शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंना 'सर्वोच्च' दिलासा, सुप्रीम कोर्टाकडून शिक्षेला स्थगिती; आमदारकीही जाणार नाही
2
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
3
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
4
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
5
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
6
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
7
Budh Gochar 2025: २०२५ ला निरोप देताना 'या' ७ राशींचे नशीब चमकणार, आयुष्यात येणार सुवर्णकाळ
8
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
9
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
10
KVP Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
11
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
12
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
13
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
14
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
15
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
16
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
17
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
18
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
19
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
20
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
Daily Top 2Weekly Top 5

पत्नीपाठोपाठ पतीचीही प्राणज्योत मालवली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2018 23:41 IST

जन्म-मृत्यू हा नैसर्गिक असून कोणाच्याही हाती नाही. सांसारिक जीवनाचा गाडा चालविताना पती-पत्नीची साथ महत्वपूर्ण असते. मात्र कमावता पती आजारी पडल्याने पत्नीने कुटुंबाचा भार उलचला असताना ध्यानीमनी नसताना पत्नीचा मृत्यू झाला. हा धक्का सहन न झाल्याने आजारी पतीनेसुद्धा, पत्नीचे अंत्यसंस्कार करून नातलग घरी येताच जीव सोडला.

ठळक मुद्देमुलगा झाला अनाथ : एका दिवसाच्या फरकाने सारख्या वेळेवर मृत्यू

लोकमत न्यूज नेटवर्कबोंडगावदेवी : जन्म-मृत्यू हा नैसर्गिक असून कोणाच्याही हाती नाही. सांसारिक जीवनाचा गाडा चालविताना पती-पत्नीची साथ महत्वपूर्ण असते. मात्र कमावता पती आजारी पडल्याने पत्नीने कुटुंबाचा भार उलचला असताना ध्यानीमनी नसताना पत्नीचा मृत्यू झाला. हा धक्का सहन न झाल्याने आजारी पतीनेसुद्धा, पत्नीचे अंत्यसंस्कार करून नातलग घरी येताच जीव सोडला.एकमेकांच्या सुख:दु:खात सहभागी होवून, काबाड-कष्ट करुन मुलाबाळांच्या सुखमय जीवनासाठी जन्मदात्यांची अविरत धडपड असते. घरचा कमवता गेल्या काही महिन्यांपासून प्रकृती बरी नसल्यामुळे खाटेवर पडला होता. कमावती पत्नी व एका अविवाहित मुलाने घर सांभाळला. अशातच एकाएकी पत्नी अंतकला गुरुवारी दुपारी ३.२० वाजता मृत्युमुखी पडली. तिच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार दुसऱ्या दिवशी शुक्रवारी (दि.६) दुपारी नातलगांच्या उपस्थितीत करण्यात आले. सर्व मंडळी घरी आली. दरम्यान इकडे अंथरुणावर पडलेला पती मयाराम यांची ४.२० वाजताच प्राणज्योत मालविल्याची घटना घडली. सर्व आप्तस्वकीय आलेलेच असल्याने मयारामच्या पार्थिवावर पत्नीच्या समाधीजवळच अंत्यसंस्कार उरकवण्याची दुर्दैवी पाळी येथील बारगसाडे कुटुंबावर आली. या पती-पत्नीच्या सलग मृत्यूमुळे गावात सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.बोंडगावदेवी येथे मयाराम मंगरु बारसागडे (६२), पत्नी अंतकला बारसागडे (५५) व एक अविवाहित मुलगा गजानन (२५) हे तिघेही राहत होते. दोघाही पती-पत्नीने स्वत:च्या अंगमेहनतीने काबाडकष्ट करुन दोन मुलींचा विवाह केला.पती-पत्नीच्या परस्परांवर असलेल्या प्रेमाने ते दोघेही गोडीगुलाबीने आपल्या कुटुंबाचा चरितार्थ चालवित होते. अशा या सुखी संसारावर काळाने घाला घातला. एकाच दिवशी पती-पत्नीवर अंतिम संस्कार होणे हा एक योगायोगच म्हणावा लागेल. आयुष्यात दोघांनीही कष्ट केले. दोघेही एकमेकांच्या सोबतीला राहत होते. अशी ही प्रेमळ जोडी एकाच दिवशी निघून गेली.मयाराम यांची मागील काही महिन्यांपासून प्रकृती साथ देत नव्हती. त्यामुळे ते अंथरुणावरच पडून होते. पत्नी अंतकला ही मात्र शरीर स्वास्थ्याने बरी होती. खाटेवर पडलेल्या पतीची सेवा करण्यातच तिने धन्यता मानली होती. खाटेवर पडलेल्या मयारामला पत्नी अंतकला मोठी आधार होती. ही जोडी तुटेल अशी पुसटशी कल्पनाही घरच्यांसह शेजाºयांनासुद्धा नव्हती. परंतु म्हणतात ना जन्म-मृत्यू आपल्या हातचा नाही आणि तेच घडले. ध्यानीमनी नसताना एकाएकी गुरुवारी दुपारी पत्नीने पतीचा साथ सोडून मृत्यूला कवटाळले.पत्नीच्या मृत्यूची हालचाल पतीला लागली. तो पत्नी दु:खवियोगात पडला. पत्नीवर दुपारी अंतिम संस्कार करण्यात आले. स्मशान भूमितून सर्व लोक घरी आले व मयारामने त्याच दिवशी नेमकी तिच वेळ ४.२० साधून मृत्यूला कवटाळले. दोघाही पती-पत्नीचे अंतिम संस्कार शेजारीच करण्यात आले. पती-पत्नीच्या एक दिवसाच्या फरकाने नेमक्या सारख्या वेळेस मृत्यू झाल्याची घटना गावात प्रथमच घडल्याचे सांगीतले जाते. मात्र सज्ञान असलेला मुलगा गजानन अनाथ झाला.

टॅग्स :Deathमृत्यू