शहरं
Join us  
Trending Stories
1
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
2
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
3
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
4
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
5
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
6
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
7
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
8
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
9
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
10
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
11
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
12
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
13
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
14
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
15
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
16
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
17
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
18
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
19
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
20
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज

नवोदयच्या विद्यार्थ्यांना लागणार वार्षिक १८ हजार शुल्क

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2018 21:37 IST

ग्रामीण भागातील गरीब व होतकरु विद्यार्थ्यासाठी मोफत व दर्जेदार शिक्षण मिळणाऱ्या जवाहर नवोदय विद्यालयात आता नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांना वार्षिक अठरा हजार रुपये शुल्क आकारण्यात येणार आहे.

ठळक मुद्देमोफत शिक्षणाचा बोजवारा : शेकडो विद्यार्थ्यांना भुर्दंड, पालकांमध्ये रोष

लोकमत न्यूज नेटवर्कवडेगाव : ग्रामीण भागातील गरीब व होतकरु विद्यार्थ्यासाठी मोफत व दर्जेदार शिक्षण मिळणाऱ्या जवाहर नवोदय विद्यालयात आता नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांना वार्षिक अठरा हजार रुपये शुल्क आकारण्यात येणार आहे. नवोदय विकास निधीच्या नावाखाली आकारलेल्या शुल्क रचनेमुळे पालक व विद्यार्थ्यात असंतोष आहे.केंद्र शासनाच्या मानव संसाधन विकास मंत्रालयाद्वारे तत्कालीन प्रधानमंत्री राजीव गांधी यांच्या सकल्पनेतून देशातील ग्रामीण भागातील हुशार व होतकरु विद्यार्थ्यासाठी १९८६ पासून जवाहर नवोदय विद्यालयाची स्थापना करण्यात आली. देशातील २८ घटक राज्य व ७ केंद्रशासीत प्रदेशात ही ७२९ विद्यालये कार्यान्वित आहेत.महाराष्ट्रातील ३४ जिल्ह्यात नवोदय विद्यालये आहेत. जवाहर नवोदय विद्यालयात इयत्ता दहावीला दरवर्षी प्रत्येक जिल्ह्यात ८० विद्यार्थ्याना प्रवेश परीक्षेद्वारे प्रवेश दिला जातो. दर्जेदार, गुणवत्तापूर्ण व मोफत शिक्षण त्यातही ग्रामीण भागातील विद्यार्थ्यासाठी ८० टक्के जागा राखीव असल्याने अलीकडे बहुतांश विद्यार्थ्याचा नवोदयकडे कल वाढला आहे.परंतु मागील काही वर्षापासून सर्वासाठी मोफत असलेल्या नवोदय विद्यालयात विद्यार्थ्याची वर्गवारी पाडून फी घेण्याचे सत्र शासनाने सुरु केले आहे. आधी काही वर्ष इयत्ता नववी ते बारावीपर्यंत प्रती विद्यार्थी प्रती महा २०० रुपये फी घेण्यात येत होती. ती ३१ आॅगस्ट २०१७ पासून दोनशे ऐवजी सहाशे रुपये करण्यात आली आहे. त्यातही नवोदय विद्यालय समितीने २० डिसेंबर २०१७ रोजी परिपत्रक क्र. एफ. क्र.१६-१४/२०१७/एनवीएस(एसए) १३६ नुसार नवोदय विद्यालयात इयत्ता नववी ते बारावीच्या शिक्षण घेत असलेल्या शासकीय, निमशासकीय कर्मचाऱ्यांच्या पाल्यांना दरमहा १५०० प्रमाणे वार्षीक १८ हजार रुपये शुल्क आकारण्यात आले आहे.शुल्कवाढीला विकास निधीचे नावसदर शुल्क नवोदय विकास निधीच्या गोंडस नावाखाली सर्व प्रवर्गाच्या कर्मचाºयांच्या पाल्यांना सक्तीने आकारण्यात आली.यामुळे मोफत व दर्जेदार शिक्षण देण्याच्या नवोदय विद्यालयाच्या मूळ तत्वावरच घाला घातला गेला असून सर्व विद्यार्थी व पालकांमध्ये यामुळे तीव्र असंतोष आहे.ग्रामीण भागातील गरीब व होतकरु विद्यार्थ्यासाठी मोफत शिक्षण देणाऱ्या नवोदय विद्यालयात नवोदय विकास निधीच्या नावाखाली शुल्क आकारणे म्हणजे नवोदय संपविण्याचा शासनाचा डाव आहे. आधी दोनशे मग सहाशे व आता १५०० रुपये फी आकारुन शासनाद्वारे हळूहळू सर्वच विद्यार्थ्यांना फी आकारुन आर्थिक दहशत निर्माण करीत आहे.- नाना पटोले, माजी खासदारनवोदय विद्यालय समितीचे २० डिसेंबर २०१७ चे पत्रकानुसारच इयत्ता नववी ते बारावीच्या कर्मचाºयांच्या पाल्यांसाठी फी आकारण्यात आली आहे. तशी सूचना नोटीस बोर्डावर व विद्यार्थ्याना देण्यात आली आहे.-एम.एस.बलवीर, प्राचार्य, जवाहर नवोदय विद्यालय नवेगावबांध

टॅग्स :Schoolशाळा