शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतासारख्या कणखर सहकाऱ्यासोबतचे संबंध खराब करू नका"; ट्रम्प यांना निकी हेली यांनी सुनावले
2
खेड प्रेम प्रकरण: "मठाच्या नावाखाली अनेक..."; प्राजक्ताच्या वडिलांचे विश्वनाथ गोसावीवर गंभीर आरोप
3
Video: "आता मी हिंदीत बोलू????"; मराठीत बोलत असतानाच काजोल भडकली, बघा काय घडलं?
4
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 
5
हीरक महोत्सवी महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
6
खूशखबर... नागपूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसचा लवकरच शुभारंभ; PM मोदी दाखविणार हिरवा झेंडा 
7
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
8
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
9
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
10
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
11
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
12
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
13
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
14
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
15
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
16
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
17
Dharali floods: ताशी 43 किमी वेग... 1230 फूट उंचावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
18
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
19
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
20
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?

जुन्या पेन्शनसाठी सर्व विभागांनी एकत्र लढा द्यावा

By admin | Updated: March 16, 2017 00:30 IST

केंद्र शासनाने १ जानेवारी २००४ व महाराष्ट्र शासनाने १ नोव्हेंबर २००५ पासून जुनी पेंशन योजना बंद करून नवीन अंशदायी पेंशन योजना लागू केली.

गोंदिया : केंद्र शासनाने १ जानेवारी २००४ व महाराष्ट्र शासनाने १ नोव्हेंबर २००५ पासून जुनी पेंशन योजना बंद करून नवीन अंशदायी पेंशन योजना लागू केली. त्यामुळे आयुष्यभर शासनाची सेवा करून म्हतारपणी भीक मागण्याची पाळी सरकारी कर्मचाऱ्यांवर येणार आहे. अशी पाळी येवू नये यासाठी सर्व विभागांनी जुन्या पेंशनसाठी एकत्र येवून लढा तीव्र करण्याची गरज आहे, असे महाराष्ट्र राज्य जुनी पेंशन हक्क संघटनेने प्रसिद्धीपत्राद्वारे आवाहन केले आहे. नवीन अंशदायी पेंशन योजनेचा विरोध करून जुनी पेंशन योजना लागू करावी, या मागणीसाठी संपूर्ण राज्यात ‘महाराष्ट्र राज्य जुनी पेंशन हक्क संघटन’ कार्य करीत आहे. आतापर्यंत हिवाळी अधिवेशन, मुंबई येथील आर्थिक अधिवेशनावर मोर्चे, निदर्शने करून निवेदने देण्यात आलीत. परंतु हा लढा तीव्र करण्यासाठी शासनाच्या सर्व विभागातील नवीन/जुनी पेंशन धारक कर्मचाऱ्यांनी एकत्र येण्याची गरज आहे. महाराष्ट्र शासन, खासगी, स्थानिक स्वराज्य संस्था अंतर्गत महसूल, आरोग्य, शिक्षण, पंचायत, पाटबंधारे, महिला बालकल्याण, तंत्र शिक्षण, वन, बांधकाम, सामान्य प्रशासन, गृह, भूमीअभिलेख, कृषी, पशुसंवर्धन, नगर विकास, वित्त व सर्वच विभागातील नवीन पेंशनधारक कर्मचाऱ्यांनी एकत्र येवून जुनी पेंशन मागणीचा लढा तीव्र करावे. नवीन पेंशन योजनेला संपूर्ण देशात विरोध आहे. तामिळनाडू राज्यात कुणीच कर्मचाऱ्याने एनपीएस स्वीकारले नाही. तेथे जुनी पेंशन लागू करण्यासाठी शासनानेच समिती गठित केली. व्ययक्तिक याचिकेवर अलाहाबाद उच्च न्यायालयाने नवीन पेंशन योजनेसंदर्भात राज्य व केंद्र सरकारला बारा आठवड्यात आपले मत सादर करण्यास सांगितले. तसेच महाराष्ट्र शासनानेसुद्धा त्रुटी मान्य करीत मृत कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाचा प्रश्न सोडविण्यासाठी वित्तमंत्री मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित केली. त्यामुळे जुनी पेंशन मागणीचा लढा तीव्र करण्यासाठी सर्व विभागांनी एकत्र यावे, असे आवाहन संघटनेच्या वतीने संदीप सोमवंशी यांनी केले.