३५० शेतकऱ्यांनी विमा कंपनीकडे अर्ज केले आहे.विमा कंपनीने प्रत्येक तालुकास्तरावर एका प्रतिनिधीची नियुक्ती केली असून जिल्हास्तरावर समन्वयकाची नियुक्ती केली आहे. त्यांच्याकडे पीक विमाधारक शेतकºयांनी अर्ज करणे आवश्यक आहे.अन्यथा त्यांना नुकसान भरपाई मिळण्यापासून वंचित राहावे लागणार आहे.नुकसान भरपाईसाठी ३३ टक्केची अटपीक विमा कंपनी आणि शासनाच्या नियमानुसार ज्या शेतकऱ्यांचे अवकाळी पावसामुळे ३३ टक्केच्यावर नुकसान झाले आहे. त्याच शेतकऱ्यांच्या याद्या तयार करण्याचे काम सध्या सुरू असल्याची माहिती आहे. त्यामुळे हेच शेतकरी नुकसान भरपाईस पात्र ठरणार आहेत.कृषी व महसूल विभाग लागला कामालाअवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करुन गाव निहाय याद्या तयार करण्याचे निर्देश शासनाने दिले आहे. या अंतर्गत कृषी आणि महसूल विभागाने पंचनामे करण्यास सुरूवात केली आहे. या नुकसानीचा अहवाल शासनाच्या संकेतस्थळावर अपलोड केला जात आहे. ही प्रक्रिया पुन्हा किमान आठ दिवस चालणार असल्याची माहिती कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.शेतकऱ्यांसाठी सर्वच राजकीय पक्ष सरसावलेजिल्ह्यात मागील आठवड्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. यामुळे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे.त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाने नुकसान भरपाई द्यावी यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी मागणी लावून धरल्याचे चित्र आहे.पाखड धान ११०० रुपये प्रतिक्विंटलकापणी केलेले धान मोठ्या प्रमाणात भिजल्याने ते पाखड झाले. शेतकरी हे धान बाजारपेठेत विक्रीस नेत असून व्यापारी त्याची पडत्या दराने खरेदी करीत आहे. सध्या पाखड झालेला धान ११०० रुपये प्रती क्विंटल दराने खरेदी केला जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना प्रती क्विंटल ७०० रुपयांचा फटका बसत आहे.धान खरेदी केंद्राचे भिजत घोंगडे कायमदिवाळी लोटत असली तरी अद्याप जिल्ह्यात आदिवासी विकास महामंडळ आणि जिल्हा मार्केटिंग फेडरेशनचे धान खरेदी केंद्र सुरू झालेले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना गरजेपोटी कमी दराने खासगी व्यापाऱ्यांना धानाची विक्री करावी लागत आहे. शासकीय धान खरेदी केंद्र केव्हा सुरू होणार याबाबत अद्यापही अनिश्चितेचे चित्र आहे.

टॅग्स :agricultureशेतीCrop Insuranceपीक विमा