शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

दीड वर्षानंतर आजपासून वाजणार शाळांची घंटा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2021 05:00 IST

जिल्ह्यात १६६३ एकूण शाळा आहेत; परंतु वर्ग पाचवी ते १२ वीच्या शाळाच सुरू राहणार असल्याने ग्रामीण भागातील वर्ग पाचवी ते १२वीच्या १०२६ शाळा; तर शहरी भागातील आठवी ते १२ वीच्या १२३ शाळा सुरू राहणार आहेत. यात ग्रामीण भागातील पाचवी ते ७वीचे ४१ हजार ६३३ विद्यार्थी, तर आठवी ते १२वीचे ६४ हजार ३८८ विद्यार्थी शाळेत जाणार आहेत. शहरी भागातील वर्ग आठवी ते १२ वीचे २९ हजार ४९८ विद्यार्थी शाळेत जाणार आहेत. 

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया :  तब्बल दीड वर्षाच्या कालावधीनंतर आज, सोमवारपासून (दि. ४) शहरी आणि ग्रामीण भागांतील जिल्ह्यातील ११५९ शाळा सुरू होत आहेत. कोरोनाच्या सावटाखाली या शाळा सुरू होत असल्याने मुख्याध्यापक आणि शिक्षकांना विद्यार्थ्यांची विशेष काळजी घ्यावी लागणार आहे. सोमवारपासून शाळा सुरू होणार असल्याने विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी शिक्षक कामाला लागल्याचे चित्र होते. ७ ऑक्टोबरपासून मंदिराचे द्वार उघडणार असल्याने शाळा आणि मंदिराची घंटा वाजण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. राज्य सरकारने वर्ग पाचवी ते सातवीच्या शाळा ४ ऑक्टोबरपासून सुरू करण्याच्या निर्णय घेतल्याने गोंदिया जिल्ह्यातील ११४९ शाळा सुरू होणार आहेत. या शाळांत जिल्ह्यातील एक लाख ३५ हजार ५१९ विद्यार्थी शाळेत जाणार आहेत. जिल्ह्यात १६६३ एकूण शाळा आहेत; परंतु वर्ग पाचवी ते १२ वीच्या शाळाच सुरू राहणार असल्याने ग्रामीण भागातील वर्ग पाचवी ते १२वीच्या १०२६ शाळा; तर शहरी भागातील आठवी ते १२ वीच्या १२३ शाळा सुरू राहणार आहेत. यात ग्रामीण भागातील पाचवी ते ७वीचे ४१ हजार ६३३ विद्यार्थी, तर आठवी ते १२वीचे ६४ हजार ३८८ विद्यार्थी शाळेत जाणार आहेत. शहरी भागातील वर्ग आठवी ते १२ वीचे २९ हजार ४९८ विद्यार्थी शाळेत जाणार आहेत. 

कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे करावे लागणार पालन - आज, सोमवारपासून शाळा सुरू असून यासाठी शासनाने शाळांना काही नियमांचे पालन करण्याच्या सूचना केल्या आहेत. यात शाळेत हेल्थ क्लिनिक सुरू करण्याचे तसेच प्रत्येक विद्यार्थ्याचे नियमित तापमान मोजणे व प्रवेशद्वारावरच त्यांचे सॅनिटायझिंग करण्याची व्यवस्था करावी लागणार आहे. तसेच सर्व शिक्षक आणि कर्मचाऱ्यांना लसीचे दोन्ही डोस घेणे आवश्यक आहे. शाळा सुरुवात होताच दोन आठवडे अभ्यासाला सुरुवात न करता खेळमेळीच्या वातावरणात शिकविण्याचे निर्देश दिले आहे. 

दिवाळीनंतर वर्ग पहिली ते चौथीच्या उघडणार शाळा- शिक्षण अप्पर मुख्य सचिव वंदना कृष्णा यांनी ३० सप्टेंबर रोजी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे महाराष्ट्रातील सर्व शिक्षणाधिकाऱ्यांची बैठक घेऊन त्या बैठकीत वर्ग पहिली ते चौथीच्या शाळा दिवाळीनंतर सुरू करण्याचे संकेत दिले आहेत.

विद्यार्थी व पालकांनाही उत्सुकता - कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मागील दीड वर्षापासून पाचवी ते सातवीपर्यंतच्या शाळा प्रत्यक्षात सुरू झाल्या नाहीत; त्यामुळे विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणावरच अवलंबून राहावे लागत होते. या प्रकाराने विद्यार्थी आणि त्यांचे पालकही कंटाळले होते. मात्र आता आज, सोमवारपासून प्रत्यक्षात शाळा सुरू असल्याने विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड उत्साह आहे. पालकांना उत्सुकता असली तरी तेवढीच काळजीदेखील कायम आहे. 

मंदिराबाबत अद्याप मार्गदर्शक सूचना नाही 

- राज्य सरकारने ७ ऑक़्टोबरपासून मंदिर उघडण्याचे निर्देश दिले आहे. मात्र मंदिरात भाविकांना प्रवेश देताना कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे काटेकोरपणे पालन करायचे आहे. जिल्हा प्रशासनाकडून सोमवारी सविस्तर मार्गदर्शक सूचना काढण्यात येणार असल्याची माहिती आहे. 

 

टॅग्स :Schoolशाळा