शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
2
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
3
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
4
मोहम्मद युनूस यांचा मोठा निर्णय; शेख हसीन यांच्या ‘अवामी लीग’वर आणली बंदी
5
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
6
"पाकिस्तानी लोक 'ऑफिशियल भिकमंगे'..."; असदुद्दीन ओवेसींनी पाकड्यांची पार लक्तरं काढली!
7
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
8
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
9
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
10
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
11
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
12
पाकिस्तानसोबतच्या युद्धविरामावर असदुद्दीन ओवेसींनी उपस्थित केलं प्रश्नचिन्ह, सरकारला विचारले चार सवाल  
13
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
14
"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास   
15
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
16
पुढे धोका आहे! रात्री मोबाईलचा जास्त वापर करणं 'डेंजर'; शरीरातील 'हा' हार्मोन होतो कमी अन्...
17
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
18
Operation Sindoor Live Updates: दिल्ली विमानतळाकडून प्रवाशांना मार्गदर्शक सूचना जारी
19
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
20
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video

सर्वपक्षीय शांती मोर्चाचे पोलिसांना साकडे

By admin | Updated: April 12, 2016 04:11 IST

आमदार गोपालदास अग्रवाल यांच्यावर शनिवारी सायंकाळी झालेल्या हल्ल्यामुळे गेल्या दोन दिवसांपासून गोंदिया

गोंदिया : आमदार गोपालदास अग्रवाल यांच्यावर शनिवारी सायंकाळी झालेल्या हल्ल्यामुळे गेल्या दोन दिवसांपासून गोंदिया शहरासह जिल्हाभरात निर्माण झालेले तणावसदृश वातावरण सोमवारी सायंकाळी निवळले. मात्र गोंदियात बाजारपेठ दिवसभर बंद होती. आरोपींना अटक करण्याच्या मागणीसाठी सर्वपक्षीय शांतीमोर्चा काढून उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. त्यानंतर बंद मागे घेत असल्याचे काँग्रेसकडून एका पत्रकाद्वारे जाहीर करण्यात आले.पत्रपरिषद सुरू असताना अचानक येऊन हल्ला करणारे नगरसेवक शिव शर्मा व सहकारी राहुल श्रीवास हे ४८ तासानंतरही पोलिसांच्या हाती लागले नाही. त्यांना अटक करा आणि गोंदियावासीयांना दहशतीतून मुक्त करा, अशी मागणी सोमवारी सर्वपक्षीय शांती मोर्चाने पोलीस प्रशासनाकडे केली. एसडिपीओ राठोड यांनी आरोपींचा शोध घेण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू असून यात कोणतीही हलगय सुरू नसल्याचे आ.राजेंद्र जैन, जिल्हा परिषद अध्यक्ष उषाताई मेंढे, जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष पुरूषोत्तम कटरे, भंडारा-गोंदिया लोकसभा युवक काँग्रेस अध्यक्ष प्रफुल्ल अग्रवाल, जि.प.सभापती पी.जी.कटरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विनोद हरिणखेडे आदींच्या शिष्टमंडळाला सांगितले. या मोर्चात राष्ट्रवादीचे जि.प.मधील गटनेता गंगाधर परशुरामकर, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे उपाध्यक्ष राधेलाल पटले, काँग्रेसचे जिल्हा महासचिव आणि आदिवासी नेते सहेसराम कोरोटे, माजी मंत्री भरतभाऊ बहेकार, अमर वराडे, राईस मिलर्स असोसिएशनचे अध्यक्ष अशोक अग्रवाल, माजी अध्यक्ष दामोधर अग्रवाल, विशाल अग्रवाल, डॉ.झामसिंग बघेले, राजेश नंदागवळी, दीपक नशिने, राकेश ठाकूर, अशोक शहारे, संदीप ठाकूर यांच्यासह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. निषेध मोर्चा व सभेचे संचालन जिल्हा काँग्रेसचे महासचिव अपूर्व अग्रवाल यांनी केले. (जिल्हा प्रतिनिधी)अग्रवाल मुंबईला रवाना४हल्ल्याने झालेल्या दुखापतीमुळे दोन दिवसांपासून गोंदियातील खासगी रुग्णालयात उपचार घेत असलेले आ.गोपालदास अग्रवाल सोमवारी पुढील उपचारासाठी मुंबईला रवाना झाले. नाकातून बराच वेळ थेंब-थेंब रक्तप्रवाह झाल्यामुळे अंतर्गत दुखापतीची तपासणी तिथे केली जाणार आहे. तिथेच ते प्रकृती सावरल्यानंतर विधानसभा अधिवेशनालाही हजेरी लावणार आहे.शर्माचा सर्वत्र शोध सुरू४या प्रकरणातील मुख्य आरोपी आणि भाजपातून निलंबित केलेले नगरसेवक शिव शर्मा यांचा गोंदिया, बालाघाटसह इतरही भागात सुरू आहे. मात्र पोलिसांना त्यांचा कोणताही सुगावा लागलेला नाही. अपर पोलीस अधीक्षक संदीप पखाले यांच्या नेतृत्वातील पथकांकडून शोधमोहीम सुरू आहे. दरम्यान शर्मांना अटक झाली नसली तरी गोंदियातील वातावरण मंगळवापासून पूर्वपदावर येणार आहे.अनेक दिग्गजांकडून प्रकृतीची विचारणा४काँग्रेसचे ज्येष्ठ आमदार या नात्याने आ.अग्रवाल यांच्या प्रकृतीची प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा.अशोक चव्हाण, काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी मोहन प्रकाश, माजी केंद्रीय मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेता खा.प्रफुल्ल पटेल, माजी प्रदेशाध्यक्ष माणीकराव ठाकरे, राधाकृष्ण विखे पाटील, पतंगराव कदम यांच्यासह अनेक नेत्यांनी चौकशी करून त्यांना धीर दिला.आमगावात काँग्रेसचे निवेदनआमगाव : नगरात रविवारी काँग्रेस पक्षाच्या वतीने बंदचे आवाहन केले होते. यादरम्यान गांधी चौकात निषेध सभा घेऊन तहसीलदार व ठाणेदारांना निवेदन देण्यात आले. हल्लेखोर शिव शर्माला अटक करा अशी मागणी त्यात करण्यात आली. यावेळी काँग्रेसचे पदाधिकारी धिरेश पटेल, सुरेंद्र मिश्रा, इसुलाल भालेकर, राजकुमार फुंडे, केशरीचंद सेठीया, रामसिंह चव्हाण व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.(तालुका प्रतिनिधी)सडक-अर्जुनीत पाळला बंद सडक-अर्जुनी : अग्रवाल यांच्यावरील हल्ल्याचे पडसाद सोमवारी (दि.११) सडक-अर्जुनी येथे उमटले. काँग्रेस पक्षाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी संपूर्ण सडक-अर्जुनी तालुका बंदचे आवाहन केले होते. सोमवारला सकाळपासून सर्व दुकाने बंद दिसून आली. काही तुरळक ठिकाणी दुकाने चालू होती. ती कार्यकर्त्यांनी बंद पाडली. दुकानदारांनी बंदला चांगलाच प्रतिसाद दिला. या बंदसाठी काँग्रेस तालुका अध्यक्ष निताराम देशमुख, रामलाल राऊत, शेषराव गिऱ्हेपुंजे, जि.प.सदस्य शारदा कापगते, राजेश नंदागवळी, विलास कापगते, दिनेश कोरे, राजू पटले, अनिल राजगिरे, नगर पंचायत सदस्य रिहान शेख, नगर पंचायत सदस्य अभय राऊत, महम्मद शाहीद पटेल, निशांत राऊत आणि असंख्य कार्यकर्त्यांनी पुढाकार घेतला. (तालुका प्रतिनिधी)