शहरं
Join us  
Trending Stories
1
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
2
अश्रूंचा बांध फुटला... राजवीर यांना शेवटचा निरोप देताना पत्नी कर्नल दीपिका चौहान भावूक ( Video )
3
MHT CET 2025 Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये राज्यातील २२ जण अव्वल!
4
इराण-इस्त्रायल यांच्यातील युद्धात कोण बनणार शांतीदूत?; चीन आणि रशियानेही दिली ऑफर
5
Sonam Raghuwanshi: सोनम आणि तिच्या बॉयफ्रेंडने कशी केली राजाची हत्या? पोलीस आरोपींना घेऊन 'त्या' ठिकाणी
6
प्रक्षेपण सुरू असतानाच झाला होता हल्ला, आता इस्राइलच्या नाकावर टिच्चून त्या महिला अँकरने दिल्या बातम्या  
7
"भारतीय एजंट्सनं अपहरण केलं होतं..," फरार हिरे व्यापारी मेहुल चोक्सीचा खळबळजनक दावा
8
आर. अश्विनच्या टीमवरील बॉल टेम्परिंगचा आरोप खरा की, खोटा? TNPL आयोजकांनी निर्णय दिला, आता...
9
तुम्ही 'या' क्षेत्रात काम करताय का? सरकार दरमहा देणार ३,००० रुपये, आजच अर्ज करा!
10
अहमदाबाद विमान अपघातात २३ वर्षीय क्रिकेटपटूचा दुर्दैवी मृत्यू; टीमने वाहिली श्रद्धांजली
11
कधीही अण्वस्त्र तयार करू शकणार नाही इराण? G7 शिखर परिषदेतून तेहरानला इशारा; या सर्व देशांचा इस्रायलला पाठिंबा
12
Groww, Zerodha सह टॉप ब्रोकर्सनं २ महिन्यांत गमावले ४.७ लाख अ‍ॅक्टिव्ह ग्राहक, काय आहे कारण?
13
Israel Iran Conflict : अमेरिका आता इराणवर हल्ला करणार? ट्रम्प यांनी दिला इशारा; म्हणाले, तेहरान रिकामे करा...
14
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
15
"इराणच्या अयातुल्ला खामेनींना संपवल्यानंतरच हा संघर्ष थांबेल"; बेंजामिन नेतन्याहूंचे मोठे विधान
16
Devendra Fadnavis: स्थलांतरित शाळाबाह्य मुलांना जबरदस्तीने शाळेत आणा, मुख्यमंत्र्यांचे आवाहन
17
'सैराट'मधील हा अभिनेता लवकरच गर्लफ्रेंडसोबत बांधणार लग्नगाठ, ती दिसायला आहे खूप सुंदर
18
UPI Changes: ट्रान्झॅक्शन टाईम, बॅलन्स चेक लिमिट... UPI शी निगडीत या मोठ्या बदलांबाबत जाणून घ्या 
19
रस्त्यावरील लोखंडी वस्तूमुळे पायाला पडले १८ टाके, महापालिकेचा ढिसाळ कारभार अभिनेत्रीला पडला महागात
20
नाशिक भाजपाचा आज प्रवेशोत्सव ! माजी मंत्री बबनराव घोलप, उद्धव सेनेचे सुधाकर बडगुजर यांच्यासह दहा ते बारा माजी नगरसेवक कमळ हातात घेणार 

स्थलांतरितांच्या सोयीसाठी अन्नपूर्णा आल्या धावून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2020 05:00 IST

‘लॉकडाऊन’मुळे हातावर कमावून खाणाºयांची परवड होत आहे. मात्र अशांना मदत करण्यासाठी समाजातून कित्येकांचे हात पुढे आले आहेत. सामाजिक कार्यकर्ता व संस्थाच काय आता राजकीय पक्षांकडूनही धान्य व जेवणाची सोय करून दिली जात आहे. त्यामुळे स्थायी असलेल्या अशा गरजूंची कशी ना कशी सोय होत असल्याचे दिसत आहे. मात्र स्थलांतरण करीत असलेल्यांची समस्या कायम आहे.

ठळक मुद्देनवीन बायपासवर ‘स्टॉपेज’ : अन्नपूर्णा ग्रुप करीत आहे मजुरांची संपूर्ण व्यवस्था

कपिल केकत।लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : गरजूंच्या दोन वेळच्या जेवणाचा प्रश्न सोडविण्यासाठी आज समाजातून कित्येकांचे हात पुढे येत आहेत. धान्य व जेवणाची सोय करून गरजूंची भूक शमविली जात आहे. अशात स्थलांतरण करणाऱ्या मजुरांची परवड होत असून महिला व लहान-लहान मुलांसह त्यांचा उपाशी पोटी प्रवास सुरू आहे. अशा स्थलांतरण करणाऱ्यांच्या जेवणाची व्यवस्था करण्यासाठी येथील अन्नपुर्णा ग्रुप धावून आला आहे. नवीन बायपासवर या लोकांसाठी ग्रुुपने ‘स्टॉपेज’ दिला आहे. तेथे त्यांच्या चहा-नाश्ता व जेवण तसेच थांबण्याचीही व्यवस्था करण्यात आली आहे.‘लॉकडाऊन’मुळे हातावर कमावून खाणाºयांची परवड होत आहे. मात्र अशांना मदत करण्यासाठी समाजातून कित्येकांचे हात पुढे आले आहेत. सामाजिक कार्यकर्ता व संस्थाच काय आता राजकीय पक्षांकडूनही धान्य व जेवणाची सोय करून दिली जात आहे. त्यामुळे स्थायी असलेल्या अशा गरजूंची कशी ना कशी सोय होत असल्याचे दिसत आहे. मात्र स्थलांतरण करीत असलेल्यांची समस्या कायम आहे.हाताला काम नसल्याने खिशात पैसा नाही. अशात उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाल्याने परराज्य व जिल्ह्यात कमावण्यासाठी गेलेल्या मजुरांचे जत्थे आता परतू लागले आहेत. उपाशी व तहानलेल्या लोकांच्या या जत्थ्यांमध्ये महिला व लहान-लहान मुलांचाही समावेश आहे.पायी-पायी चालत जात असलेल्या अशा मजुरांना अन्नपूर्णा ग्रुपचे सदस्य संतोष कायते बिस्कीट तर कधी चिवडा अशी काही ना काही व्यवस्था करून देत होते. गुरूवारी (दि.२३) अशाच काही लोकांना ते बिस्कीट व चिवडा वाटत असताना हैदराबाद येथील ४०-५० जणांचा जत्था तेथे आला व त्यांच्याकडे आशेने बघू लागला. मात्र त्यांच्याकडे उरले नव्हते व कायते यांनाही हे खटकू लागले. अशात मात्र त्यांचे मित्र मनोज पटले, ईश्वर वाढई व कालू मेश्राम तेथे आले व परिस्थिती बघता त्यांनी लगेच त्यांच्या चहा-नाश्ता व जेवणाची धावपळ सुरू केली. कायते यांनी त्यांच्या शेतातील झोपडीत त्यांना थांबण्याची व बोअरवेलवर आंघोळीची सोय करून दिली. चहा-नाश्ता दिल्यानंतर त्यांना दुपारचे जेवण व शिदोरी देऊन रवाना केले.आज तर झाले मात्र दररोज येथून जाणाऱ्या गरजूंची व्यवस्था कशी करायची हा प्रश्न त्यांना खटकत होता. अशात कायते यांचे मित्र विनोद पंधरे, संतोष पटले, कि सन भगत, श्याम बिसेन, पंकज अंबुले, विजय गुप्त तसेच अन्नपूर्णा ग्रुपचे प्रतीक कदम, जयेश रामादे आदि एकत्र आले व त्यांनी लगेच स्वयंपाकासाठी लागणारे भांडे तसेच प्रत्येकी एक हजार रूपये जमा करून बायपासने जाणाºया प्रत्येकाच्या जेवणाची सोय करण्याचा संकल्प घेतला.आतापर्यंत त्यांनी २०० हून अधिक जणांना जेवण व शिदोरी देत आपले सामाजिक कर्तव्य पार पाडत आहेत.दुकानदारांना दिले मोबाईल क्रमांकबायपासवरील या चौकात काही दुकाने असून त्यांच्याकडे कायते यांनी मोबाईल क्रमांक दिले आहे. कुणालाही जेवणाची गरज असल्यास त्यांच्या मोबाईलवर संपर्क केला जातो. लगेच ते आपल्या मित्रांसोबत एकत्र येऊन जेवणाची सोय करून देत आहेत. त्यामुळे आता या मार्गाने जाणाऱ्या मजुरांसाठी तेवढीच सोय होत आहे. विशेष म्हणजे, त्यांच्या या कार्याची दखल घेत आता छोटा गोंदिया परिसरातील नागरिकही त्यांना धान्य पुरवून मदतीचा हातभार लावत आहेत.

टॅग्स :Socialसामाजिकsocial workerसमाजसेवक