शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : नाद करायचा नाय! अभिषेक-गिलची विक्रमी भागीदारी; पाकसमोर पुन्हा टीम इंडियाची 'दादागिरी'
2
IND vs PAK : दोघांनी ठरवून पाकची जिरवली! मैदानात नेमकं काय घडलं? मॅचनंतर अभिषेकनं सगळं सांगितलं
3
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
4
IND vs PAK : "खूप मजा आली..." अभिषेकच्या आईसह बहीण कोमलनं उडवली शाहीन आफ्रिदीची खिल्ली (VIDEO)
5
'हवाई तळ सोडा, अफगाणिस्ताची एक मीटरही जमीन देणार नाही'; ट्रम्प यांच्या धमकीनंतर तालिबानने थोपटले दंड
6
IND vs PAK : ... अन् अभिषेक शर्मा पाकिस्तानी गोलंदाजाला भिडला! पंचांनी सोडवलं भांडण (VIDEO)
7
'पॅलेस्टाईनला मान्यता देऊन दहशतवादासाठी भेट दिलीत'; ब्रिटनच्या निर्णयावर भडकले नेतन्याहू
8
Sahibzada Farhan Celebration : पाक सलामीवीराचं 'नापाक' सेलिब्रेशन! सोशल मीडियावर उमटल्या संतप्त प्रतिक्रिया
9
कुणाचे लग्न थांबलं, कुणाच्या आईला अश्रू अनावर; ट्रम्प यांच्या H-1B व्हिसाच्या निर्णयाने भारतीय संकटात
10
टोळीयुद्धाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांची मोठी कारवाई; एका दिवसात ४३ गुंडांना पाठवले तुरुंगात
11
IND vs PAK मॅचमध्ये Fakhar Zaman च्या विकेटवरुन नवा वाद; नेमकं काय घडलं? (VIDEO)
12
'आमच्यातल्या टॅलेंटला घाबरतात म्हणून...'; ट्रम्प यांच्या एच१-बी व्हिसाच्या निर्णयावर पियुष गोयल यांची रोखठोक प्रतिक्रिया
13
IND vs PAK : हार्दिक पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO)
14
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
15
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
16
इस्रायलला मोठा धक्का; ब्रिटनसह ३ देशांची पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता
17
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
18
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
19
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
20
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...

पत्नीपाठोपाठ पतीचीही प्राणज्योत मालवली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2018 23:41 IST

जन्म-मृत्यू हा नैसर्गिक असून कोणाच्याही हाती नाही. सांसारिक जीवनाचा गाडा चालविताना पती-पत्नीची साथ महत्वपूर्ण असते. मात्र कमावता पती आजारी पडल्याने पत्नीने कुटुंबाचा भार उलचला असताना ध्यानीमनी नसताना पत्नीचा मृत्यू झाला. हा धक्का सहन न झाल्याने आजारी पतीनेसुद्धा, पत्नीचे अंत्यसंस्कार करून नातलग घरी येताच जीव सोडला.

ठळक मुद्देमुलगा झाला अनाथ : एका दिवसाच्या फरकाने सारख्या वेळेवर मृत्यू

लोकमत न्यूज नेटवर्कबोंडगावदेवी : जन्म-मृत्यू हा नैसर्गिक असून कोणाच्याही हाती नाही. सांसारिक जीवनाचा गाडा चालविताना पती-पत्नीची साथ महत्वपूर्ण असते. मात्र कमावता पती आजारी पडल्याने पत्नीने कुटुंबाचा भार उलचला असताना ध्यानीमनी नसताना पत्नीचा मृत्यू झाला. हा धक्का सहन न झाल्याने आजारी पतीनेसुद्धा, पत्नीचे अंत्यसंस्कार करून नातलग घरी येताच जीव सोडला.एकमेकांच्या सुख:दु:खात सहभागी होवून, काबाड-कष्ट करुन मुलाबाळांच्या सुखमय जीवनासाठी जन्मदात्यांची अविरत धडपड असते. घरचा कमवता गेल्या काही महिन्यांपासून प्रकृती बरी नसल्यामुळे खाटेवर पडला होता. कमावती पत्नी व एका अविवाहित मुलाने घर सांभाळला. अशातच एकाएकी पत्नी अंतकला गुरुवारी दुपारी ३.२० वाजता मृत्युमुखी पडली. तिच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार दुसऱ्या दिवशी शुक्रवारी (दि.६) दुपारी नातलगांच्या उपस्थितीत करण्यात आले. सर्व मंडळी घरी आली. दरम्यान इकडे अंथरुणावर पडलेला पती मयाराम यांची ४.२० वाजताच प्राणज्योत मालविल्याची घटना घडली. सर्व आप्तस्वकीय आलेलेच असल्याने मयारामच्या पार्थिवावर पत्नीच्या समाधीजवळच अंत्यसंस्कार उरकवण्याची दुर्दैवी पाळी येथील बारगसाडे कुटुंबावर आली. या पती-पत्नीच्या सलग मृत्यूमुळे गावात सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.बोंडगावदेवी येथे मयाराम मंगरु बारसागडे (६२), पत्नी अंतकला बारसागडे (५५) व एक अविवाहित मुलगा गजानन (२५) हे तिघेही राहत होते. दोघाही पती-पत्नीने स्वत:च्या अंगमेहनतीने काबाडकष्ट करुन दोन मुलींचा विवाह केला.पती-पत्नीच्या परस्परांवर असलेल्या प्रेमाने ते दोघेही गोडीगुलाबीने आपल्या कुटुंबाचा चरितार्थ चालवित होते. अशा या सुखी संसारावर काळाने घाला घातला. एकाच दिवशी पती-पत्नीवर अंतिम संस्कार होणे हा एक योगायोगच म्हणावा लागेल. आयुष्यात दोघांनीही कष्ट केले. दोघेही एकमेकांच्या सोबतीला राहत होते. अशी ही प्रेमळ जोडी एकाच दिवशी निघून गेली.मयाराम यांची मागील काही महिन्यांपासून प्रकृती साथ देत नव्हती. त्यामुळे ते अंथरुणावरच पडून होते. पत्नी अंतकला ही मात्र शरीर स्वास्थ्याने बरी होती. खाटेवर पडलेल्या पतीची सेवा करण्यातच तिने धन्यता मानली होती. खाटेवर पडलेल्या मयारामला पत्नी अंतकला मोठी आधार होती. ही जोडी तुटेल अशी पुसटशी कल्पनाही घरच्यांसह शेजाºयांनासुद्धा नव्हती. परंतु म्हणतात ना जन्म-मृत्यू आपल्या हातचा नाही आणि तेच घडले. ध्यानीमनी नसताना एकाएकी गुरुवारी दुपारी पत्नीने पतीचा साथ सोडून मृत्यूला कवटाळले.पत्नीच्या मृत्यूची हालचाल पतीला लागली. तो पत्नी दु:खवियोगात पडला. पत्नीवर दुपारी अंतिम संस्कार करण्यात आले. स्मशान भूमितून सर्व लोक घरी आले व मयारामने त्याच दिवशी नेमकी तिच वेळ ४.२० साधून मृत्यूला कवटाळले. दोघाही पती-पत्नीचे अंतिम संस्कार शेजारीच करण्यात आले. पती-पत्नीच्या एक दिवसाच्या फरकाने नेमक्या सारख्या वेळेस मृत्यू झाल्याची घटना गावात प्रथमच घडल्याचे सांगीतले जाते. मात्र सज्ञान असलेला मुलगा गजानन अनाथ झाला.

टॅग्स :Deathमृत्यू