शहरं
Join us  
Trending Stories
1
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
2
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
3
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
4
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
5
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
6
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
7
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
8
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
9
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
10
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
11
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
12
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
13
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
14
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
15
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
16
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!
17
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
18
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?
19
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सुप्रिया सुळे घटनास्थळी; जखमींना दिला धीर, मदतीचे निर्देश
20
नागरिकांनी अपघाताची केली होती, शक्यता व्यक्त;सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाने केले दुर्लक्ष

योजनांची घोषणा केली मात्र लाभ केव्हा?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2019 21:21 IST

शेतकरी मोठा असो की लहान, शेती कोरडवाहू असो की ओलित,शेतात धान असो की भाजीपाला,आज पूर्व विदर्भातील एकही शेतकरी विवंचनेतून सुटलेला नाही. लहान शेतकऱ्याची जगण्याची तर मोठ्या शेतकऱ्याची मोठेपण टिकविण्याची धडपड सुरू आहे.

ठळक मुद्देशेतकऱ्यांची फरफट सुरूच : धान उत्पादकांना आशा

संतोष बुकावन।लोकमत न्यूज नेटवर्कअर्जुनी-मोरगाव : शेतकरी मोठा असो की लहान, शेती कोरडवाहू असो की ओलित,शेतात धान असो की भाजीपाला,आज पूर्व विदर्भातील एकही शेतकरी विवंचनेतून सुटलेला नाही. लहान शेतकऱ्याची जगण्याची तर मोठ्या शेतकऱ्याची मोठेपण टिकविण्याची धडपड सुरू आहे. लहान शेतकऱ्याची व्यथा लहान तर मोठ्या शेतकऱ्याची व्यथा मोठी आहे.मोठा शेतकरी उसणे अवसान आणून जगतो तर लहान शेतकरी आपल्या फाटलेल्या आयुष्याला ठिगळं लावण्याचा प्रयत्न करतो आहे.शेतकऱ्यांच्या नशिबात काय लिहीलं आहे तेच कळत नाही. आता हेच बघा अर्जुनी मोरगावच्या तालुका कृषी अधिकाऱ्यांनी शेतकऱ्याना अनुदानावर ट्रॅक्टर खरेदी करण्याचे पत्र दिले.त्यांनी विश्वास ठेऊन शासकीय योजनेतून ट्रॅक्टर खरेदी केले. यासाठी पदरमोड करून व होते नव्हते असे करुन सावकारांकडून कर्ज घेतले.अनुदानाचे पैसे मिळाले की कर्जाची परतफेड करण्याची स्वप्न त्यांनी पाहिली होती. तशी कबुलीही धनकोंना दिली होती.मात्र ते आज गचाळ प्रशासनाचे बळी ठरून निरुत्तर झाले आहेत. निधी उपलब्ध नसतानाही अधिकच्या शेतकऱ्यांना ट्रॅक्टर मंजूर करून खऱ्या लाभार्थ्यांना अनुदानापासून वंचित ठेवले.गेल्या पाच महिन्यापासून त्यांना अनुदानच मिळाले नाही.ते प्रशासकीय व्यवस्थेचे बळी ठरले आहेत.महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री सौरऊर्जा कृषीपंप योजना आणली.२०१६ पासून अद्याप योजनेचा लाभ मिळाला नाही. शासनाने सौरऊर्जा कृषीपंप क्षेत्रात काम करणाऱ्या टाटा, सीआरआय, मुंदरा व रविंद्र एनर्जी या चार एजन्सीला काम दिले.ज्या शेतकऱ्यांनी वीज वितरण कंपनीकडे मागणी पत्राप्रमाणे पैशाचा भरणा केला त्यांना सौरऊर्जा कृषीपंप लाऊन देण्याची जबाबदारी या एजन्सीची आहे. शासन केवळ फर्मान सोडून निर्धास्त झाले पण शेतकऱ्यांच्या शेतात कृषीपंप पोहोचले किंवा नाही, काय अडचणी आहेत हे बघण्याचे साधे सौजन्य बाळगता आले नाही हे दुर्दैव आहे.अर्जुनी मोरगाव तालुक्यात ४०८ शेतकऱ्यांच्या कृषीपंपांना मागील दोन वर्षांपासून पैसे भरूनही वीज जोडणी करण्यात आली नाही ही शोकांतिका आहे. आम्ही ५०० रु पये धान पिकाला बोनस दिले हे सांगण्याचा विसर मात्र राजकारण्यांना पडत नाही हे विशेष. शेतकरी सुखी व्हावा असं कुणालाच वाटत नाही.शासन व प्रशासनात मोठमोठी जी माणसं बसली आहेत ती शेतकऱ्यांचीच पोरं असतांना हे घडते हीच खºया अर्थाने चिंतेची बाब आहे.आता रविवारचच बघा ना, खरीप हंगामाप्रमाणे उन्हाळी धानपिकाला ५०० रुपये बोनस देण्याची मागणी करण्यात आली. मात्र मुख्यमंत्री यासंदर्भात आपल्या भाषणात काहीच बोलले नाहीत.त्यामुळे संभ्रम निर्माण झाला आहे. बुधवारी कॅबिनेट झाली त्यानंतरही असा निर्णय झाल्याचे ऐकिवात आले नाही. पालकमंत्री परिणय फुके हे सुध्दा खरीपाप्रमाणेच उन्हाळीला धान पिकाला बोनस मिळावे यासाठी अनुकुल आहे.त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या असून मोठ्या आशेने त्यांच्या नजरा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पालकमंत्री परिणय फुके यांच्याकडे लागल्या आहेत.

टॅग्स :Farmerशेतकरीgovernment schemeसरकारी योजना