शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
2
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
3
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
4
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
5
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
6
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
7
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
8
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
9
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
10
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
11
Mumbai Rain Mithi River: दोरी फेकली, पण अंदाज चुकला; मिठी नदीच्या पुरात तरुण गेला वाहून
12
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
13
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
14
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका
15
कुत्र्याला वाचवण्याच्या प्रयत्नात पोलीस अधिकाऱ्याचा जीव गेला; रस्त्यावर पडताच कारने चिरडले
16
"मी सुरक्षित आहे..." १३ दिवसांनी अर्चना तिवारीचा आईला फोन; बेपत्ता होण्यामागचं रहस्य उलगडणार?
17
निमिषा प्रियासाठी सरकार जनतेकडून ८ कोटी मागत आहे? परराष्ट्र मंत्रालयाने सत्य सांगितले
18
याला म्हणतात शेअर...! 24 तासांत 1 लाखाचे केले 88 लाख, एवढी तेजी आली की ट्रेडिगच थांबवावी लागली! नेमकं काय घडलं?
19
जिओने खिसा कापला...! १ जीबी, २८ दिवसांचा प्लॅन बंद केला; आता २९९ रुपये मोजावे लागणार
20
ऑनलाइन बेटिंग आता दंडनीय गुन्हा, केंद्रीय मंत्रिमंडळाचा गेमिंग विधेयकाला हिरवा कंदील

बालकामगार निर्मूलनासाठी सर्व समाजघटकांनी पुढाकार घ्यावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2019 05:00 IST

बालमजुरी ही एक गंभीर समस्या असून तीची पायमुळे ही समाजात खोलवर रु तलेली आहेत. बहुतांश मुले बालमजुरीत गुंतल्याने त्यांचे शिक्षण, आरोग्य, विकास आणि भविष्यातील उदरनिर्वाह यावर गंभीर परिणाम होत आहे. देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी बालमजुरी समुळ नष्ट करण्यासाठी व बालमजुरी निर्मुलनासाठी स्वयंसेवी संस्था तसेच सर्व समाज घटकांनी पुढाकार घेवून समन्वयाने काम करावे असे प्रतिपादन निवासी उपजिल्हाधिकारी महेंद्र पवार यांनी केले.

ठळक मुद्देमहेंद्र पवार : बालकामगार जनजागृत अभियानाचे उद्घाटन

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : बालमजुरी ही एक गंभीर समस्या असून तीची पायमुळे ही समाजात खोलवर रु तलेली आहेत. बहुतांश मुले बालमजुरीत गुंतल्याने त्यांचे शिक्षण, आरोग्य, विकास आणि भविष्यातील उदरनिर्वाह यावर गंभीर परिणाम होत आहे. देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी बालमजुरी समुळ नष्ट करण्यासाठी व बालमजुरी निर्मुलनासाठी स्वयंसेवी संस्था तसेच सर्व समाज घटकांनी पुढाकार घेवून समन्वयाने काम करावे असे प्रतिपादन निवासी उपजिल्हाधिकारी महेंद्र पवार यांनी केले.राज्य शासनाच्या उद्योग, ऊर्जा व कामगार विभागामार्फत ७ नोव्हेंबर ते ७ डिसेंबर कालावधीत बालकामगार जनजागृती मोहिमेच्या उद्देशातून गुरूवारी (दि.७) जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित बालकामगार जनजागृती अभियानाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी सरकारी कामगार अधिकारी गुणवंत पंधरे, नमाद महाविद्यालयाचे प्राध्यापक रु तु तुरकर, सामाजिक कार्यकर्ता डॉ.सविता बेदरकर प्रामुख्याने उपस्थित होते. प्रास्ताविकातून पंधरे यांनी, संपूर्ण अभियानाची उपस्थितांना माहिती दिली. तसेच प्रकल्पांतर्गत बालकामगार मुलांना कोणत्या सोयी-सुविधा तसेच त्यांच्यासाठी राबविण्यात येणाऱ्या कार्यक्र म व राष्ट्रीय बालकामगार प्रकल्पाची माहिती दिली. तसेच बालकामगारांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याकरीता आपण सर्वांनी प्रयत्न केले पाहिजे असे मत मांडले. तुरकर यांनी, लहान मुलांना कामावर ठेवणे हा कायदेशीर गुन्हा आहे. ही बाब सर्वांच्या लक्षात येणे आवश्यक आहे असे सांगितले. डॉ.बेदरकर यांनी, बालकामगार विषयावरती व बालकामगार प्रथा दूर करण्याकरीता प्रत्येकाने आपली जबाबदारी म्हणून कार्य करावे असे सांगितले.संचालन प्रकल्प संचालक महेंद्र रंगारी यांनी केले. आभार कार्यक्र म व्यवस्थापक नितीन डबरे यांनी मानले. कार्यक्र माला शिक्षण विभाग, आरोग्य विभाग, नगरपरिषद, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, सामाजिक न्याय विभाग, जिल्हा महिला बाल विकास तसेच जिल्हा बालसंरक्षण अधिकारी यांच्या कार्यालयातील कर्मचारी तसेच सहायक कामगार आयुक्त व सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. शेवटी मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.

टॅग्स :Socialसामाजिक