शहरं
Join us  
Trending Stories
1
'काळजी करू नका; तुम्हाला जे हवे, तेच होणार', पहलगामबाबत राजनाथ सिंह यांचे सूचक विधान
2
कुख्यात नक्षलवाद्याला दहशतवाद विरोधी पथकाने केली अटक, ६-७ वर्षांपासून होता फरार
3
PBKS vs LSG : बॅटिंग-बॉलिंगमध्ये 'सिंग इज किंग शो'; पंतच्या लखनौसमोर श्रेयस अय्यरच्या पंजाबचा 'भांगडा'
4
"...त्यासाठी सुंदर महिलांना अमेरिकेत पाठवा’’, ज्येष्ठ पत्रकाराचा पाकिस्तानला अजब सल्ला, आता होतेय टीका   
5
सीमेवर तणाव, त्यात पाकिस्तानच्या या मित्रदेशाने थेट कराचीला पाठवली युद्धनौका, कारण काय?
6
विमानतळावर उतरताना भिंतीवर आदळले विमान, वैमानिकाने उडी मारून वाचवले प्राण
7
नागपुरात शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्याविरोधात विनयभंग, फसवणुकीचा गुन्हा दाखल
8
पाच लग्नं केली, सहाव्याच्या तयारीत होता, पण पीडित पत्नीने घेतली पोलिसांत धाव, पोलिसाचाच कारनामा झाला उघड
9
सेंच्युरी हुकली; फिफ्टी प्लस धावसंख्येसह प्रभसिमरन याने साधला मोठा डाव; गेलच्या विक्रमाशी बरोबरी
10
मोदी पहलगाममधील दहशतवाद्यांना धडा कधी शिकवणार? काँग्रेस नेत्याचा सवाल, राफेलला म्हटलं खेळणं  
11
अजिंक्य रहाणेनं घेतलेला कॅच भारीच! याशिवाय या दोन गोष्टींची रंगली चर्चा (VIDEO)
12
चार पैकी दोन दहशतवादी काश्मिरी, पर्यटकांशी मैत्री केली आणि..., पहलगाम हल्ल्याबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट  
13
KKR vs RR : "हम तो डूबे हैं सनम तुम को भी ले डूबेंगे..." गाणं वाजलंच होतं, पण कॅसेट गुंडाळलं अन्...
14
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी चालवली रिक्षा
15
IPL 2025 : रियान परागचा मोठा पराक्रम; ६ चेंडूत सलग ६ षटकार मारत सेट केला नवा रेकॉर्ड
16
IND W vs SL W: श्रीलंकेच्या नीलाक्षी दा सिल्वाचं वादळी अर्धशतक; भारताचा तीन विकेट्सने पराभव
17
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
18
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
19
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
20
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या

जुन्या पेन्शनसाठी सर्व विभागांनी एकत्र लढा द्यावा

By admin | Updated: March 16, 2017 00:30 IST

केंद्र शासनाने १ जानेवारी २००४ व महाराष्ट्र शासनाने १ नोव्हेंबर २००५ पासून जुनी पेंशन योजना बंद करून नवीन अंशदायी पेंशन योजना लागू केली.

गोंदिया : केंद्र शासनाने १ जानेवारी २००४ व महाराष्ट्र शासनाने १ नोव्हेंबर २००५ पासून जुनी पेंशन योजना बंद करून नवीन अंशदायी पेंशन योजना लागू केली. त्यामुळे आयुष्यभर शासनाची सेवा करून म्हतारपणी भीक मागण्याची पाळी सरकारी कर्मचाऱ्यांवर येणार आहे. अशी पाळी येवू नये यासाठी सर्व विभागांनी जुन्या पेंशनसाठी एकत्र येवून लढा तीव्र करण्याची गरज आहे, असे महाराष्ट्र राज्य जुनी पेंशन हक्क संघटनेने प्रसिद्धीपत्राद्वारे आवाहन केले आहे. नवीन अंशदायी पेंशन योजनेचा विरोध करून जुनी पेंशन योजना लागू करावी, या मागणीसाठी संपूर्ण राज्यात ‘महाराष्ट्र राज्य जुनी पेंशन हक्क संघटन’ कार्य करीत आहे. आतापर्यंत हिवाळी अधिवेशन, मुंबई येथील आर्थिक अधिवेशनावर मोर्चे, निदर्शने करून निवेदने देण्यात आलीत. परंतु हा लढा तीव्र करण्यासाठी शासनाच्या सर्व विभागातील नवीन/जुनी पेंशन धारक कर्मचाऱ्यांनी एकत्र येण्याची गरज आहे. महाराष्ट्र शासन, खासगी, स्थानिक स्वराज्य संस्था अंतर्गत महसूल, आरोग्य, शिक्षण, पंचायत, पाटबंधारे, महिला बालकल्याण, तंत्र शिक्षण, वन, बांधकाम, सामान्य प्रशासन, गृह, भूमीअभिलेख, कृषी, पशुसंवर्धन, नगर विकास, वित्त व सर्वच विभागातील नवीन पेंशनधारक कर्मचाऱ्यांनी एकत्र येवून जुनी पेंशन मागणीचा लढा तीव्र करावे. नवीन पेंशन योजनेला संपूर्ण देशात विरोध आहे. तामिळनाडू राज्यात कुणीच कर्मचाऱ्याने एनपीएस स्वीकारले नाही. तेथे जुनी पेंशन लागू करण्यासाठी शासनानेच समिती गठित केली. व्ययक्तिक याचिकेवर अलाहाबाद उच्च न्यायालयाने नवीन पेंशन योजनेसंदर्भात राज्य व केंद्र सरकारला बारा आठवड्यात आपले मत सादर करण्यास सांगितले. तसेच महाराष्ट्र शासनानेसुद्धा त्रुटी मान्य करीत मृत कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाचा प्रश्न सोडविण्यासाठी वित्तमंत्री मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित केली. त्यामुळे जुनी पेंशन मागणीचा लढा तीव्र करण्यासाठी सर्व विभागांनी एकत्र यावे, असे आवाहन संघटनेच्या वतीने संदीप सोमवंशी यांनी केले.