शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता विजयला पाहण्याचा नादात तमिळनाडूत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा गेला जीव, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता
2
९ वर्षांची मुलगी बेपत्ता झाल्याची बातमी अन्... विजयच्या रॅलीत ३६ जणांचा मृत्यू, पाण्याच्या बाटल्या फेकत होता अभिनेता
3
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
4
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
5
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
6
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
7
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
8
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
9
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
10
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
11
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
12
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
13
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
14
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
15
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
16
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
17
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
18
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
19
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...
20
“पूरग्रस्तांचे संसार पुन्हा उभे करण्यासाठी सर्वस्व पणाला लावू”; अजित पवारांचा VCद्वारे संवाद

कृषी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरु

By admin | Updated: June 14, 2017 00:36 IST

मृद व जलसंधारण विभागाकडे अधिकारी व कर्मचारी वर्ग देण्यापूर्वी कृषी विभागाचा सुधारित आकृतीबंध तातडीने करण्यात यावा,

काळ्या फिती लावून कामकाज : तालुका कृषी अधिकाऱ्यांना दिले निवेदन लोकमत न्यूज नेटवर्क बोंडगावदेवी : मृद व जलसंधारण विभागाकडे अधिकारी व कर्मचारी वर्ग देण्यापूर्वी कृषी विभागाचा सुधारित आकृतीबंध तातडीने करण्यात यावा, या मागणीसाठी कृषी कर्मचाऱ्यांनी सोमवारपासून (दि.१२) आंदोलनाचा पवित्रा उगारला असून काळ्या फित लावून कामकाज केले. तालुक्यातील कृषी कर्मचाऱ्यांच्या वतीने दिलेल्या निवेदनानुसार, राज्य शासनाने स्वतंत्र मृद व जलसंधारण विभाग नुकताच स्थापन केला आहे. परंतु कृषी विभागाचा सुधारित आकृतीबंध काय असेल याबाबत कृषी विभागातील अधिकारी व कर्मचारी यांच्यामध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. मृद व जलसंधारण विभागाने कृषी सहायकास पदोन्नतीने मिळणाऱ्या पर्यवेक्षकाची सर्वच पदे स्वत:कडे घेतली आहेत. त्यामुळे भविष्यात कृषी सहायकांना पदोन्नतीला पद राहणार नाही. कृषी विभागामध्ये बरीच पदे आजघडीला रिक्त आहेत. कृषी विभागाचा सुधारित आकृतीबंध तातडीने तयार करण्यात यावा. कृषी सहायकांचे पदनाम सहाय्यक कृषी अधिकारी करावे. कृषी सहायकांमधून कृषी पर्यवेक्षकांची पदे शंभर टक्के पदोन्नतीने भरण्यात यावे, सदर प्रस्तावास सामान्य प्रशासन विभाग, विधी न्याय विभाग यांनी यापूर्वीच मान्यता दिली आहे. परीक्षेची अट रद्द करावी, कृषी सेवक पदाचा तीन वर्षाचा कालावधी हा शिक्षण सेवकाप्रमाणे आश्वासीत प्रगती योजना व इतर सर्व लाभांसाठी ग्राह्य धरण्यात यावा इत्यादी मागण्यांसाठी कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांनी सोमवारपासून (दि.१२) आंदोलनाचा मार्ग अवलंबलेला आहे. अर्जुनी-मोरगाव तालुका कृषी अधिकारी कार्यालयांतर्गत सर्वच कर्मचाऱ्यांनी काळया फिती लावून कामकाज केले. आपल्या मागण्यांचे निवेदन तालुका कृषी अधिकारी कार्यालयातील अधिकारी ढाकले यांच्याकडे दिले. आंदोलनात अविनाश हुकरे, भारती येरणे, पी.एम. सूर्यवंशी, व्ही.पी. कवासे, डी.एम. शहारे, एफ.एम. कापगते, पी.बी. काळे, आर.एच. मेश्राम, सी.आर. मसराम, पी.के. खोटेले, एम.टी. येळणे, बी.एम. नखाते, एन.एन. बोरकर, वाय.बी. मोहतुरे, जी.एस. पुस्तोडे, एस.एफ. ठवकर, व्ही.आर. औरासे, पी.बी. वासनिक, एस.एन. बोचरे आदींचा सहभाग होता. ऐन शेती हंगामात कृषी कर्मचाऱ्यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतल्याने शेतकरी बांधव कृषी मार्गदर्शनास मुकण्याची परिस्थिती निर्माण झालेली दिसत आहे. विविध टप्प्यात आंदोलन आंदोलनाच्या पावित्र्यात असलेल्या कृषी कर्मचाऱ्यांनी आंदोलनाचे विविध टप्पे अंगिकारले आहे. १२ ते १४ जूनपर्यंत काळ्या फिती लावून कामकाज करणे, १५ ते १७ जून या कालावधीत लेखणी बंद आंदोलन, १९ जून रोजी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयावर निदर्शने व धरणे आंदोलन, २१ ते २३ जून रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर साखळी उपोषण, २७ जूनला विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयावर निदर्शने व धरणे, १ जुलैला कृषी आयुक्त कार्यालयावर मोर्चा आणि अखेर मागण्यांची पूर्तता न झाल्यास १० जुलैपासून बेमुदत कामबंद करण्याचा पवित्रा कृषी कर्मचाऱ्यांनी घेतला आहे.