शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

पत्नीपाठोपाठ पतीचीही प्राणज्योत मालवली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2018 23:41 IST

जन्म-मृत्यू हा नैसर्गिक असून कोणाच्याही हाती नाही. सांसारिक जीवनाचा गाडा चालविताना पती-पत्नीची साथ महत्वपूर्ण असते. मात्र कमावता पती आजारी पडल्याने पत्नीने कुटुंबाचा भार उलचला असताना ध्यानीमनी नसताना पत्नीचा मृत्यू झाला. हा धक्का सहन न झाल्याने आजारी पतीनेसुद्धा, पत्नीचे अंत्यसंस्कार करून नातलग घरी येताच जीव सोडला.

ठळक मुद्देमुलगा झाला अनाथ : एका दिवसाच्या फरकाने सारख्या वेळेवर मृत्यू

लोकमत न्यूज नेटवर्कबोंडगावदेवी : जन्म-मृत्यू हा नैसर्गिक असून कोणाच्याही हाती नाही. सांसारिक जीवनाचा गाडा चालविताना पती-पत्नीची साथ महत्वपूर्ण असते. मात्र कमावता पती आजारी पडल्याने पत्नीने कुटुंबाचा भार उलचला असताना ध्यानीमनी नसताना पत्नीचा मृत्यू झाला. हा धक्का सहन न झाल्याने आजारी पतीनेसुद्धा, पत्नीचे अंत्यसंस्कार करून नातलग घरी येताच जीव सोडला.एकमेकांच्या सुख:दु:खात सहभागी होवून, काबाड-कष्ट करुन मुलाबाळांच्या सुखमय जीवनासाठी जन्मदात्यांची अविरत धडपड असते. घरचा कमवता गेल्या काही महिन्यांपासून प्रकृती बरी नसल्यामुळे खाटेवर पडला होता. कमावती पत्नी व एका अविवाहित मुलाने घर सांभाळला. अशातच एकाएकी पत्नी अंतकला गुरुवारी दुपारी ३.२० वाजता मृत्युमुखी पडली. तिच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार दुसऱ्या दिवशी शुक्रवारी (दि.६) दुपारी नातलगांच्या उपस्थितीत करण्यात आले. सर्व मंडळी घरी आली. दरम्यान इकडे अंथरुणावर पडलेला पती मयाराम यांची ४.२० वाजताच प्राणज्योत मालविल्याची घटना घडली. सर्व आप्तस्वकीय आलेलेच असल्याने मयारामच्या पार्थिवावर पत्नीच्या समाधीजवळच अंत्यसंस्कार उरकवण्याची दुर्दैवी पाळी येथील बारगसाडे कुटुंबावर आली. या पती-पत्नीच्या सलग मृत्यूमुळे गावात सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.बोंडगावदेवी येथे मयाराम मंगरु बारसागडे (६२), पत्नी अंतकला बारसागडे (५५) व एक अविवाहित मुलगा गजानन (२५) हे तिघेही राहत होते. दोघाही पती-पत्नीने स्वत:च्या अंगमेहनतीने काबाडकष्ट करुन दोन मुलींचा विवाह केला.पती-पत्नीच्या परस्परांवर असलेल्या प्रेमाने ते दोघेही गोडीगुलाबीने आपल्या कुटुंबाचा चरितार्थ चालवित होते. अशा या सुखी संसारावर काळाने घाला घातला. एकाच दिवशी पती-पत्नीवर अंतिम संस्कार होणे हा एक योगायोगच म्हणावा लागेल. आयुष्यात दोघांनीही कष्ट केले. दोघेही एकमेकांच्या सोबतीला राहत होते. अशी ही प्रेमळ जोडी एकाच दिवशी निघून गेली.मयाराम यांची मागील काही महिन्यांपासून प्रकृती साथ देत नव्हती. त्यामुळे ते अंथरुणावरच पडून होते. पत्नी अंतकला ही मात्र शरीर स्वास्थ्याने बरी होती. खाटेवर पडलेल्या पतीची सेवा करण्यातच तिने धन्यता मानली होती. खाटेवर पडलेल्या मयारामला पत्नी अंतकला मोठी आधार होती. ही जोडी तुटेल अशी पुसटशी कल्पनाही घरच्यांसह शेजाºयांनासुद्धा नव्हती. परंतु म्हणतात ना जन्म-मृत्यू आपल्या हातचा नाही आणि तेच घडले. ध्यानीमनी नसताना एकाएकी गुरुवारी दुपारी पत्नीने पतीचा साथ सोडून मृत्यूला कवटाळले.पत्नीच्या मृत्यूची हालचाल पतीला लागली. तो पत्नी दु:खवियोगात पडला. पत्नीवर दुपारी अंतिम संस्कार करण्यात आले. स्मशान भूमितून सर्व लोक घरी आले व मयारामने त्याच दिवशी नेमकी तिच वेळ ४.२० साधून मृत्यूला कवटाळले. दोघाही पती-पत्नीचे अंतिम संस्कार शेजारीच करण्यात आले. पती-पत्नीच्या एक दिवसाच्या फरकाने नेमक्या सारख्या वेळेस मृत्यू झाल्याची घटना गावात प्रथमच घडल्याचे सांगीतले जाते. मात्र सज्ञान असलेला मुलगा गजानन अनाथ झाला.

टॅग्स :Deathमृत्यू