शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली ब्लास्ट : रोहतकची डॉक्टर प्रियंका शर्मा अनंतनागमधून ताब्यात, कुटुंबीयांनी काय सांगितंल?
2
ब्रेकिंग! मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईचा गॅस पुरवठा खंडित; पाईपलाईनचे मोठे नुकसान, घरगुती गॅस बंद, CNG स्टेशनवर तुटवडा
3
सैन्यभरतीसाठी गेलेल्या तरुणांच्या मोटरसायकलला उसाच्या ट्रकची धडक; दोघांचाही जागीच मृत्यू
4
भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज मॅच! वैभव सुर्यवंशीचा संघ ढेपाळला; एका मागोमाग एक १० विकेट, झालेत इतकेच रन्स...
5
मोठी बातमी! लाल किल्ला स्फोटाची जबाबदारी टीआरएफने स्वीकारली; 'पहलगाम' हल्ल्याशी जोडले स्फोटाचे धागेदोरे
6
दिल्ली ब्लास्ट प्रकरणात NIA ची मोठी कारवाई, उमरच्या जवळच्या सहकाऱ्याला अटक; याच्याच नावावर होती i-20 कार
7
'विशेष मतदार यादी सुधारणा' प्रक्रियेच्या कामाच्या ताणामुळे बीएलओ अधिकाऱ्याने आयुष्य संपविले; कर्मचारी वर्गात संताप
8
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार! 'मिशन कॅबिनेट'ची तयारी पूर्ण; मुख्यमंत्री कोणाचा होणार यावर मात्र...
9
तेजस्वी यांनी पराभवासाठी बहीण रोहिणीला ठरवलं जबाबदार; फेकली होती चप्पल? अशी आहे संपूर्ण इनसाइड स्टोरी!
10
पाकिस्तानच्या गोळीबार गमावला पाय; आता 'गौरी'ला मिळाले नवीन आयुष्य
11
दिल्ली ब्लास्टचे बांग्लादेश कनेक्शन उघड; मुर्शिदाबाद मार्गे भारतात आणली स्फोटके
12
युरोपने केलेली 'ही' मोठी चूक अमेरिकेला ३० वर्षांत गरीब करेल; जे पी मॉर्गनचा इशारा
13
तेजस्वी यादवांच्या अन्य तिन्ही बहिणींनी पाटणाचे घर सोडले; मोठ्या बहिणीनंतर...
14
मी दिलेला '२५ जागांचा शाप' खरा ठरला!; तेजस्वी यादवांनी तिकीट नाकारले तेव्हा रडणाऱ्या नेत्याचा दावा 
15
तेजप्रताप यादवांचा राज्यातील NDA सरकारला पाठिंबा; रोहिणी आचार्य यांना मोठी जबाबदारी देणार
16
रशिया आणि युक्रेनमध्ये मोठा करार होणार, राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींनी केली घोषणा; म्हणाले...
17
“जो जीता वही सिकंदर, पण सिकंदर बनायचे राज समजू शकले नाही”; बिहार निकालावर उद्धव ठाकरे बोलले
18
"सुन लो जयचंदों...! माझ्या वडिलांनी एक इशारा दिला तर...!", रोहिणी आचार्य वादावरून तेजप्रताप भडकले
19
राहुल गांधींमुळे काँग्रेसच्या तरुण खासदारांचे भविष्य धोक्यात; PM मोदींचा घणाघात...
20
लालूप्रसाद यादवांना निकामी किडनी दिली; तेजस्वी यादव अन् बहीण रोहिणी आचार्य यांच्यात तू तू मै मै, चप्पलफेक...
Daily Top 2Weekly Top 5

१९१ ग्रामपंचायतींवर प्रशासक येणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2020 05:00 IST

कोरोना आजारामुळे राज्यात उद्भवणारी परिस्थिती लक्षात घेऊन ग्राम विकास विभागाने कोरोना संपेपर्यंत ग्रामपंचायतीच्या निवडणुका न घेण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे जिल्ह्यातील १९१ ग्रामपंचायतींची मुदत जुलै ते डिसेंबर या कालावधीत संपत असल्याने या ग्रामपंचायतीवर प्रशासक नियुक्त केले जाणार आहे. जिल्ह्यात एकूण ५४५ ग्रामपंचायती असून यापैकी १९१ ग्रामपंचायतीचा पाच वर्षांचा कालावधी पूर्ण होत आहे.

ठळक मुद्दे३८ विस्तार अधिकाऱ्यांवर जबाबदारी : शासनानचे पत्र प्राप्त झाल्यानंतर अंमलबजावणी

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : कोरोना विषाणूमुळे उद्भवणाºया संसर्गजन्य आजाराने आरोग्यविषयक आपत्कालीन परिस्थिती साथरोग अधिनियम १९९७ ची सुरू झालेली अंमलबजावणी आणि राज्यात साथरोगाचा प्रादुर्भाव प्राधान्याने रोखण्यासाठी आवश्यक उपाययोजना केल्या जात आहे. याच अनुषंगाने राज्यातील प्रस्तावित निवडणुकांमध्ये वाढणारी तीव्र जोखीम लक्षात घेता कोरोना संपेपर्यंत शासनाने ग्रामपंचायत निवडणुका पुढे ढकल्या आहेत. गोंदिया जिल्ह्यातील ५४५ पैकी १९१ ग्रामपंचायतीची निवडणूक जुलै ते डिसेंबर या कालावधीत संपत असल्याने या ग्रामपंचायतींवर प्रशासक नियुक्त करण्याची तयारी जिल्हा परिषदेने सुरू केली आहे. शासनाचे पत्र प्राप्त होताच याची अंमलबजावणी केली जाणार आहे.कोरोना आजारामुळे राज्यात उद्भवणारी परिस्थिती लक्षात घेऊन ग्राम विकास विभागाने कोरोना संपेपर्यंत ग्रामपंचायतीच्या निवडणुका न घेण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे जिल्ह्यातील १९१ ग्रामपंचायतींची मुदत जुलै ते डिसेंबर या कालावधीत संपत असल्याने या ग्रामपंचायतीवर प्रशासक नियुक्त केले जाणार आहे. जिल्ह्यात एकूण ५४५ ग्रामपंचायती असून यापैकी १९१ ग्रामपंचायतीचा पाच वर्षांचा कालावधी पूर्ण होत आहे.जुलै महिन्यात २० ग्रामपंचायतीचा कालावधी संपत आहे. ऑगस्ट महिन्यात १४४ ग्रामपंचायतीच्या कालावधी संपत आहे.सप्टेंबर महिन्यात २१ ग्रामपंचायतीचा कालावधी, नोव्हेंबरमध्ये सहा ग्रामपंचायतीच्या कालावधी अशा एकूण १९१ ग्रामपंचायतीचा कालावधी संपत आहे.त्यामुळे या ग्रामपंचायतीची निवडणूक सद्या घेण्यात येणार नाही. परंतु पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यामुळे या ग्रामपंचायतींवर प्रशासक नियुक्त केला जाणार आहे. गोंदिया तालुक्यातील ३८ ग्रामपंचायत, तिरोडा तालुक्यातील २०, आमगाव २२, सालेकसा ९, देवरी २९, गोरेगाव २६, सडक-अर्जुनी १९,अर्जुनी-मोरगाव २९ अशी एकूण १९१ ग्रामपंचायतीची निवडणूक होणार नाही. त्यामुळे पंचायत समिती स्तरावरील विस्तार अधिकारी यांना ग्रामपंचायतीच्या प्रशासक म्हणून नियुक्ती केली जाणार आहे.गोंदिया जिल्ह्यातील १९१ ग्रामपंचायतींवर प्रशासक म्हणून बसविण्यासाठी विस्तार अधिकाऱ्यांची संख्याही मोठी असायला पाहिजे होती.परंतु गोंदिया जिल्ह्यात फक्त ३८ विस्तार अधिकारी असल्यामुळे एकऐका विस्तार अधिकाऱ्यावर पाच ते सहा ग्रामपंचायतीचा भार येणार आहे.सहा महिन्यात १४३१४ ग्रामपंचायती संपेल मुदतमहाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांतील ग्रामपंचायतींवर नजर टाकल्यास आतापासून डिसेंबर २०२० पर्यंत १४ हजार ३१४ ग्रामपंचायतींची मुदत संपणार आहे. त्यात नागपूर विभागातील १५२५ ग्रामपंचायती, कोकण ८१३, पुणे २ हजार ८८५, अमरावती २ हजार ४७३, नाशिक २ हजार ५०६ व औरंगाबाद ४ हजार ११२ ग्रामपंचायतीची मुदत संपणार आहे.सरपंचानाच संधी द्याकोरोना विषाणूचा संसर्ग लक्षात घेता गावस्तरावर सरपंचांनी उत्तम कामे केलीत. कोरोनाचा कालावधी त्यांना काम करण्यासाठी कमी पडल्यामुळे निवडणूक होईपर्यंत योद्धा असलेल्या सरपंचांना सदर ग्रामपंचायती सांभाळण्याचा अधिकार द्यावा. शासनाने निवडणूक कालावधी संपणाऱ्या ग्रामपंचायतीवर प्रशासक नियुक्त न करता मुदत संपलेल्या ग्रामपंचयतीच्या सरपंचानाच कारभार सांभाळण्याची मूभा द्यावी, अशी मागणी जिल्हा परिषदेचे विरोधी पक्ष नेते तथा जि.प.सदस्य गंगाधर परशुमकर यांनी केली आहे.

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायत