शहरं
Join us  
Trending Stories
1
पायलटकडूनच मोठी चूक? दोन्ही इंजिनांचा इंधनपुरवठा सेकंदाच्या फरकाने झाला बंद
2
आजचे राशीभविष्य, १३ जुलै २०२५ : आज आर्थिक गुंतवणूक विचार पूर्वक करा
3
तीन वेळा पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केलेली, जयंत पाटलांचा राजीनामा? राष्ट्रवादी, भाजप म्हणतेय...
4
म्हाडाची जाहिरात आली; ५,२८५  घरांची लॉटरी, या दिवशी होणार बुकिंगला सुरुवात...
5
शत्रूचं ड्रोन ५ लाखांचं, पाडायला लागते १० लाखांचं मिसाइल...; ब्रिगेडिअरनी सांगितला ऑपरेशन सिंदूरचा खर्च...
6
मंत्री शिरसाट म्हणाले...पैशांची एखादी बॅग देऊ, आजकल हमारा नाम बहुत चल रहा है 
7
मेक इन इंडियाचे १०वे वर्ष;  येणार १०० रुपयांचे नाणे; कोलकाता टाकसाळीमध्ये तयार होणार विशेष नाणे
8
नवी मुंबई विमानतळाला ३० सप्टेंबरची डेडलाइन; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सिडको, अदानी समूहाला निर्देश
9
खंडाळा घाटातील ‘मिसिंग लिंक’ नोव्हेंबरपर्यंत सुरू करा; मुख्यमंत्र्यांचे आदेश
10
ईडी आरोपपत्रात रोहित पवारांचे नाव; २०२४ मध्येच चौकशी
11
बूट घ्यायलाही पैसे नव्हते; चिखलात सराव केला...
12
भारतीय न्यायव्यवस्थेपुढे अनोखी आव्हाने; सरन्यायाधीश भूषण गवई यांनी व्यक्त केली खंत
13
दुर्घटनेला महिना उलटला तरी अजूनही प्रवासी, नातेवाईक धास्तावलेलेच...
14
पोलंडची इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी क्वीन
15
बुमराहला रोखण्याच्या नादात इंग्लंड स्वत: अडकला जाळ्यात!
16
ड्युक्स चेंडूंची समस्या म्हणजे ‘मार पायाला आणि मलम डोक्याला!’, टिकतच नाहीय...
17
विमानतळावर येताच तपासणी; बॅगेत सापडले प्राणी-पक्षी
18
सोने आणखी किती भाव खाणार? २०११ सारखीच वाढ, कशाचे संकेत...
19
आमदार, मंत्र्यांना ठोकमध्ये नाइट ड्रेस घेऊन दिले तर..?
20
‘सीसीएमपी’वरून वैद्यकीय क्षेत्रात गोंधळ

तालुका दुष्काळग्रस्त घोषित करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2019 23:14 IST

तालुक्यातील ८० टक्के शेतांमधील धानाचे पºहे पूर्णत: नष्ट झाले. त्यामुळे तालुक्यात नक्कीच दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. म्हणून महाराष्ट्र शासनाने देवरी तालुका तत्काळ दुष्काळग्रस्त घोषित करावा अशी तालुका काँग्रेस पक्षाच्यावतीने करण्यात आली आहे.

ठळक मुद्देतालुका कॉँग्रेस कमिटी : मुख्यमंत्र्यांना पाठविले मागण्यांचे निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कदेवरी : तालुक्यातील ८० टक्के शेतांमधील धानाचे पºहे पूर्णत: नष्ट झाले. त्यामुळे तालुक्यात नक्कीच दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. म्हणून महाराष्ट्र शासनाने देवरी तालुका तत्काळ दुष्काळग्रस्त घोषित करावा अशी तालुका काँग्रेस पक्षाच्यावतीने करण्यात आली आहे. यासाठी मंगळवारी (दि.२३) उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन पाठविण्यात आले.सध्या सुरु असलेल्या खरीप हंगामात तालुक्यात सरासरी पेक्षा कमी पाऊस पडल्यामुळे रोवणी होऊ शकली नाही व शेतातील ८० टक्के पºहे नष्ट झाले आहेत. हंगामाची वेळ निघून गेल्यामुळे तालुक्यात नक्कीच दुष्काळ पडलेला दिसत आहे. तरी शासनाने तत्काळ देवरी तालुक्यात दुष्काळ घोषित करुन दुष्काळाचा मोबदला शेतकऱ्यांना एकरी २५ हजार रुपये द्यावा, पीक विम्याची रक्कमही शासनाने स्वत: भरावी, रोजगार हमी योजनेचे काम त्वरित सुरु करावे तसेच शासकीय रुग्णालयात औषध, डॉक्टरांची सोय व पिण्याच्या पाण्याची सोय करावी अशी मागणी तालुका कॉँग्रेस कमिटीच्यावतीने करण्यात आली आहे.आपल्या मागणीसाठी तालुका कॉँग्रेस कमिटीच्यावतीने मंगळवारी (दि.२३) उपविभागीय अधिकारी यांच्या प्रतिनिधी मार्फत राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांना निवेदन पाठविण्यात आले. निवेदन देताना, माजी आ. रामरतन राऊत, काँग्रेसचे प्रदेश प्रतिनिधी सहषराम कोरोटे, जिल्हा महिला काँग्रेस अध्यक्ष उषा शहारे, तालुकाध्यक्ष संदीप भाटीया, माजी उपसभापती संगीता भेलावे, शेडेपारच्या सरपंच माधुरी राऊत, गडेगावच्या सरपंच सविता वालदे, किसान आघाडी अध्यक्ष धनपत भोयर, युकाँचे माजी अध्यक्ष अविनाश टेंभरे, एन.एस.यु.आईचे तालुकाध्यक्ष अमित तरजुले, तालुका काँग्रेसचे उपाध्यक्ष चैनसिंग मडावी, काँग्रेसचे सक्रिय कार्यकर्ता माणिक आचले, कमलेश पालीवाल, दलित आघाडी अध्यक्ष सुरेंद्र बंसोड, सुभाष कोचे यांच्यासह तालुक्यातील बहुसंख्य शेतकरी, शेतमजूर व काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

टॅग्स :congressकाँग्रेस